शाळा बंद कादंबरीविषयी
शाळा बंद ही कादंबरी वाचकांच्या हाती देतांना आनंद होत आहे. ही कादंबरी सरकारी शाळा बंद या विषयावर असून यात एक अनोखा विषय आहे. अलिकडील काळात सरकारनं एक आदेश काढला होता की वीस किमीपर्यंत अंतरावरील शाळा पटसंख्येअभावी बंद करण्यात येतील. हाच विषय लक्षात घेवून मी शाळा बंद कादंबरी लिहिली. तसेच त्याचे परिणामही विषद केले.
शाळा बंद ही पुस्तक कादंबरी वाटत नाही. कारण तो एक विचार आहे. एक वेगळाच विचार. त्या विचारानुसार शाळा बंद ही सरकारची योजना. ती एक फसवी योजनाच. परंतु ती योजना फसते. आता ती का फसते? याचं वर्णन या कादंबरीत आहे आणि ते वाचनीय आहे.
महत्वाचं सांगायचं झाल्यास शाळा बंद म्हणणं व करणं वरवर पाहता सोपं आहे. परंतु त्याचे दुरगामी परिणाम जास्त आहेत. शिवाय ती शाळा बंद करीत असतांना सरकार काय काय करतं हे सांगायला नको. विशेष म्हणजे कादंबरीची कथा मी देत नाही. परंतु एक आवर्जून विनंती करतो की आपण ती वाचावी व काही ना काही प्रतिक्रिया नक्की द्यावी. जेणेकरुन आणखी नवीन कादंबरी लिहायला प्रेरणा मिळेल.
आपला नम्र
अंकुश शिंगाडे नागपूर
९३७३३५९४५०