संत तुकाराम - अभंग चिंतन
संत तुकाराम- अभंग चिंतन.
आपुला तो एक देव करूनि घ्यावा |
येणे विण जीवा सुख नोहे |
येर ती माईकके दुखःची जनिती |
नाही आदिअंती अवसान |
अविनाश करी आपुलिया ऐसे |
लावी मना पिसे गोविंदाचे |
तुका म्हणे एका मरणेचि सरे |
उत्तमचि उरे किर्ती मागे |
प्रस्तुत अभंग जगद्गुरू तुकाराम महाराज यांच्या पवित्र व पावन अभंग गाथामधील क्र. 2298 चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे!
या अभंगात तुकोबाराय म्हणतात....
आपुला तो एक देव करूनी घ्यावा |
तेणे विण जीवा सुख नोहे |
बाबारे हा देह नाशिवंत आहे.....शाश्वत सत्य काय आहे? तर ते भगवंताचे नामस्मरण विठ्ठलाचे भजन कीर्तन आहे ! म्हणून तुम्ही विठ्ठलाला आपलेसे करून घ्यावे !! काया वाचा मने एकाग्र चित्ताने मनोभावे देवाला आपलेसे करून घेण्यासाठी भक्तीचा मार्ग निवडला पाहिजे ! भक्ती केल्याने काय होत नाही? होत्याचे नव्हते होते !!अशक्यातील गोष्ट शक्य करून घेण्यासाठी भक्तीच केली पाहिजे! देव कोठे आहे? तर देव संताचे सहवासात राहून भजन कीर्तन करतो! माऊली म्हणतात , चंद्र तेथे चंद्रिका | शंभू तेथे अंबीका |संत तेथे विवेका | आसने किजे| जेथे चंद्र आहे तेथे चंद्रिका आहे . जेथे शंभू आहे तेथे अंबीका आहे आणि संत जेथे आहे तेथे भगवंत आहे! येथे असे देव उभा जैशी समचरणाची शोभा म्हणून आपला एक देव करूनी घ्यावा त्याच्या शिवाय आपल्याला कोणी नाही! कारण त्यांच्या पायी सुख लोळण घेत आहे! सुख वसे तुझे पायी सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार सुख नाही कोठे…. आलीया संसारा वाया हावभरी…. होऊ नका ……खरे सुख विठ्ठलाच्या भक्तीतच आहे! म्हणून तुकोबाराय म्हणतात सुखरूप ऐसा दुजा कोणी नाही माझ्या पांडूरंगा वाचोनी !!या जीवनाचे कायापालट करून घेण्यासाठी देवाला आपलेसे करून घ्यावे!
म्हणून अभंगाचे दुसर्या चरणात तुकोबाराय म्हणतात.....
येर ती माईके दुखःची जनीती |
नाही आदी अंती अवसान |
या संसार बंधनातून मुक्त होऊन संतमहंताचे संस्कारांचा घास घेतला पाहिजे ! ऐसा लाभ बांधा गाठी | विठ्ठल पायी पडो मिठी | जर तुम्ही भगवंताला शरण गेलात तर तुम्हाला कधीच दुखाचा सामना करायची गरज नाही. एवढी अगाध भक्ती आहे.....विठूराया साठी वेडावले मन देखीले चरण पद पवित्र… या जगात आपले परब्रह्म शिवाय कोणी नाही… हा सगळा खटाटोप व्यर्थ आहे ! निष्ठावंत भावाच्या बळावर साधक हरिला आपलेसे करून घेतोच . मग त्याला दु:खाचा सामना करण्यापेक्षा तुझ्या भक्तीत रंगून गेले तर आपल्या जीवनाचा उध्दार होईल! नामदेवराय देखील म्हणतात अंतकाळी मी परदेशी ऐसे जाणूनी मानशी म्हणूनीया ऋषिकेशी शरण तुजशी आलो! कारण हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा वरी चर्म घातले रे कर्म चिकटाचा साजा…… हे शरीर भोगाचे अधीन जाणारे आहे . याचे सुख क्षणभंगुर आहे. नरदेहाला आल्यानंतर दुख येणारच . पण भगवंताला शरण गेलो तर तुम्हाला कधीच कमी पडू देणार नाही मन माझे मरोनिया गेले मजला केले अमर !….. तुला मागेपुढे देव सांभाळीत राहतो तुला आदी अंती अवसान आणून दुखःची शिराणी कधीच येऊ देणार नाही! म्हणून भगवंत सुंदर त्यांची भक्ती ही सुंदर जो भक्ती करतो तो भक्त ही सुंदर! असा सावळ्या परब्रह्मचे भजन कीर्तन करून देवाला आपलेसे करून घ्यावे !
म्हणून अभंगाचे तिसऱ्या चरणात महाराज म्हणतात....
अविनाश करी आपुलीया ऐसे |
लावी मना पिसे गोविंदाचे |
गोविंद गोविंद म्हणा लागलीया छंद…… विठू माऊली तु माऊली जगाची माऊलीच मुर्ती विठ्ठलाची …… मी अविनाशी आहे माझ्या मुखातून सतत देवा तुझे नामस्मरण घडो! हेची मज घडो जन्मोजन्मातरी मागणे श्रीहरी नाही दुजा ! देवा माझे मन गोविंदू रंगले आहे मला आता तुझ्या शिवाय उणे काहीही नाही! नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी|….. नाही निर्मळ जीवन | तरी काय करील साबण …..देवा माझे मन पवित्र आहे मी निर्मळ मनाने तुझी सेवा करण्यासाठी मी दास होऊन राहतो! कारण हा देह नश्वर आहे! क्षणाचा नाही भरवसा…. म्हणून देवा मी तुझ्या भक्तीत तल्लीन होऊन जातोय! मला तुझ्या नामाचा महिमा वर्णन करायचे आहे! म्हणून देवा तु माझ्या मनाला तुझ्या नामाचा छंद लाऊ द्यावे ! मी ठरवले आहे कि पंढरपूर निवासी भगवान परमात्मा विठ्ठल तारणारा आहे! हेच खरे.देवा माझ्या वरती ऐवढी दया करा! असो नसो भाव आलो तुझ्या ठायी कृपा दृष्टी पाहे तु मज कडे पंढरीराया! माझ्या मनाला तुझ्या नामाचा छंद लागोनिया रहावे !
म्हणून अभंगाचे शेवटच्या चरणात तुकोबाराय म्हणतात..... तु का म्हणे एका मरणेची सरे |
उत्तमची उरे किर्ती मागे |
मरावे परी किर्ती रूपाने उरावे! याला सार्थकी जीवन जगणे म्हणतात .मग आपणच ठरवावे सार्थक जीवन जगायचे कि व्यर्थ जीवन!!सार्थकी म्हणजे कशे? आमच्या तुकोबाराय यांनी चारशे वर्षा पुर्वी सांगितले आहे, तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला !!…किंवा…. तुका झालासे कळस ……ज्ञानाचा लळा माऊलीने आम्हाला लावला आहे..! आमच्या सारख्या सामान्य जीवाला भक्ती मार्गावर आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले ! जगाच्या कल्याणा संताच्या विभूती देह कष्ट वीती परोपकारी संतानी कधीच स्वतःचाच विचार केला नाही. त्यांनी आपल्याला संस्कारांचा घास दिले . म्हणून तर त्यांची किर्ती अजरामर आहे! आमच्या माऊलीने वयाच्या बाविसा व्या वर्षी समाधी घेतली !…. या देशासाठी भगतसिंग यांना वयाच्या तेवीस वर्षी फासावर जावे लागते……. वयाच्या ऐकोन चाळीस वर्षे स्वामी विवेकानंद जगले …….वयाच्या ऐकोन पन्नास वर्षे छत्रपती शिवाजी महाराज जगले …… दयानंद सरस्वती हे वयाचे चौतीस वर्षे जगले …… जगद्गुरू तुकोबाराय हे वयाच्या बेचाळीस वर्षी सदेह वैकुंठाला गेले! पण या महात्म्यानी जे काही केले आहे त्यांचे चरित्र जीवनात आचरण करा आणि मग जीवन पावन करून घ्यावे! हे सर्व महात्मे पन्नासच्या आतच जगले.....पण त्यांची किर्ती आजही दरवळत आहे !!म्हणून तर तुकोबाराय म्हणतात की मरा पण किर्ती रूपाने उरावे …..याला सार्थकी जीवन जगणे म्हणतात ! बावीस वर्षे समाधी घ्यायचे वय नाही पण माऊलीने बावीस वर्षेपर्यंत असे काही करून ठेवले आहे कि आज जागतिक स्तरावरील मोठमोठे शास्त्रज्ञ संत ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यास करत आहेत! पण त्यांना माऊलीची महती कळाली नाही!! ऐवढी अगाध शक्ती नामात आहे ! म्हणून तुकोबाराय म्हणतात सुखरूप ऐसा दुजा कोणी नाही माझ्या पांडूरंगा वाचोनी….. उत्तम किर्ती मागे ठेवून मरावे असे महाराज म्हणतात.
🙏 🙏 🙏
मच्छिन्द्र माळी, छ. संभाजीनगर
मो. नं. 8830068030.