असंख्य गोष्टी दडलेल्या असतात मनाच्या गाभाऱ्यात,उचंबळून येणाऱ्या भावनांच उगम स्थान असतात त्या..कधी व्यक्त होतात जीव्हेद्वारे तर कधी बरसतात नयनांच्या कमानीतनू मुक्तपणे..कधी दडतात नकली हास्यापाठी, तर कधी रुद्र रूप धारण करून भौतीकतेची जोड घेतात..त्यांची मांडवली करण्याचा जणू ठेकाच घेतलेला असतो काही टोकदार काट्यांनी पण आपण फक्त त्या काट्यांच्या सुरक्षा कुंपणात लपलेल्या गुलाबासाठी तळमळत त्यांची आहूती देतो..अगदीच प्राणपणाने आणि मग उरतात असहनीय विंचवाचे डंख...प्रचंड विखारी...!!

-Mana

English Thought by Mana : 111943681
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now