Marathi Quote in Poem by गिरीश

Poem quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

काळ-वेळ
महानगरीत गेले गावातील चाकरमानी ,
लोकल त्या नगरीची धमनी,
रांगेतुन घेऊन तिकीट शिरले ते स्टेशनात
ट्रेन पकडली धांवत धांवत,
दोन तीन ट्रेन मधून फिरून काम करून आले परत, होवून श्रांत,
रुळ ओलांडून जात होते सगळेच सहज, तीघांपैकी दोघे सरावलेले , गेले ते ही सहज तीसरा उतरला रूळावर पण चुकीच्या जागेवर! वर जाता येइना, चालू लागला बघत जागा,
ऐकू आले शब्द "अरे ट्रेन आली" तो स्तब्ध,
गेट कडून येत होता सहकारी , वेगाने पोचला जवळ , ओढून घेतले त्याला त्वरेने ,
जागा झाला तो ट्रेनच्या आवाजाने ,
दोघांना तेव्हा कळले काय असते धडधडणे यालाच म्हणतात देवासारखा येणे काळ येणे पण वेळ टळवणे.१ - सहज वाटणाऱ्या गोष्टी सहज नसतात. २ - घटना घडून जातात. क्षणा क्षणाला महत्व असते. ३- असं कसं केलेस या प्रश्नाला उत्तर नसते. ४- काळ आला होता पण वेळ आली नव्हती . ५. काय घडतेय ते समजून घेऊन कृती करणारा माणूस मिळाला तो देवासारखा. वेळ टळवणारा.

Marathi Poem by गिरीश : 111913882
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now