Quotes by Brains Media Solutions Pvt. Ltd. in Bitesapp read free

Brains Media Solutions Pvt. Ltd.

Brains Media Solutions Pvt. Ltd.

@brainsmediasolutionspvt.ltd..736163


ಮಾರ್ಗಶಿರ ದಿನದ ಪೂಜೆ





ಶ್ರಾವಣ ಮತ್ತು ದೀಪಾವಳಿ ಹಬ್ಬದ ನಂತರ ಇಲ್ಲಿ ಮತ್ತೊಂದು ಪೂಜೆ ಬರುತ್ತದೆ, ಅದು ಮಾರ್ಗಶಿರ ಪೂಜೆ. ಹಿಂದು ಸಂಪ್ರದಾಯದ ಪ್ರಕಾರ ಇಡೀ ವರ್ಷದಲ್ಲಿ ಮಾರ್ಗಶಿರ ಅತ್ಯಂತ ಮಂಗಳಕರ ತಿಂಗಳು. ಮಾರ್ಗಶಿರ ಮಾಸಕ್ಕೆ ವಿಶೇಷ ಮಹತ್ವವಿದೆ.

ಮಾರ್ಗಶಿರ ಮಾಸದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಗುರುವಾರದಂದು ಲಕ್ಷ್ಮಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.ಈ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡುವುದರಿಂದ ನಾವು ನಮ್ಮ ದೈನಂದಿನ ಜೀವನದಲ್ಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಸಂತೋಷ, ಸಂಪತ್ತು ಮತ್ತು ಸಮೃದ್ಧಿಯನ್ನು ಪಡೆಯುತ್ತೇವೆ.

ಮಾರ್ಗಶೀರ ಮಾಸದ ಗುರುವಾರದಂದು, ಭಕ್ತರು ಮನೆಗಳಲ್ಲಿ ಲಕ್ಷ್ಮಿ ಪೂಜೆಯನ್ನು ಮಾಡಲು ಸಿದ್ಧರಾಗುತ್ತಾರೆ. ಹಬ್ಬದ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಮನೆಗಳನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಅಚ್ಚುಕಟ್ಟಾಗಿ ಇಡಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಿಯ ಸಣ್ಣ ವಿಗ್ರಹವನ್ನು ಪೂಜೆ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ಇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಕೆಲವರು ಲಕ್ಷ್ಮಿಯ ಚಿತ್ರ ಅಥವಾ ವಿಗ್ರಹದ ಬದಲಿಗೆ ಕಲಶವನ್ನು ಇಡುತ್ತಾರೆ.

ಮಾರ್ಗಶೀರ ಮಾಸದ ಎಲ್ಲಾ ಗುರುವಾರಗಳಲ್ಲಿ, ಭಕ್ತರು ಬೆಳಿಗ್ಗೆಯಿಂದ ಸಂಜೆಯವರೆಗೆ ಉಪವಾಸವನ್ನು ಮಾಡುತ್ತಾರೆ.ಈ ಉಪವಾಸದ ಸಮಯದಲ್ಲಿ, ಹಣ್ಣುಗಳನ್ನು ಮಾತ್ರ ಸೇವಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನಗಳಲ್ಲಿ ಗಣೇಶ, ಲಕ್ಷ್ಮಿ ಮತ್ತು ವಿಷ್ಣು ದೇವರನ್ನು ಪೂಜಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ವ್ರತ ಕಥೆಯನ್ನು

ಓದುತ್ತಾರೆ. ಶ್ರೀ ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ಆರತಿ ಮತ್ತು ಮಹಾಲಕ್ಷ್ಮಿ ನಮನ ಅಷ್ಟಕಗಳನ್ನು ಸಹ ಪಠಣ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ. ಸಂಜೆ ಲಕ್ಷ್ಮಿ ಪೂಜೆಯ ನಂತರ, ಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವಿಗೆ ತೋರಿಸಿದ್ಧ ನೈವೇದ್ಯವನ್ನು ಆಕಳಿಗೆ ತಿನ್ನಿಸಿ ಅದರ ನಂತರ ಅವರು ತಮ್ಮ ಆಹಾರವನ್ನು ಸೇವಿಸುತ್ತಾರೆ. ಈ ರೀತಿಯಾಗಿ ಮಾರ್ಗಶೀರ ಪೂಜೆಯನ್ನು ಸಂತೋಷದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.



Article By

Akshata Ningannavar

Brains Media Solutions

Read More

मार्गशीर्ष गुरूवारचे पवित्र व्रत

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमो स्तुते !!

सर्व प्रथम आपल्या सर्व महिलांना मार्गशीर्ष गुरुवार व्रताच्या हार्दीक, हार्दिक शुभेच्छा.

श्रावणाइतकाच महत्वाचा आणि पवित्र म्हणजेच मार्गशीर्ष. दिवाळी नंतर सण अगदी थंड पडलेले असतात. मग सुरू होतो तो मार्गशीर्ष महिना. मार्गशीर्ष आला की महिलांचे गुरूवारचे व्रत सुरू होतात. म्हणजेच सणाचा माहोल पुन्हा एकदा सुरू होतात. ठिकठिकाणी सर्व स्त्रिया हे गुरूवार लक्ष्मीचे व्रत करताना दिसतात. हि पूजा करताना उपवास करण्याची पद्धत असते. तसेच सवाष्णींना वाण देण्यालाही मार्गशीर्ष महिन्यात खूप महत्व आहे.

या महिन्यात स्त्रिया श्री महालक्ष्मीची भक्तिभावनाने पूजा अर्चना करतात. या दिवशी सर्व महिला आपल्या घरामध्ये श्री महालक्ष्मी व्रताची कथा वाचतात, आरती म्हणतात, गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो व लक्ष्मीची पूजा विधी केली जाते. हे महालक्ष्मी व्रत घरामध्ये सुख, शांती, आनंद नांदावा म्हणून केलं जातं. तसेच लक्ष्मीच्या स्वरूपात सवाष्णी स्त्रिला हळदी-कुंकू देऊन तिचा आदर राखला जातो. सोबत फुलं, गजरा, महालक्ष्मी व्रताचं पुस्तक, एखादी भेटवस्तू आणि फळ, नारळ भेटवस्तूच्या स्वरूपात दिली जाते.

वैदिक मान्यतेनुसार सर्व महिन्यामध्ये मार्गशीर्ष महिन्याला विशेष महत्व आहे. या महिन्यांमध्ये धार्मिक कार्य केल्यास आपल्या जीवनामध्ये शुभ फल व सफलता प्राप्त होते. भगवान कृष्णाची पूजा करण्यासाठी हा महिना सर्वोत्तम, अतिउत्तम मानला गेला आहे. मार्गशीर्ष महिना म्हणजे मी स्वयम् आहे स्वतः कृष्णाने "गीता" मध्ये सांगितले आहे. याच महिन्यामध्ये श्री महालक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी, तिने सतत आपल्या घरी वास करावा म्हणून हे मार्गशीर्ष महिन्यातील चार गुरुवार हे व्रत करतात. जे कोणी महालक्ष्मी व्रत मोठया श्रद्धेने आणि मनोभावे करतील, त्यांना श्री महालक्ष्मी प्रसन्न होऊन त्यांच्यावर तिची कृपा होईल. पण श्रीमंती आल्यावर सुद्धा माणसाने उतू नये, मातु नये, नित्य नेमाने श्री महालक्ष्मी व्रत करावे, देवीचे मनन - चिंतन करावे, म्हणजे देवी सदैव तुमच्या पाठीशी उभी राहील,तुमची कामना पूर्ण करील असे मानले जाते.

मार्गशीर्षातील गुरूवारची चाहूल लागताच बाजारपेठ फळाफुलांनी भरून जातात. या व्रतासाठी आंब्याचे डहाळे, पांच पत्री, पाच फळे, नारळ आणि या निमित्ताने घरी येणाऱ्या सुहासिनी साठी गजरे आदी गोष्टी फार महत्त्वाच्या असतात. त्यामुळे बाजार सगळा याच गोष्टींनी भरून फुलून गेलेला दिसत आहे.

Article By - Anjali Patil

Brains Media Solutions

Read More

आवळा

आवळा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, खरच आवळा हे असं फळ आहे कि जिथे आवळ्याला बघितलं कि लगेच आपल्या तोंडातून मिटक्या पडतात. हे फळ अगदी लहाना पासून ते मोठ्यापर्यत सगळ्यांना आवडतो. आवळ्याचा औषध म्हणून खूपच उपयोग केला जातो. आयुर्वेदातही आवळ्यापासून विविधप्रकारचे औषधे तयार करतात. हे फळ आरोग्यदृष्टीने, आर्थिकदृष्टीने आणि धार्मिक दृष्टीने खूप महत्व आहे.

कार्तिक महिन्यात म्हणजेच नोव्हेबर डिसेंबर महिन्यात आवळ्याचे पीक होते. आवळा हा मध्यम उंचीचा पानझडी वृक्ष असून संपूर्ण भारतात सापडतो. आणि आता हे सिजनच आहे आवळ्याचं, बाजारात टीकटिकांनी आवळ्याच्या राशीच्या राशी विकायला बसलेले दिसून येतात. आवळा हा चवीने आंबट व तुरट असतो. आवळ्या मध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे. आवळा हे फळ कितीही शिजवल्यावर किंवा सुकवल्यावर त्यामधील महत्वाचे जीवनसत्वे व औषधी गुणधर्म कमी होत नाही.

आवळा हा पित्तशामक, बलदायी, पाचक, ज्वर नाशक, दात मजबुतीसाठी उपयुक्त आहे. तसेच केसांसाठी गुणकारी आहे, मधुमेह, पचनक्रिया, ऍसिडिटी, हाडे मजबुती साठी उपयुक्त आहे. वजन कमी करण्यासाठी आणि अशाप्रकारे बऱ्याच औषधा मध्ये आवळ्याचा उपयोग केला जातो. आवळ्यापासून बरेच खाण्याचे पदार्थ सुद्धा बनवण्यात येतात जसे कि आवळ्याचा मुरंबा, लोणचे, सुपारी, आवळा चूर्ण, जॅम, ज्यूस, चटणी, सरबत आणि कॅण्डी इत्यादी पदार्थ तयार करता येतात व हे पदार्थ आम्हाला वर्ष भर टिकवता येते. म्हणून तर म्हणतात आवळा हा फळ अगदी सर्वगुणसंपन्न आहे.

Article By - Anjali Patil

Brainsmedia Solution

Read More

आवळा

आवळा म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं, खरच आवळा हे असं फळ आहे कि जिथे आवळ्याला बघितलं कि लगेच आपल्या तोंडातून मिटक्या पडतात. हे फळ अगदी लहाना पासून ते मोठ्यापर्यत सगळ्यांना आवडतो. आवळ्याचा औषध म्हणून खूपच उपयोग केला जातो. आयुर्वेदातही आवळ्यापासून विविधप्रकारचे औषधे तयार करतात. हे फळ आरोग्यदृष्टीने, आर्थिकदृष्टीने आणि धार्मिक दृष्टीने खूप महत्व आहे.

कार्तिक महिन्यात म्हणजेच नोव्हेबर डिसेंबर महिन्यात आवळ्याचे पीक होते. आवळा हा मध्यम उंचीचा पानझडी वृक्ष असून संपूर्ण भारतात सापडतो. आणि आता हे सिजनच आहे आवळ्याचं, बाजारात टीकटिकांनी आवळ्याच्या राशीच्या राशी विकायला बसलेले दिसून येतात. आवळा हा चवीने आंबट व तुरट असतो. आवळ्या मध्ये क जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहे. आवळा हे फळ कितीही शिजवल्यावर किंवा सुकवल्यावर त्यामधील महत्वाचे जीवनसत्वे व औषधी गुणधर्म कमी होत नाही.

आवळा हा पित्तशामक, बलदायी, पाचक, ज्वर नाशक, दात मजबुतीसाठी उपयुक्त आहे. तसेच केसांसाठी गुणकारी आहे, मधुमेह, पचनक्रिया, ऍसिडिटी, हाडे मजबुती साठी उपयुक्त आहे. वजन कमी करण्यासाठी आणि अशाप्रकारे बऱ्याच औषधा मध्ये आवळ्याचा उपयोग केला जातो. आवळ्यापासून बरेच खाण्याचे पदार्थ सुद्धा बनवण्यात येतात जसे कि आवळ्याचा मुरंबा, लोणचे, सुपारी, आवळा चूर्ण, जॅम, ज्यूस, चटणी, सरबत आणि कॅण्डी इत्यादी पदार्थ तयार करता येतात व हे पदार्थ आम्हाला वर्ष भर टिकवता येते. म्हणून तर म्हणतात आवळा हा फळ अगदी सर्वगुणसंपन्न आहे.

Article By - Anjali Patil

Brainsmedia Solutions

Read More

वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उड्या हा व्यायाम आपल्याला फायदेशीर ठरतो.



आपले आरोग्य तंदरुस्त तर आपण तंदरुस्त. चला तर वजन कमी करण्यासाठी दोरीच्या उड्या हा व्यायाम फायदेशीर कसा ठरतो हे आपण जाणून घेऊ. पूर्वीच्या काळात लहान मुलाचा हा खास व सगळ्याचा आवडता खेळ होता. ज्या मुळे खेळता खेळता मुलाचा चांगलाच व्यायाम होत होता. दोरीच्या उड्या हा व्यायाम एक इनडोअर व्यायाम असून त्याचे फायदे भरपूर आहेत.



जर का तुम्ही तुमचे वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर, नियमित पणे दोरीच्या उड्या मारल्याने तुमच्या वजनामध्ये फरक जाणवेल.

दररोज दोरीच्या उड्या मारल्याने आपल्या शरीरातील कॅलरी कमी होते. शरीरात भरपूर प्रमाणात चरबी साठलेली असते ती कमी करण्याचा हा सोपा मार्ग आहे. चरबी कमी झाली कि वजन आपोआप कमी होते. या साठी नियमित पणे काही मिनटे दोरीच्या उड्या मारणे गरजेचं आहे.

दोरीच्या उड्या मारल्याने आपल्या हृदयाची क्षमता वाढते व हृदय विकाराचा धोका सुद्धा कमी होतो.

आपला स्टॅमिना वाढवण्यासाठी दररोज उड्या मारणे फायदेशीर ठरतो.

शरीराच्या आरोग्यासह आपल्या मानसिक आरोग्याला सुद्धा फायदेशीर आहे.

न चुकता जी मुलं दोरीच्या उड्या मारतात त्यांची उंची लवकर वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर मुलांच्या पाटीचा कणा, पाठ व पायाचे स्नायू यांच्यावर योग्य प्रमाणात ताण येतो. त्यामुळे उंची वाढण्यासाठी चांगलीच मदत होते.

Article By - Anjali Patil

Brainsmedia Solution

Read More

ತುಳಸಿ ವಿವಾಹ

ತುಳಸಿ ವಿವಾಹವನ್ನು ತುಳಸಿ ಕಲ್ಯಾಣ ಎಂದೂ ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಇದು ಹಿಂದೂ ಹಬ್ಬಗಳಲ್ಲಿ ಒಂದಾಗಿದೆ. ತುಳಸಿ ವಿವಾಹವು ಮಳೆಗಾಲದ ಅಂತ್ಯ ಮತ್ತು ಮದುವೆಯ ಋತುವಿನ ಆರಂಭವನ್ನು ಸೂಚಿಸುತ್ತದೆ. ತುಳಸಿ ವಿವಾಹವನ್ನು ಹಿಂದೂ ಕ್ಯಾಲೆಂಡರ್ ಪ್ರಕಾರ ಕಾರ್ತಿಕ ಮಾಸದ ಶುಕ್ಲ ಪಕ್ಷದ (ಪ್ರಕಾಶಮಾನವಾದ ಹದಿನೈದು ದಿನ) ದ್ವಾದಶಿ (12 ನೇ ದಿನ) ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.ಈ ಮಂಗಳಕರ ವಿವಾಹ ಸಮಾರಂಭವನ್ನು ಮಾಡುವ ಮೂಲಕ, ಮಹಿಳೆಯರು ತಮ್ಮ ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂತೋಷ, ಸಮೃದ್ಧಿ ಮತ್ತು ಸಂಪತ್ತನ್ನು ತರಲು ಬಯಸುತ್ತಾರೆ ಹಾಗು ಹಿಂದೂ ಧರ್ಮಗ್ರಂಥಗಳ ಪ್ರಕಾರ, ತುಳಸಿ ವಿವಾಹವು ಲಕ್ಷ್ಮಿ ದೇವತೆ ಮತ್ತು ವಿಷ್ಣು ದೇವರ ಆಶೀರ್ವಾದವನ್ನು ಪಡೆಯಲು ವಿಶೇಷ ದಿನ ಎಂದು ಹೇಳಲಾಗಿದೆ.

ಎಲ್ಲರಿಗೂ ತಿಳಿದಿರುವಂತೆ ತುಳಸಿಯು ಶ್ರೀಕೃಷ್ಣನನ್ನು ಮದುವೆಯಾದಳು. ಶಾಪಗಳ ಹೊರತಾಗಿಯೂ, ಭಗವಾನ್ ವಿಷ್ಣುವು ಅವಳ ಭಕ್ತಿಯನ್ನು ಮೆಚ್ಚಿ ತುಳಸಿ ಗಿಡವಾಗುವಂತೆ ಆಶೀರ್ವದಿಸಿದನು. ವರ್ಷದಿಂದ ವರ್ಷಕ್ಕೆ ಕೃಷ್ಣ ಏಕಾದಶಿಯಂದು ಅವಳನ್ನು ಮದುವೆಯಾಗುವುದಾಗಿ ಭರವಸೆ ನೀಡುತ್ತಾನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಕೃಷ್ಣ ಏಕಾದಶಿಯ ದೈವಿಕ ದಿನದಂದು, ಭಗವಾನ್ ಕೃಷ್ಣ ಮತ್ತು ತುಳಸಿಯ ನಡುವಿನ ಪವಿತ್ರ ಬಂಧವು ಸ್ಥಾಪನೆಯಾಗುತ್ತದೆ.

ತುಳಸಿ ವಿವಾಹವನ್ನು ಸಂಜೆಯ ಸಮಯದಲ್ಲಿ ಮಾಡಲಾಗುತ್ತದೆ.ಈ ದಿನ ಮಂಡಪವನ್ನು ಮಾಡಿ ಗಿಡವನ್ನು ಹೂವಿನಿಂದ ಅಲಂಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.ಸ್ಥಳವನ್ನು ಸ್ವಚ್ಛಗೊಳಿಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಗಿಡವನ್ನು ಇಡುವ ಸ್ಥಳದಲ್ಲಿ ರಂಗೋಲಿಗಳನ್ನು ಬಿಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ.ತುಳಸಿ ಗಿಡವನ್ನು ವಧುವಿನಂತೆ ಅಲಂಕರಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಅರಿಶಿನ ಮತ್ತು ಸಿಂಧೂರದಿಂದ ಹೊದಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಚಿಕ್ಕ ಬಳೆಗಳು ಮತ್ತು ಆಭರಣಗಳನ್ನು ಕೋಮಲವಾದ ಕೊಂಬೆಗಳ ಮೇಲೆ ತೂಗು ಹಾಕುತ್ತಾರೆ. ಕೆಂಪು ಬಣ್ಣದ ಬಟ್ಟೆಯ ಸಣ್ಣ ತುಂಡನ್ನು ನಂತರ ಸಸ್ಯವನ್ನು ಮುಚ್ಚಲು ಸೀರೆಯಾಗಿ ಬಳಸಲಾಗುತ್ತದೆ. ವಿಷ್ಣುವಿನ ಸಂಕೇತವಾಗಿ ತುಳಸಿಯ ಪಕ್ಕದಲ್ಲಿ ಸಾಲಿಗ್ರಾಮ್ವನ್ನು ಇರಿಸಲಾಗುತ್ತದೆ ಮತ್ತು ಅದನ್ನು ಧೋತಿಯಿಂದ ಕೂಡಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ವಿಧಿವಿಧಾನಗಳ ನಂತರ ತುಳಸಿ ವಿವಾಹವನ್ನು ಮದುವೆಯ ಸಂಪ್ರದಾಯಗಳಂತೆಯೇ ಅನುಸರಿಸಲಾಗುತ್ತದೆ.ಇತರ ನಂತರ ತುಪ್ಪದ ದೀಪನ್ನು ಹಚ್ಚಿ ಆರತಿಯನ್ನು ಬೆಳಗಿಸುತ್ತಾರೆ ಹಾಗು ತುಳಸಿ ವಿವಾಹ ಮುಗಿದ ನಂತರ ಎಲ್ಲರಿಗೂ ಪ್ರಸಾದವನ್ನು ವಿತರಿಸುತ್ತಾರೆ.

Written by

Akshata Ningannavar

Brains Media solutions.

Read More

तुळशी विवाह

चला तर मित्रांनो दसरा झालाआहे आणि दिवाळी पण झाली आता आपण करूया तुळशीचं लग्न. दिवाळी हि खऱ्या अर्थाने संपते ती म्हणजे तुळशीचे लग्न झाल्यावर. तुळशीचं लग्न म्हणजेच लग्नांची धाम धमाट सुरु झाली म्हणायला काय हरकत नाही. आपले पूर्वज म्हणतात कि तुळशी विवाहनंतरच घरातील इतर विवाहांना सुरुवात होते.



आपल्या हिंदू धर्मात तुळशी विवाहाला अतिशय पवित्र सोहळा मानला जातो. दिवाळी नंतर तुळशीच्या लग्नाची गडबड सुरू होते. तुळशी विवाह केल्याने कन्यादानाचे पुण्य प्राप्त होते. आता या सध्याच्या कलियुगात जो कोणी तुळशीचे रोप लावून तिची निगराणी करतो व त्याचबरोबर तुळशीची भक्ती भावाने पुजा, आराधना व स्मरण करतो, तो सर्व प्रकारच्या पापातून मुक्त होऊन त्याला भगवान श्री कृष्णाचे पवित्र धाम प्राप्त होते अशी मान्यता आहे.



विवाहाच्या अगोदर तुळशी कट्टा रंगवून सुशोभित करतात. मग ऊस, सौभाग्याचे वाण, चिंचा, आवळे, झेंडूच्या फुलांचे बाशिंग, हार व फुलांनी सजवून जणू काय नवरी मुलगीला सजवल्यासारखे सजवतात. त्याचबरोबर तुळशी भवती छान छान रंगीबेरंगी रांगोळ्या व दिव्यांची रोषणाईने आंगण अगदी झगमगून दिसून येते. आपल्या घरात असलेली प्रभू कृष्णाची मूर्ती पाटावर विराजमान केलेली, मधोमध अंतरपाट, मंगलाष्टका चे सूर अशा भक्तिमय वातावरणात व प्रथेप्रमाणे विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करतात. त्याच बरोबर व्यापारी वर्गात सुद्धा लक्ष्मीपूजनाचा उत्सव जोरात, मोठ्या थाटामाटात आणि फटाक्याच्या धाम धूम मध्ये साजरा करतात. हा सण अगदी आनंदात, मिळून-मिसळून आणि हसत-खेळत साजरा केला जातो.

Article By - Anjali Patil

Brainsmedia Solution

Read More

ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ದಿನ



ಕರ್ನಾಟಕ ತನ್ನ 68ನೇ ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಆಚರಿಸಲು ಸಜ್ಜಾಗಿದೆ. ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯೋತ್ಸವವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ರಚನೆ ದಿನ ಅಥವಾ ಕರ್ನಾಟಕ ದಿನ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನವನ್ನು ಎಲ್ಲಾ ಕನ್ನಡಿಗರು ಅತ್ಯಂತ ಅದ್ಧೂರಿಯಾಗಿ ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ.

ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ಪ್ರತಿ ವರ್ಷ ನವೆಂಬರ್ 1 ರಂದು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಈ ದಿನ ಕರ್ನಾಟಕದ ರಚನೆಯಾಯಿತು. 1956 ರಲ್ಲಿ ಕನ್ನಡ ಮಾತನಾಡುವ ಎಲ್ಲಾ ಪ್ರದೇಶಗಳು ಒಗ್ಗೂಡಿ ಒಂದು ರಾಜ್ಯವಾದಾಗ ಈ ದಿನವು ವಾಸ್ತವಕ್ಕೆ ಬಂದಿತು. ಮೊದಲಿಗೆ ಇದನ್ನು ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯ ಎಂದು ಕರೆಯಲಾಗುತ್ತಿತ್ತು ಆದರೆ ನಂತರ ಅದು ಕರ್ನಾಟಕ ಎಂದು ಹೆಸರು ಬದಲಾಯಿತು ಮತ್ತು ಅಂದಿನಿಂದ, ಈ ದಿನವನ್ನು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ ದಿನವೆಂದು ಘೋಷಿಸಲಾಗಿದೆ.

ಈ ದಿನವನ್ನು ಕನ್ನಡಿಗರು ಬಹಳ ಗೌರವ ಮತ್ತು ಸಂಭ್ರಮದಿಂದ ಆಚರಿಸುತ್ತಾರೆ.ಈ ದಿನದಂದು ಕನ್ನಡಿಗರು ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಉಡುಪುಗಳನ್ನು ಧರಿಸುತ್ತಾರೆ ಮತ್ತು ಕನ್ನಡ ರಾಜ್ಯ ಧ್ವಜವನ್ನು ಹಾರಿಸುತ್ತಾರೆ. ಕರ್ನಾಟಕದ ಧ್ವಜವು ಹಳದಿ ಮತ್ತು ಕೆಂಪು ಎಂಬ ಎರಡು ಬಣ್ಣಗಳನ್ನು ಹೊಂದಿದೆ ಮತ್ತು ಅವರು ಜೈ ಭಾರತ್ ಜನನಿಯ ತನುಜಾತೆ ಎಂದು ತಮ್ಮ ಕನ್ನಡ ಗೀತೆಯನ್ನು ಹಾಡುತ್ತಾರೆ.

ಕರ್ನಾಟಕದ ಏಕೀಕರಣದಲ್ಲಿ ಆಲೂರು ವೆಂಕಟರಾವ್ ಪ್ರಮುಖ ಪಾತ್ರ ವಹಿಸಿದ್ದರು. ಗುದ್ಲೆಪ್ಪ ಹಳ್ಳಿಕೇರಿ, ಸಿದ್ದಪ್ಪ ಕಾಂಬ್ಳಿ, ಆರ್.ಎಚ್.ದೇಶಪಾಂಡೆ, ರಂಗರಾವ್ ದಿವಾಕರ್, ಕೌಜಲಗಿ ಶ್ರೀನಿವಾಸರಾವ್, ಶ್ರೀನಿವಾಸ್ ರಾವ್ ಮಂಗಳವೇಧೆ, ಕೆಂಗಲ್ ಹನುಮಂತಯ್ಯ, ಗೊರೂರು ರಾಮಸ್ವಾಮಿ ಅಯ್ಯಂಗಾರ್, ಎಸ್ ನಿಜಲಿಂಗಪ್ಪ, ಟಿ ಮರಿಯಪ್ಪ, ಸುಬ್ರಹ್ಮಣ್ಯ, ಸೌಕಾರ್ ಚೆನ್ನಯ್ಯ, ಎಚ್.ಕೆ.ವೀರಣ್ಣಯ್ಯ, ಎಚ್.ಬಿ.ಎಸ್.ಕಕ್ಕಿಲ್ಲಾಯ, ಬಿ.ವಿ.ಕಕ್ಕಿಲ್ಲಾಯ ಮತ್ತು ಅನಕೃ ಈ ಚಳುವಳಿಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದರು.ಈ ದಿನ ಕರ್ನಾಟಕ ತಾಯಿ ಭುವನೇಶ್ವರಿ ಅವರ ಭವ್ಯ ಮೆರವಣಿಗೆ ಆಗುತ್ತದೆ ಮತ್ತೆ ಈ ದಿನ ಇಡೀ ರಾಜ್ಯವು ಕನ್ನಡ ಹಬ್ಬವನ್ನು ಆಚರಿಸುತ್ತದೆ.

ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ ಮಾತೆ

ನಿಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯೋತ್ಸವ ದಿನದ ಶುಭಾಶಯಗಳು

Article By

Akshata Ningannavar

Brains Media Solutions

Read More

“भाऊबीज”

दिवाळीचा चौथा दिवस म्हणजे भाऊबीज. हा दिवाळीचा अत्यंत महत्त्वाचा आणि मौलिक सण आहे. बहिण भावाच्या नात्यांमधील प्रेम जोपासणारा हा सण म्हणजे भाऊबीज. दिवाळीची सांगता या दिवसाने होते. कार्तिकी शुद्ध द्वितीया म्हणजेच भाऊबीजेचा दिवस त्याच बरोबर यमद्वितीया असेही म्हणतात. या दिवसाच्या अनेक दंतकथा प्रसिद्ध आहेत. असेही म्हटले आहे कि या दिवशी देवता यमराज आपल्या बहिणीला यमुनेला भेटायला त्यांच्या घरी गेले. त्यांच्या बहिणीकडून झालेला आदर सत्कार पाहून ते खूप प्रसन्न झाले. त्यामुळे यमराजांनी हे वरदान दिले कि या दिवशी जो भाऊ आपल्या बहिणीच्या घरी जाईल त्याला संकटापासून मुक्ती मिळेल आणि मोक्ष मिळेल. तेव्हापासून हा दिवस भाऊबीज नावाने साजरा होतो.

हा सण खास भाऊ - बहिणीचा आहे. बहिण या दिवशी भावाला बोलावून किंवा त्याच्याकडे जाऊन गोड धोडाचे जेवण करून, बहिण भावाला ओवाळून, टिळा लावते आणि भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करते. भावाने नंतर काहीतरी भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. बहिण - भावाच्या प्रेमाचा हा अंत्यत मंगल दिवस भाऊबीज म्हणून साजरा केला जातो. असा हा दिवाळीचा सण खूप आनंद, रोषणाई, सुख आणि समाधान घेऊन येत असतो.

तुम्हा सर्वांना भाऊबीज निमित्त हार्दिक, हार्दिक शुभेच्या ......

Article By - Anjali Patil

Brainsmedia Solution

Read More

दिवाळी आली हो दिवाळी आली

दिवाळी हा सण आला कि सर्वांचे चेहरे अगदी आनंदाने फुलून येतात. कारण या सणाची वाट अगदी लहान मुलांपासून ते मोठयापर्यत बगतात व प्रत्येकाचा आवडता व महत्वाचा सण आहे. आपल्या भारत देशात दिवाळी हा सण प्रमुख मानला जातो. त्यासाठी हा सण पूर्ण भारतात मोठया उत्साहात आणि आनंदाने साजरा केला जातो. त्याच सोबत हा सण इतरही अनेक देशांमध्ये मोठया थाटामाटात साजरा केला जातो.

दिवाळी म्हटलं की सगळीकडे आनंदी वातावरण, तो दिव्यांचा लखलखीत प्रकाश, फराळाचा छानपैकी सुंगध आणि अजून बरेच काही. दिवाळी हा आनंदाचा आणि बंधुभावाचा सण आहे. या सणाला सामाजिक, वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्वही आहे.

मित्रांनो दिवाळी हा सण का साजरा केला जातो ? दिवाळीचा इतिहास खूप जुना आहे. त्याच्याशी संबंधीत अनेक पौराणिक कथा आहेत, या दिवाळी सणाचे मुख्य कारण आहे. या दिवशी श्री राम रावणाचा वध करून, 14 वर्षांचा वनवास संपून लक्ष्मण आणि माता सीतेसह आयोध्या ला आले होते. त्यांच्या आगमनाच्या आनंदात अयोध्यातील जनतेने त्यांचे स्वागत असंख्य दिवे लावून केले. म्हणून त्या दिवसापासून हा सण सर्वीकडे सर्वजण अगदी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

अश्विन वदय त्रयोदशी ते कार्तिक शुद्ध द्वितीया हे पाच दिवस दिवाळीचे असतात. अज्ञानाचा नाश आणि ज्ञानाचा प्रकाश देणारी ही दिवाळी सर्वांनाच प्रिय आहे. जो तो आपापल्या परीने ती साजरी करतो आणि आनंद लुटतो. दिवाळीच्या आगमनाच्या काही दिवस आधी लोक हा सण साजरा करण्याची तयारी सुरु करतात. छान छान तिखट - गोड पदार्थ बनवले जातात. लाडू, चकल्या, शंकरपाळी, करंज्या, चिवडा असे मुख्य पदार्थ तर बनवले जातातच. याशिवाय बेसन आणि रव्याचे लाडू, अनारसे, बर्फी, चक्की असे पदार्थही आता बनवले जातात. घरातील सर्वांना नवीन कपडे किंवा इतर काही वस्तू घेण्याचा हा मुहूर्त असतो .

दिवाळी हा सण पाच दिवसाचा असतो. धनत्रयोदशी, नरक चतुर्थी, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज हे दिवाळीचे पाच दिवसात घरापुढे कंदील, आंब्याच्या पानाचे तोरण व झेंडूच्या फुलांचे तोरण मुख्यप्रवेश द्वारावर लावले जाते. तसेच वेगवेगळ्या रंगाच्या रांगोळ्या काढल्या जातात. तेलाचे लहान दिवे आणि मेणबत्या इत्यादींनी सजवले जाते. दिवाळीच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे लवकर उठून उटणे लावून अभ्यंगस्नान केले जाते. नवीन कपडे घातले जातात व संध्याकाळी देवी लक्ष्मी आणि गणेश जी यांची पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर प्रत्येक जण आपल्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना प्रसाद, मिटाई , फराळ, भेटवस्तू इत्यादी देवाण-घेवाण करतात. या दिवशी मुले बॉंम्ब , फटाके पेटवून खूप आनंदी असतात. दिवाळीच्या दिवशी दुकाने, बाजारपेठ आणि घरे दिव्यांच्या सजावटीमुळे उजळून दिसतात. मोठे आणि लहान, श्रीमंत आणि गरीब यांच्यातील फरक लोक विसरतात आणि हा उत्सव एकत्र साजरा करतात. हेच या सणाचे वैशिष्ट्य आहे.

तुम्हा सर्वाना दिवाळीच्या खूप खूप मंगलमय शुभेच्छा……

Article By - Anjali Patil

Brainsmedia Solution

Read More