विरहानंतर ती जेव्हा समोर आली,
जणू थांबलेली वेळ पुन्हा हळूच चालू लागली।
ओठांवर तक्रार नव्हती, प्रश्नांचं ऊन नव्हतं,
डोळ्यांनीच सांगितलं — जे होतं, ते अजूनही तिथंच होतं।
थोडावेळ शांत उभी, मीही काही बोललो नाही,
त्या निःशब्द क्षणांनीच सारा हिशोब मिटवला काही।
विरहात जे अपुरं राहिलं होतं मनामध्ये,
त्याच एका नजरेत पूर्णत्व उमटलं क्षणामध्ये।
तीही पूर्वीसारखी नव्हती, मीही तोच उरलो नव्हतो,
तरी हृदयाने तिलाच पुन्हा आपलंसं मानलं होतं।
जिथे पावलं थांबली होती एका काळाच्या वळणावर,
त्याच ठिकाणी प्रवास पुन्हा हसला नव्या क्षणावर।
फ़ज़ल, त्या भेटीने इतकंच शिकवलं हृदयाला —
काही प्रेम विरहानंतरही जिवंत राहतं शांतपणे
@Fazal Abubakkar Esaf