*पूर्वी*
चार ढग एकत्र आले
की मुसळधार पाऊस पडायचा.
आता आभाळ ढगांनी अंधारले
तरी थेंब निथळत नाही.
*पूर्वी*
विहिरीत नुसता हात टाकला
की हाताला पाणी लागायचं.
आता बुडाशी जाऊन बसलं
तरी ओंजळ भरत नाही.
*पूर्वी*
माणसाच्या खांद्यावर हात ठेवला
की आपुलकीचा झरा वाहायचा
आता ह्रदयात हात घातला
तरी ओल लागत नाही.
*थोडक्यात* :
हे ढग काय ,
ही विहीर काय ,
हा माणूस काय ...
चराचरातून *"ओलावा"*
आटत चाललाय हेच खरं !
*"माती" आणि "नाती"*
*यांतला ओलावा जपुया...*