Marathi Quote in Blog by Sadhana v. kaspate

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

Emotional bond !

तुम्ही घरापासून दुर राहत असता. तुम्ही खुप उदास असता. कशातच मन लागत नाही. राञभर तळमळत असता. पण कुणाशीच काहीच बोलत नाही. अचानक सकाळी सकाळी बहिणीचा फोन येतो. अग मला काल स्वप्न पडल . तु रडत होतीस स्वप्नात. सगळ ठिकय ना ? तु बरी आहेस ना ?
You shocked... Sister's love rocks !

तुम्ही कुठेतरी मोठ्या संकटात सापडता. मदतीला कोणी नसत. कावरा बावरा जीव , मदतीच्या शोधात. आणि तेवढयात आईला ठसका लागतो. ती लगेच तुम्हाला फोन लावते. बाळा बरा आहेस ना ? खुप आठवण येत होती आणि उगीच तुझी काळजी वाटत होती , जीव घाबरत होता. नीट आहेस ना ?
You shocked ... Mother's love rocks !

तुम्ही खुप लो फिल करत असता. करियर मध्ये भयाण टेंशन चालु असत. काय कराव कळत नाही. तुम्ही अचानक डिपी बदलता. गौतम बुद्ध वगैरे. आणि स्टेटस ठेवता ' peace ' आणि दुसर्याच क्षणाला , तुमच्या best friend चा फोन येतो.
" हं बोल काय problem चालुये ? कसला stress घेतेस ? "
you shocked... Friend's love rocks !

तुम्ही अपयशी झालेले असता. सगळ संपत आलेल असत. तुम्ही कायमच give up करण्याचा विचार करता. तुम्ही मानसिकरित्या पुर्णतः कोसळणार असता..त्यापुर्वी best friend ला एकदा बोलुया , सगळ सांगुया...असा विचार करुन फोन लावता. पण मिञ बाहेर असतो. तो थोडा कामात असतो. म्हणुन दुसरच बोलुन फोन ठेवण्याचा प्रयत्न करता पण सगळ ऐकुन झाल्यावर मिञ बोलतो , " हं आता जे सांगण्यासाठी फोन केला होतास ते सांग..सगळ खरं खरं " आणि तुम्ही मुकपणे अश्रु गाळता.
you shocked ... Friendship rocks !

तुम्ही तुमच्या सर्वात जवळच्या व्यक्तीशी बोलत असता. आज रोजच्या पेक्षा थोड वेगळ काहीतरी जाणवत. तुमच्या पासुन ५०० किमी दुर व्यक्तीच्या मनात काय चाललय हे तुम्ही feel करु शकता. तुम्ही लगेच विचारता , " r u ok ? उदास आहेस का ? काय झाल ? " आणि तिकडुन शाँक वाली whats app emoji येते. तुला कस कळल ? इथे घरातल्यांना कळाल नाही की मी उदास आहे. पण तुला कस कळाल ?
बेटा इसे तो कहते है Heart to heart connection ! emotional bond !

नात कुठलही असो , बहिणीच , भावाच , मैञीच , प्रेमाच.. त्यात आपण प्रामाणिकपणे मनापासुन involved असलो ना की समोरच्याला आपण फिल करु शकतो .. मग त्यात ठिकाणांच अंतर अगदी हजारो किलोमीटर असल तरी !
" हृदयाशी जोडलेल्या नात्यांना..रस्त्यांच्या अंतरांचा फरक कधीच पडत नाही !"
जर तुमच्या आयुष्यात असा एकही emotional bond असेल तर तो जपा .. कारण प्रत्येकालाच तो मिळेल अस नाही. तुम्हाला मिळालाय म्हणजे तुम्ही नक्कीच खास आहात !
- साधना वालचंद कस्पटे ©

Marathi Blog by Sadhana v. kaspate : 111052284
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now