मनाचं घर
घर मोठं असण्यापेक्षा,
मन मोठं असणं महत्त्वाचं असतं.
शब्द गोड असण्यापेक्षा,
भावना खरी असणं सुंदर असतं.
नाती रक्ताची असतीलच असं नाही,
जिव्हाळ्याने जोडलेली माणसंही आपलीच असतात.
सुखात साथ देणारे अनेक भेटतात,
पण दुःखात हात धरणारेच खरे आपले असतात.
जीवन फार मोठं नाही,
म्हणून प्रत्येक क्षण प्रेमाने जगा...
कारण शेवटी आठवणीत राहतात
फक्त आपली माणसं आणि त्यांच्यावर केलेलं प्रेम.
समाप्त....
लेखिका: रोहिणी