अशावेळी आपणचं आपल्या मनाला आवरायचं असतं
गंध आवडला फुलाचा म्हणुन फुल मागायचं नसतं
अशावेळी आपल्या मनाला आपणचं आवरायचं असतं....
परक्यापेक्षा आपलीचं माणसं आपल्याला नेहमी दगा देतात,
एकमेकांच्या पाठीवर मग नजरे आडुन होतातं वार,
भळभळणाऱ्या जखमेतून विश्वास घाताचं रक्त वाहतं,
छिन्नविछीन्न जखमेला तेव्हा आपणचं पुसायचं असतं
अशावेळी आपल्या मनाला आपणचं आवरायचं असतं
आपलं सुख पाहण्याचा तसा प्रत्ये
काला अधिकार आहे,
पण दुसऱ्याला मारुन जगणं हा कुठला न्याय आहे,
माणूस म्हणुन माणसावर खरं प्रेम करायचं,
आपल्यासाठी थोडं दुसऱ्यासाठी जगायचं,
जगण्याचं हे ध्येयं मनात आपणचं बनवायचं असतं,
अशावेळी आपणचं आपल्या मनाला आवरायचं असतं.