शब्दच घडवितात महाभारत
-------------------------------------------
"माणसाचं आयुष्य प्रचंड चढ-उतारांनी भरलेलं असतं.. आयुष्यातला कोणता दिवस तुम्हाला कोणत्या भूमिकेमध्ये नेऊन ठेवेल आपण सांगू शकत नाही.. जीवनाच्या रंगमंचावर रोजचे अभिनय वेगळे तसे आपल्या आजूबाजूच्या जगाचे रंगही त्यासोबत दिसू लागतात.. कठीण प्रसंगात आपली माणसं ओळखण्याची कला दडलेली असते पण कठीण प्रसंगी आपण आपला "विवेक" गमावून बसलेलो असतो..
स्त्री असो वा पुरुष बोलताना शब्द नेहमी जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या घडलेल्या या उदाहरणावरून लक्षात येईल.
महाभारत युद्ध अठरा दिवस चालले. याचा द्रौपदीला खूप त्रास झाला.
शरीराने व मनाने ती खूप खंगली होती, वयस्कर दिसत होती.
हस्तिनापुरात सर्व दूर फक्त विधवा दिसत होत्या. आणि अनाथ मुले इकडे तिकडे फिरतांना दिसत होती. सर्वत्र उदासीनता पसरली होती.
अधूनमधून एखाद दुसरा पुरुष दिसत होता.
महाराणी द्रौपदी हस्तिनापुराच्या महालात पहूडली होती...तिचे मन अतिशय खिन्न होते
जेंव्हां श्रीकृष्ण तिच्या कक्षात आले. .
त्याला पाहून तिला रहावलं नाही. तिने त्याला विचारले.. केशवा अरे, असा तर मी विचारच नव्हता केला रे. हे असं कसं झालं? हस्तींनापूर भयंकर दुःखाचे खाईत ढकलल्यागत झाले आहे. बेचिराग झाल्यागत हस्तींनापूरची अवस्था झाली आहे.
कृष्ण म्हणाले. "पांचाली नियती खूप निष्ठुर असते. ती आपल्याच मनाप्रमाणे चालत असते."
द्रौपदी, तुला कौरवांचा बदला घ्यायचा होता ना? मग तू तर यशस्वी झालीस! फक्त दुर्योधन आणि दुःशासन नव्हे, तर सर्वच कौरव संपले... द्रौपदी तुला तर आनंदच व्हायला हवा होता..?
द्रौपदी म्हणते, मधुसूदना अरे तू मला सावरायला आला आहेस? की मला हिणवायला आला आहेस ?
योगेश्वर म्हणतात 'नाही द्रौपदी, मी तुला त्यातलं खरं काय आहे ते वास्तव सांगायला आलो आहे.
आपल्या कर्माची फळे आपल्याला दिसत नाहीत. पण ती जेंव्हा समोर येतात तेव्हा आपण काही करू शकत नाही.कर्म बदलण्याचे सामर्थ्य आपल्या हातात नसते. शिवाय आपल्या नशिबात जसे असेल तसेच घडत असतें. "कर्म घेत असे झोले तेथे देवाचे काही न चले " म्हणूनच प्रत्यक्ष भगवन्तालाही देखील रामावतारत वनवास चुकविता आला नाही. मग इतरांचा काय केवा? मग आपल्या कर्माची फळं आपल्याला कशी चुकतील? भोग हें भोगूनच संपवता येतात.
द्रौपदी विचारते, कृष्णा मग ह्या युद्धाला मीच पूर्णपणे जबाबदार आहे असं का तुला म्हणायचं आहे?
कृष्ण म्हणतात, नाही द्रौपदी, तू स्वत:ला इतकं महत्त्व देऊ नकोस.!
तू तुझ्या कर्मात थोडा जरी दूरदर्शीपणा दाखवला असतास तर तुला एवढा त्रास झाला नसता!
द्रौपदी विचारते कृष्णा, मी काय करू शकत होते?
कृष्ण म्हणतात, तुझ्या स्वयंवराच्या वेळी तू कर्णाचा अपमान करायला नको होतास..स्वयंवराचे प्रसंगी कर्नाचा अपमान करून त्याचे मन दुखावलेस.
आणि त्यानंतर कुंतीने तुला पाच पांडवांची पत्नी होण्याचा आदेश जेंव्हा दिला. त्या आदेशाचा तू स्विकार केला नसतास, तर परिणाम काहीतरी वेगळे झाले असते..
जगात दुसऱ्या ला हसण्या इ तके सोपे आणि दुसऱ्या साठी रडण्या इतके कठीण काम कोणते नाही.
त्यानंतर तू तुझ्या महालात दुर्योधनाच्या वर्मावर घाव घालणारं वाक्य बोललीस..त्या अपमानित वाक्याने दुर्योधनाच्या अंतःकरणात घर केल दुर्योधन सुडागणीने पेटून उठला.
"अंधे का पुत्र अंधा"
असे म्हणून वर खिदळून हसत त्याचा "सार्वजनिक अपमान" केला नसतास तर तुझं वस्रहरण झालं नसते..
कदाचित त्यावेळीही परिस्थिती वेगळी असती..
आपले शब्दच आपले कर्म बनवतात.
आपण आपला प्रत्येक शब्द विचार करुन बोलायला हवा., नाहीतर त्याचे दुष्परिणाम फक्त स्वत:लाच नाही तर आपल्या संपूर्ण परिवाराला भोगावे लागतात.
जगात फक्त मानव असा एक प्राणी आहे की त्याच्या दातात नाही तर जिभेत विष आहे.
म्हणून.. बोलतांना भान ठेवणं महत्वाचं असतं... बेलगाम बोलण्यानंच, नाती तुटतात व प्रपंचात "महाभारत घडते.
मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर.