शाळकरी मी
ना कळत कधी आपली साथ सुटली,
तू कुठे, मी कुठे, वाट चुकली जणू पुटली…
गुंतलो रोजच्या या धावपळीत,
आणि हरवली गंमत बालपणाच्या गोष्टीत…
तुझ्यासोबत गेले ते क्षण सुंदर,
आजही मनात आहेत ते अगदी जिवंत ठसठशीत ठरवून…
हसणं, खेळणं, दंगा-मस्ती,
त्या आठवणींनी भरलीय अजूनही हृदयाची पाटी!
माझ्या मित्रा, एक विचार येतो,
पुन्हा लहान होणं शक्य असेल का रे असंच वाटतं…
परत शाळेत जाऊ, त्या गेटसमोर थांबू,
सकाळी सात वाजता ‘गुड मॉर्निंग’ म्हणू!
जेवणाची सुट्टी, ती धावपळ भारी,
खायच्या पेक्षा खेळायचीच जास्त घाई सारी!
परत येतील का रे ते क्षण?
जिथे नसतं काहीच, फक्त मजा आणि मनमोकळं मन…
कधी ना कधी आपली वाट वेगळी झाली,
पण आठवणींच्या दुनियेत अजूनही साथ चालली…
त्या क्षणांना सोडायचं नाही,
जगणं भले पुढं जावो, पण बालपण विसरायचं नाही…
एक आशेचा किरण अजून उरलाय,
कधीतरी, कुठेतरी, तू भेटशील असंच वाटतंय…
तेव्हा बसू पुन्हा, हसून-खिदळून,
आठवणींना नव्याने एक सुर देऊन…
... आठवणींचा वारसा
... मयुर पाटील