Quotes by Dr GAJANAN PATIL in Bitesapp read free

Dr GAJANAN PATIL

Dr GAJANAN PATIL

@drgajananpatil1084


https://m.facebook.com/story.php?story_fbid=785629075556285&id=100023275994321&sfnsn=wiwspmo&extid=QgPmwRYpERAW1DYv&d=n&vh=i
वरील लिंकवर क्लीक करुन पहा लाईव्ह आत्मसंवाद .
डॉ .गजानन पाटील

Read More

रागाचे रंग आणि रंगाचे राग

( हे लेखन केवळ मनोरंजनासाठी असलेने यातून कोणाच्या भावना अथवा मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही . हे कृपया माझ्या सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे ही विनंती . )

प्रकार चौथा : लिंबू राग

या रागामध्ये लिंबू सारखी अवस्था त्या नवरोजी मंडळीची झालेली असते. कापावा तर आंबट आणि ठेवावा तर वातळ .अशी अवस्था त्यांची होते .या रागामध्ये सौभाग्यवती सतत सतत टोमणे देत राहतात आणि या टोमण्यांचा एवढा मोठा परिणाम मनावर होतो की नवरोजी आक्रसून जातात. उदाहरणार्थ लग्न करताना मोठ्यांनं सांगितलं होतं ,म्हणे मी असा आहे मी तसा आहे .आणि बघतो तर काय ? आंब्याच्या झाडाला वांगी लागलेली आणि ती पण कीडकी .. आणि लग्नाच्या अगोदर माझ्या वडिलांना वचन दिलं होतं ,तुमच्या मुलीला मी कसलाही त्रास देत नाही ... आणि लग्नाच्या पहिल्या दिवसापासून जो त्रास सुरू आहे तो अजून पर्यंत काही गेला नाही... आणि म्हणे तुझं करिअर करू ... गेलं खड्ड्यात करीयर .. रांधा , वाढा , उष्टी काढा यात जन्म गेला ..पण किमान म्हणायचं तरी ,तुझ्यासाठी नाही करता आलं ..ते सुद्धा कधी म्हणून झालं नाही ...जी मंडळी दारू पिणाऱ्या पैकी नाहीत ती दारूच्या मागे न लागता एकटेच शांत बसून राहतात. असं घडलं कसं याचा विचार सातत्याने करत राहतात .एकाच छताखाली असून दोघांची बोलती ४-४ महिने अजिबात होत नाही . सारा व्यवहार मुलांच्या नावावरून होतो, उदाहरणार्थ तिकडून ,चिंगे चहा झालाय घेऊन जा . इकडून ,चिंगे, रिकामी कप बशी घेऊन जा आत आणि आज मला शेवग्याची आमटी नको ... अशी बोलणी सुरू होतात. विशेष म्हणजे त्यात कोणीही मध्यस्थी करू शकत नाही . शिवाय हे प्रकरण चार भिंतीच्या बाहेर कधीही जाऊ शकत नाही . उगा नाचकी... बरं सौभाग्यवतींच्या माहेरी हे प्रकरण सांगावं तरी अडचण असते ...म्हणून त्या माहेरी हे प्रकरण घेऊन जाऊ शकत नाहीत .. आणी घराच्या बाहेर हे प्रकरण कुणाला सांगण्याची सोय नसते ...असा हा राग लिंबू सारखाच हिरवट पिवळा आणि आंबट असतो ...म्हणजे साखर घालून केला तर सरबत होतो पण नाही केला तर नुसता आंबट ढयाण असतो ... अशातली गत या रागाची असते .या रंगांमध्ये कोणी माघार घ्यायची यावर बराच वेळ शीत युद्ध चालू असतं . आणि माघार घेतली तर तुम्ही का माघार घेतली ? म्हणून पुन्हा युद्ध सुरू होतं.. आणि या सगळ्या भानगडीत मध्ये अनेक वेळा माघार घ्यावी किंवा न घ्यावी या विचारांच्या गर्तेत नवरोजी मंडळी माघार न घेता सुद्धा जाहीर माफी मागून रिकामे होतात. पण माफी कशाची असा प्रश्न विचारला जातो . तेव्हा होऊन गेलेली घटना आठवण्यासाठी नवरोजीना अर्धा तास तरी लागतो .अशी घटना घडल्यावर सौभाग्यवती म्हणतात ,बघा बघा आपल्या चुका सुद्धा आठवत नाहीत ... मग केवढ्या चुकांची यादी आहे यांची ??? मग पुन्हा युद्धाला भडका .असा हा लिंबू राग पिळावा तेवढा आंबटच होत जातो आणि त्यामुळे संसाराला कंटाळलेली मंडळी कट्ट्यावर येऊन बाहेर निवांत गप्पा मारत असतात. रात्री जेवण सुद्धा बाहेरच घेतात . कदाचित त्यांच्यामुळेच धाबा संस्कृती जोरदार बळावली असा आमचा होरा आहे . या रागाचा प्रर्दूभाव झालेली मंडळी आंबट चेहरा करून कामावर जातात आणि या मंडळींना पाहिल्यानंतर आजूबाजूचे लोक म्हणतात ,लग्न काही पचनी पडले नाही बुवा ... काहीतरी प्रॉब्लेम आहे ...आणि मग त्यांचे चेहरे फुलून जातात आणि मग हा आंबट लिंबूचा रंग आमसुली बनत जातो . त्यातूनच पुढचा राग होतो आमसुली ..


डॉ गजानन पाटील

Read More

रागाचे रंग आणि रंगाचे राग
डॉ गजानन पाटील

( हे लेखन केवळ मनोरंजनासाठी असलेने यातून कोणाच्या भावना अथवा मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही . हे कृपया माझ्या सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे ही विनंती . )
( भाग ३ )
प्रकार तिसरा : नारंगी राग

या रागामध्ये सौभाग्यवती जितका तुमचा तिरस्कार करता येईल तितका त्या तिरस्कार करतात. म्हणजे तुम्ही अगदी समोर आला तरी ते तुमच्याकडे पाहणार सुद्धा नाहीत .आणि पाहिले तर नाक डोळे मुरडणार . शिवाय जेवायला या , असं म्हणण्या ऐवजी गिळायला बसा ..असा शब्दप्रयोग केला तर शंभर टक्के ओळखायचं हा नारंगी राग आहे. हा राग डोकं दुखवणारा असतो . नवरोजी म्हणाले , माझं चुकलं . तर दाणकन उतर येणार .. शेण खाताना नव्हतं कळत ... आणि मग जो काही त्या इतिहास उगाळणार की नवरोजीची बोलती बंद होणार . तो सर्व आरोप डोक्यावर घेवून सफशेल डोकं सौभाग्यवतीच्या पायावर नवरोजीनी टेकवलं तरी जरा सुध्दा पान्हा न फुटता परत लाह्या फुटू लागतात .. म्हणजे आधी चुका करायच्या आणि वर मी त्यातला नाही म्हणून सांगायचं .असा त्याचा अर्थ होतो. चुका करतो माणूस म्हणूनच माफी मागतो ना ! असं खूप खूप बोललं जातं त्यावेळी ,म्हणजे नवरोजीना मोसंबी - नारंगी पिवून आपणास स्वप्न पडले की काय असा सतत भास होतो ... या रागाचं वैशिष्ट्य असं की एकाच छताखाली राहून कित्येक महिने एकमेकांची तोंड बघितली जात नाहीत .एकमेकाकडे पाहिलं जात नाही. आणि सतत यावरून त्यावरून उणेदुणे काढले जाते .मग नवरोजीला एखादा मित्र सल्ला देतो, तिला माहेरी पाठव कायमची. तर तो नवरोजी हताशपणे म्हणतो ,तिला माहेरी पाठवल्यावर या पोरांचा करायचं कोणी? असेना का भांडकुदळ पण प्रेमळ आहे , खरं बोलणारी आहे .बाहेर तो त्या सौभाग्यवतीची एवढी प्रशंसा करतो की बोलायची सोय नाही .पण घरात मात्र या नवरोजीला प्रचंड त्रास होतो हे बाहेर सांगून कुणालाही खरं वाटत नाही. असा हा नारिंगी रंग असतो म्हणून या रागाच्या रंगामध्ये नवरोजी कधीकधी नारंगी मोसंबी आणि मग पुढे इंग्लिश प्यायला सुरुवात करतात .मूळ सुरुवात कुठून झाली याचा शोध घेतल्यास मूळ येथे सौभाग्यवती कडे असते . हे कुणालाही कळत नाही .तरीसुद्धा सौभाग्यवतीमुळे मला दारू प्यावी लागली असं कोणताही पुरुष प्रथम दर्शनी म्हणत नाही . तर माझ्या दुःखामुळे मी दारू पीत आहे असे म्हणतात .असा हा नारंगी राग आहे . हा राग बरेच दिवस सुरू असला तर पुढचा राग तयार होतो . लिंबू राग...

डॉ गजानन पाटील

Read More

https://youtu.be/wDpv7i9cjQQ

वरील 👆 लिंकवर क्लीक करून जरूर पहा हा जीए मोटीव्हेशनल चॅनेल वरील हिरवा निसर्ग हा भवतीने ... हा व्हीडीओ ... या व्हीडीओमध्ये आहे कोकणातील हिरवागार निसर्ग, निसर्गाच्या रंग छटा , खळाळणारे पाणी , हिरवीगार भातशेती , नागमोडी वळणे , भरून आलेले आभाळ आणि मस्त धुकं . हा व्हीडीओ पहाताना मन तुमचं आनंदून जाईल अन् मनावरचा ताण नाहीसा होईल . तेव्हा तुम्ही पहा अन् इतरांनाही ही लिंक शेअर करा . धन्यवाद .
डॉ .गजानन पाटील

Read More

रागाचे रंग आणि रंगाचे राग

डॉ . गजानन पाटील
( हे लेखन केवळ मनोरंजनासाठी असलेने यातून कोणाच्या भावना अथवा मन दुखावण्याचा आमचा हेतू नाही . हे कृपया माझ्या सुज्ञ वाचकांनी लक्षात घ्यावे ही विनंती . )
( भाग २ )

प्रकार दुसरा : केतकी राग

या रागात जरा आक्रमकता जास्त असते .म्हणून याला केतकी राग असं म्हटलं जातं .जसं तुम्ही मुलीला सांगता , दीदी आज ऑफिसमधून येताना मी जेवून येईन .त्यावर अबोली रंग जर विरला तर काहीच प्रतिक्रिया होत नाही .उलट आतून आवाज येतो ,दिदी सांग त्यांना ,संध्याकाळी जेवणाला घरीच या म्हणावं मस्त जेवण करते ...त्यावेळी ओळखायचं अबोली रंगात बदल होत चाललेले आहेत ..पण याच्या ऐवजी असं जर झालं तर तो केतकी रंगांमध्ये मोडतो .म्हणजे जर सौभाग्यवती म्हणाल्या ,असं बाहेरचं खाऊन खाऊन चटावलेले नुसते... घरातल्यांची चिंता नाही... कधी आम्हाला कुठे नेले नाही , कधी हौसेने फिरवले नाही . सदा कदा मित्राच्या पाटर्या जळ्या मेल्या त्या ... असं म्हणत धडाधड भांडी पडण्याचा आवाज आला तर हा केतकी राग असतो हे ओळखावे ... या केतकी रंगाच्या रागांमध्ये अनेक गोष्टी असतात .घरातील चहाच्या कपांचे लग्न लागतात, बशांना पोरं होतात , काचेचे ग्लासाचे व्हराड निघतं . आणि घरातील शोच्या वस्तू जागेवर राहत नाहीत. तर जमिनीवर पडून त्या अनेकविध होतात .या गोष्टीचा त्रास मात्र आपल्याला सोसावा लागतो कारण आर्थिक भुर्दंड आपल्यालाच पडणार असतो ..केतकी राग आपल्या खिशाला परवडणारा नसतो. म्हणून सर्व मंडळांना सूचना आहे की केतकी रागा पर्यंत जाण्याइतपत आपली कोणतीच गोष्ट अनुचित करू नये किंवा अबोली रंगात बदल होतोय असं कळाल्यानंतर लगेच बिनार्शत माघार घ्यावी . माफी मागावी .विरोधी पक्षनेत्या सारखे वागू नये .असा आमचा आपणास सल्ला आहे. हा केतकी रंग अधिक बळावतो तेव्हा नारंगी रंगाचा राग तयार होते...

(क्रमशः )
पुढचा राग : नारंगी राग
डॉ .गजानन पाटील

Read More