महाराष्ट्राचे खांन - पान
विश्वास नसेल तर करून घ्या खात्री;
रश्श्या बरोबर होऊन जाऊ दे एक
छानशी भाकरी.
गरमा-गरम उकडीचे मोदक खाऊन
तर पहा;
प्रेमात नाही पडलास तर मग पहा.
पाणीपुरीचे तिखट पाणी;
तू खाऊनच गाशील गाणी.
खुसखुशीत शंकरपाळ्या;
आवडली तर वाजवा टाळ्या.
कोल्हापूरची झणझणीत मिसळ;
ती खाऊनच तू कधी नाही विसर.
पुरणपोळी वर केवढं तूप;
तुला आवडेलच ती खूप.
मस्त तळलेली अळूवडी;
तू खाशीलच ती घडी-घडी.
पुलाव आहे मसालेदार;
आणि सोलकडी आहे थंडगार.
मुंबईचा मोठा वडापाव;
तू नक्कीच मारशील ताव...
एकदा महाराष्ट्रात येऊन तर बघ;
जातोस कसा ते बघते मी मग!
© Simran Ugavekar