मानवी जीवन सृष्टीचा वस्तू स्पर्श होण्याआधी ते विरून जातात . तरी देखील माणसे वर्तमानात खरची घालून भविष्याचा रेघोट्या मारताच असतात . सरत्या वया सोबत आयुष्याच्या तरीवाहिक पणाची रेषा अधिक गडत भासू लागते .
मानवी शरीराचा बाहुल्या आपल्या ईशाऱ्यावर यथेच्या नाचवणारा कर्ता करविता त्याच्यायोजना नेहमीच अथर्क ठेवीत असतो . माणसाची आकलन आणि तर्क शक्ती जिथे संपते तेथून देवाची सरहद्द सुरु होते . मानवी आयुष्यात प्रारब्द लिहून ठेवलेली नियंत्याची ही नोंद वही आपल्याला गवसली असती तर ! तर ज्यान -त्यानं उद्यायची स्वप्ने आजच वास्थवात उतरवण्याचे नाना यत्न केले असते. कदाचित भविष्य हे कालपटला- वरून कायमच पुसलं गेलं असत . म्हणूनच विधिलिखितांची ही नोंद वही माणसाच्या कायम दृष्टी आड हेतुता राहिलेली असावी .
प्रिय- अप्रिय घटनांच्या लहरीणवर मानवी आयुष्य हेलकावे खात असत . सुखांना बंदीस्त करण्याचे प्रयास नियतिकडून उध्दवस्थ होत असतात . " पानगळ झालेली फांदी पुनःच्या नवी पालवी घेऊन हिरवी होते ". बहर आणि पथझड हे दोन ऋतू मानवी आयुष्याला आरंभापासून अंतापर्यंत चिकटलेली असतात . जीवनाचे संकेत ओळखून फांदीने केवळ डोलत रहावे हेच खर जगण्याचे मर्म आहे .
विधिलिखितांचा हा धडा समजून तो स्वीकारावा लागतो . काळोघात या जखमेवर खपली जडते . जीवनाची वाट अगम्य गूढ गढर वळणावळणाची असते . विधिलिखितांन योजलेला हा प्रवास नियतीच्या जोवर मनात आहे तोवर तो करावयाचा असतो. आणि तिच्या आदेशावर त्यागायचाही असतो . जगण्याची पात्रता धारण करण्याची संधी मात्र देवानं माणसाला त्याच्या समतेनुसार बहाल केलेली असते. लौकीक अर्थाने जगातुन जातात तथापी कार्य रुपाने आपल्यात असतात.
" दुर्लभ मनुष्य जन्म हे देहन भारंभार
तलवार जो पत्ता झडे भवरीन लागे डार "
अस संत कबीर सांगून गेले ८४ लक्ष्य योनीच्या फेऱ्यांनंतरमनुष्य जन्माची प्राप्ती होते . अस उपनिशीद सांगून गेले . आपल्याच हाडा मासाची पोद धारण केलेले काही अवलिय पुरुष हयात भर सुख आणि दुःख यांचा शोध घेत राहिले ,जगण्याचा प्रामश्य घेत राहिले . विधिलिखिताला टाळता येणार नाही तथापि त्याला एक सुंदर अस वळण देता येईल या थव संत मंडळींनी आपले जीवन सिद्धांतांना जण माणसात रुजवले आचार, विचार ,आणि व्यवहार यात सुसुत्रता आणण्याचे कान मंत्र संत महंतांनीयेणाऱ्या पिढीला देवु केला .
गतकाळापासून बोध घ्यावा आणि भविष्याचा वेध घ्यावा या दोहनच्या समन वयात वर्तमानात स्वतपाचा शोध घ्यावा अशा प्रवाही सूत्रा मध्ये मानवी जीवन ओवलेले असतं . नियतीच्या बिलोरी आरश्यात उद्याच्या सुखचित्रात प्रतिबिंब नेहाळून पाहणे हा मानवी स्वभाव आहे . तथापि वास्थव चितारणारी साधनं बरोबर असताना त्यांना बाजूला सारून कल्पनेत रमणीय होऊन ते जगण्याला नाकारणारे आहे .
विधी वश्यात प्राप्तेने संत श्यथांम हा उपनिसिधानी केलेला उपदेश अनुभव सिद्ध आणि सब प्रमाणात आहे .
" ठेविलें अनंते तेसींची रहावें
चित्त असुद्यावे समाधान "
तुकोबांनी हा सुखी समाधानी आयुष्याचा कान मंत्र जण सामन्यांना देऊ केला आहे . जे प्राप्त आहे जे दृष्टी पल्याड आहे त्याचा सोस अपकारक मानावा ....
? प्रकाश चव्हाण ?
---