माझं माझं म्हणता म्हणता तु काय कमावलंस,
गर्वाने मन मात्र तुझं सदा भरलेलं.
तेव्हा जोडली असती माणसे तु,
तर आज चिता तुझी जळत असताना देखील,
कोणी तरी वाट पाहत राहील असत.
गेले तुला सोडून सारे, एकटाच जळत राहिलास..
एक दिवस आठवण काढतील, त्या नंतर तु आठवणीतुन निघून जाशील..
नको असा गर्वाने वागु माझं नाही आपलं म्हणुन जग..
नाही तर जिवंतपणीच, मरणाची लागेल धग..