good Quotes in Hindi, Gujarati, Marathi and English | Matrubharti

good bites

####Good afternoon !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐ***** राष्ट्रसंत श्री निवृत्ती महाराज इंदुरीकर *****ॐ
---------------------------------------------
इंदुरीकर महाराज किर्तनाच्या माध्यमातून समाज सुधारणा, भगवंताच्या भक्तिचे महत्त्व, समाजातील प्रत्येक विषयांचे समर्पकपणे विवेचन करून समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करतात.तसेच किर्तनाच्या माध्यमातूनच आपल्या संस्कृतीची जोपासना होते.आजच्या तरूण पिढीला किर्तनाची गरज आहे ??गेली वीस वर्षे झाली आहेत इंदोरीकर महाराज महाराष्ट्रभर किर्तनं करत आहेत..
महाराष्ट्रातील एक ही असा जिल्हा, तालुका नाही जिथं महाराजांचं किर्तन झालं नाही..

आजही दररोज ३ किर्तनं होतात अंतर जवळ असेल तर कधीकधी ४ कधी ५ ही किर्तनं झाली आहेत..
कित्येक वेळा महाराज सकाळी घरून कार्यक्रमासाठी निघालेत संध्याकाळी सातारा कोल्हापूर या भागात किर्तन आयोजित असते, पण त्याच वेळी काही अडचणी आल्यामुळे कार्यक्रम रद्द करण्यात आले.. तरीही तेथील लोकं महाराज एवढ्या लांब आपल्यासाठी आले हि भावना ठेवून मानधन देण्याचा मनापासून प्रयत्न करतात पण किर्तन न करता महाराजांनी एक रूपया ही कुणाचा घेतलेला नाही.. वीस वर्षापूर्वी महाराजांनी त्यांचं स्वतःचं इंदोरी हे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील गाव सोडलं आणि संगमनेर तालुक्यातील ओझर या गावी राहण्यासाठी आले, तेथे स्वतः जागा घेऊन घर बांधलं आश्रम बांधला, गोरगरीब जनतेची मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांनी, संत ज्ञानेश्वर बहूउद्देशिय वारकरी शिक्षण संस्था स्थापन केली, स्वखर्चाने शाळेची इमारत बांधली, तेथे १५/२० शिक्षकांची नेमणूक केली, त्यांचे मासिक वेतन हे आजही स्वतः महाराज हेच देतात.. आजही जे शिक्षण घेतात ते शंभर मुलं महाराजांच्या जवळ राहतात, त्यांच्या राहण्याची जेवणाची त्यांना लागत असलेल्या वही पुस्तक कपडे या सर्व गोष्टीचा खर्च महाराज हे स्वतः करतात..

आणि महाराजांवर टिका करणारे आतापर्यंत खुप झाले, जर खरंच कोण चुकीचं असेल तर जरूर आवाज उठवला पाहिजे, पण महाराजांच्या कार्यक्रमात, दारू पिऊ नका, जुगार खेळू नका, आपल्या आई वडिलांना उतारवयात अपमानास्पद वागणूक देऊ नका, त्यासारखं मोठं पाप नाही.. तरूण मुलामुलींना पळून जाऊ नका, आजकाल अनेक भागात या गोष्टीचं प्रमाण वाढलंय हे महाराज सांगत असतात.. मुलगा मुलगी प्रत्येक माणसाला असते, मुलगी हि एक दिवस लग्न होऊन सासरी जाणार आहे त्यामुळे मुलीचे लाड करा पण आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील माणसं आहोत, हे ध्यानात ठेवा मुलीला पाच हजाराचा ड्रेस घ्या पण मुलीला अंग झाकून कपडे घ्या.. तसेच सुनबाई आणि सासुबाई यांच्यामध्येही सुसंवाद रहावा प्रेमाने घरात एकी रहावी घरात वाद नको, ह्या सारख्या असंख्य गोष्टी महाराज आपल्या प्रबोधनात विनोदाची झालर लाऊन सांगतात..
मग ते कूणाला पटो किंवा न पटो..
आजही महाराजांच्या कार्यक्रमाच्या तारखा पुढील दोन वर्षे तरी मिळत नाहीत, यावरूनच त्यांची लोकप्रियता आहे की नाही हे समजते..
आणि महाराष्ट्रातील अन्य महाराज आहेत त्यांच्याही पेक्षा कमी मानधन घेऊन महाराज किर्तन करतात.. किमान पैशासाठी तरी कधी कुणाची अडवणूक केलेली मी तरी २००२ पासून पाहिले नाही..
लिहीण्यासारखं खुप आहे, पण लाईक मिळवण्यासाठी न लिहीता सत्यपरिस्थिती जाणून योग्य लिहीण्याचा प्रयत्न केला तर ते अधिक योग्य होईल..
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे इथं आपण कुणावरही टिका करण्याच्या आधी, समाजात आपलं स्थान काय..? सामाजिक कार्यात आपलं योगदान काय..? आपल्या शिक्षणाचा फायदा समाजासाठी काय आहे का..? आपण कधी कुणावर परोपकार केला का..? हे ही तपासून बघायला हवे.. नाहीतर अनेकजण इथे अक्कल शिकवण्यातच व्यस्त रहायचे..
????????????? ..?जय जय राम कृष्ण हरी?

??राम कृष्ण हरी,, ??,????हरीचा दास????

####Good morning!
###शुभ प्रभात!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

अभंग वाणी संतांची
------------------------
माझें कोण आहे तुजविण देवा ।
मुकुंदा केशवा नारायणा ॥१॥

वाट पाहतसें कृपेच्या सागरा ।
गोपीमनोहरा पांडुरंगा ॥ध्रु.॥

साच करीं हरी आपुली ब्रिदावळी ।
कृपेनें सांभाळीं महाराजा ॥२॥

क्षमा करीं सर्व अपराध माझा ।
लडिवाळ मी तुझा पांडुरंगा ॥३॥

साह्य होसी तरी जाती साही वैरी ।
मग सुखें अंतरीं ध्यान तुझें ॥४॥

कृपा करोनि देई दया क्षमा शांती ।
तेणें तुझी भक्ति लाभईंल ॥५॥

माझें हें सामर्थ्य नव्हे नारायणा ।
जरी कांहीं करुणा येइल तुज ॥६॥

तुका म्हणे मज कैसें आपंगा जी ।
आपुलेंसें करा जी पांडुरंगा ॥७॥

?रामकृष्ण हरि?

####शुभ प्रभात ###Good morning
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
, ++ पंढरीची वारी ++
-------------------------------

*टाळा_टाळी_लोपला_नाद_!*

*आली पंढरीची वारी, आनंद मावेना अतंरी.*

काय आहे ही पंढरीची वारी...
पढंरीच्या वाटेवर बरेच मुक्कामी गावे लागतात, नेमक दिंडीच्या अगोदर पाहील तर या गावामध्ये सुन्न अशी निरव शांतता असते व मुक्कामाच्या दिवशी येथे अलंकापुरीच साकारते, तेथे आदल्या रात्री काहीच जरी नसले तरी मात्र माउलींच्या मुक्कामाच्या रात्री अमरपुरीच वाटते. तेथे शेतं व रानं झाकली जातात, व तेथे सुदंर अस नदंनवन दिव्याच्या दिपमाळा लागतात व माणसांना माणुस सापडत नाही एवढी गर्दी होते. काय त्या जागेच महीमान असेल कीती भाग्यवान आहे ती जागा, जेथे वैष्णवजन माउलींच्या जयघोषात व भजनाच्या तालात स्वत:लाच विसरून जातात व विठ्ठलाच्या नामघोषात मुग्ध होतात. जणु त्यांच्या अगांत विठ्ठल नामाचा संचार होतो व देहभान हरपलेले ह्या वैष्णवांचा.

*टाळा_टाळी_लोपला_नाद_!*
*अंगोअंगी_मुराला_छंद_!*

असा अनुभव येतो.

हा आनंद उपभोगायचाय ना, मग काय...

*या वारीला पांडुरंगाच्या भेटीला...*

*वाट_पंढरीची!*

*वारी_आत्मसुखाची_!!*

*!! रामकृष्णहरि !!*

?

###Good evening !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
ॐॐॐ आत्मा.
-----------------------------------
*** आ त्मा ***
---------------------------
।।आत्मा म्हणे शिव-नारायणा घाल म्हणी मानव जन्माला करीन तुमचे सुमरण मग मी ओळखीन साधू-संताला।।
वरील भजन हे श्री तुकाराम महाराजांनी लिहलेले असून आईच्या गर्भात असताना जवळपास प्रत्येक जण वरील वचन देऊन या जगात जन्म घेतो.काहींचा गर्भात मुत्यु होतो ते त्याचे विधीलिखित असते.
परंतु जन्म झाल्यावर कळत-नकळत दिलेले वचन विसरले जाते. व त्याची शिक्षा म्हणून आपणास शारीरिक,मानसिक दंड दिले जातात यातून काहीजण भक्ती मार्गाकडे वळून आपले मूळ वचन पाळण्याचे प्रयत्न करतात.काहीजण दुर्लक्ष करतात.काहीजणांना या जन्मात या गोष्टी समजतच नाही.
ज्या गुप्त शक्तीने हे सम्पूर्ण अवकाश,पृथ्वी,ग्रह,तारे,निसर्ग निर्माण केला त्याचा सर्वात जास्तीत -जास्त भोग हा मानव घेतो.येथून काहीही घेऊन जाता येत नाही हे माहीत असूनही तो नाना दुष्ट कर्म करून संपत्ती गोळा करणयात मग्न असतो.त्याच्या मेहनती नुसार चांगल्या कर्मानुसार मिळणाऱ्या संपत्तीत तो समाधान मानत नाही व त्यामुळे तो स्वतःहून आपल्यासाठी व कुटुंबासाठी दुःख,त्रास गोळा करतो.
साधू-संतांच्या सांगण्यानुसार या पृथ्वीवर आपण सर्व पाहुणे असून कधीही बोलावणे येऊ शकते.
आपल्या जन्माचे उद्दिष्ट्य हे या विश्वाच्या"कर्त्यास"ओळखणे असून या साठी आपणास
मदती साठी साधू, संत,गुरू,मार्गदर्शक नेहमी तयार असतात.
परंतु या साठी आपली शाररिक,मानसिक तयारी हवी. "निष्काम भाव" ही या साधनेत गुरू किल्ली असते.
मुंगीलाही साखरेच्या एका दान्याचे टेन्शन असते मग आपण तर मानव आहोत.भोग नेहमी भोगून पूर्ण करावा.?जय हरी विठ्ठल ?

||धन्य आम्ही जन्मा आलो | दास विठोबाचे झालो||??जय जय राम कृष्ण हरी??

, ,????हरीचा दास????

###Good morning !!!
ॐ नमः शिवाय!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

####Good morning!
ॐॐॐॐ; शुभ सकाळ !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .

ॐॐॐॐॐ शुभ सकाळ !
###Good morning!
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
???????????

*रस्त्याने जाताना भेटणारी माझी* *शाळा मला विचारते ...*

*"जीवनाची परीक्षा" बरोबर* *देतोयस ना?*

*मी उत्तर दिले*
*आता फक्त दफ्तर खांद्यावर* *नाही; एवढच ..!*
*बाकी* ........
*लोकं अजूनही धडा*
*शिकवून जातात..!!*
*?? ??*

???????????

###Good morning!
ॐॐॐ @मच्छिंद्र माळी औरंगाबाद .
***************************
दया क्षमा समाधान ।
घ्यावे संतांचें दर्शन ॥
संत संग वेगीं ।
वृत्ति जडों पांडुरंगीं ॥
??????????? करुणावरूनालय आनंदकंद दयाघन पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या नागरीमध्ये चंद्रभागेच्या तीर्थात स्नान करत असताना ह भ प श्री कीर्तनकेसरी पुरुषोत्तम महाराज धाटावकर (बापू), ह भ प श्री सेवामहर्षी राजाराम महाराज पाटील, बाबुराव पाटील ,निवृत्ती महाराज पाटील व त्यांच्या सहवेत मी
हा सुख सोहळा स्वर्गी नाही ......
संत दर्शनीहा लाभ पद्म नाभ जोडला
???????

####Good morning ! शुभ सकाळ !
@मच्छिंद्र माळी औरंगाबाद .