good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

good Quotes, often spoken by influential individuals or derived from literature, can spark motivation and encourage people to take action. Whether it's facing challenges or overcoming obstacles, reading or hearing a powerful good quote can lift spirits and rekindle determination. good Quotes distill complex ideas or experiences into short, memorable phrases. They carry timeless wisdom that often helps people navigate life situations, offering clarity and insight in just a few words.

good bites

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
# *आला बैलांचा सण*

*आज वाढबैल व उध्या पोळा..*
-------------------------------------------

श्रावण महिन्याच्या शेवटच्या अमावस्येला (पिठोरी अमावस्या) हा सण जगाचा पोशिंदा बळीराजा साजरा करतो.

महाराष्ट्रात हा सण वेगवेगळ्या ठिकाणी वेगळा साजरा केला जातो.विदर्भात पिठोरा (बैल पोळा)साजरा होतो.
या दिवशी, बैलांचा फार मोठा थाट असतो. या दिवशी त्यांना कामापासुन आराम असतो.आजच्या दिवशी बैलांना चाबुक अजिबात वापरण्यात येत नाही.

*पोळ्याच्या आदल्या दिवशी बैलांना आमंत्रण (आवतण) देण्यात येते.त्याला खांदेमळणी म्हणतात त्यांना नदीवर/ओढ्यात नेउन धुण्यात येते. नंतर चारुन आणण्यात येते. या दिवशी बैलाच्या खोंडाला (मान व शरीराचा जोड-खांदा) हळद व तुपाने किवा लोण्याने (सध्या महागाईमुळे तेलाने पण सध्या तेल पण महाग झाले आहे ) शेकल्या जाते.*

आणी

आमंत्रित केल्या जाते

*आज आवतण घे*
*उध्या जेवायला ये*

शेतकरी राजांना बैल पोळ्याच्या मनापासून
खूप खूप शुभेच्छा

☪︎ ☪︎ ☪︎ ☪︎

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" हल्लीचे किर्तनकार "
-------------------------------
??राम कृष्ण हरि ??
????????
जेथे किर्तन करावे ॥ तेथे अन्न न सेवावे ||१||
बुका लावू नये भाळा ॥ माळा लावू नये गळा ||२||
तट्टा वृषभासी दाणा ॥ तृण मागो नये जाणा ||३||
तुका म्हणे द्रव्ये घेती ॥ देती ते दोही नरका जाती ||४||
????????
भावार्थ:- अशा प्रकारे संत तुकोबारायांनी आपल्या अनेक अभंगातुन कथाकार,किर्तनकार,व्याख्यानकार यांच्यावर आसुड ओढले आहेत.परंतु हे किर्तनकार मुद्दामहुन तुकोबाच्या अशा अभंगाकडे दुर्लक्ष करतात.एकीकडे तुकोबाचे वारसदार,वारकरी संप्रदायाचे वारसदार असल्याचा आव आणतात आणि पद्धतशीरपणे जनतेला लुबाडण्याचे धंदे करतात.
३५० वर्षापुर्वी तुकोबांनी लिहुन ठेवलेले अभंग हे अशा महाराज लोकांसाठी झणझणीत अंजन आहेत.परंतु आजही आम्हाला खरे तुकोबाराय समजलेच नाहीत.हे आमचे दुर्दैव आहे.सत्यनारायण कथेची पुजा करण्यापेक्षा घरोघर तुकोबाच्या गाथेची पारायणे व्हायला हवीत तरच समाज जागृती घडेल अन अशा भोंदू किर्तनकारापासुन भोळाभाबडा समाज दुर राहील.आणि तुकाराम महाराजांनी भक्तासाठी स्वतःचे आयुष्य सार्थकी घातले असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
??शुभ सकाळ ??

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

#####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

####Good night!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*आज महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराजांची जयंती...*

श्रावण कृष्णाष्टमी, शके ११९७ (इ.स. १२९५) ला म्हणजेच श्री कृष्ण जन्माष्टमीला विठ्ठलपंत व रूक्मीणी मातेच्या पोटी कृष्णनामे पावन असणाऱ्या वारकऱ्यांच्या घरात ज्ञानोबारायांचा जन्म झाला.

ज्ञानोबाराय हा महाराष्ट्राच्या जिवनधर्माचा आधार आहे. ज्यांना तत्त्वज्ञान ऐकण्याचाही अधिकार नव्हता त्यांना तत्वज्ञान सांगण्याचा अधिकार माऊलींनी मिळवून दिला. ज्यांना मोक्षाचा अधिकारच नव्हता त्यांच्यासाठी माऊलींनी 'मुक्तीची गंवादी' घातली.

कुळ-जात-वर्ण यांचा अभिमान मोडीत काढून पंढरीला आध्यात्मिक लोकशाहीची राजधानी बनवणारे प्रवर्तक म्हणजे श्री ज्ञानोबाराय महाराज. संस्कृत वगळता इतर प्रादेशिक भाषेत गितेवर भाष्य लिहण्याचा पहिला मान ज्ञानोबारायांचाच आहे. वारकरी संप्रदायाला 'ज्ञानेश्वरी' हा प्रमाण ग्रंथ दिला. त्यामुळं मराठी समृद्ध झाली.

महाराष्ट्राला गितेच्या चौकटीत विचार करायची सवय लावली त्यामुळे गितेवरील सर्वाधिक भाष्ये मराठीत लिहली गेली. ते भक्तीचे आचार्य आहेत... प्रेमाचे आचार्य आहेत.
भक्ती -भाषा- संस्कृती- लोकव्यवहार यावर सदगुरू ज्ञानोबारायांचे अनंत उपकार आहे.

*ज्ञानाबाई माझी अनाथाची माय !*
*एका जनार्दनी पाय वंदितसे!!....*

*!! जय माऊली!!*

?

###Good night!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

*श्री संत सेना महाराज**पुण्यतिथी*
----------------------------------------------

आज श्रावण वद्य द्वादशी संत सेना महाराज पुण्यतिथी.

वैशाख वद्य द्वादशी रविवार विक्रम सवंत १३५७ यादिवशी देवीदास व प्रेमकुवंरबाई या मातापित्याना पुत्र रत्न झाले बाधंवगङ येथे तेच सेना महाराज,त्यांचे वडील हे श्री ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांचे गुरुबंधु होते.
श्री रामानंदस्वामी हे त्यांच्या गुरुंचे नाव होते.
बालपणापासून सेना यांना परमेश्वरभक्तीची आवड होती. त्यांच्या वडिलांनी त्यांना नाभिक व्यवसाय शिकवला होता.तो व्यवसाय करीतच ते पांडुरंगाचे भजन-किर्तन करीत.साधुसंत हे
नेहमी सेना यांच्या घरी येत असत.त्या संताची ते सेवा करीत.वडिलांप्रमाणे त्यांनीही रामानंदस्वामी यांचे शिष्यत्व पत्करले.सेना यांची भक्ति,आचरण,ज्ञान पाहून
रामानंदस्वामी यांनी त्यांना सामाजिक समत भक्तिमार्गात आणण्याचे कार्य करण्यास सांगितले.गुरुआज्ञाने त्यांनी ती महत्वाची कामगिरी केली.

लोकांची दाढी-डोई करण्यात ते प्रवीण
होते.त्यांच्या हाताला मृदुमुलायम स्पर्श होता.त्यामुळे शरीराचा दाह कमी होते असे.लोक सेना यांच्याकडे हजामत करवून घेण्यासाठी येत होते,तसेच त्यांच्या भजन-किर्तनालाही गर्दि करीत होते.सेना यांची किर्ती बादशहाच्या कानी गेली.त्याने सेना यांना बोलावून घेतले व आपल्याकडे नोकरीला ठेवले.

एकदा सेना महाराज हे पांडुरंगाची पुजा करीत बसले होते.बादशहाकडून तीन-चार बोलावणी आली."ते घरात नाहीत,"असेच प्रत्येक वेळी त्यांच्या पत्नीने सांगितले. परंतु त्यांच्या दुष्ट शेजाऱ्याने लगेच जाऊन बादशहाला कळविले की,"सेना न्हावी घरात देवपूजा करीत बसला आहे.त्याच्या बायकोनं तो घरात नसल्याचं खोटं सांगितल."ते एकून बादशहास क्रोध आला.सेनानी त्याने मोट बांधून त्याला नदिच्या उसळ्त्या प्रवाहात टाकून देण्याची सेवकांना आज्ञा केली.तेव्हा पांडुरंग सेना न्हावी यांचे रुप घेऊन बादशहासमोर गेला.त्याला पाहताच
बादशहाचा राग शांत झाला व तो हजामत करण्यास बसला.हजामत करीत असताना बादशहा मान खाली करी त्या वेळी रत्नखचित
वाटीतील तेलात बादशहाला पांडूरंगाचे प्रतिबिंब दिसे,वर पाहिले की,समोर सेना न्हावी दिसू लागे.वाटीतील ते रुप पाहून
बाद्शहा अगदी मोहित झाला.त्याचे देहभान हरपले. हजामत झाल्यावर बादशहाने त्याला ओंजळभर सोन दिले. पांडुरंगाने ते धोकटीत
ठेवून,ती धोकटी सेना न्हावी यांच्या घरी नेऊन
ठेवली,आणि आपण गुप्त झाले.

बादशहाला ते ईश्वरी स्वरुप पाहण्याची ऒढ
लागली.दोन प्रहरी त्याने सेना न्हावी यांना बोलावून घेतले. त्याला पाहताच त्याने
ती सकाळची वाटी आणविली. म्हणाला,
"सकाळी मला या वाटीत ते चतुर्भुज रुप दिसत होते,ते मला पुन्हा दाखव".बादशहाचे हे उदगार ऎकून सेना विस्मित झाले.
प्रात:काली बादशहाला जे रुप दिसले तसे पुन: दोन प्रहरी दिसेना.तेव्हा आपल्या रुपाने पांडुरंग आला असाव असे समजून त्याने पांडुरंगाचा धावा केला.तेव्हा बादशहाला पुन:ते रुप दिसले.नंतर सेना यांना आपल्या धोकटीत धन दिसले.ह्या चमत्कारामुळे
बादशहा विरक्त होऊन श्रीहरीचे भजन करु लागला.सेना महाराजाना आनंद झाला.
सेना महाराज यांनी मध्य भारतातील अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले; नंतर त्यांनी पंढरपुरात वास्तव्य केले.
एका हिंदी भाषिक संतांची मराठी भक्तीरचना वाचताना महाराष्ट्र्रातील भक्तांना जरासुध्दा वेगळेपण जाणवत नाही. ज्ञानेश्र्वर, तुकारामा इतकेच संत सेना महाराजांना श्रेष्ठ अधिकारी मानले जाते.संत सेना महाराजांचे अभंग
मोठया आवडीने आजतागायत गायले जात आहेत. संतांना प्रदेश,भाषा,जातपात यांच्या मर्यादा नसतात हेच यावरुन सिध्द होते.
अतीशय उच्च विचार सरनी व पंढरीनाथावर निष्टा असनारे हरिभक्त संत सेना महाराज जन्मले महाराष्ट्राबाहेर व घङले महाराष्ट्रीय संताच्या सहवासात अशी त्याची जिवन यात्रा अखेर पर्यंत चालु राहीली बर्याच दिवसानंतर ते जन्मभूमीकङे सर्वाचा निरोप घेऊन जायला निघाले जिथ जन्मलो त्या मातीची ओढ लागली होती त्याच्या पुनरागमनानतंर बाधंवगङला पुनरवैभव प्राप्त झाले .
दिवसभर घरातच चितंनात मग्न राहीले दुसरा दिवस उजाडला कुनाशीही न बोलता धोकटी खुटीला अङकवून तिथच श्रीविठ्ठलाचे नामस्मरण करत करत समाधी लागली व कुङीतील आत्मतत्त्व अंनंतात विलीन झाले.
तो दिवस श्रावण वद्य द्वादशी सेनामहाराज पुण्यतिथी दिन.

--------------------------

? ? ?

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
सुविचारधन
----------------

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
* संताची अभंग वाणी *