सावर रे...!
मन उदास उदास,
त्याले किती सावरू।
आल्या किती अडचणी,
कधी जिद्द ना हरू।
कधी सुख कधी दुःख,
पाठशिवनीचा खेळ,
एकमेका साथ करू,
घालू भविष्याचा मेळ।
परिस्थिती काही असो,
परी डगमगू नको।
साथ असेल सदा ही,
उगा चिंता करू नको।
वाईट माणूस नसतो,
सारा वेळेचा हा खेळ।
साथ सोडू नये कधी,
येईल सुखाची ग वेळ।
कष्ट करत रहावे,
कुणा बोल लावू नये,
द्यावा मदतीचा हात,
कधी नाही म्हणू नये।
(बहिणाबाईंच्या कवितांवर आधारित, एका उदास झालेल्या मित्रासाठी लिहिलेली कविता।)
- ईश्वर त्रिंबकराव आगम