कुठलीही गोष्ट
आयुष्यभर सोबत कधीच राहू शकत नाही
कधी न कधी ती सुटतेचं
सोबत राहतात त्या आठवणी
अन् त्यातून भेटलेल्या शिकवणी
आयुष्य नेहमी वेग वेगळी वळणं घेत राहतं
त्या वळणावर आपण किती टिकून राहतो
ते महत्त्वाचं असतं
आयुष्यभर सोबत राहण्याची वचनं देणारा जोडीदार सुद्धा
कधी न कधी अर्ध्या वळणात एकट्याला सोडून दूर कुठेतरी निघून जातोच ना?
त्याने जगणं थांबत का?
तसचं परिस्थितीच देखील आहेच!
आज काही गोष्टी सोडाव्या लागल्या त्याने जीवनचं संपल अस तर म्हणता येणार नाही!
हे आयुष्य आहे इथे प्रत्येक व्यक्तीची एक सुंदर कहाणी आहे
फक्त त्यातील पात्र आणि घटना रहस्य आहे त्या वेळ आल्या की समजतातच!