खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते

"विद्यार्थी हा ज्ञानसागरात पोहणारा राज हंस आहे" या सुविचारा प्रमाणे खरा विद्यार्थी हा नेहमीच वेगवेगळे ज्ञान शोधून ते शिकण्याच्याच मागे असतो. खऱ्या विद्यार्थ्याला फक्त पोटा पुरते शिकून चालत नाही,तर त्याला जास्तीत जास्त शिकून वेगवेगळे ज्ञान आत्मसात करून प्रगतीच्या वाटेवर चालून उन्नती कडे म्हणजेच प्रकाशा कडे झेप घ्यायची असते कारण त्याला माहिती असते की आज जर आपण कष्ट केले प्रचंड मेहनत केली तर उद्या मिळणारे कष्टाचे फळ ही नक्कीच गोड असणार आहे. खऱ्या विद्यार्थ्याला नेहमी उंच भरारी मारणाऱ्या गरुड पक्ष्या प्रमाणे वागायला हवे. म्हणजेच केवळ परिक्षे पुरता अभ्यास न करता आपण वर्षभर अभ्यास केला पाहिजे. म्हणजेच सध्या च्या परिस्थिती प्रमाणे तुम्ही ऑनलाईन exam घ्या की ऑफलाईन त्याला काहीच फरक न पडता तो नेहमी तयार राहायला पाहिजे

Marathi Thought by Sayali Warik : 111911557

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now