#तिचाप्रवास
आज परत आजी ला भेटावस वाटल, तिच्याशी बोलवस वाटल ,तिच्याकडून पान विकत घ्यावेसे वाटले . मग मी माझ्या मिञाला घेऊन गाडगे नगर ला मंदिराजवळ गेलो , दिवसभर सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत आजी तिथेच उन्हात बसलेली होती ..
मी क्षणाचाही विलंब न करता आजी जवळ बसलो आणि, आणि बोलण्याच निमित्त म्हणुन आधि पान विकत घेतले , आणि आजीसोबत बोललो . काल जे काही मी आजीबद्द्ल सांगितले होते . त्यापेक्षा आजी खुपच महान आहे अस मला वाटल . मी गहिरवरुन गेलो
आजीला विचारल्याप्रमाणे ती गाडगे नगर ला कोण्यातरी नातेवाईकांकडे राहते. राहण्याचा मोबदला म्हणुन आजी या वयातसुद्धा घरातील सर्व काम करुन, पान विकण्यासाठी गाडगे नगर ला येते .
तिला मुलबाळ कोणीही नाही , एक मुलगी होती तीही वारली अस मला आजीने सांगितले .
मी आजीला अनाथ आश्रम मध्ये चलण्यास म्हटले पन आजीने नकार दिला.
आजी म्हणाली की मला मेहनतच कमानुन खायच आहे , मला या जागेशिवाय कुठेच करमत नाही आजीची ही गोष्ट मला फार आवडली आजीचा स्वभाव मला खुप आवडला आहे . आता मी रोज तीची भेट घेतो
आजीला पन माझा स्वभाव खुप आवडला . तिने खुपसार प्रेम, आशिर्वाद मला दिला .
जुन्या छञिमधुन आजीला उन लागते पन पानाचा टोपलीला माञ ती सावलीत ठेवते . कारण उन्हाने पान खराब झाले तर कोणी विकत घेत नाही . म्हणुन माझी इच्छा आहे आजीला एक मोठी छञी घेऊन दयावी . जेणेकरुन तीलासुद्धा
ऊन लागणार नाही .
शेवटी अशी विनंती आहे की असे आजी आजोबा ईतर कोणी अपंग बांधव जे परिस्थितीवर मात करुन भिक न मागता पोट भरण्यासाठी पैसै कमावत असतात त्यांना आपन मदत करा .कारण आपल्या दहा रुपयाने कुणाची एक वेळची भुक भागवल्या जाते .