असं का झालं आहे?
कळत नाही आहे
दोन माणसांच्या अंतरात "अंतर" पडत आहे...
कुणीतरी "तिसरे चौथेच"
ते करत आहेत
"पहिल्याला" "दुसर्या"पासून लांब ठेवत आहेत?
कारण काय असेल या सगळ्या गणिताचं
बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकाराचं?
"पाचवी"ला पूजलेला जीवनाचा भार
"सहा" ऋतू आल्हाद देतात जीवनभर करीत पुकार
"सात" जन्मांची सोबत "आठ"वणीत घुमणारी
"नऊ" महिन्यांच्या वेदनेनंतरही "दहा" अंगुळेच उरणारी!
कोणत्या सूत्राने सोडवू हे गणित????
नियतीच्या मनातले काय असेल गुपित??