good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

good bites

###Good morning !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
*?वारकरी पुष्प*?

*मानवी जीवनात अनेक ऋषीमुनीं व संतानी सर्वांचा अध्यात्मिक, शारीरीक व समाधानी वृत्तीची उन्नती होण्यासाठी योग विद्याचे महत्व सांगितले*.
*ब्रम्हदेवाच्या हुंकारातुन आणि ऋषीमुनींच्या ॐकारातुन तयार झालेली वैदिक संस्कृती आणि या संस्कृतीनी जगाला दिलेली अमुल्य देणगी म्हणजे योग विद्या.*
*आत्म्याकडुन परमात्म्याकडे नेणारी तन मनाशी निगडीत साधना म्हणजे योगविद्या*
*हा वैभवशाली आणि गौरवसंपन्न वारसा म्हणजे योगविद्या*
*कर्तव्यांची पुर्तता करण्याचे साधन म्हणजे शरीर आणि शरीर स्वास्थ्य निरोगी ठेवण्यासाठी योगाचा अभ्यास करणे आवश्यक आहे*
*आज जागतिक योग विद्या दिवस या योग दिना निम्मित्त*
*आपणा सर्वांना संपन्न, समाधानी आणि निरामय आयुरारोग्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना*
*??रामकृष्णहरि*??

***** || जय जय रामकृष्ण हरि || *****
###Good morning!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
विठ्ठल हा चित्तीं |
गोड लागे गातां गीतीं ||१||

आम्हां विठ्ठल जीवन |
टाळ चिपळ्या धन ||ध्रु||

विठ्ठल हे वाणी |
अमृत हे संजिवनी ||२||

रंगला या रंगें |
तुका विठ्ठल सर्वांगें ||३||

?रामकृष्ण हरि?

###$$##Good morning !!
ॐॐॐॐशुभ उषाःकाल !!!!?
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

" बोधकथा " *** समाधान ***
----------------

*!! सुमंगल सुप्रभात !!*

?###Good morning
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .


*समाधान*

एक श्रीमंत सावकार होते ,अलोट संपत्ती होती,पुढील सातपिढ्या जरी बसून खाल्या तरी संपणार नाही एवढी संपत्ती मिळवली होती,तरी पण हा श्रीमंत सुखी नव्हता . मनात काहीतरी विवंचना होती त्यामुळे रात्रभर झोप यायची नाही त्यामुळे खऱ्या सुखाला तो वंचित झाला होता.

त्याने प्रत्येकाला विचारावे मी काय करू म्हणजे या विवंचनेतून मी सुटेन आणि मला सुखाची झोप लागेल ! त्याला कोणीतरी सांगितले तू संताना शरण जा म्हणजे संतचं यातून तुला सोडवतील .

श्रीमंत संतांच्या शोधार्थ निघाला वाटेत एका झाडाखाली एक साधु महाराज बसले होते त्याना नमस्कार करून श्रीमंत म्हणाला महाराज मला काहीही कमी नाही पुढील सात पिढ्या बसुन खातील एवढं मिळवलं आहे तरी मी सुखी नाही, एक विवंचना मला झोप येवु देत नाही त्यामुळे मी सुखी नाही.

साधु महाराज म्हणाले आधि विवंचना काय आहे ते सांग म्हणजे त्यातून कसे सुटायचे ते सांगतो ,श्रीमंत म्हणाला महाराज तसं म्हणाल तर मला काहीही विवंचना नाही पण एकच विवंना आहे आणि ती म्हणजे माझ्या आठव्या पिढीचे काय होईल?कारण सात पिढ्याचे कमवून ठेवले आहे चिंता आहे ती आठव्या पिढिची !
साधु महाराज हसले आणि म्हणाले काळजी करु नकोस मी तुला यातून सोडवतो .

साधुनि त्याला एक किलोभर तांदळाची पिशवी दिली आणि सांगितले की त्या डोंगरावर एक म्हातारी एका झोपडीत राहते तिला हे तांदूळ देवून ये म्हणजे मी तुला तुझ्या विवंचनेतून मुक्त करतो .

तांदूळ घेऊन श्रीमंत म्हातारीच्या झोपडीत आला ज्या झोपडीला दार सुद्धा नव्हते.ती भगवंताच्या भजनात दंग होती, तिची भावसमाधी लागली होती,श्रीमंताच्या पायाच्या आवाजाने आजीची भावसमाधी भंग पावली , तिने वर बघितले आणि म्हणाली का आलास बाबा ईथे ? तो म्हणाला म्हातारे तुला तांदूळ द्यायला आलो आहे हे घे मग मी जातो .ती म्हणाली कारे तुला मागीतले होते का ? तुझ्या समोर हात पसरला होता का?नाही ना?मग का आणलेस तांदूळ?ही पिशवी उचल आणि चालायला लाग तो म्हणाला मला त्या झाडाखाली बसलेल्या साधुने पाठवले आहे म्हणून मी आलोय, ती म्हणाली त्या साधुला जाऊन सांग की अजून दोन दिवस पुरतील एवढे तांदूळ माझ्या झोपडीत आहेत .

श्रीमंताने आपली अक्कल चालवली तो म्हणाला म्हातारे तिसर्‍या दिवसाला होतील राहू दे.ती म्हणाली माझ्या तिसऱ्या दिवसाची चिंता तुलाही नको आणि त्या साधुलाही नको त्याला सांग माझ्या तिसर्‍या दिवसाच्या तांदळाची चिंता मी ज्याच्यावर सर्वस्वाचा भार टाकून या निर्जन स्थळी भजन करत बसलेय त्याला आहे.
हे ऐकून श्रीमंत पिशवी घेऊन परत आला आणि साधु समोर पिशवी ठेवून निघाला.साधुने त्याला हाक मारली अरे!विवंचना घेऊन आला होतास ना?मी तुला त्यातुन सोडवणार आहे.श्रीमंत खाली मान घालून म्हणाला महाराज मला उत्तर मिळाले तिसऱ्या दिवसाच्या तांदळाची चिंता न करणारी म्हातारी जेवढी सुखी आहे तेवढा मी महामूर्ख दुःखी आहे.

☆★☆★ *अर्थात* ★☆★☆

या दृष्टांताचा आशय हा आहे की,सुख कशात आहे हेच आम्हाला कळत नाही. तर सुख समाधानात आहे. आणि हे समाधान बाजारात विकत मिळत नाही.ते भगवंताच्या भजनानेच मिळते .

*सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनि आले भजन सकल गेले चित्त दुःचित्त झाले।भ्रमित मन कळेना हीत ते आकळेना। परम कठिण देहो देह बुद्धी गळेना।।*

भोजनात सुख नसून भजनात सुख आहे.आमच्या जीवनातील भंजन नाहीसे झाले आणि आम्ही भोजनाला प्राधान्य दिले म्हणून आम्ही दुःखी आहोत.

*आवडीने भावे हरिनाम घेशी । तुझी चिंता त्यासी सर्व आहे।।*
*****************

####Good morng शुभ सकाळ
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

###Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

###Good afternoon
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
???राम कृष्ण हरी???

त्रिगुण असार निर्गुण हें सार । सारासार विचार हरिपाठ ॥१॥

सगुण निर्गुण गुणाचें अगुण । हरिवीणें मन व्यर्थ जाय ॥२॥

अव्यक्त निराकार नाहीं ज्या आकार । जेथुनि चराचर त्यासी भजें ॥३॥

ज्ञानदेवा ध्यानीं रामकृष्ण मनीं । अनंत जन्मांनी पुण्य होय ॥४॥

?????????

###Good morning ! $$$$ सर्व मातृभारती परिवाराला शुभ सोमवारच्या शुभेच्छा !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .