good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

good Quotes, often spoken by influential individuals or derived from literature, can spark motivation and encourage people to take action. Whether it's facing challenges or overcoming obstacles, reading or hearing a powerful good quote can lift spirits and rekindle determination. good Quotes distill complex ideas or experiences into short, memorable phrases. They carry timeless wisdom that often helps people navigate life situations, offering clarity and insight in just a few words.

good bites

#######Good earlier morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐ अमृत-वाणी * अभंग तुकारामाचे ॐ
-----------------------------------------------------------
*अभंग*
नेञ झाकोनिया काय जपतोसी ! जव नाही मानसी प्रेमभाव !!
ऊघडा मंञ जाणा रामकृष्ण म्हणा ! तुटती यातना गर्भवास !!
मंञयंञ काही करीसी बुटबुटी ! तेणे भुतसृष्टी पावशील !!
सार तुका जपे बिज मंञ एक ! भवसिंधू तारक रामकृष्ण !!
??संत तुकोबारायांनी जे ढोंगी बुवा बाबा साधू लोक आहेत,त्यांचे वर टिका तर केलीच परंतु त्यांच्या तपसाधना,त्यांचे गुरूमंञ यावरही हल्ले चढवले आहेत.सदरील अभंगात वारकरी संप्रदायाचा गुरूमंञ हा कसा सोपा आणि भवतारक आहे ते तुकोबारायांनी पटवुन सांगीतले आहे.ईतर कुठल्याही ऊपासना किंवा मंञतंञ जपतप करण्याची गरज नाही असे सदरील अभंगातुन तुकोबारायांनी सांगीतले आहे.
संत तुकोबाराय म्हणतात की,डोळे बंद करून ध्यानाला बसुन,हातात माळ घेऊन कशाचा जप करतोस.जर मनात प्रेमभावच नाही,देवाबददल भक्तीभावच नाही.मनात वाईट विचार भरलेले आहेत.मन विषय वासनेने बरबटलेले आहे तर या माळेचा जप करण्याचा काय फायदा.या पेक्षा साधा,सोपा ऊघड असलेला वारकरी संप्रदायाचा गुरूमंञ रामकृष्ण हरी हा जो आहे तो जपा.या मंञजपाने सर्व यातना,दु:खे नाहीशी होतात.या मंञाने मुक्ती मिळेल.पुढे तुकोबाराय म्हणतात की,मंञ,तंञ,जप तप हे जे काही तुम्ही तोंडाने बुट बुट करताय ना हे सगळे चुकीचे आहे.या ऊपासनेने काहीही फायदा नाही.याच्या जपाने तुम्ही भुतसृष्टीत जन्म घ्याल.
शेवटच्या कडव्यात तुकोबाराय म्हणतात की,मी स्वत: हा बिजमंञ,गुरू मंञ याचा जप करतो.या भवसागरातुन मुक्तता मिळवण्याची,या भवसिंधुतून तरून जाण्याची ताकत या वारकरी संप्रदायाच्या नाममंञात आहे.
थोडक्यात संत तुकोबारायांचा हा नामपर अभंग आहे.या अभंगातुन वारकरी संप्रदायाच्या नाममंञाचे महत्व तुकोबारायांनी प्रतिपादन केले आहे.ईतर सर्व ऊपासना,जपतप हे सर्व थोतांड आहेत.त्यापासुन काहीही फायदा होणार नाही.तुम्ही कितीही जपमाळ करा.परंतु मनातील विषयभावनाच संपल्या नसतील तर सर्व जपतप बिनकामाचे आहेत असे तुकोबारांयानी सांगीतले आहे...!!
|| जय जय रामकृष्ण हरी ||
प्रस्तुतीः मच्छिंद्र माळी , पडेगांव,औरंगाबाद.


?????

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
$$$ सकाळ विशेष !

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

####Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
" अभंग वाणी संताची "
-------------------------------
*****************************
नको मुर्ती सोंग | जे आहे ते दावा अंग ||१|
आम्ही लेकुराळे दास | का वैरी वाटे तुम्हास ||२||
दाता घेता भेटी | मनी पाहे खरे खोटी ||३||
दिपा म्हणे तु जाणता | तरी का रे अजाणता ||४||

अर्थ:- पांडुरंगाला साष्टांग स्वरुपी येण्यासाठी केलेल्या विनंती बद्दल सांगताना सांगावेसे वाटते की, "आता हे मुर्तित असलेलं सोंग नको, जे आहे ते तुम्ही साष्टांग दाखवा. ||१|| अहो, आम्ही तर तुझे लेकरा समान तुझेच भक्त आहोत. तुम्हाला आम्ही काय तुझे वैरी वाटत आहे का? ||२|| अहो, दाता आणि घेता समोरासमोर आल्यावर हट्टाचा प्रसंग निर्माण होणारच आणि तुम्ही तुमच्या मनाला विचारुन पहा आमचा हट्ट योग्य आहे की नाही. ||३|| देवा, भक्तांचे भाव तर तुम्ही एका नजरेत ओळखता, मग आडाण्या सारखे वागता कशाला? "||४||
*****************************
रचना आणि भावार्थ:- श्री संदिप पांडव

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*** पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा ***
------------------------------------------------------