जात (कादंबरी) अंकुश शिंगाडे जात फोफावत चालली होती व त्याची झळ दिक्षाला जाणवत होती. दिक्षाच्या विवाहाला गावानं स्विकारलं होतं. परंतु बिरादरी? त्या बिरादरीनं दिक्षाला स्विकारलं नव्हतं. शिवाय तिची जात जातबंधनंही पाळत होती. शिक्षणही निःशुल्क नव्हतंच जातीचं. ते पाहून दिक्षाच्या मनात विचार आला होता. निदान शिक्षणात तरी जातीचा वापर होवू नये. जात असावी. परंतु ती माणसाची एक ओळख म्हणून. जातीवरुन जाच नसावा व जातीवरुन भेदभावही नसावाच. जात आणि जातीप्रथा केव्हा नष्ट होणार. हा एक चिंतेचा प्रश्न होता. जातीप्रथा देशात पाळली जात होती व त्याच आधारावर भेदभाव करुन जाणीवपूर्वक जाणूनबुजून अत्याचार केला जात होता. ज्याचे बिजारोपण शाळेतच केले जात होते. शाळेतही जातीप्रथा अस्तित्वात आहे व तिथंही शिकतांना विद्यार्थ्यांचा पदोपदी अपमानच होत आहे. अन् तेवढाच त्रासही. असं सारखं जाणवत होतं. त्याचं कारणही होतं. विद्यार्थ्यांचं शाळेत नाव दाखल करतांना त्याच्या नावासमोर जात लिहिणं. दिक्षाला वाटत होतं की तिच्या अपत्याच्या नावासमोर जात लिहावी. परंतु ती त्याची जात लिहिता तिचीच जात लिहावी. त्याचं कारण होतं, आरक्षण असणं. दिक्षाची जात चांभार असल्यानं त्या जातीचा समावेश अनुसूचित जाती गटात खुद्द बाबासाहेबांनी केला होता. तसंच आरक्षण समाप्त करण्याचा विचार करु पाहणारे नेते हे आरक्षण समाप्त करीत नव्हते. त्याचं कारण होतं निवडणूक. निवडणुकीत आपल्याला जास्तीत जास्त मतदान मिळावं म्हणून सरकारनं आरक्षण सुरु ठेवलं होतं. ज्याचा फायदा दिक्षालाच होत होता. दिक्षाला दोन मुलं झाली होती. त्यातच तिनं विवाह केल्यामुळं ती मुलं साहजीकच आंतरजातीय विवाह केल्यामुळं तिला तिच्या पतीची जात प्राप्त झाली होती. कारण जन्मानंतर पित्याचीच जात त्या मुलांना प्राप्त होत असे व तसा नियमही होता. मात्र आरक्षणाचा विशेष फायदा होईल व आपल्याला शेवटपर्यंत लाभ मिळेल या हेतूनं दिक्षाला वाटत होतं की तिची जात मुलांसमोर लागावी. तसं तिनं घरी सांगीतलं की मला माझ्या मुलाच्या नावासमोर जात म्हणून माझीच जात टाकायची आहे व त्या जातीला विशेष असं आरक्षण आहे. तसं आरक्षण हे तुमच्या जातीला नाही. दिक्षानं आपल्या पतीसमोर तसं म्हणताच तिच्या पतीच्या पायातील आग मस्तकात गेली. त्यानंतर काही वेळ पर्यंत त्यानं तिला समजावून पाहिलं. सांगीतलं की जन्मानंतर पित्याचीच जात मुलांच्या नावासमोर लागते. आपण जर तसं केलं तर आपल्याला लोकं वेड्यात काढतील. आपण तसं करु नये. दिक्षानं ते ऐकलं. परंतु ती काही ऐकायला तयार नव्हती. त्याचा राग तिच्या पतीला येत होता व त्याचा राग अनावर झाला व त्यानं रागाच्या भरात त्यानं तिच्या थोबाडीत मारली. ज्यामुळं तिला तिच्या पतीचा भयंकर राग आला होता. दिक्षा निराश होती. त्यानंतर ती चूप बसली होती. तशी रात्र झाली. रात्री दिक्षानं जेवनही केलं नाही. सकाळ झाली होती व सकाळी काही दिक्षा लवकर उठली नाही. तिच्या मनात रात्रीचाच राग होता. काही वेळानं दिक्षा उठली व तिनं आपल्या मुलांसाठीच स्वयंपाक केला. परंतु पतीसाठी स्वयंपाक केला नव्हता. दोन तीन दिवस झाले होते. तिचा पती आणि दिक्षा आताही बोलत नव्हते. त्यातच तिच्या पतीलाच समस्या येत होती. तिच्या न बोलण्याचा त्याला राग येत होता. अबोला सहन होत नव्हता. शेवटी त्यानंच मौन सोडून तिला म्हटलं, "दिक्षा, मला माफ कर. मी चुकलो. तुला जसं वागायचं, तसं वाग. मुलांच्या नावासमोर जात लिहिण्याचा तुझा प्रयत्न. तो प्रयत्न रास्तच आहे. तुझं बरोबर आहे. परंतु आजच्या काळात अजुन तरी मुलांच्या नावासमोर मुलांच्या आईची जात लिहिण्याची प्रथा नाही. त्यामुळंच मी बोललो." दिक्षाच्या पतीनं दिक्षाला म्हटलेले शब्द. ते पाहून दिक्षालाही आपली चूक कळली व तिनं ठरवलं की आता मुलांचं शाळेत नाव टाकतांना मुलांच्या नावासमोर जातच टाकायची नाही. ना रहेगा बास ना बजेगी बासरी. ना आपल्या पतीलाही राग येणार ना आपल्यालाही. तसा विचार करुन ती आपल्या मुलांचं शाळेत नाव दाखल करायला शाळेत गेली. दिक्षानं शाळेत नाव दाखल करणं सुरु केलं होतं. त्या शाळेतील एक शिक्षिका तिच्या मुलाचा फॉम भरत होती. त्या शिक्षीकेनं त्या मुलाचं नाव गाव विचारलं. त्यानंतर ती जातीच्या रकान्यावर आली व तिनं जात विचारली. जात...... जातीचा रकाना येताच व जात विचारताच दिक्षानं सांगीतलं की तिला मुलांच्या नावासमोर जात लिहायची नाही. परंतु ती शाळा, त्या शाळेत घरचे नियम कसे चालणार. शेवटी एक निर्णय निघाला की मुलांची जात जर मुलांच्या नावासमोर लिहिली जात नसेल तर मुलाचं नाव कसं दाखल करायचं. असं असल्यानं शेवटी तिनं आपली जात सांगीतली. आपल्या मुलांचं नाव शाळेत टाकतांना. एवढ्यात तिच्या ओळखीची एक महिला आली व तिनं तिची ओळख शिक्षकांना दाखवली व म्हणाली, "बाई तू आपली जात बदलली ना. आतं कायले आमची जात चोरते?" जात चोरणे. हा नवीनच प्रकार होता व दिक्षा काही जात चोरत नव्हती. तिला वाटत होतं की ती जातीनं चांभार असल्यानं तिचीच जात मुलांसमोर लागावी. तिला जाती आरक्षणाचा फायदा मिळावा. परंतु ते सगळं त्या एका महिलेसमोर फोल ठरलं होतं. ती बातमी. दिक्षा एक सामान्य स्री नसल्यानं ती बातमी हा हा करता करता परीसरात पसरली. तशी दिक्षा कलेक्टर होती. ती शिकलेली होती. परंतु शाळेत नाव दाखल करतांना तिच्या शिक्षणाचा उपयोग झाला नाही. ती कलेक्टर जरी असली तरी ती जातीबाबत काहीही करु शकत नव्हती. तसं पाहिल्यास कितीही उच्च शिकलेला व्यक्ती जरी असेल, तो न्यायाधीश वा पंतप्रधान जरी असेल, तरी त्यालाही आपली मुलं शाळेत दाखल करतांना शाळेत आपल्या मुलांसमोर जात लिहावीच लागत होती. जाती बदल नव्हताच. शेवटी काही लोकं म्हणत होते की एवढी मोठी कलेक्टर. अन् जातीचं आरक्षण घेते. जातीचं आरक्षण. ते आरक्षणाचा लाभ घेणारे घटक हे ती कलेक्टरच नाही, तर कित्येक शिकले सवरलेले व अति श्रीमंत असलेले लोकं घेत होते. शिवाय जात आणि आरक्षण जर नष्ट करतो म्हटलं तर लोकं ओरडत होते. ज्यातून नेत्यांच्या निवडून येण्यावर सांशकता निर्माण झाली होती. त्याचा विचार सहजच रक्षाला आला. ती विचार करु लागली की काल जातीनं जातीवरच अत्याचार केला. आजही जातच जातीवर अत्याचार करीत आहे. तसं पाहिल्यास आज पाश्चात्त्य लोकांच्या सानिध्यात समाज आल्यानं समाज थोडासा सुधारला आहे. परीवर्तन झालं आहे. त्यामुळं आज जात नष्ट व्हायला हवी असं वाटत आहे. परंतु आज जातीला अधिकच घट्टं केलं जात आहे. शिक्षणातही जात आणली आहे. विविध लाभाच्या योजना जाती माध्यमातून राबवल्या जात आहेत. शिष्यवृत्या, आरक्षण या माध्यमातून जातीला अधिकच घट्ट केलं जात आहे. शिवाय जात टिकून राहावी म्हणून मुलाला ज्यावेळेस शाळेत टाकले जाते. त्यावेळेसच त्याच्या पालकांना जात विचारली जात आहे. त्यानंतर त्याचं शाळेत नाव टाकलं जात आहे. अशा पद्धतीनं आजच्याही काळात जातीप्रथा टिकवली जात आहे व जातही टिकवली जात आहे. हे कार्य केवळ समाजमाध्यमच नाही तर सरकारकडून होत आहे. ही एक चिंतेची बाब आहे. आज काळ बदलला आहे. त्यापाठोपाठ पोशाख, रहनसहन शिक्षण सारं बदललं आहे. लोकं शहाणे झाले आहेत. परंतु काळ बदलला असला तरी आजचा काळही असाच अनाडी काळ आहे असं वाटत आहे. त्याचं कारण आहे जात आणि जातीप्रथा. कारण अनाडी माणसंच जात व जातीप्रथा जास्त पाळतात. सुशिक्षित तेवढी पाळत नाहीत. हे लोकांना तेवढंच सत्य वाटत आहे. तसेच काल वर्ण होते, ब्राह्मण, क्षत्रीय, वैश्य व शुद्र. आज ते वर्ण नाहीत. आज जात आहे आणि जातीवरुन भेदभावही आहे. दिक्षाला तसं वाटणं स्वाभाविक होतं. कारण अलिकडील काळातही भेदभाव होताच. जात आधारीत भेदभाव. माणसाला या काळातही माणूस समजलं जात नव्हतं. दिक्षा विचार करीत होती, 'काल माणूस जेव्हा झाडावरुन खाली आला. तेव्हा त्याला त्याची जात कोणती हे माहीत नव्हतं. तो कामं करायचा, वडीलधारी मंडळी सांगतील तीच कामं. कालांतरानं त्यात वर्ण तयार झाले. मात्र जात, जात नसल्यानं जात म्हणजे काय? ते माणसाला माहीत नव्हतं. शिवाय माणसं कामं करीत असतांना ज्या तत्सम जाती तयार झाल्या. त्याचं कारण होतं कसब वाढवणं व कसब वाढल्यानं कामं भराभर होणं. तिचा तो विचार. जे सत्य होतं, तेच तिला वाटू लागलं होतं. जाती कशा निर्माण झाल्या या गोष्टीचा उलगडा जातीबाबतीत तिला होऊ लागला होता. तसाच तिचा विचारही प्रगल्भ होवू लागला होता. कामाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास सुरुवातीला काम करतांना स्वार्थ नव्हताच. कामाचं कसब वाढवणं हे धोरण होतं. ज्यातून जात निर्माण झाली. शिवाय जात ही बदलवता येत असे. एका जातीतून दुसर्या जातीत जाता येत असे माणसांना. परंतु काळ बदलला व बदलत्या काळानुसार जातीवर बंधनं आली. कोणीच आपली जात बदलवू नये अशी. त्याचंही कारण स्वार्थ नव्हताच. तर त्या जातीत येणाऱ्या नवीन व्यक्तीला ती कामं भराभर करता येत नाहीत म्हणून जात बदलविण्याची पद्धत बंद झाली. नवीन जातीची माणसं. बदलत्या काळानुसार जे वर्ण निर्माण झाले होते. त्या प्रत्येकच वर्णात सुरुवातीच्या काळात जाती होत्याच. मात्र कालांतरानं त्या त्या वर्णातील तत्सम जाती बंद झाल्या. जातीची वर्गवारी तयार झाली व जातीचे भाग पाडण्यात आले. ज्या जातींची विभागणी वर्णात केली गेली. तेव्हाही भेदभाव नव्हताच. अशातच विदेशी लोकांचं देशात आगमण झालं व त्यांनी या देशावर राज्य करण्यासाठी एक नवी जातरहित व्यवस्था निर्माण केली. ज्या जातीव्यवस्थेचा बळी त्या काळातील ब्राम्हणच वर्ण नाही तर इतर सर्व वर्ण ठरले. ज्याची झळ संत ज्ञानेश्वर हे जरी ब्राम्हण असले तरी त्यांनाही शोसावी लागली. शिवाय त्या काळातील शुद्र वर्णातील स्रियाच नाही तर ब्राम्हणवर्णीय सर्व स्रियांना शोसावी लागली. त्या जाचातून कोणालाच सोडलं नाही. शुद्र जातींनाच नाही तर कर्तबगार स्रियांनाही सोडलं नाही. मग त्या ब्राम्हण वर्णातील का असेना. चार वर्ण. ब्राम्हण, क्षत्रीय, वैश्य आणि शुद्र. ब्राम्हणांना देव मानलं जाई. ज्यांना देव मानावं असं एका मनुस्मृती नावाच्या ग्रंथानं लिहिलं. त्याचं कारण होतं शिक्षण. शिक्षण देण्याचे हक्कं हे ब्राम्हण वर्णाकडे अबाधीत असायचे. मग गुरु हा देवापेक्षाही मोठा म्हणजेच देवच ठरला. मात्र,त्यानं ज्याला ज्ञान दिलं, त्या व्यक्तीनं पुढं राजा बनून ज्ञानार्जन करणाऱ्या त्या ब्राम्हण वर्णाला राजाश्रय दिला. मात्र त्या वर्णाला त्यापुर्वी तेवढा दर्जा नव्हता की तो राज्याचा आधारस्तंभ असणार. हा इतिहास सांगतोच. ब्राम्हणाचं आश्रम असायचं शिकविण्याचं. ते आश्रम राजमहालात नसायचं तर दूर अशा ठिकाणी, जिथं वाघ, सिंहांसारख्या हिंस्र प्राण्यांची भीती असायची. जिथं सदैवं साप, विंचू सारख्या प्राण्यांची भीती वाटायची. मात्र हाच ब्राम्हण व्यक्ती त्या सर्व प्राण्यांना न घाबरता तिथं राहायचा व राजाच्या मुलांना ज्ञानार्जन करायचा. तो आपल्या शिष्यांना शिकविण्याचं काम करायचा. ज्यातून काही शिष्य राजे बनत असत. ते राजे बनले की मग ते आपल्याला शिकविणाऱ्या गुरुच्या सल्ल्यानं चालत असत. जे तरुणपणात राजधानीत न राहता आश्रमात, दऱ्याखोऱ्यात शिकण्यासाठी राहायचे. ते राजे बनल्यावर आपल्याच गुरुच्या सल्ल्यानं चालत असत. कारण तेच राजाला ते आश्रमात असतांना शिकवीत असत. पुढे त्याचा शिष्य राजा बनताच राजा सल्ला घेण्यासाठी आपल्या गुरुला आश्रमात बोलावून घेत असे. ज्ञानार्जन करणारा ब्राम्हण वर्ग. दूर दऱ्याखोऱ्यात असलेला, निसर्गाच्या सान्निध्यात असलेला त्यांचा अधिवास. पुढं ज्या राजांच्या युवराजांना त्यांनी शिकवलं. त्याच युवराजांनी पुढे राजे बनल्यावर आपल्या गुरुंना आपले आपले सल्लागार बनवले. पुढं त्यांचं राजधानीत एवढं महत्व वाढलं की राजे प्रत्येक गोष्टीत वा प्रत्येक नियम बनवितांना ब्राम्हण वर्गाचाच सल्ला घेवू लागले. ज्यांनी तद्नंतर याच गोष्टीचा फायदा घेऊन आपला स्वार्थ साधला. त्यांनी आपल्या सोईचे नियम बनवून घेतले व जे जे त्यांचे विरोधक होते. त्यांना गुलाम बनविण्याचे कार्य केले. हे जातीआधारावरुनच करता आलं हे नाकारता येत नाही. कालचा गुरु हा ब्राम्हण वर्णातील असला तरी त्याला पाहिजे तेवढे अधिकार नव्हते. राजा जरी सर्व अधिकाराचा सर्वेसर्वा असला तरी त्याचं तेव्हापर्यंतच चालत होतं, जेव्हापर्यंत त्याची सत्ता असेल. ज्यावेळेस त्याची सत्ता जात असे वा तो म्हातारा होत असे. तेव्हा मात्र त्याचं कोणीही ऐकत नव्हतं व त्याचं कोणी ऐकत नसल्यानं नाईलाजास्तव अपमान सहन करण्याऐवजी तो अरण्यात निघून जात असे. विशेष म्हणजे त्या काळात लोकांच्या वागण्यावरुन भेदभाव होता ना कोणाच्या मतानुसार राज्य चालत असे. स्वातंत्र्य होतं व तेवढंच सार्वभौमत्वही होतं. राजा वयोवृद्ध झाल्यास तो जेव्हा अरण्यात निघून जात असे. त्यासोबतच त्याला सल्ला देणारा सल्लागार असलेला ब्राम्हण वर्णीय त्याचाच गुरु, तोही अरण्यात राजासोबत निघून जात असे. परंतु जसा काळ गेला. तसे राजाच्या अधिवासाचे नियम बदलले. त्याचबरोबर सल्लागार असलेल्या गुरु असलेल्या ब्राम्हण वर्णातील माणसांच्या अधिवासाचेही नियम बदलले. जे नियम ब्राम्हण वर्णातील व्यक्तीच्या सल्ल्यानं बनले. ज्यात भेदभाव शिरला. त्यानंतर माणसाला माणूस समजले जात नव्हते. माणसाला एका पशूगत वागणूक मिळायला लागली होती. वर्ण संपले होते व त्या वर्णाची जागा जातीनं घेतली होती. तद्नंतर जातीच्या आधारावर भेदभावाचं दृष्टचक्र सुरु झालं होतं. हे सर्व भारत स्वातंत्र्य होण्यापुर्वीपर्यंत सुरु होतं. भारत स्वातंत्र्य झाला. त्यानंतर आरक्षण आलं व आरक्षणाचा लाभ विशिष्ट जातीलाच देण्याची पद्धत रुढ झाली. ज्या जातींनी स्वातंत्र्यापुर्वी अमानुष अमानवीय वागणूक सहन केली. परंतु त्यात एक बदल झाला. तो लाभ आपल्याला घेता यावा म्हणून बऱ्याच लोकांनी लपून छपून आपल्या जाती बदलवल्या. त्या फक्त लाभासाठी होत्या. मुळात वास्तविक रुपात जाती बदलवल्या नव्हत्या. हे बऱ्याच लोकांनी केलं. हे जरी खरं असलं तरी जाती बदलल्या होत्या हे तेवढंच खरं. जात शिक्षणासाठी व शिक्षण आणि नोकरीचा लाभ घेण्यासाठी बदलली जरी असली तरी जात बदलवता आली. मग ती लाभासाठी की असेना. मध्यंतरीचा काळ असाच आला की जाती बदलल्या. त्या जाती शिक्षण घेण्यासाठी व लाभासाठी बदलल्या. मात्र त्यानंतर आरडाओरड झाली. ज्या जातीवर स्वातंत्र्यापुर्वी अत्याचार झाला. त्यांनी असंतोष व्यक्त केला की आमच्या जातीचं आरक्षण अशा जात बदलविणाऱ्याला नको. त्यांनी काहीच शोषलं नाही. आम्ही बरंच शोषलं आहे. त्यामुळंच जाती पडताळणी आली व पुन्हा एकदा जात शिरजोर झाली. जात....... जी जात नाही तिला जात म्हणतात. जी जात आरक्षणाच्या निमित्यानं का होईना, बदलली गेली. बदलवताही आली. अशा कित्येकांच्या जाती बदलल्या. परंतु त्यात पुन्हा एकदा पडताळणी नावाचा राक्षस शिरल्यानं जात एखाद्या अमरवेल वा बांडगुळागत घट्ट चिकटली नव्हे तर घट्टं केली गेली. जात ही शिक्षणात अडचणीची आहे व शिक्षणाचा लाभ घेण्यास अडसरीचा मार्ग आहे. कारण शाळशाळेत हा विद्यार्थी अमूक जातीचा, तो विद्यार्थी अमूक जातीचा अशी चर्चा विद्यार्थी आपापसात करीत असतांना आढळतात. हे अगदी बालवयापासून चित्र दिसत असतं. परंतु ती गोष्ट कोणी समजूनच घेत नाहीत. जात शाळेत असलेली पदोपदी दिसत आहे. तसेच आजही जात घट्ट करण्याचे पुरेपूर प्रयत्न केले जात आहेत. जरी जातीआधारावर अत्याचार आजही केला जात असला तरी. परंतु तिला नष्ट करण्याचे प्रयत्न केले जात नाहीत. तसे आदेश काढले जात नाहीत. जरी गतकाळात जातीआधारावर भेदभाव नावाच्या राक्षसानं माणसाच्या विचाराला गुरफटलं होतं. माणसाच्या मनातील विचारांच्या वाईट प्रवृत्तीवर जातीनं ताबा मिळवला होता. त्यातच जातीनं अस्पृश्यांनाही छळलं होतं त्या काळात. विशेष म्हणजे ज्या जातीनं जातीच्याच माणसांना छळलं नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या यातना सहन करायला लावल्या. विविध प्रकारचे अत्याचार केले. ती जात आज नष्ट करायला हवी. तिला बांडगुळागत चिकटवून ठेवूच नये. निदान शिक्षणात तरी जात आधार म्हणून घेवू नये म्हणजे झालं. विशेष म्हणजे जात काही खेळायचा चेंडू नाही वा एखादा पदार्थ नाही की जी विद्यार्थ्यांचं शाळेत नाव टाकतांना त्याला चिकटवावी. त्याला त्याच्या जातीची ओळख करुन द्यावी. माणसानं वा पालकानं आपल्या स्वार्थासाठी आपल्या पाल्याला जातीचं बंधन घालावं. त्याला बेडी घालावी जातीची विद्यार्थी दशेपासून नव्हे तर त्याला जातीचं बांडगुळ चिकटंवावं. महत्वाचं म्हणजे सरकारनं याकडे विशेष लक्ष द्यावं. शिक्षणात तरी जातीचा वापर करु नये. जातीवर आधारीत शिक्षण नसावं. शिक्षण जातविरहीत असावं. जेणेकरुन विद्यार्थ्यांना तरी शिक्षण घेतांना जातीछळाचा त्रास होणार नाही व वर्गावर्गात तो विद्यार्थी अमूक जातीचा आहे, असे म्हणत त्याचा अपमान होणार नाही. ज्यातून त्याला मध्येच शिक्षण सोडावं लागतं. दिक्षा जिल्हाधिकारी होती. त्यामुळंच तिच्या मनात त्या आशयाचे विचार. तसे विचार येणे साहजिकच होते व तसे विचार आलेही होते. ती स्वगतच विचार करीत होती की माझं काय चुकलं. मी माझ्या मुलाचं नाव शाळेत दाखल करतांना माझी जात टाकतो म्हटलं, तरी चाललं नाही. माझी जात न टाकता जातच नाही टाकत म्हटलं तरी चाललं नाही. ही जात तर जायलाच हवी. परंतु ती जात नाही त्यात मी तरी काय करु? जात मुलांच्या नावासमोर न टाकण्याचा तिचा निर्धार. तो निर्धार घट्ट झाला होता. तसा तिचा मुलाच्या शाळेत मुलांची जात न टाकण्याचा निर्धार पाहून पत्रकारिता झाली. तिच्या जात न टाकण्याबाबतचे मत वर्तमानपत्रात छापून आले. ज्या पत्रात तिच्याबाजूचे असलेले मतही छापून आले. मग काय ते मत समाजमाध्यमात पसरलं. त्यातच ते प्रकरण चिघडविण्यात आलं व आंदोलनं सुरु झाली. ज्या आंदोलनात एक मोठा लोकांचा जत्था तिच्या घरावर चालून आला. त्या जत्थ्यानं तिच्या पतीला समजावलं. त्यानंतर तिच्या पतीनं तिला. परंतु तिच्या पतीनं तिला कितीही समजावलं असलं तरी तिनं त्याचं ऐकलं नाही. अशातच तिचा पतीही तिला सोडून निघून गेला होता व त्यानं घटस्फोट घेतला होता. ****************************************** जात व जातीप्रथा नष्ट व्हावी. हा तिचा विचार. जात नष्ट होवू शकते. जर जात विद्यार्थ्यांच्या नावासमोर त्याचं नाव दाखल करतांना नाही टाकली तर...... तसं पाहिल्यास जातीप्रथा व जात नष्टच व्हायला हवी. परंतु कशी करता येईल. तशी ती जाती कशा नष्ट करता येतील त्याचा गंभीरतेने विचार करु लागली होती. दिक्षा विचार करीत होती की आज सक्षम पिढी तयार होत नाही? काल गुरुला आपण देव मानत होतो. म्हणत होतो की गुरु हाच ब्रम्ह, गुरु हाच विष्णू, गुरु हाच महेश आणि गुरु हाच सर्वेसर्वा अर्थात परब्रम्हं आहे. एवढा गुरुला मान होता. कारण गुरु जे काही विद्यार्थ्यांना शिकवायचा. त्यात ते शिकवितांना मुलांच्या समोर संकटं निर्माण करायचा. त्यात तो कधीकधी शिक्षाही करायचा. ज्यातून विद्यार्थी असे घडायचे की ते पुढं युद्ध करतांना मरणालाही घाबरत नसत. ते भेकाड्यासारखे आत्महत्या करीत नसत. तर युद्ध करुन मरण पत्करत. काही विद्यार्थी हे आपल्या संसारात यशस्वी होत. मग त्याला कितीही संकट आलं तरी. मात्र आज तसं नाही. आजचे विद्यार्थी मरणाला अजिबात घाबरत,नाहीत. ते संकटालाच घाबरतात. कारण आजचा शिक्षक हा संकटांवर मात कशी करायची ते शिकवीत नाहीत. ज्यामुळं संकटावर मात करण्याचं तंत्र विद्यार्थ्यांना माहीत नसल्यानं आत्महत्या घडतात. याला जबाबदार कोण? याला जबाबदार आजचा शिक्षक नाही तर याला जबाबदार आहे पालक. पालकांमुळंच सरकारनंही शिक्षणाचं तंत्र बदलवलं. ज्याची झळ पालकांना नाही, शिक्षकांनाही नाही, सरकारलाही नाही तर विद्यार्थ्यांना पोहोचेली आहे. यात शंका नाही. कालमितीस माणूस बदलला नव्हता असे नाही. काळ परीवर्तनाचाच असतो. त्यानुसार बदलाव महत्वपुर्ण घटक असतो. काल माणूस माकडरुपात झाडावर राहात होता. आज तो जमीनीवर राहतो. यालाच परीवर्तन म्हणता येईल. कालचा झाडावरचा माणूस आज जसा जमीनीवर आला. तसतसा त्याच्या राहणीमानातही बदल झाला. तो बदल अनुषंगीक व कालसापेक्ष आहे. सामाजिक परीवर्तन झालं व काळ बदलला. त्यानुसार काळ बदलला असल्यानं माणसाच्या राहणीमानातही बदल झाले. एक स्री एका नऊवारी लुगड्यावरुन साडीवर आली. त्यानंतर सलवार कमीजवर व आता जीन्स टीम शर्टवर. आज स्रियांची केससज्जाही बदलली. आज स्री जशी बदलली. तसाच बदलला पुरूषही. त्यानं आपलं धोतर त्यागून त्याजागी फुलपँट आणला. केसाचीही फॅशन बदलवली. इतकंच नाही तर कालची डोक्यावरची टोपी जावून त्याजागी इंग्रजांची हॅट आली. खानपान बदललं व घरेदारेही बदलली आणि रहदारीची साधनंही बदलली. त्यामुळंच साहजीकच गुरुही बदलला. कालचा गुरु हा कालचा गुरु राहिलेला नाही. कालचा गुरु हा भेदभाव करणारा नव्हता. तो विद्यार्थ्यांना सर्वतोपरी ज्ञान शिकवीत असे. तो आपल्या मुलाला तेवढंच ज्ञान देत असे, जेवढे ज्ञान ते आपल्या शिष्यांना देत असत. परंतु आजचा गुरु आपली मुलं कॉन्व्हेंटमध्ये टाकतात. ते ज्या मुलाला शिकवतात. त्या शाळेत टाकत नाहीत. हे झालं शिकविणं. आजच्या शिक्षकांचा पोशाखही बदलला. कालचा गुरु हा धोतरवर राहात असे. आजचा गुरु शाळेत चक्कं टी शर्ट व फुलपँटवर वावरतो. आज शिक्षकाचं जसं राहणीमान बदललं. शिकवणं बदललं, तसंच शिकविण्याचं स्थळही बदललं. कालच्या काळात मुलांवर संस्कार व्हावे म्हणून त्याला आश्रमात जावं लागत असे. तिथंच अभ्यास व्हायचा, परीपुर्ण अभ्यास. ज्यात केवळ युद्धकलाच नाही तर राजकारण, राज्यकारभार याचाही अभ्यास शिकवला जायचा. तोही परीपुर्ण. मग एकदा का परीपुर्ण अभ्यास झाला की कसोटी व्हायची. ती कसोटी मायबापासमोर व्हायची. त्यावेळेस त्यावेळच्या मुलाच्या शिक्षणात पालक ढवळाढवळ करायचे नाहीत. आपल्या मुलाला आपण टाकलेल्या आश्रमातील गुरु काय शिकवतो, कसा शिकवतो? याकडे मायबाप लक्ष द्यायचेच नाही अजिबात. ते शिक्षण परीपुर्ण झाल्यावरच दिसायचं. जेव्हा कसोटी घेतली जात असे. शिक्षणात मध्यंतरीच्या काळात मायबाप दिसत नसत. ते दिसत असत एकदम शेवटी. जेव्हा कसोटी असायची व परीक्षा घेतली जात असे. शिकविण्याचं सानिध्य अर्थात स्थळ हेही दूर अशा ठिकाणी अर्थात अरण्यात असायचं. जरी एवढा मोठा राजमहाल असायचा. तरी तिथं शिकवायची व्यवस्था नसायची. त्याचं कारण असायचं विद्यार्थ्यांना काटक बनवणं. विद्यार्थी हे अरण्यातच राहात असल्यानं ते स्वतःचं आणि आपल्या गुरुंचं संरक्षण हिंस्र प्राण्यांपासून करायचे. त्यामुळंच विद्यार्थी साहजीकच काटक बनत असत. शिवाय विद्यार्थ्यांलाही मग मायबाप बालपणापासूनच दिसत नसल्यानं ते आपल्या गुरुंनाच मायबाप समजायचे. त्यांनाच देवही समजायचे. त्यानंतर ते त्यांच्याच आज्ञेत वागायचे. तसंच स्थळ हे निसर्गाच्या सानिध्यात असल्यानं त्या विद्यार्थ्यांना परीसर अभ्यास, भौगोलिक घटना शिकविण्याची गरज नसायची. पर्यावरण, प्रदूषण, स्वच्छता या बाबी त्याला प्रात्यक्षिक रुपात शिकायला मिळत असत. एकंदरीत सांगायचं झाल्यास मायबापाचा शिक्षणात हस्तक्षेप नसल्यानं त्यांची मुलं एवढी काटक स्वरुपाची तयार व्हायची की त्यांच्या जीवनात कोणतंही संकट आलं की ते त्या संकटाचा सामना करण्यास समर्थ असायचे. काळ बदलला. तसं शिक्षण शिकविण्याचं स्थळही बदललं. मायबापाचा हस्तक्षेपही बदलला. शिक्षणाचं जे स्थळ अरण्यात होतं, ते स्थळही बदललं व ते स्थळ राजमहालात आलं. त्या राजमहालात, ज्या राजमहालात पर्यावरण दिसत नव्हतं. नैसर्गिक वातावरण नव्हतं. त्यामुळंच पर्यावरण म्हणजे काय हे विद्यार्थ्यांना नैसर्गिकरीत्या शिकवता येत नव्हतं. परीसर अभ्यासाचे कुत्रिम पाठ शिकवावे लागायचे. संकट नसायचं. ना हिंस्र प्राण्यांचं संकट असायचं, ना कोणत्या स्वरुपाचं संकट की जे संकट आश्रमात शिकविणारा गुरु विद्यार्थी कितपत शिकला, हे तपासून पाहण्यासाठी निर्माण करायचा. एकंदरीत सांगायचं झाल्यास काळ बदलला व बदलत्या काळात जिकडे तिकडे पसरलं अंधाराचंजाळं. अंधानुकरण. प्रदुषण वातावरणाचं नाही तर विचारांचं होत गेलं. ज्यातून कलुषीत विचार शिकवले जायला लागले. आश्रमपद्धती केव्हाचीच अदृश्य झाली व त्याजागी आली कुत्रीम शिकविण्याची व्यवस्था. ज्यात मायबापाचा वारंवार हस्तक्षेप होत असल्यानं गुरुंना अभय नव्हतं व त्याला ज्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शिकवायचं होतं. ते तो शिकवू शकत नव्हता. साहजीकच तंत्र बदललं व बदलत्या तंत्रानुसार शिक्षण बदललं. आज शिक्षणाची अवस्था वाईटच आहे व या वाईट अवस्थेनुसार शिक्षण हे कालच्या शिक्षणासारखं वाघिणीचं दूध राहिलेलं नाही. आज मायबापाचा वारंवार शिक्षणात हस्तक्षेप होत असल्यानं मुलांसमोर गुरु संकट निर्माण करु शकत नाही. त्यातच मुलं ही काटक स्वरुपाची तयार होत नाहीत. ती भेकड स्वरुपाची तयार होतात व थोडंसं जरी संकट आलं तरी घाबरुन जातात. महत्वपुर्ण बाब ही की शिक्षणापुढं मायबापानं आपल्या मुलांना होत असलेल्या त्रासाची दखल घेवू नये. त्याचा बाऊ करु नये. गुरु त्यांना अभ्यासाविषयी करीत असलेल्या शिक्षा ह्या किरकोळ स्वरुपाच्या असतात. त्याचा बाऊ करु नये. ते,एक संकटच. काही पालक आता शिक्षणाच्या स्थळाची व्यवस्था बदलण्यानं त्याचा बाऊ करतात. कोणतेही संकट. ते संकट येणारच आहे. ते जेव्हा येईल, तेव्हाच मुलंही काटक बनतील. त्यानंतर ते जीवनातील कोणत्याच संकटाला घाबरणार नाहीत. कारण मायबाप काही त्याच्या समस्त जीवनाला पुरत नाहीत. सगळा संसार मायबापानंतरही त्यांनाच सांभाळावा लागतो. जर त्या विद्यार्थ्यांच्या समोर त्यांचा सर्वांगीण विकास करीत असतांना परीक्षारुपी वा किरकोळ शिक्षेच्या स्वरुपाचं संकट निर्माणच झालं नाही तर ते जीवनातही यशस्वी होणार नाही याची पालकांनी दखल घ्यावी. त्यामुळं काळ जरी बदलला असला तरी बदलत्या काळानुसार पालकानं बदलावंच. बदलू नये असं नाही. परंतु असा बदलाव करु नये की जो विद्यार्थ्यांच्या आयुष्याला कलाटणी देवू शकेल. तुमच्या बदलावानं आपल्याच विद्यार्थ्यांचं आयुष्य उध्वस्त होवू शकेल. दिक्षाला वाटत होता बदलाव. परीवर्तन. ते परीवर्तन आजतागायत झालेलं नव्हतं. ना होणार असं वाटत होतं. त्याचं कारण होतं आजतागायत बदलाव न होणं. ती विचारच करीत होती. विचार करता करता तिचं लक्ष पतंगाकडे गेलं. आकाशात भरपूर पतंगा उडत होत्या. एक एक पतंग कटत होती. त्याचबरोबर विचार आला. 'ही पतंग. ही पतंग म्हणजे जीवन. जोपर्यंत पतंगाला प्राणवायू मिळतो. तोपर्यंत पतंग आपल्याला आकाशात दिसते आणि जेव्हा त्या पतंगाचा प्राणवायू संपतो. तोच ती पतंग आकाशातून आपलं अस्तित्व संपविते व ती जमीनीवर येते अर्थातच पतंग ही मृत्यू पावते. तिचं जीवन संपतं. तसंच माणसाचं आहे. माणसाचं जीवनही पतंगासारखंच. माणसालाही जेव्हा प्राणवायू मिळत नाही. तेव्हा माणूसही संपतो पतंगासारखाच.' पतंग काही महत्वाचा नाही. कारण पतंगातून मृत्यू होत असतो. पतंगातून मृत्यू होतो. हे मायबापांनाही माहीत असतं. तरीही मायबाप आपल्या पाल्यांना आवडीनं पतंग घेवून देत असतात. ज्यात पतंगातून मृत्यू होतो व दोषी मायबापच असतात. परंतु ते आपल्या स्वतःवर दोष येवू देत नाहीत. विचार करतात की आपल्या लेकराचा थोडा ना पतंगातून जीव गेला. दुसर्याचा जीव गेला ना, दुसर्याचा मुलगा मरण पावला ना. बरे झाले. पतंग उडविणे ही लोकांना एक चांगली गोष्ट वाटते. ते पतंग उडविण्याला उत्सव समजतात व पतंग उडवीत असतात. ज्यातून कोणाचे अकारण जीव जात असतात. आता पतंग उडविण्यातून धोके निर्माण झाल्यानं लोकांनी पतंग उडविणं बंद केलेले नाही तर लोकांनी पतंग हे विशिष्ट दिवशीच उडविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार तीळसंक्रात, गणराज्यदिन याच विशिष्ट दिवशी ते पतंग उडवीत असतात व त्याच दिवशी अति बेभानपणे पतंग उडवून आपला आनंद साजरा करण्याची पद्धती त्या दिवशी प्रचलीत केलेली आहे. त्या दिवशी पतंग उडविणाऱ्या लोकांवर कुणीही बंदी आणत नाही व लोकांना मनसोक्तपणे पतंग उडवू देतात. पतंग उडविणे हा अतिशय घातक खेळ असून तो तेवढाच जीवघेणाही आहे. तसं पाहिल्यास कोणतेही खेळ हे साधेसुधे नाहीत. क्रिकेट, कबड्डी, कुस्ती, शंकरपट व पोळ्याला खेळला जाणार गोटमार हा खेळ, इत्यादी. त्यात पतंग हा देखील खेळ मोडतोच. याबाबतीत एका व्यक्तीचा संवाद. तो म्हणत होता, "पतंग नाही उडविणार तर कोणता खेळ खेळणार." ते त्याचं बोलणं. त्यावर दुसरा एक व्यक्ती म्हणाला, "कंचे खेळावेत." "कंचे खेळण्यात धोके नाहीत असं वाटंतय का?" "होय. अगदी तसंच वाटतंय." "अहो, कंच्यातून वाद निर्माण झाल्यावर एखाद्यानं एखादा कंचा त्याच्या गुप्त भागावर जोरानं मारल्यास त्यातही जीव जावू शकतो. जीव जावू शकतो का नाही?" ते त्याचं उत्तर. त्यावर पलीकडील व्यक्ती निरुत्तर झाला. केवळ पतंग वा कंचेच खेळणं नाही, तर असे कितीतरी खेळ आहेत की त्या खेळात लोकांचा जीव जावू शकते. जसे क्रिकेट, विट्टीदांडू, लघोरी, धावन, जिम्नॅस्टिक्स, कबड्डी, खो खो, लंगडी. अशी बरीच नावं देता येतील की त्यामुळंच जीव जावू शकतो. थोडंसं चुकलं खेळतांना की जीव जाणारच. बाकीच्या खेळात चुकांना वाव नाही. चुकलं खेळतांना की जीव जातो. परंतु पतंग खेळात चुकण्याचा प्रसंगच उद्भवत नाही. मात्र या खेळाचा धाग्याशी संबंध येत असल्याने व या खेळातील धाग्यापासून माणसांचे गळे, पशुपक्षांचे गळे, नाही तर संपुर्ण जीव जात असल्यानं हा खेळ खेळायला बरा वाटत नाही. त्यातच नॉयलान मंजा. जो कधी सडत नाही. सडून गळत नाही वा नष्ट होत नाही. शिवाय असा नॉयलान मंजा पक्षांच्या पायात अडकल्यास पक्षी त्यातून निसटू शकत नसल्यानं ते उपाशी पोटी तडफडत मरण पावतात. ज्यातून पक्षी कमी होतात व पक्षांवर ही सक्रांत आलेली दिसते. तसेच हाल पशुंचेही असते. नॉयलान मंजा. हा नॉयलान मंजा सरासरी तुटत नाही, सडत नाही, गळत नाही, नष्टही होत नाही. तो ओढल्यास रबरासारखा लांब होतो. तो तिक्ष्ण असून अतिशय धारधार असतो. जो गळ्यावर आल्यास गळ्याचा पुर्ण भाग कापला जातो. ज्यात नसा असतात. रक्तवाहिन्या असतात व त्या रक्तवाहिन्या तुटून गेल्यानं त्यातून रक्तस्राव होतो. असा रक्तस्राव बराच झाल्यानं व्यक्ती गतप्राण होतो. ही तीव्रता बरेचदा जाणवते. याबाबतीत एक व्यक्ती म्हणाला, "नॉयलान मंजाला दोष दिला जातो. मग साधा मंजा घातक नाही काय?" त्या व्यक्तीचं म्हणणं बरोबर. साधा मंजाही गळे कापू शकतो. तोही तेवढाच घातक आहे. त्या व्यक्तीचं म्हणणं बरोबर होतं. साध्या मंजानंही नुकसान होतच होतं व गळेही कापले जात होते. पतंग....... पतंग उडविल्यानं पशूपक्षांचेच नाही तर माणसांचेही गळे कापले जात असतात. ज्यात निरपराध माणसं विनाकारण मृत्युमुखी पडत असतात. ज्यातून कोणाचा पती मरण पावल्यास संसार तुटतो. कुणाचा पुत्र मरण पावल्यास शल्य जाणवतं आणि कोणाचे आईवडील मरण पावल्यास छत्र हरवतं. ज्यात पालकांचा दोष असतो. पतंग उडविल्यानं आपलं काय नुकसान होणार आहे. असा विचार करीत लोकं आपल्या पाल्यांना ते रडतात, म्हणून त्याची हौस पुरविण्यासाठी आणि त्याला आनंद मिळवून देण्यासाठी पतंग व मंजा घेवून देतात. ज्याने कधीकधी त्यांच्या पाल्याचंच नुकसान होत असते. ज्यात कधीकधी ते पाल्य पतंग उडवितांना नॉयलान मंजाचा वापर करतात. ज्यांना पोलीस पकडून नेत असतात. अलिकडील काळात पतंग उडविण्याचा छंद वाढत चाललेला आहे. आज तिळसंक्रात आहे व तीळसंक्रात हा सण जरी तिळगुळ घ्या व गोड गोड बोला. असा गोड बोलण्याचा संदेश देत असला तरी हा दिवस कोणाच्या तरी आयुष्यात अति वेदनाशामक वेदना आणणारा दिवस आहे. जर कोणी पतंग उडविणार असेल तर....... या गोष्टीचा नक्कीच सर्वांनी विचार करावा व जरी तीळसंक्रात हा सण आपण पतंग उडविण्याचा सण म्हणून साजरा करीत असलो तरी पतंग कोणीही उडवू नये. तशी शपथ आपण घ्यावी. उद्या लोकं तीळसंक्रात एक गोड बोलणारा सण म्हणून साजरा करणार आहेत. ज्यात कोणाचा जीव जावू शकतो व त्याला पतंग उडविणाऱ्याचा राग येवू शकतो. असे होवू नये. म्हणून कोणीही पतंग उडवू नये व तीळसंक्रात हा सण पतंग उडविण्याचा दिवस म्हणून साजरा करु नये. तर तो गोड सण म्हणून साजरा करावा. तसंच पालकांनीही या दिवसाच्या निमित्याने त्यांचा पाल्य रडला तरी आपल्या पाल्यांना पतंग घेवून देवून दोषी होवू नये. ज्यातून कोणाची मान कापण्यातून वाचेल. कोणाचा जीव जाण्यातूनही वाचेल नव्हे तर कोणाचा संसार तुटून त्याचं विनाकारण नुकसान होण्यातून वाचेल यात शंका नाही. दिक्षाला अंधश्रद्धा आवडत नव्हत्या. ना प्रथा परंपरा आवडत होत्या. ना जातही आवडत होती. ती आपल्या मुलाचंच नाव टाकायला गेली, तेव्हा त्याचं नाव न घेतल्यानं ती खजिल झाली होती. अशातच कुंभमेळा भरला होता. कुंभमेळा..... ज्या कुंभमेळ्याचा योग हा बारा वर्षातून एकदाच येत होता. त्या कुंभमेळ्यात कितीतरी भावीक जात होते. परंतु यावेळचा कुंभमेळा विशेष होता. लोकं म्हणत होते की त्या कुंभमेळ्यात आंघोळ केल्यास पाप धुतल्या जातं. दिक्षा तेच ऐकत होती. परंतु तिचा कुंभमेळ्यावर विश्वास नव्हता. तिला वाटत होतं की लोकांनी कुंभमेळ्यात आंघोळ करायला जाण्याऐवजी इथेच राहून मायबापाची सेवा करावी. आंधळ्या, लंगड्या, लाचार, वृद्ध, बालक यांची सेवा करावी. म्हणजे त्यांचं इथंच पाप धुतल्या जातं. लोकं जे करायला हवं, ते करीत नाहीत व दोष दुसर्यांना देतात. ******************************************** कुंभमेळ्यातील स्नानावर एक गाणं प्रसिद्ध आहे. कभी प्यासे को पानी पिलाया नही. गंगा नहाने से क्या फायदा? गंगा नहाकर कोई फायदा नही, अगर मन के तुच्छ विचार न त्यागे तो. अशा आशयाचं ते गाणं. गाणं जुनं जरी असलं तरी आजच्या समाजातील लोकांच्या वागण्यावर चपखल बसतं. सध्याच्या काळात कुंभमेळा सुरु होता. हा योग दर बारा वर्षांनी येत होता. लोकं कुंभ स्नान करायला आवडीनं जात होते. तेथील पाण्यात आंघोळ करीत होते. हे सगळं बरोबर असून यात एक आख्यायिका होता की त्या कुंभमेळ्यात आंघोळ केल्यानं आपलं सबंध पाप धुतलं जातं. अंघोळ करायला हवी. एकदा तरी कुंभमेळ्यात जायला हवं. परंतु आपलं पाप धुतलं जाईल या विचारानं जावू नये तर एक आस्था म्हणून जावं. फिरायला जायचं आहे म्हणून जावं. त्याचं कारण होतं की कितीही वेळेस आपण कुंभमेळ्यात आंघोळ केली आणि मनात जर कुविचारांची कालवाकालव ठेवली तर कुंभमेळ्यात आंघोळ केल्याचा फायदाच होणार नाही. त्यासाठी मन स्वच्छ निर्मळ असायला हवं. ते कुंभमेळ्यात जाण्यापुर्वीच स्वच्छ केलेलं बरं. तसेच आंघोळ करायचीच असेल तर शरीराची स्वच्छता करण्याऐवजी आधी मनाची स्वच्छता करावी. मगच कुंभमेळ्यात आंघोळ करायला जावं. परंतु हे जरी बरोबर असलं तरी लोकं त्याचा विचार करीत नव्हते व ते कुंभमेळ्यात जात होते. कोणी फिरायला जात तर कोणी वात्रटपणे वागायला जात होते. दिक्षाला असाच एक व्हिडिओ फेसबुकवर दिसला. त्यात दाखवलं होतं की एका व्यक्तीला लोकं चांगलं बदडून काढत आहेत. त्याचं कारण आहे, त्यानं शिवपिंडीवर पाय ठेवून फोटो काढणे. हा कुविचारच. असे करायला नको होतं व कुणाच्याही भावना दुखवायला नको होत्या. त्यासाठीच दिक्षानं म्हटलं होतं की मनातील कुविचार त्यागून कुंभमेळ्यात जावं व स्नान करावं. ज्या स्नानाला खऱ्या स्वरुपात अर्थ प्राप्त होईल. म्हणतात की बादशाहा अकबरही कुंभमेळ्यात गेला होता व त्यानंही कुंभमेळ्यात स्नान केलं होतं. तेव्हापासून तेथील स्नानाला शाही स्नान म्हटलं जातं. आज तेथे मुस्लीम समुदाय जात नसला तरी तेथील शाही स्नानाला विशेष महत्व होतं. कुंभस्नान हे पुर्वीपासूनच सुरु होतं. परंतु हे जरी खरं असलं तरी महापुरुष हेच आपले आधारस्तंभ आहेत की ज्यांनी कुंभमेळ्यात स्नान करण्याऐवजी सद्विचार बाळगा असा संदेश दिलेला आहे. म्हणतात की वाईट विचारांचं गवत आपोआप येतं, पण चांगल्या विचारांच्या गोष्टी नेहमी पेराव्या लागतात. आज महापुरुषांना व देवांनाच शिव्या हासडण्याची पद्धत सुरु झाली आहे. जे झाले नसते तर कदाचीत सुधारणा झाल्या नसत्या. जरी देव हा पाषाणाचा असला तरी त्याचेवर आस्था ठेवून लोकांनी आपल्यात सुधारणा घडवून आणल्यात. शिवाय निदान देव नावाच्या संकल्पनेला घाबरुन तरी लोकं चांगले वागत असतात. चांगले वर्तन करीत असतात. तरीही काही कूपमंडूक देव नावाच्या संकल्पनेला घाबरत नसल्यानं समाजात भेदभाव मग तो स्पृश्य अस्पृश्य, गरीब श्रीमंत का असेना, तो संपला नाहीच. सुरुच राहिला. तो संपला नसता. अनिष्ट रुढी, प्रथा परंपरा संपल्या नसत्या. अंधश्रद्धाही तेवढ्याच जास्त प्रमाणात राहिल्या असत्या. माणूसपण कधीच लाभलं नसतं. माणूस हा माणूस बनला नसता व तो आजही त्याच झाडावरील माकडासारखा माकडच राहिला असता. जर महापुरुष झाले नसते तर....... कुंभमेळा असंच सुधारणेचं प्रतीक. परंतु ज्यांनी कुंभमेळ्याला समजून घेतलं त्यांच्यासाठी. इतरांसाठी नाही. इतरांसाठी ते करमणुकीचं ठिकाण. मग ते शिवपिंडीवर पाय ठेवून फोटो काढणं का असेना. तसं कोणीही करु नये म्हणजे कुंभमेळ्यात आंघोळ करण्याचं सार्थक झालं. महापुरुष....... महापुरुष हे गतकाळात होवून गेले. त्यांनी आपल्याला बरंच काही दिलं. त्यांनी कुंभमेळ्यात स्नानाला महत्व दिलं नाही तर त्यांनी चांगल्या मनातील निर्मळ विचारांना महत्व दिलं. त्यांना आपले पुर्वजही म्हणता येईल. ज्यात आपण ज्यांना देवाचा दर्जा दिला. आपण त्यांना अवतार समजतो. ते आपले महापुरुषच. असे हे महापुरुष आपल्याला बरंच काही शिकवतात. त्यांच्याकडून बरंच काही घेण्यालायक असते. दिक्षाला एक दिवस विचार आला. ती घराच्या ओसरीत बसली होती. जिथं गार वारा सुटला होता. अचानक लोकांचा आवाज येत होता. जो आवाज तिच्या कानात शिरला होता. तो आवाज होता, शिवाजी महाराज की जय. एकोणवीस फ्रेब्रुवारी. शिवाजी महाराजांची जयंती. ज्या राज्यामध्ये निजामशाही आणि आदिलशहाचा वचक होता. ज्या राज्यामध्ये देशमुख, देशपांडे इत्यादी वतनदार आपापसात भांडत होते. तसेच ज्या राज्यामध्ये मराठ्यांची अस्मिताच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र पिंजून जात होता. त्या राज्याला आदिलशाही आणि निजामशाही मुक्त करणारा माणूस जर कोणी असेल, तर त्यात शिवाजी महाराजांचं नाव अग्रस्थानी घ्यावं लागतं. अगदी बालपणापासूनच शिवरायांचा स्वभाव हा दांडगा असल्यामुळं शिवरायाच्या वाटेला कोणी जात नसत. शिवरायांबाबत सांगायचं झाल्यास शिवरायांना त्यांची आई जीजाबाईनं घडवलं. ज्यावेळी शिवरायांचा जन्म झाला, त्यावेळी त्यांचे वडील शहाजीराजे हे लढाईत गुंतले होते. त्यातच शहाजीराजांनी शिवरायांचा जन्म चांगल्या परिस्थीतीत व्हावा म्हणून लढाईवर जाण्याआधी जीजामातेला शिवनेरी किल्ल्यावर अगदी सुरक्षीत ठेवलं. तिथंच पुढं शिवरायांचा जन्म झाला. ती तारीख म्हणजे १९ फेब्रुवारी १६३०. या तारखेबाबतही लोकांमध्ये संभ्रम आहे. कोणी तीन मार्च तर कोणी एक मे ही शिवरायांची जन्मदिनांक सांगतात. लहान असतांना शिवराय हे आईच्या सानिध्यात होते. शिवनेरीवर असलेल्या शिवाई देवीच्या नावावरुन शिवाजीचं शिवाजी नाव ठेवल्यानंतर त्याचं खरं शिक्षण हे आईनं केलं एवढंच नाही तर त्या शिवरायाचा पाहिजे त्या प्रमाणात लाड न करता त्याला स्वराज्यासाठी वाहून टाकलं. त्या शिवरायांना लहानपणापासूनच राम, क्रिष्ण व अभिमन्यूच्या कथा सांगून शुरवीर कसे असतात ते अगदी शिवरायांच्या रोमारोमात भरलं. त्यातच त्यांना आध्यात्मीक धडे सुद्धा दिले. संत ज्ञानेश्वरापासून तर संत तुकारामापर्यंतच्या गोष्टी त्यांना शिकवल्या. एवढंच नाही तर शिवरायांना युद्धनीती आणि राजनीती शिकविण्यासाठी वेगवेगळ्या शिक्षकांची शिवनेरीवर नियुक्ती केली. त्यातच ते राज्यकारभार करणे, घोडा भरधाव फेकणे, चोरवाटा शोधणे, तलवार चालवणे, भाला फेकणे इत्यादी गोष्टी शिवराय शिकले. अगदी लहानग्या वयात शिवराय मातीचे किल्ले बनवणे, हत्ती बनवणे हे खेळ खेळायचे. त्यातच लहान वयात त्यांनी त्या सह्याद्रीच्या द-याखो-यातील लहान लहान आदिवासी मुलांना आपले मित्र बनवले. ज्या मित्रांनी पुढे जावून शिवरायांसाठी आपल्या प्राणांची आहूती दिली. पण शिवरायांवर थोडीशी आचही येवू दिली नाही. या मावळ्यांच्या मुलांसोबत शिवराय काय करायचे? तर चोरवाटा शोधायचे, त्या मुलांना तलवारबाजी शिकवली, एवढंच नाही तर याच शिवरायांनी रानावनात जावून मावळ्यांच्या मुलासोबत वावरतांना आपलं जेवन त्यांना दिलं व त्यांची कांदाभाकर त्यांनी खाल्ली. त्यामुळं साहजिकच शिवरायांबाबत आत्मीयता मावळ्यांच्या मुलांमध्ये निर्माण झाली. ही आत्मीयता निर्माण करण्यासाठी शिवराय त्या मावळ्यांच्या मुलांच्या घरी जात. त्यांच्या आईवडीलांशी संवाद साधत. एवढंच नाही तर त्यांच्या मायबापाशी संवाद करीत. याच संवादातून पुढे स्वराज्याचं महत्व त्या मावळ्यांच्या मायबापांनी आपल्या मुलांनाही समजावून दिलं होतं. हेच स्वराज्याचं महत्व शिवराय स्वतःही मावळ्याच्या मुलांना समजावून देत. अगदी अल्प वयातच मावळ्यांना घेवून शिवरायांनी मावळ्याच्या मुलांसमोर रायरेश्वराच्या देवालयात स्वराज्यस्थापनेची प्रतिज्ञा केली. त्यातच ज्या वयात मुलांचं खेळण्याबागडण्याचं वय असतं. त्या अगदी अल्प वयात म्हणजे वयाच्या चौदाव्या वर्षीच त्यांनी तोरणा किल्ला जिंकला. त्यातच जे काम आपण आपल्या उभ्या हयातीत करु शकत नाही. त्याच अल्प वयात त्यांनी सर्व गोष्टीचा विचार करुन तोरणा किल्ल्याची डागडुजी केली. त्याला नवं नाव दिलं प्रचंडगड. त्यातच या तोरण्याचं बांधकाम करतांना ज्या चार सोन्याच्या घागरी शिवरायांना सापडल्या, त्या सोन्याचा वापर शिवरायांनी पुढे दुसरे किल्ले बांधण्यासाठी केला. पुढे एक एक करीत करीत शिवरायांनी जे किल्ले जिंकण्याचा सपाटा लावला. त्याला थांबवणं कठीण होतं. आदिलशहानं शहाजीराजांना समजावून पाहिलं. परंतू काहीच उपयोग झाला नाही. हे पाहून की काय, आदिलशहा चिडला. त्यांनी त्यावर उपाय काढण्यासाठी विजापुरात बैठक बोलावली. बडी साहेबा. आदिलशाही महाराणी ही अध्यक्षस्थानी. पैजेच तबकात विडा. त्यांनी उचलावा. जो शिवाजीचा अंत करेल. मग घोषणा झाली. घोषणेनुसार विजापूर दरबारातील बडा तुफान ताकदीचा व धिप्पाड देहाचा सरदार अफदलखान उभा झाला. त्यानं तबकातील विडा उचलला व आश्चर्य करीत म्हटलं. "कोण शिवाजी? कुठला शिवाजी? मी आत्ताच त्याला जीवंत वा मारलेला पकडून आणतो." अफजलखान तुफान ताकदीचा व धिप्पाड देहाचा होता. त्याला आपल्या ताकदीवर गर्व होता. त्याला वाटत होतं की आपण शिवरायांचा बिमोड करु शकतो. तसं पाहता त्याला शिवरायांच्या बाबतीत कोणतीच माहिती नव्हती. विडा उतलताच तो प्रतापगड पायथ्याशी आला. शिवाजी युद्धासाठी सज्ज व्हावा वा शरण यावा. म्हणून त्यानं आजूबाजूच्या गावांना व विशेषतः देवळांना त्रास देवू लागला. जबरदस्तीनं तो या तमाम महाराष्ट्रातील स्रीयांच्या इज्जती लुटू लागला. एवढेच नाही तर पशूधनांनाही ठेच पोहोचवू लागला. त्याच्या अशा प्रकारच्या उपद्रव्यानं शिवरायांना वाईट वाटत होतं. शेवटी त्यांनी विचार केला की आपण अफजलखानाला ठार करायचे. अफजलखानाला समोरासमोर मारता येत नाही. म्हणून शिवरायांनी त्याच्याशी युक्तीनं लढा देण्याचा विचार केला. त्यांनी खान बेसावध राहावा म्हणून आपण त्यांना फारच घाबरतो अशीही सुचना पाठवली. त्यातच खान बेसावध तर झालाच. शिवाय तो निर्भीडही झाला. शेवटी तो शिवरायांच्या म्हणण्यानुसार वागायला तयार झाला. शिवरायांनी खानाला प्रतापगडाच्या पायथ्याशी भेटायला बोलावले. भेट ठरली. शिवरायांनी जय्यत तयारी केली. कारण त्यांना खानाचा डाव माहित होता. भेटीदरम्यान शिवरायांनी खानाच्या म्हणण्यानुसार आलिंगण दिलं. त्यातच शिवराय सावधच होते. शेवटी खानानं कपटी डाव साधला. शिवरायांवर कट्यारीचा वार केला. त्यातच शिवरायांनी तो वार पुरता हुकवला व अस्तनीतून बिचवा काढून खानावर वार करुन वाघनख्यांनी खानाचं पोट फाडून टाकलं. झालं, क्षणातच धिप्पाड देहाचा खान मरण पावला. खान मरण पावताच शिवरायांचा दरारा आजूबाजूला फारच वाढला. एकेक क्लुप्त्या करीत शिवराय आदिलशाहाला पराभूत करीत होते. निजामशाही तर पावलंच बाहेर काढत नव्हती. शिवरायांसमोर शेवटी या आदिलशाहानं शरणागती पत्करली. त्यानंतर शिवरायांनी आपला मोर्चा मोगलांकडे वळवला. त्यावेळी मोगल सम्राट औरंगजेब ह्यानेही डाव साधला. त्यानं शिवरायांच्या पराक्रमी चर्चा ऐकल्या होत्या. त्यानं शिवरायांना भेटीला आग्र्याला बोलावले. ज्यावेळी शिवराय आग्र्याला औरंगजेबाला भेटायला गेले. तेव्हा शिवराय महाराष्ट्राचे राजे असूनही त्यांचा आग्र्याला अपमान केला गेला. त्यांना दुस-या क्रमांकाच्या रांगेत उभे केले. शिवाय त्यांना नजरकैदेतही टाकले. नजरकैदेत पडल्यानंतर शिवरायांनी आजारपणाचं सोंग केलं. त्यातच एक दिवस ते व त्यांचा मुलगा संभाजी मिठाईच्या पेटा-यात बसून ते प्रसारही झाले. शिवरायांनी आपल्या जीवनात खुप सा-या गोष्टी केल्या. मुसलमान झालेल्या नेतोजी पालकरांना हिंदू धर्मात आणले. तानाजीच्या मृत्यूनंतर त्याच्या उमरठे गावी जावून रायबाचं थाटामाटात विवाह केला. त्यांनी शायीस्तेखानाची बोटं तोडली. एवढंच नाही तर पुरंदरच्या लढाईत मुरारबाजी मेल्ल्यानंतर होत असलेला स्वकीय माणसाचा संहार पाहून पुरंदरचा तह केला. त्यातच तेवीस किल्ले आणि चार लक्ष होनाचा मुलूख मोगलांना दिला. पुढे राज्याची गरज लक्षात घेता कोंढाण्यासारखा बळकट किल्ला हातात घेतला. त्यामध्ये तानाजीसारखा बालपणीचा मित्र गमवावा लागला. शिवाजीला वाचविण्यासाठी ज्या मराठे सरदारांनी प्राणांची बाजी लावली. त्यात बाजीप्रभू, तानाजी, जीवा महाला, मदारी मेहतर, शिवा काशीद यांचं बलिदानही विसरता येत नाही. त्यांनी जर बलिदान दिलं नसतं, तर शिवाजी महाराजंही दिसले नसते. त्या असंख्य शिवाजींच्या मावळ्यांमुळे हे स्वराज्य उभं राहिलं. त्याला पुढं नाव दिलं हिंदवी स्वराज्य. हिंदवी स्वराज्य हे मावळ्यांच्या बलिदानातून साकार झालेलं स्वराज्य. प्रत्येक आई आपल्या मुलाला कोणतीही क्षति पोहोचू नये यासाठी प्रयत्न करते. स्वतः संकटं झेलते. खपते, मरते. पण जीजाबाईनं त्याचा विचारच केला नाही. तिला माहित होतं की तोरणा गडाच्या युद्धात शिवराय मरुही शकते. तरी प्रेरणा दिली की हे शिवा, तू हा तोरणा जिंकू शकतोस आणि काय आश्चर्य तोरणा जिंकला. पुढे अफजलखान भेटीलाही जातांना शिवराय आई जीजामातेला म्हणाले की वाचलोच तर परत येईल. नाही वाचलोच तर मासाहेब आपण संभाजीला गादीवर बसवायचं व राज्य सांभाळायचं. त्यावेळी त्याच्या जन्मदात्या आईला काय वाटलं असेल. तरीही तिनं आज्ञा दिली आणि सांगीतलं की तू जर माझा मुलगा असशील तर त्या अफजलखानाचं मुंडकंच कापून आणशील. पुढं आग्र्यालाही जातांना तेच घडलं. शिवरायांनी राज्यभिषेक केला खरा. पण हे राज्य निर्माण करण्याचं स्वप्न जीजाबाईनं दाखवलं होतं. नव्हे तर ते राज्य तमाम मावळ्यांच्या बलिदानातून साकार झालं आहे. आज मात्र याच शिवरायांच्या नावावर केवळ राजकारण सुरु आहे. ऐरी, गैरी सारीच मंडळी निव्वळ शिवाजी महाराज की जय तर म्हणतात. पण तसे वागण्याचा प्रयत्न करतात का? निव्वळ दाढी वाढवून वा वेषभुषा करुन शिवाजी बनत नाही, तर शिवाजी बनायला ती शिवरायांची दृष्टी हवी. ती स्वप्न दाखवणारी जीजामाताही हवी आणि ते प्राणांची बाजी लावणारे मावळेही हवे. बापू बापू म्हणत अगदी तरणेताठ होईपर्यंत जोपासणारी आमची आई नको आणि महत्वाची एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. ती ही की जे शिवाजी शेकडो महिलांची अब्रू वाचवीत होते. आपण आपल्या वस्तीतील एका जरी महिलांची अब्रू वाचवली तरीही शिवराय बनल्याचं सार्थक होईल. तसेच ज्याप्रमाणे शिवराय राज्यातील प्रत्येकाला मदत करीत होते. आपण एका व्यक्तीला जरी मदत केली तरी आपल्यातला शिवाजी प्रकर्षानं दिसेल यात शंका नाही. शिवरायांनी तर एक आदर्श निर्माण करुन दिला आपल्यासमोर. आपणही त्याच आदर्शाचा आदर्श बाळगून केवळ युद्धानं नाही तर शांतीनं या काळातील आदिलशाही, निजामशाही व मोगलशाही वृत्तीच्या माणसाच्या मनातील वाईट विचारांचा बिमोड करावा. जेणेकरुन शिवाजीच्या आत्म्यालाही शांती वाटेल व ख-या अर्थानं हिंदवी स्वराज्य नाही तर बलाढ्य अशा स्वरुपाचं स्वराज्य आपल्याला दिसेल यात शंका नाही. दिक्षाला विचार येत होता तो महापुरुषांचा. आज महापुरुषांना शिव्या हासडत होते लोकं. तिचा तो विचार. ते महापुरुष. ज्यांना आपण अवतार समजतो. त्यात राम व क्रिष्णाचा समावेश होतो. त्या राम व क्रिष्णापासून लोभाचा त्याग करणं, ही गोष्ट शिकता येते. राम प्रसंगी वनवासात गेले. परंतु त्यांनी राज्य बळकावण्याचा प्रयत्न केला नाही वा ते मोठे असल्यानं त्यांनी राजगादीवर आपला अधिकार सांगितला नाही. ही त्यागाची भावना रामानं शिकवली तर कंसवध झाल्यानंतर पुर्ण राज्य हाती आल्यावरही आपल्या आजोबाला म्हणजेच उग्रसेनाला राजगादीवर बसून राज्य बघणारे क्रिष्ण, बलराम, त्यांच्यापासूनही लोभ करु नये हेच शिकता येतं. कर्ण दानवीर होता. त्याच्या दानशुरतेचा जोडीदार आजपर्यंत कोणीच झाला नाही. त्याला माहीत असतांनाही व आपण मरणार हे माहीत असतांनाही त्यानं आपलं कवचकुंडल दान दिलं. हीच दानशुरता त्याचेकडून शिकण्यासारखी आहे. महापुरुषांनी सुधारणा केल्या तर काही महापुरुषांनी आपलं शरीर झिजवलं. अशीच राजा हरिश्चंद्राची कहाणी प्रसिद्ध आहे. राजा हरिश्चंद्र चित्रपट कुणालाही माहीत असेल, त्यानं एका शब्दावर आपलं पुर्ण राज्य दान केलं. ते दान केलं त्यानं आपल्या स्वप्नात दिलेल्या वचनानुसार. एवढंच नाही तर चांगोलानं आपल्या पुत्राचंच मस्तक कापून त्याचं जेवन बनवून नवश फेडला होता. नल दमयंतीचीही कथा अशीच. जवळ फक्त अर्धीच पोळी असतांना व भूक फार लागलेली असतांना त्या दोघांनीही आपली अर्धी पोळी एका श्वानाला दिली. पुर्वी ज्याला आपण अवतार समजत होतो. त्या लोकांनी अहंकार त्यागला. लोभ त्यागला. दानशूरपणाचा धर्म हातात घेतला व परोपकार साधला. त्यामुळंच त्यांचं नाव आजही अजरामर आहे, कुंभमेळ्यात स्नान नाही केलं तरीही. मध्यंतरीच्या काळातील महापुरुष, त्यांनीही लोभ केला नाही. तेही राग, द्वेष, अहंकारापासून दूर राहिले. त्यांनीही परोपकार साधला. आज तेही महान झाले. मात्र आताचे लोकं काही बरोबर नाहीत. मी मी चा संसार आहे. एव्हाना मी पणाच्या या जगातील मीपणा वाढत चालला आहे. तोच आपली अधोगती करीत आहे. शिवाय हाच मीपणा लोकांना चांगले वागायला शिकवीत नाही. स्वार्थवाढीस लावत आहे. तरीही लोकांना माहीत आहे की कितीही मी मी व माझं माझं केलं. तरीही आपल्या पदरात काहीच पडत नाही व आपल्याजवळ काहीच येणार नाही. आजचा आपला समाज याच मीपणाच्या चक्रव्यूहात फसत असून तोच आज महापुरुषांची टिंगल टवाळकी करतो आहे. तो प्रसंगी त्या महापुरुषांसारखा किंचीतही वागत नाही. वागण्याचा प्रयत्न करीत नाही. उलट मी किती चांगला असेच दाखविण्याचा प्रयत्न करतो आहे. हे मी पण संपणारे आहे. एकदा का व्यक्ती संपला तर........ राहू शकते दान, कर्ण व हरिश्चंद्रानं केलेला. राहू शकते त्याग, राम व क्रिष्णानं केलेला. राहू शकतात सुधारणा, महापुरुषांनी जुनाट रुढी, परंपरांना छेद दिलेल्या आणि तो सुधारणा करणाराही अमरत्व प्राप्त करु शकतो. जरी त्यानं कुंभमेळ्यात स्नान नाही केलं तरी. महत्वाचं सांगायचं झाल्यास माणसानं मी पण सोडावं. सेवा करावी. त्याग करणं शिकावं आणि शिकावा कर्णासारखा दानशुरपणा. त्याला मरण माहीत असतांनाही त्यानं आपली कवचकुंडलं दान दिली होती. मरणानंतर माणूस जमीनीवरील एकही वस्तू आपल्यासोबत नेत नाही. नेतो फक्त त्याग, दानशुरपणा आणि नाव. ज्या नावात किर्ती नावाची एक गोष्ट गुप्त स्वरुपात लपलेली असते. हेच करावं माणसानं जीवनात. कुणीही कुणाचा द्वेष करु नये. एकमेकांशी प्रेमाच्या भावनेने राहावे. प्रेम द्यावे, प्रेम घ्यावे. कुणीही आपल्या बोलण्यानं कुणाचं मन दुखवू नये. पाप करणं सोडावं. पाप जर करणं सोडलं तर कदाचीत कुंभमेळ्यात स्नान नाही केलं तरी चालेल. आपलं नाव धरणीवर उरेल यात शंका नाही. कुंभमेळ्यात स्नान करण्याआधी मनाची स्वच्छता केलेली बरी. नाहीतर कितीही वेळेस कुंभमेळ्यात स्नान केलं तरी आपले पाप नष्ट होणार नाही. ते वाढतच जाईल. हे तेवढंच खरं. दिक्षाच्या मनात कुंभमेळ्यात जाण्याचा विरोध नव्हता. विरोध होता माणसात निर्माण झालेल्या विचारांचा. ती म्हणत होती, कुंभमेळ्यात अवश्य जावे. पण....... त्या पणचं कारण वेगळं होतं. ******************************************** कुंभमेळा...... ज्या ठिकाणी स्नान केलं जातं. ज्या ठिकाणाला म्हणतात की तब्बल एकशे चवळेचाळीस वर्षांनी योग आला. त्या ठिकाणी आंघोळ करणे म्हणजे समस्त पापाचं खंडण. त्या गोष्टीचीच जाहिरात आणि त्याच गोष्टीच्या नादात लागून वेडी झालेली जनता. कुंभमेळ्यात स्नान करण्यासाठी जात होती व आपणही त्या क्षणाला कुंभमेळ्यात स्नान केलं होतं. त्या क्षणाचे साक्षीदार बनत होते. कुंभमेळ्यात स्नान...... हा स्नानाचा योग एकशे चवळेचाळीस वर्षांनी आलेला. कोणी त्याला जाहिरात मानत असत. कोणी त्याला श्रद्धा तर कोणी अंधश्रद्धाही मानत. कोणी त्याला चमत्कार तर कोणी देवानं निर्माण केलेला भक्तीभाव मानत. कोणी त्याला पाप धुण्याचं साधन तर कोणी त्यात स्नान केल्यानं पुण्यप्राप्ती मानत. परंतु याही वर जावून काही लोकं तेथील आंघोळ करणाऱ्या कर्माला पाप पुण्य मानत नाहीत. लोकं कुंभमेळ्यात स्नान करणाऱ्या गोष्टीला पाप वा पुण्य हे नाव देत नव्हते. याबाबत बरेच व्हिडिओ सोशल मिडीयावर होते. त्यातील एका व्हिडिओचं वर्णन. व्हिडीओत एक मुलगा कुंभमेळ्यात स्नान करायला जायला तयार होता. त्याची आई आजारी होती व त्यावर आई विचारत होती, "बाळा, कुठं चाललाय?" "कुंभमेळ्यात." "कशासाठी?" "पुण्य मिळवायला." "तुला पुण्य मिळेल असं वाटतं का?" "का नाही मिळणार? अगं, तिथं तीन नद्यांचा संगम आहे. ज्या नद्या स्वर्गातून आलेल्या आहेत. त्यात आंघोळ केल्यानं मला पुण्य मिळणार आहे." "तरीही सांगतो बाळा की तुला पुण्य मिळेल हे शक्य आहे काय?" आईनं म्हटलेले शब्द. प्रत्यक्षात आईच्या रुपात देवच बोललेला. त्यामुळंच बाळाला विचार आला. त्यानं विचारलं, "आई, तू असं का बोलतेय? तुला आनंद नाही वाटत का की तुझा बाळ कुंभमेळ्यात जात आहे. आंघोळ करुन पुण्य मिळवायला." ते बाळाचं बोलणं. त्यावर आई म्हणाली, "आहे. नक्कीच आनंद आहे. परंतु बाळा, मी आजारी आहे व या परिस्थितीत मला एकटं सोडून कुंभमेळ्यात आंघोळीला जाणं तेवढं गरजेचं नाही. असं मला वाटतं. कदाचीत माझं बरंवाईट झालं तर......." आईनं यु ट्यूबवरील व्हिडिओ काढला. त्यात गाणं लावलं, 'कभी प्यासे को पाणी पिलाया नही, अब गंगा नहाने से क्या फायदा?' तरीही बाळ काही ऐकला नाही. त्यानंतर ती म्हणाली, "बाळा, विचार कर की मी आजारी असतांना तू जर कुंभमेळ्यात गेलाही आणि प्रत्यक्षात तिथं देव जरी आला तरी तो म्हणेल की तू इथं कशाला आला? आधी घरी जा व आईची सेवा कर. अन् तुला त्यावेळेस कळल्यानं तू आलाही. परंतु त्यानंतर मी जीवंत नसले तर......." आईनं बाळाला भरपूर समजविण्याचा प्रयत्न केला. परंतु तो कुंभमेळ्यात गेला व परत येईपर्यंत आई वारली. हा एका मिडीयावरील व्हिडिओ. आजच्या काळात मुलं आपल्या मायबापाला वृद्धाश्रमात ठेवतात आणि पुण्य मिळविण्यासाठी कुंभमेळ्यात जातात. लोकं आपल्या घरी म्हाताऱ्या, अनाथ, अपंगाची सेवा करीत नाहीत. अन् कुंभमेळ्यात जातात. मान्य करतात की कुंभमेळ्यात आपलं पाप धुतलं जाणार. परंतु हे शक्य आहे काय? त्याचा अर्थ एका शब्दात सांगणे म्हणजे हे शक्य नाही. कुंभमेळ्यात जाणे. ही अंधश्रद्धा नाही. ती एक प्रकारची श्रद्धा आहे लोकांच्या मनात निर्माण झालेली. त्या ठिकाणी चमत्कार नाही वा कोणताच दैवी गुण नाही. गुण आहे मनाला आनंद देणारा. मनाच्या आनंदासाठी कुंभमेळ्यात जाणे. परंतु त्यातून पाप धुतल्या जाते हा गैरसमज लोकांमध्ये झालेला आहे. हं, विशेष हे की कुंभमेळ्यात ज्याला जायचे ते जावू शकतात. कारण त्यांना पुढील जीवन जगत असतांना हळहळ वाटायला नको. तसंच जो कोणी गेला. त्याला हे माहीत आहे की शिस्त बाळगलेली बरी. जी बाळगली नाही तर देव निराश होईल. त्यानं ती दखल घेणे गरजेचे आहे. दखल नाही घेतली तर घात होणारच. दखल म्हणजे कुठेही झोपू नये. उदा. रस्त्यावर झोपल्यास रस्त्यावरुन चालणारी माणसं तुम्हाला पायदळी तुडवणार म्हणजे तुडवणारच. जसं मौनी अमावश्येच्या दिवशी घडलं. कारण त्या दिवशी फार मोठी गर्दी होती व लोकं रस्त्यावर झोपले होते. अशातच गर्दीचा लोंढा आला. ज्यात काही लोकं चेंगराचेंगरीत गेले. फिरायला जाणे ही एक चांगली कृती आहे. त्यातच तेथे असलेल्या संगमातील पाण्यात आंघोळ करणे ही देखील एक चांगली कृती आहे. परंतु ही कृती करीत असतांना त्यात चमत्कार आहे वा देव प्रसन्न होईल अशी आस मनात ठेवू नये. वाटल्यास आपले मायबाप जर घरी असतील तर त्यांची सेवा करावी. कुंभमेळ्यात जायची गरज उरणार नाही. अपंग, निराधार व आश्रीतांची सेवा केली, तरही देव पावेलच. त्यात शंका नाही. त्यासाठी कुंभमेळ्यात जायची गरज नाही. तसंच आपले पाप पाण्यानं धुतले जात नाही. ते धुतले जातात चांगल्या विचारानं. चांगले विचार ऐकून आपल्यात बदल केला तर....... जसं वाल्मिकीचं झालं. अंगुलीमालचंही झालं. हेच लक्षात ठेवावे. त्यासाठीही कुंभमेळ्यात जायची गरज नाही. कुंभमेळ्यात अवश्य जायला हवं. परंतु घरी असलेल्या सर्व सदस्यांची सुखरुप असल्याची खात्री करुन. आपल्या मनातील कुविचार त्यागून नव्हे तर कुविचार नावाचं मनाच्या शेतातील तणकट काढून टाकून. त्या आपल्या मनाच्या पोकळीत सुविचारांची पेरणी करुन. जर ती पेरणी झालीच नाही तर कुंभमेळ्यात जाण्याला काहीच अर्थ उरणार नाही हे तेवढंच खरं.***************************************** दिक्षानं आपल्या मुलाचा प्रवेश करताच त्यासाठी होत असलेला जातीचा विरोध. ती जात त्या मुलांच्या शिक्षणाचं नुकसान करणारी ठरत होती. तिला काय करावं सुचत नव्हतं. त्यामुळंच तिच्या मनात प्रश्न पडला होता व अचानक तिच्या तोंडातून शब्द फुटले. थांबा. जात टिकविणे आहे. जात जातीवरुन तिच्या मनात विचार आलेत. अलिकडील काळात जात ही एखाद्या घोरपडीसारखी घट्ट चिकटलेली आहे व त्याच जातीवरुन अत्याचार सुरु आहेत. तेच अत्याचार वाढत आहेत. काही ठिकाणी असले होणारे अत्याचार वाढत चाललेले दिसत आहेत तर काही ठिकाणी असले अत्याचार हे समाप्त होणार असेही जाणवत आहे. काही ठिकाणी जात घट्ट चिकटली आहे एखाद्या बांडगुळागत, तर काही ठिकाणी जात ही विरळ होतांना दिसत आहे. कारण अलिकडील काळात बऱ्याच ठिकाणी प्रेमविवाह अगदी जोरात होत चाललेले असून त्याची तिव्रताही वाढत चाललेली आहे. त्यामुळं जात नष्ट होईल काय? असा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडलेला आहे. अलिकडील काळात जात असली तरी काही लोकं जात पाळतांना दिसत नाहीत. शहरातही प्रेमविवाह थाटात होत असून प्रेमविवाहाला आजच्या समाजातील लोकांनी मान्यता दिल्यागत चित्र दिसत आहे. हे जरी खरं असलं तरी जात नष्ट होणार नाही. ती नष्ट व्हायला वेळ लागेल. कारण ज्या तिव्रतेनं ती वाढली. त्यानंतर ती जशी टिकली. तशीच ती नष्ट होतांनाही बराच वेळ लागेल किंवा लागू शकते. आज समाज सुधारला. कारण तो शिकला आणि शिकू लागला आहे. तो शिकलेला सुधारलेला समाज जातीप्रथा नष्ट करीत असून पाहिजे त्या प्रमाणात जात पाहात नाही. शहरात तर जातीप्रथा तेवढ्या प्रमाणात दिसून येत नाही. जातीभेद मिटलेला दिसत आहे. हे कामावरुन दिसतं. विवाहावरुनही तेच दिसतं. तसंच एकमेकांच्या व्यवहारावरुनही तेच दिसून येत असतं. कारण जातीच्या आधारावर विचार केल्यास शहरातील माणसे जात जात न करता एकमेकांच्या घरी जातात. मग तो विवाह समारंभ असो की एखादा कोणता समारंभ. शिवाय आजचे शहरातील लोकं हेही समजायला लागले आहेत की रक्त हे कोणत्याही जातीच्या व्यक्तीचे काढले तर ते लालच निघेल वा रक्तदान होतांना ते रक्त कधीच भेदभाव बाळगत नाही. मी अमूक माणसांचा असे कधीच म्हणत नाही. कधी ते रक्त दान होतांना धर्मावरुन भांडत नाही. मी हिंदू मी मुसलमान म्हणा, कधीच ते रक्त मी अमूक जातीचा बहुजन तर मी तमूक जातीचा सनातन असा फरक करीत नाही. यावरुन एकंदरीत सांगायचं झाल्यास जात नष्ट होणार असल्याची चिन्हं दिसतात. जात....... जातीवरुन वरील स्वरुपाच्या गोष्टी ह्या जरी खऱ्या असल्या तरी मी अमूक जातीचा. मला अमूक म्हणा किंवा माना. असे का मानावे आम्ही. अन् त्या जातीवरुन कधीकधी ती नष्ट व्हायलाच पाहिजे व जातीवरुन भेदभावही नष्ट व्हायलाच पाहिजे. असेही का मानावे आम्ही? असे शहरातील नाही तर तमाम देशातील लोकांचे वागणे दिसून येते. लोकांच्या एकंदरीत वागण्यावरुन शहरात जातीप्रथा दिसत नाही. शिवाय शहरातील लोकं कामासाठीही एक दुसऱ्याच्या घरी, अनोळखी माणसाच्याही घरी कामाला जात असतात. ज्या घरी ते कामावर जातात. त्या घरची मंडळी ती त्याची जात पाहात नाहीत. काम करवून घेतात, ओळख पारख नसतांनाही अन् जात माहीत नसतानाही अन् जातही माहीत झाली तरी जातीचा भेदभाव मानत नाहीत. याचाच अर्थ असा की शहरात जातीवरुन वादंग नाही. एकंदरीत सांगायचं झाल्यास समाजातून जात मिटल्याची चिन्हं दिसत आहेत. ग्रामीण भागातही आज आंतरजातीय विवाह होवू लागले आहेत. तेही एकमेकांच्या घरी कामाला जावू लागले आहेत. तेही एकमेकांच्या विवाह सोहळ्यात सहभागी होवू लागले आहेत. याचाच अर्थ असा की ग्रामीण भागातूनही शहरासारखी जात मिटत चाललेली आहे. तशीच जात मिटत चालली आहे सरकारी कार्यालयातूनही सरकारी नोकऱ्या मिळाल्यावर अनेक जातीची माणसं एकत्र जेवनाचे डबे खातांना दिसतित. परंतु हे जरी खरं असलं तरी शहरात जात आहे, ती शाळेतील एकंदरीत वातावरणातून दिसते. ज्या शाळेत मुलं दाखल करतांना प्रत्यक्षात जात लिहिली जावू नये. असे असतांना जात ही विद्यार्थ्यांचा शाळा प्रवेश घडतांना लिहिली जाते. शहरात जात समाजातून जरी मिटत चालली असली तरी शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची जात आजही शहरात सुरु असलेली दिसत आहे. हेही नाकारता येत नाही. ही झाली शहरातील स्थिती. ग्रामीण भाग तर याहीपेक्षा वेगळा आहे. तिथे तर जात एखाद्या जळूसारखी आहे. जी जात जळूसारखी माणसांचं रक्तही पिते. कधीकधी यावरुनच अत्याचार होतो व उच्च जातीची माणसं कनिष्ठ जातीवर अनन्वीत जातीआधारावर अत्याचार करतात. ग्रामीण भाग असो वा शहरी. जात एवढी माणसाला घट्ट चिकटली आहे की जातीवरुन भेदभाव आजही दिसतो. जात आजही अस्तित्वात आहे. कधीकधी शहरातही एखाद्या व्यक्तीची मुलगी एखाद्या दुसर्याच जातीतील मुलांसोबत पळून जरी गेली तर बाऊ होतो. कधी त्याचा तेवढा जास्त दिवस बाऊ होत नाही. ग्रामीण भागात मात्र त्याचा बाऊ होतो. एवढंच नाही तर अशा घटना खेड्यात घडल्यास वाळीत टाकण्यासारख्या घटना घडतातच. व्यतिरीक्त कधीकधी ज्यांची मुलगी पळून गेली. त्यांच्या घरी आत्महत्याही घडत असतात. सर्वात जास्त प्रमाणात परजातीसोबत मुलगी पळून जाण्याचा धक्का मुलीच्या बापालाच पोहचतो व तोच आत्महत्या करीत असतो. एखादा अपवाद असतो की जातीवरुन वादंग होत नाही व परजातीशी एखाद्या मुलीचा विवाह झाल्यास मायबाप त्या विवाहाला स्विकार करीत असतात. इतर जातीचे जातीवरुन वाळीत टाकणे दूरच. जात..... एकीकडे जात आहे असे चित्र दिसतं तर दुसरीकडे जात अस्तित्वात नाही असंच चित्र दिसतं. जात ही रक्तावरुन दिसत नसली व सर्वांचे रक्त लालच असले तरी जात ही आजच्या काळात सरकारी कार्यालयातही दिसून येते. जातीवरुन आम्ही भेदभाव करीत नाहीत म्हणणारे चक्कं जातीवरुन सरकारी कार्यालयात भेदभाव करतांना दिसतात. ते इतर कनिष्ठ जातीशी फटकून वागतात. त्यांना साध्या पदोन्नत्याही देत नाहीत वा त्या द्यायला मागेपूढे पाहतात. तेच चित्र शहरातील काही लोकांच्या वागण्यावरुन दिसून येते तर तेच चित्र कधीकधी ग्रामीण भागातील लोकांच्या वागण्यावरुन दिसून येते. एकंदरीत सांगायचं झाल्यास रक्तावरुन व रक्तदानावरुन जात जरी नष्ट झालेली दिसत असली तरी आजही जात आहे. त्यातच जातीप्रथाही टिकूनच आहे. शिवाय जातीवरुन आजही भेदभाव आहे हे नाकारता येत नाही. तेव्हा जात नाही वा जातीप्रथा व जातीआधारीत भेदभाव मिटत आहे, मिटणार आहे. जात नष्ट होणार आहे असे कोणीही म्हणू नये. मानू नये. त्यामुळंच कोणी जर म्हणत असेल की थांबा, जात टिकविणे आहे, तर ते तेवढंच खरं आहे यात शंका नाही. जात...... जातीवरुन सर्व प्रकारचं आक्रंदन. जातीवरुन विवाह जुळणे व ते तुटणे. जातीवरुन निर्माण झालेल्या सर्वच गोष्टी. अशातच तिला गतकाळ आठवला व आठवलं तिला तिचं प्रेम. जे प्रेम गतकाळात ती दहावीला असतांना तिच्या मनात निर्माण झालं होतं. परंतु ते प्रेम जातीवरुनच तुटलं होतं. जरी ते तिचं प्रेम खरं होतं तरी. त्यानंतर तिला वाटत होतं. दहावीत निर्माण झालेलं प्रेम खरं प्रेम नसतंच. माणसं लहान असतात वा दहावीत असतात. तेव्हा अचानक मुलामुलीत प्रेम निर्माण होतं. परंतु ते प्रेम शाश्वत टिकत नाही. ते तुटतं. ते दहावीचं प्रेम तर सोडाच. साध्या कोणत्याही वयातील आजच्या काळात प्रेमाला थारा नाही. प्रेम हे अंधश्रद्धा, प्रथा, परंपरेच्या जाळ्यात अडकून पडले आहे व जातीनं त्या प्रेमावर बंधनं कसली आहेत. त्या प्रेमावर जात नावाच्या कवचाचं अतिशय कठीण असं आवरण बसवलं आहे की जे आवरण तुटता तुटत नाही. तो मुलामा नाही की तो निघून जाईल. अलिकडील काळात जे निर्माण झालेलं प्रेम दिसतं. ती वासना असते. ते प्रेम नसतं तर तो एका रासायनिक स्त्रावाचा परिणाम असतो. ज्याला आपण हार्मोन्स म्हणतो. आपण त्यालाच प्रेम समजतो. परंतु त्या रासायनिक स्रावाचा परिणाम जर सोडला वा तो परिणाम निघून गेला की प्रेम संपते. ज्याला आपण खरे प्रेम समजतो. प्रेम...... हे अतिशय महत्वाचं असतं. आईवडीलावर निर्माण झालेलं. भावाबहिणीत निर्माण झालेलं. परंतु अलिकडील काळात असं प्रेम कितीही मोठ्या स्वरुपाचं असलं तरी त्याला अर्थ उरत नाही. अर्थ येतो तो त्यानंतरच्या निर्माण झालेल्या प्रेमाला. जे प्रेम आजच्या काळात तरुण तरुणीत निर्माण होत असतं की ते तुटलं तर अतिशय वाईट वाटत असतं. कधीकधी ते तुटतंही. जेव्हा लक्षात येतं की आपल्या मित्रानंच आपला विश्वासघात केलाय किंवा आपल्या मैत्रीणीनंच आपला विश्वासघात केलाय. याबाबत एक प्रसंग, जो दिक्षाच्या जीवनात घडला नव्हता. प्रसंग एका दहावीतील विद्यार्थ्यांचा होता. ती एक मुलगी. ती दहावीत होती. तेव्हा तिच्यावर एक मुलगा निरतिशय प्रेम करायचा. तिही प्रेम करीत होती. कालांतरानं दहावी सुटलं व बरीच वर्ष झालीत. तो मुलगा अतिशय मोठ्या हुद्यावर लागला. तिही आज जिल्हाधिकारी बनली होती. तशीच आज ती एका मात्र सुसंस्कृत कुटूंबात पडली होती. मुलगा मोठ्या हुद्यावर. त्याचंही लग्न झालेलं. परंतु जसजसा काळ गेला, तसतसं त्याला त्याचं जुनं प्रेम आठवायला लागलं. अशातच त्याला दोनचार मैत्रिणी भेटल्या, काही मित्रही भेटले. ती भेटली नाही. ती भेटली नसल्यानं त्यातच त्यानं तिची भेट घ्यायचं ठरवलं. परंतु हे इतर काही मित्रांना आवडत नव्हतं व त्यातील एका मित्रानं त्याला सल्ला दिला. "तू तिच्या घरी जावू नकोस. नाही तर सगळं बरोबर असतांना एक चूक होईल. तिच्या पतीच्या मनात संशय निर्माण होईल व त्यांचा संसार तुटेल." ते त्याचं बोलणं. त्यावर उत्तर देत तो मित्र म्हणाला, "मी सगळं बरोबर करतोय." "आता काय बरोबर करायचं राहून गेलं तुझं?" "अरे ती माझं स्वागतच करणार." "अगदी बरोबर. परंतु तिच्या घरच्यांचा स्वभाव कसा आहे हे मला नाही, पण तिचा स्वभाव मला माहीती आहे. ती मनमिळाऊ होती आणि असेलही कदाचीत. ते तुझं स्वागतच करणारच. परंतु तू परत फिरल्यानंतर तिच्या घरी काय प्रतिक्रिया उमटतील. ते तुला तरी माहीत आहेत का? कितीतरी प्रश्नांची सरबत्ती होईल तिच्या घरात की ज्या प्रश्नांची उत्तरे ती देवू शकणार नाही." ते बोल ऐकून न घेता मित्र पुन्हा म्हणाला, "मी सगळं बरोबर करतो." त्यावर सल्ला देत तोच एक मित्र म्हणाला, "आता दहावीत आहे का बरोबर करण्यासाठी. सोडून दे भेटायचा नाद बाळा. तू तिच्या घरी जावू नको आणि तिच्या संसारात ढवळाढवळ करु नकोस. सुखी राहू दे सगळं वातावरण." ते एका मित्राचं बोलणं. त्यावर सगळेच त्याला सल्ला देवू लागले. त्यावर तो म्हणाला, "अरे सर्वांनी काहीही अर्थ काढू नका. बालमैत्रीण म्हणजे वर्ग मैत्रीण आहे. जसे तुम्ही सर्व." त्यानंतर त्यातील एकजण म्हणाला, "मित्रा, आता बालप्रेम चालत नाही. आता पतीप्रेम चालते. तिच्या सासूरवाडीला नाही समजत बालमैत्रीण. तू जाणारही कदाचीत. कदाचीत ती काही म्हणणारही नाही. परंतु तू गेल्यावर साऱ्याच प्रश्नांची सरबत्ती. प्रश्न न संपणारे." स्रीचं जीवन असंच. तिला तिचं प्रेम, तिच्या भावना, तिचं स्वातंत्र्य, तिचे जुने मित्रमंडळ, हे सर्व त्यागून व आपलं मन मारुन आपला विवाह करावा लागतो अगदी बालवयातही. तिला प्रत्यक्षात आजही तिच्या आवडीचा जोडीदार निवडण्याचं स्वातंत्र्य नाही. पुढं संसारात रमल्यावर तिला फक्त एकच मुल आवश्यक वाटत असतांना पती व सासरच्या आग्रहाखातर तिला चार पाच मुलं जन्मास घालावी लागतात. ज्यात तिला अतिशय वेदनादायक त्रास होतो. कधी एखाद्यावेळेस पती मरण पावलाच तर तिला वैधव्याचं जीर्ण जगणं जगावं लागतं. अन् अचानक अशावेळेस जुन्या प्रेमाची आठवण जरी आली तरी तिला ती विधवा असतांनाही ते जुनं प्रेम ती मिळवू शकत नाही. दिक्षाच्या मनात ते विचार खेळत होते. तिनं एक दिर्घ श्वास घेतला. तशी ती मनाशीच प्रश्न करु लागली. "ते प्रेम, ज्या प्रेमात जात असते. जातीआधारावर निर्माण झालेले संबंध हे सर्वकाळ टिकतात. अन् प्रेमात जात जर नसली तर एक वडील म्हणतो की बेटा तू आता माझ्यासाठी मरण पावलीय. पुन्हा मला तोंड दाखवू नकोस. हेच का स्रीचं जीवन? हेच का दुर्भाग्य तिच्या जीवनातलं की ती परिपक्व होण्यापुर्वीच तिचा विवाह होतो. तोही एका वयस्क माणसाशी. जो लवकर मरण पावेल व वैधव्याचं जगणं वाट्याला येईल. त्यातच तिला तिचा जुना दहाव्या वर्गातील प्रियकर आठवत असला तरी तिला काही उपयोग नसतो. कारण संसार हा भावनावर आधारीत नसतो. आधारीत असतो जुन्या अंधश्रद्धा, रुढी, प्रथा परंपरेवर. ज्या जुनाट प्रथा परंपरा आपल्याला आपल्या मनाच्या भावनांच्या वागण्याच्या परवानगी देत नाहीत. आपल्याला याच जुन्या प्रथा परंपरांमुळे नीट व्यक्तही होता येत नाही. मग आपलं दहाव्या वर्गातील कितीही चांगलं प्रेम असलं, ते प्रेम कितीही खरं प्रेम असलं तरी. ते प्रेम खरं नसतं. याबाबतीत कोणी म्हणतात की बालवय संपताच जेव्हा तरुणपण येतं. तेव्हा विशिष्ट असे रासायनिक स्त्राव शरीरातून सुटतात. त्याला हार्मोन्स म्हणतात. हे हार्मोन्सचे प्रमाण जसजसं वाढते. तसंतसं आकर्षण वाटते. ते आकर्षण वाढतेही. त्यातच असे काही काही रासायनिक घटक असतात की त्या घटकानं एकमेकांशिवाय जगणं अशक्य असते. कधीकधी एकमेकांशिवाय राहणंही अशक्य असते. हेच दहावीत घडतं आणि त्याच वयात एकत्रीकरण घडलं नाही तर कधीकधी त्यातून आत्महत्याही घडत असतात. त्यामुळं वेळीच सावधान झालेलं बरं. कारण जर याच हार्मोन्सची मात्रा संपली की प्रेम संपतं आणि भांडणंही बरीच होत असतात. त्याची परियंती आत्महत्येत. याचा दहावीच्याच नाही तर इतर सर्वच लोकांनी विचार करावा व आपलं वागणं बदलवावं. कारण दहावीत निर्माण झालेलं प्रेम हे खरं प्रेम नसतं तर तो रसायनांचा आणि वेड्या भावनांचा परिपाक असतो यात शंका नाही. मी माझ्या दहावीतील प्रेमाला जात समजू की हार्मोन्स. तोही माझा प्रियकर मला सोडून गेला. कदाचीत माझी जात तर त्यात आड आली नसेल! हो, जातच आड आली. तो चक्कं म्हणाला होता की दिक्षा, तू खालच्या जातीची. मी उच्च. तुझी जात माझ्या घरच्यांना चालत नाही." दिक्षा दहावीत होती. तिचं प्रेम होतं एका दिनेश नावाच्या उच्च जातीच्या मुलावर. ते प्रेम वृद्धिंगत होत गेलं होतं. तिनंही एक दिवस त्याला एक चैन बक्षीस दिली होती. परंतु जेव्हा दहावी संपत आली होती. तेव्हा त्याला दिक्षानं प्रेमाबद्दल विचारलं असता तो म्हणाला होता की तू खालच्या जातीतील आहेस. मी कदाचीत तुझा स्विकार करेल. परंतु माझा परीवार. तो परीवार आपलं प्रेम स्विकारुच शकणार नाही. तेव्हा हे प्रेम आपण इथंच थांबवलेलं बरं. प्रेमात दिक्षाला जातीआधारावरुन मिळालेला दगा. तो तिला सोडून गेला होता आणि त्यावेळेपासून तिला जगणं अतिशय अवघड वाटत होतं. परंतु त्यातून ती सावरली व पुढं तिनं कोणावरही प्रेम केलं नाही. तिनं अभ्यासालाच आपला मित्र बनवलं व आज ती जिल्हाधिकारी बनली होती. परंतु तिनं त्यावेळेपासून ठरवलं होतं की ज्या जाती भेदभावानं तिचं प्रेम तोडलं. तिही एक ना एक दिवस जात मिटवेल. **************************************** शिक्षणानं दिक्षा पुढे गेली होती व आज ती जिल्हाधिकारी म्हणून कार्य करीत होती. तिनं आपल्या मुलांच्या शिक्षणाची तमा बाळगली नाही. मात्र जात न लिहिण्याचा तिनं केलेला निर्धार. आज तिनं जात ही मुलांच्या शिक्षणावर अडसर ठरु नये म्हणून न्यायालयात खटला दाखल केला होता. शिक्षण...... शिक्षणानं व्यक्ती अति पुढे जात असतो. त्याचा दर्जा वाढतो. समाजात तेवढीच इज्जतही वाढते व मान प्रतिष्ठा सर्वकाही. दिक्षाचंही तेच झालं होतं. मात्र तिनं जात नष्ट करण्यासाठी व जात मुलांच्या नावासमोर न लिहिण्याचा घेतलेला निर्णय. त्यावर आधारलेला खटला न्यायालयात दाखल केल्यानं तिच्यावर कट्टर जातीवाद्यांकडून ताशेरे ओढले जावू लागले होते. त्यातच एवढं सर्व केल्यानंतर तात्पुरता तिच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळाला. तात्पुरती त्यांच्या नावासमोर जात लिहिली नाही. मात्र आज तिच्या मुलांशी काही शिक्षक व्यवहार करतांना अभद्र व्यवहार करु लागले होते. शिक्षण शिकविण्यासाठी गरज पडते शिक्षकांची. शिक्षकच हे विद्यार्थ्यांना शिकवीत असतात. त्यांचं जीवन घडवीत असतात. ज्या शिक्षणाच्या भरवशावर व्यक्तीचे विचार प्रगल्भ होत असतात. शिक्षक ज्ञान देत असतात. बदल्यात मोबदला घेत असतात. परंतु त्यातही काही शिक्षक हे शिकवीत असतात, तर काही शिक्षक हे शिकवीतच नाहीत. शिक्षणातही आज भेदभाव निर्माण होत आहे. काही शिक्षकांना भरपूर वेतन मिळतं. तर काही शिक्षकांना शिकविण्याचं वेतनच मिळत नाही. ज्या शिक्षकांना भरपूर वेतन मिळत असतं. ते शिक्षक ज्या शाळेत शिकवतात. त्या शाळेत विद्यार्थी पटसंख्या कमी असते आणि काही शिक्षक जे कॉन्व्हेंटला शिकवतात. त्या शिक्षकांना पुरेसं वेतनच नसतं. शिवाय पवित्र पोर्टल अंतर्गत सुरुवातीला परीविक्षा कालावधीत असणाऱ्या शिक्षकांना मिळणारं वेतन कमी असतं. काल शिक्षणाची व्यवस्था एका आश्रमात असायची. तो आश्रम की ज्या आश्रमात एक कच्चे घर असायचे नव्हे तर काट्याकुट्यानं बनवलेलं वा कुडानं बनवलेलं झोपडं असायचं. ज्यात चारही बाजूनं हवा यायची. सतत जंगली श्वापदाची भीती असायची. ती श्वापदं जंगलातून यायचे व त्या विद्यार्थ्यांवर हमलाही करायचे. त्यातच साप, विंचूसारखे प्राणी वेगळेच. अशा भययुक्त वातावरणात विद्यार्थ्यांची शाळा असायची. त्यातच काही विद्यार्थी पहारा देण्याचेही काम करायचे. शिकणे शिकविणे ही क्रिया एकजुटीनं व मिळून मिसळून घडायची. भेदभाव नसायचा आपापसात, ना ही वर्गातील कोणत्याच विद्यार्थ्यांची एकमेकांविरुद्ध कुरकूर असायची. तो काळ व त्यांना शिकविणारा तो गुरु. तो गुरु फक्त विद्यार्थ्यांना आपलं संरक्षण कसं करायचं, तेवढंच शिकवायचा. मात्र तो त्यांचं रक्षण करीत नसे. तर त्या विद्यार्थ्यांसमोर संकटच उत्पन्न करायचा. ज्यातून विद्यार्थी घडायचे. शिवाय विद्यार्थीच आपल्या गुरुचं त्या जंगली प्राण्यांपासून रक्षण करायचे. त्यांना अशा प्राण्यांची भीती वाटलीच वा एखादा प्राणी आश्रमाजवळ आढळलाच तर तेच शिष्य त्या प्राण्यांना हुसकावून लावायचे. हळूहळू काळ बदलला. त्या बदलत्या काळानुसार अनेक बदलाव शिक्षणात झाले. आश्रमाची जागा जावून इमारत आली. विद्यार्थ्यांना पुर्ण शरीर झाकेल असा पोशाख आला. तसं पाहिल्यास पुर्वीच्या काळात विद्यार्थी हे शरीर थोडेसे नागडे ठेवूनच संन्यासी वृत्तीनं शिक्षण घ्यायचे. ते सर्वप्रथम आपलं शरीर बनवायचे. आज तसं नाही. तशीच आज बैठक व्यवस्थाही बदलली. आज विद्यार्थ्यांना बसायला बाक आला, जो काल नव्हता. आज शिक्षणाची व्यवस्था सध्या एका पक्क्या इमारतीत झाली आहे. ज्या इमारतीला रंग मारावा लागतो. कशासाठी? तर इमारत चांगली असेल तर विद्यार्थी येईल या भावनेनं. शाळा चालावी या भावनेनं. शिक्षणात जणू स्पर्धा निर्माण झाली आहे. कारण आज दिखाव्याचं जग आहे. आज शिक्षणाला पाहिजे त्या प्रमाणात वाव नाही. जेवढा भपकेबाजपणा, तेवढं शिक्षण. असं आजचं शिक्षणाचं गणित आहे. कारण शाळेचा दर्जाच अशा भपकेबाजपणावर अवलंबून आहे. आज काळ बदलला आहे. तसा समाजही बदलला आहे व बदलत्या समाजानुसार शिक्षणाची व्याख्याही बदलली आहे. त्यानुसार असं वाटतं की आज खरं शिक्षण शाळेतून मिळतच नाही. जे काल परीसरातून मिळत होतं. काही शिक्षक ज्या शाळेत शिकवतात. त्या शाळेत विद्यार्थी पटसंख्या कमी असते आणि काही शिक्षक जे कॉन्व्हेंटला शिकवतात. त्या शिक्षकांना पुरेसं वेतनच नसतं. तसंच अलिकडेच आलेलं पवित्र पोर्टल. या काळातही शिकवीत असतांना मिळणारं वेतन हे अत्यल्पच असतं. असं वाटत असतं की तेही शिक्षक आणि हेही शिक्षकच. मग असला भेदभाव का? खरं शिक्षण हे शिक्षणाचा भेदभावच करीत असतं. पुर्वीही असाच भेदभाव होत होता व तो आजही आहे. पुर्वी अस्तित्वात असलेला एकलव्य. तो एक विद्यार्थी होता व त्याला शिक्षण शिकायची आवड असल्यानं तो शिक्षण शिकण्यासाठी आपल्या गुरुकडे गेला. परंतु गुरुनं त्याला शिकवलं नाही. कारण होतं शिक्षणात असलेला भेदभाव. शिक्षणाची संधी ही शुद्र वर्गासाठी नव्हतीच. ती क्षत्रीय वर्गासाठी व ब्राह्मण वर्गासाठी होती. शिक्षणात शिक्षकामधील भेदभाव दिसतो. तोही वेतनावरुन. एका घटकाला तो तेवढेच शिक्षण शिकवीत असूनही त्याला तुटपुंजे पैसे मिळतात. शिकवायचं वेतन एकच असायला हवे शिक्षकांना. मग तो माध्यमिक, महाविद्यालयीन वा प्राथमिक विभागातील का असेना, शिकवायला कसब वेगवेगळं लागत नाही. मेहनतही वेगवेगळी लागत नाही. परंतु भेदभाव बराच दिसतो. वेतनाच्या बाबतीत तर निश्चीतच दिसतो, जो काल दिसत होता. कालही काही गुरुंना वेतन नव्हतंच. हा भेदभावच होता वेतनातील शिक्षकांच्या बाबतीत होत असलेला. आता शिकविण्यातील विद्यार्थ्यांच्या बाबतीतील भेदभाव. काल एकलव्य सारख्या एका विद्यार्थ्याच्या मनात शिक्षणाची इच्छा होती. त्याला राजवाड्यातील मुलांना जे शिक्षण मिळतं, ते शिकायचं होतं. परंतु ते शिकायला मिळालं नाही. शिवाय व्यतिरीक्त त्याचा अंगठाही घेण्याची कृती घडली. आजही तेच घडत आहे. आजही शिक्षणात भेदभावच केला जात आहेत. आजच्या शिक्षणातील भेदभाव कोणता? असा विचार केल्यास आज शिक्षणात गरीब विद्यार्थ्यांना कॉन्व्हेटचं शिक्षण मिळत नाही. शिवाय उच्च शिक्षण घेतो म्हटल्यास तेही घेता येत नाही. एखाद्या गरीब विद्यार्थ्यानं डॉक्टर, इंजीनियर बनतो म्हटलं तर ते बनता येत नाही. कारण त्याला पैसा लागतो. तो पैसा गरीबांजवळ राहात नाही. हा शिक्षणातील भेदभावच नाही का? हा भेदभावच आहे. विद्यार्थ्यांच्या बाबतीत होत असलेला. विशेष म्हणजे विद्यार्थी विद्यार्थी यातही भेदभाव होवू नये. आज एखाद्या गरीब विद्यार्थ्यांना जर डॉक्टर, इंजीनियर बनायचं असेल वा एखाद्याला एकलव्यासारखी शिकायची आवड असेल तर ती आवड पैसे नसल्यानं मोडावी लागते. शिक्षणातून मोठं होण्याची इच्छा असेल, तरीही त्याला पुर्ण करता न येणे. हा एक भेदभावच कालपासून तर आजपर्यंत सुरु आहे व तो सुरुच राहणार की काय? असं वाटत आहे. शिवाय काल असलेला जातीतील भेदभाव आजही उघडपणे दिसत आहे. आज शाळेत जाणाऱ्या लहान मुलाला, ज्यावेळेस जात म्हणजे काय? हे समजत नाही. त्याचकाळात जात चिकटवून देवून पुढे जात माहीत झाल्यावर विद्यार्थ्यांच्या समजसुचकतेत जो बदल होतो. जो बदल एका श्वानाच्या तोंडात बाण मारून व त्याचा भुंकण्याचा आवाज बंद करुन एकलव्यानं आपलं श्रेष्ठत्व सिद्ध केलं होतं. हे अर्जुन व द्रोणाचार्यला माहीत होताच अर्जुनात व द्रोणाचार्यात जो बदल झाला, त्यासारखाच असतो. महत्वपुर्ण बाब ही की आज आपण काळ बदलला म्हणतो. समाज सुधारला म्हणतो. काळानं पाश्चिमात्य विचारसरणीचा अवलंब केला म्हणतो. परंतु खरं, सांगायचं झाल्यास खरी सुधारणा झालेली दिसते का? लोकं आजही शिकत असले. शिकले सवरले असले तरी कालच्या अंधश्रद्धेचा बुरखा वापरलेल्या लोकांच्या मनातून जुन्या अंधश्रद्धा जात नाहीत. भेदभावही जात नाही. मग तो जातीतील भेदभाव असो वा शिक्षणातील भेदभाव असो. माणसानं जी जात नाही तिला जात ठरवलं असून आज विद्यार्थ्यांच्या मनावरही जातच बिंबवली जात आहे. जरी समाज सुधरला आहे असं आपण मानत असलो तरी. तसंच शिक्षण हे गरीबांसाठी नाहीच. तुम्ही हमालच बना. असं आजचं शिक्षण हे गरीबांना खुणावतही आहे. विशेष म्हणजे आज जिथं आपण समाज सुधरला असे म्हणतो. तिथं जातीप्रथा व शिक्षणातील होत असलेला भेदभाव तरी दूर व्हायलाच हवा. निदान शिक्षणात तरी भेदभाव होवू नये. शिक्षण सर्वांनाच निःशुल्क व्हावं. त्यातच उच्च शिक्षणही. मग तो व्यक्ती गरीब असो की श्रीमंत. एखाद्या गरीब मुलांची जर इच्छा असेल, डॉक्टर, इंजीनियर बनायची तर त्याला ते बनता यावं. तशाच लोकांनी अंधश्रद्धा सोडाव्यात व तेवढ्याच जातीप्रथा आणि जातही. कारण काळ बदलला आहे आणि बदलत्या काळात सर्वच अनैतिक गोष्टी बदलायला हव्यात हे तेवढंच खरं. नाहीतर देश कितीतरी मागं जाईल. देश घडणार नाही व शिक्षणासाठी आणखी एक मोठी क्रांती घडवावी लागेल यात शंका नाही. दिक्षानं न्यायालयात टाकलेला खटला. त्याचा परिणाम म्हणून तिच्या मुलांची शाळेत होत असलेली हेळसांड. तिची मुलं जेव्हा शिक्षकांच्या वर्तनाच्या गोष्टी घरी सांगायचे. तेव्हा तिला विचार यायचा. वाटायचं की आपण विनाकारणच जातीच्या आधारावर न्यायालयात खटला दाखल केला. ज्यातून माझ्याच मुलांना त्यास शोषावा लागत आहे. दिक्षाला आलेला विचार. जात आधारीत शिक्षण व शिक्षण आधारीत जात. जात तरी शिक्षणात नसावी. परंतु कोण ऐकतोय. जी जात शिक्षणात नसावी असं वाटतं. तीच जात आज शिक्षणात आहे व ज्या जातीच्या आधारावर शिक्षण शाळेतून मिळू नये. त्याच जाती आधारीत शिक्षण शाळेतून दिलं जातं. याचं कारण सरकार व शासन धोरण. आम्ही जिल्हाधिकारी असलो आणि जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर जरी असलो तरी आमच्या मताला जिल्ह्यात काही वाव नाही. वाव आहे नेत्यांच्या मताला. जे नेते कमी शिकलेले असतात व ज्या नेत्यांच्या मनात जात ही कुटकूट भरलेली असते. अलिकडे शिक्षण हे जातीवरुन दिलं जात नाही. आजच्या काळात शिक्षण हे कोणताही व्यक्ती कोणत्याही जातीचं घेवू शकतो. जातीवर आधारीत आज शिक्षण उरलेलं नाही. मात्र जात जशी पुर्वी बदलवता येत होती. तशी आज बदलवता येत नाही. जात पुर्वी बदलवता येत होती काय? तर त्याचं उत्तर होय असंच येतं. पुर्वी जात ही बदलवता येत असे. जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जातीतील धंदा आवडला नाही तर तो धंदा बदलवत असे. त्यानंतर त्या धंद्यावरुन त्याची जात त्याला मिळत नसे. मध्यंतरीचा काळ आला व जातीवर बंधनं आली. त्यानुसार कोणीही आपली जात बदलवू नये असं ठरलं. त्याचं कारण होतं कामाचं कसब आणि कोणतेही काम जलद गतीनं व्हावे असे वाटण्याची प्रक्रिया. नंतर जातीवर आधारीत उद्योगधंदे वाढले व ते करण्यासाठी कारागीर हे जातीतूनच तयार करण्याची प्रक्रिया अस्तित्वात आली. त्यानंतर काही दिवस शांततेत गेले व काही दिवसानं त्यातही भेदभाव शिरला. जातीवर आधारीत धंदे व ते का आले? त्याचं कारण होतं कामाचं कसब व त्या कामाची गती वाढवणं. त्यानुसार कारागीरही तयार झाले व लोकं आवडीनं कोणतही काम, मग ते काम कोणत्याही जातीतील का असेना, करण्याची पद्धती अस्तित्वात आली. ज्यावेळेस भेदभाव नव्हता. परंतु याच दरम्यानच्या काळात एक नवी व्यवस्था समाजात अस्तित्वात आली. ज्या व्यवस्थेनं जातीव्यवस्थेला अधिकच घट्ट केलं. ती व्यवस्था होती गुलामीपणा. गुलामीपणा व जातीगत भेदभाव कसा आला? त्याचं कारण आहे युद्ध. युद्ध झाल्यानंतर एका राजाचा पराभव होत असे. काही राजे शरण जात असत. राजा हारत असे वा शरण जात असे. त्याचबरोबर राजाची प्रजाही हारत असे वा ती शरण जात असे. तो राजा शरण गेला वा पराभवी ठरला तर त्या दोन राज्यात तह होत. त्यानंतर त्या तहात काही अटी राहात. अटी जशा प्रदेशाच्या राहात. तशाच अटी असत कामाच्या. कामासाठी कष्टप्रद माणसं हवी असायची. जी माणसं अस्वच्छतेची कामं करु,शकतील. ज्या कामाचा राज्यातील लोकांना त्रास येतो. शिवाय ते लोकं गुलाम असायचे व ते गुलाम असल्यानं विद्यमान राजा जी कामं सांगणार. ती त्यांना करावी लागायची. अशातच जातीअंतर्गत न आवडणारी कामं ही गुलामांना करावी लागली व त्या गुलामांची जात ही त्याला घट्ट चिकटविली गेली. पुढे त्या गुलामांच्या वाणीला व त्याच्या वागण्याला पर्यात नव्हता व त्यांना इतर जातीत जाताही येत नव्हते. कामं ही आधीपासूनच होती. मात्र ती कामं व त्या कामाची जात घट्ट चिकटविण्याचं काम विजयी राज्यसंस्कृतीनं केलं पुर्वी जाती नव्हत्याच. फक्त कामं होती. परंतु जेव्हा गुलामाची संस्कृती तयार झाली. तेव्हाच जात तयार झाली व जाती आधारीत भेदभावही तयार झाला. त्या गुलामांना न बोलता कोणतीही कामं करावी लागायची. ती कामं न केल्यास गुलामांवर अत्याचार होत असत. ज्यातून गुलामांना नग्न करणे, त्यांच्या शरीरावर जळत्या अग्नीचा चटका देणे, त्यांचे हातपाय पाठीमागं बांधून त्यांचा कडेलोट करणे, त्यांना सुळावर चढविणे, ज्यातून त्यांची हत्या होईल. असं होवू नये याची भीती गुलामांमध्ये निर्माण झाल्यानं त्यांनी न बोलता सर्व प्रकारची कामं करणे वा त्या कामाचा सहर्ष स्विकार करणे सुरु केले व जाती अधिकच घट्ट झाल्या. गुलामांना काही चांगलीच कामं दिली जात नव्हती. त्यांना अतिशय हीन दर्जाची कामं दिली जायची. जी कामं अस्वच्छतेची असायची. त्यातच त्यांच्याबद्दल बरेच नियम बनवले गेले. त्यांच्या राहण्याच्या जागा ठरविण्यात आल्या. त्यातही नियम होते. त्यांनी मोठं घर बांधू नये. त्यांनी वस्तीत घर बांधू नये. गुलाम हे कोणत्याही जातीचे का असेना. त्यांच्याबाबतीत कोणीच व काहीच भेदभाव करीत नव्हते. परंतु तद्नंतरच्या काळात गुलामांसोबत अभद्र व्यवहार होवू लागला. भेदभाव व हिनतेनं कळस गाठला. आता गुलामांना जेवनही नीट मिळत नसे. सतत उपाशी राहावे लागत असे. ज्यातून त्यांनी हिंस्र पशुगत कच्चे मांस खाणे सुरु केले. एकंदरीत सांगायचं झाल्यास त्यांच्या जरी जाती ह्या उच्च स्वरुपाच्या असल्या तरी ते एका विजयी राज्याचे मांडलिक असल्यानं त्यांच्या जाती बदलल्या. त्यातून गरीब श्रीमंतच नाही तर स्पृश्य अस्पृश्यता निर्माण झाली. त्यानंतर जातीअंतर्गत भेदभाव निर्माण होवून जातीआधारीत भेदभावांला खतपाणी मिळाले. शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास काल शिक्षणावर आधारीत जात होती. त्यामुळंच जातीप्रथा नव्हती. आज मात्र जातीवर आधारीत शिक्षण आहे. म्हणूनच आज जात अस्तित्वात आहे. तसं पाहिल्यास आज जात नष्ट झाली नाही व ती अस्तित्वात जरी असली तरी आजच्या काळात लोकांना जातीगत धंदे करावे लागत नाहीत. त्यांना दुसर्याही जातीचे धंदे करण्याची मुभा मिळाली असून ही एक महत्वपूर्ण गोष्ट एका महान व्यक्तीनं केलेलं आहे. ते महान व्यक्ती आहेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहून प्रत्येक माणसाला कोणतीही कामे करण्यासाठी मोकळीक मिळवून दिली. जातीवर आधारीत भेदभाव नष्ट केला. त्याचबरोबर जातीची बंधनं नष्ट केली. त्याचबरोबर नष्ट केला जातीअंतर्गत पुर्वी होत असलेला भेदभाव. तो भेदभाव की ज्यातून स्पृश्य अस्पृश्यता होती. ज्यातून अस्पृश्यांना त्रास होता. ज्यातून अस्पृश्यांना स्पृश्य वस्तीत व्यवस्थीतपणे जाता येत नव्हते. त्यांना मोठमोठी घरंही बांधता येत नव्हती. त्यांचा स्पृश्यांना विटाळ होत असे. अन् समजा एखाद्यावेळेस अस्पृश्यांचा हात स्पृश्यांना लागलाच वा साधा स्पर्श जरी झाला तरी विटाळ झाला हे गृहीत धरुन अस्पृश्यांना छळलं जात असे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं व अस्पृश्यांना स्पृश्यांच्या बरोबरीनं बसण्यासाठी जागा मिळवून दिली. त्याच संधीचा लाभ होवून आता अस्पृश्यांनाही मोठमोठी घरं बांधता येतात. त्यांना स्पृश्यांच्या घरी विवाह समारंभात सन्मानानं जाता येते. त्यांना स्पृश्यांच्या बरोबरीनं एकत्र जेवन करता येते. आता काल जे पशुगत त्यांचं जीवन होतं. ते जीवन अनुभवावं लागत नाही. त्यात बरीच सुधारणा झालेली असून आज अस्पृश्यांनाही मानवासारखं वागवलं जात आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी आजही काही ठिकाणी अस्पृश्यांवर अत्याचार केला जातो. कधी अनन्वीत अत्याचार केला जातो. कधी त्यांना हिनतेनं वागवलं जातं तर कधी त्यांना पशुसारखं वागवलं जातं. काही ठिकाणी याच अस्पृश्यांना नोकरीच्या अधिकारांपासून डावललं जातं. जरी आज संविधानाचं राज्य असले तरी आणि संविधानाच्या या राज्यात प्रत्येकाला स्वतंत्र्यपणे जीवन जगण्याचा अधिकार असला तरी. विशेष सांगायचं झाल्यास अस्पृश्यही एक जीवच आहे स्पृश्यांसारखा. त्यालाही स्पृश्यांच्या बरोबरीचं स्थान मिळावं. लोकांनी त्याला समजून घ्यावे. त्यालाही हक्कं द्यावे. त्थांच्या अधिकाराच्या जागा हिरावून घेवू नये. तरच अस्पृश्य अस्पृश्य राहणार नाही. तोही खऱ्या स्वरुपात स्वतंत्र झाला असे म्हणता येईल. दिक्षाच्या मनात निर्माण झालेला जातीचा प्रश्न. जात नष्ट करणे आहे. हा तिचा विचार. त्यासाठीच उभारलेला तिचा तो खटला. आज ती आपलं घर सांभाळत होती. जातीचाच हा खटला तिच्या पतीला सहन न झाल्यानं व समाजानंही तिच्या पतीला जातीआधारावरुन विरोध केल्यानं तिला सोडून गेला होता. मात्र तिचा पती तिला सोडून गेला असला तरी तिनं जात नष्ट करायचा विचार त्यागला नव्हता. तो विचार आज आणखी प्रगल्भ झाला होता. ज्याची कळ तिलाच नाही तर तिच्या मुलांनाही शोषावी लागत होती. जाती आधारावर तिच्या मनात विचार आला. जात अस्तित्वात आली कामावरुन. कामाची आखणी केली गेली व त्या कामानुसार कामाचं वर्गीकरण झालं. त्यातच विशिष्ट कामाची माणसं लवकर ओळखायला यावीत. म्हणून जात निर्माण झाली. ज्यात सुरुवातीला जातीजातीतील भेदभाव नव्हता. ज्यात विटाळही नव्हता. परंतु कालांतरानं त्यात विटाळ व भेदभाव शिरला. ज्यातून सामान्य माणसांचे जीवन जगणे असह्य झाले होते. हे सर्व स्वार्थापायी झालं होतं. विशिष्ट वर्गानं आपली अक्कलहुशारी वापरुन आपल्या बिरादरीला सुख भोगता यावं म्हणून निर्माण झालेल्या जातीचा वापर कलुषीतता निर्माण करण्यासाठी केला. आजही करीत आहे. म्हणूनच जात नष्ट करणे आहे. जात स्वार्थासाठी निर्माण केलेली गोष्ट. काल जातीचं महत्व होतं. लोकांना जात व जातीची माणसं ओळखू यावी म्हणून. ज्या जातीनं पुढं जावून व्यक्तीत विटाळ व भेदभाव निर्माण केला. ज्यातून विशिष्ट जातीवर अत्याचार झाले. जे असह्य अशाच स्वरुपाचे होते. जातीवर आधारीत विटाळ कालपर्यंत चालला. आजही आहे. म्हणूनच जात नष्ट करणे आहे. जात...... जी जात नाही, ती जात. जातीवरुन विटाळ अस्तित्वात आला. विटाळ हा स्वच्छतेवरुन अस्तित्वात आला. काही लोकं म्हणतात की पुर्वी जातीवरुन विटाळ नव्हता तर तो विटाळ म्हणजे काही काळाकरिता लोकांना दिलेली शिक्षा होती. जातीवरुन विटाळ जर असता तर कुंभार, सुतार वा इतर तत्सम कामे करणाऱ्यां लोकांच्या बाबतीतही विटाळ असता. परंतु तो नाही. याचाच अर्थ जातीवरुन विटाळ नव्हताच. विटाळ होता कामावरुन. लोकांना वाटत होतं की ती कामं अर्थात घाणेरडी कामं कोणीही करु नये. ती सोडावीत. म्हणून विटाळ नावाची शिक्षा. ती शिक्षा होती लोकांनी सुधरावं यासाठी. त्यांनी व्यवस्थीत राहावं. घाणेरडं राहू नये यासाठी दिलेली. त्यांचं म्हणणं होतं की लोकांनी घाणेरडं काम करु नये. स्वच्छ अंघोळ करावी व नीटनेटकं राहावं. कारण असं अस्वच्छ राहण्यातून लोकांना आजार शिवतो. साथीचे रोग पसरतात. कारण पुर्वी गावात साथीच्या साथी यायच्या. ज्या साथीत कित्येक लोकं मरण पावत असत. ती आजाराची साथ अस्वच्छतेपासून पसरत असल्यानं ती अस्वच्छतेची कामं करणाऱ्यांचा तत्सम लोकं विटाळ मानत असत. म्हणूनच जे लोकं चांगले राहात असत. स्वच्छता पाळत असत. त्यांच्याबाबतीत विटाळ नव्हताच. यासाठीच मनुस्मृती लिहिल्या गेली. विटाळ...... अस्वच्छतेवरुन व कामाच्या स्वरुपावरुन आलेला. लोकांचं आजचं म्हणणं की त्या वेळच्या लोकांचं म्हणणं की लोकांची अस्वच्छतेची कामं करु नये. म्हणूनच विटाळ. परंतु हे जरी खरं असलं तरी ती अस्वच्छतेची कामं करणं एखाद्या तरी घटकाला आवश्यक होतं. जर ती कामं त्या विशिष्ट घटकानं केली नसती तर कदाचीत अस्वच्छताच अस्वच्छता पसरली असती. शिवाय तेवढेच आजारही आणि आजाराच्या साथीही. उदाहरण द्यायचं झाल्यास एखाद्या गाईचं देवू. एखादी गाय जर एखाद्या व्यक्तीच्या घरी मरण पावली असती आणि तिला ओढत नेवून फेकणारी जात जगात नसती तर कदाचीत त्या गाईला तिथंच सडत राहावं लागलं असतं. तिच्या पार्थिव शरीराची दुर्गंधी परीसरात सुटली असती. शिवाय त्यातून आजार पसरलाच असता. त्यामुळंच ती अस्वच्छतेची जात तेवढीच महत्वाची होती. जेवढी स्वच्छतेची कामं करणारी जात महत्वाची होती. त्यामुळंच विटाळ मानायलाच नको होता. व्यतिरीक्त मनुस्मृती लिहून जगाला मनुस्मृतीतील जाचक नियमांच्या आधारे जगायला लावले. जे जगणे अस्वच्छतेची कामं करणाऱ्यांसाठी व संपुर्ण स्रीवर्गासाठी जाचक स्वरुपाचे होते. मनुस्मृतीत स्वच्छता बाळगणाऱ्या विशिष्ट वर्गासाठी वेगळे व अस्वच्छ राहणाऱ्या विशिष्ट वर्गासाठी वेगळे नियम होते. शिक्षेच्या बाबतीतही भेदभाव केलेला होता. शिवाय अधिकार आणि स्वातंत्र्यही गोठवले होते. काही लोकांनी विटाळाला अतिशय महत्वपुर्ण घटक मानून त्याचा साथीच्या आजाराशी सःबंध जोडला. त्याला अधिक प्राधान्य दिलं. परंतु हे जरी बरोबर असलं तरी विटाळ हा अतिशय महत्वाचा घटक नव्हताच आणि तो मानणे गरजेचे नव्हतेच. शिवाय आजाराशी विटाळाचा संबंध लावून लोकांनी एका विशिष्ट जातींना अस्पृश्य मानलं. तसंच रजस्व नावाच्या नैसर्गिक प्रवृत्तीलाही विटाळ मानून स्रियांच्याही स्वतंत्र्यपणे जगण्यावर मर्यादा आणल्या. त्यांचे समाजातील अधिकार नाकारले. त्यातच अस्पृश्यांचा सुर्योदयानंतरच्या काही तासाचा गावातील प्रवेश नाकारला. एकीकडे त्यांचा स्पर्श म्हणजेच आजाराचा शिरकाव मानलं. तर दुसरीकडे त्यांनी तयार केलेल्या वस्तू त्यांना चालल्या. याचाच अभ्यास बाबासाहेबांनी केला होता. त्यानंतर बाबासाहेबांनीच सांगीतलं की पिढीतील धंदे सोडा. ते धंदेच विटाळ टिकवतात. आपल्याला माणसाप्रमाणे जगू देत नाहीत. आपल्याला त्या धंद्यामुळेच अतुच्छतेचं जगणं सहन करावं लागतं. त्यांनी पिढीजात धंदे सोडायला लावले. जातीगत विटाळ मिटविण्यासाठी. परंतु जात मिटवली नाही. जी जात मिटवायला हवी होती. ज्या कामातून जात निर्माण झाली होती व जातीअंतर्गत विटाळही निर्माण झाला होता. जो विटाळ मनुस्मृती आणि भाला संग्राममधील काही जाचक नियमांनी निर्माण केला होता. जाती, विटाळ व भेदभावाच्या पैलूतूनच त्यांनी मनुस्मृती जाळली. कारण त्यात लिहिलेल्या काही अनैतिक गोष्टी. ज्या मनाला रुचत आणि पटत नव्हत्या. शिवाय त्या प्रकरणाचा खटला न्यायालयात गेला. ज्यात विटाळ, भेदभाव होता. प्रथम तो खटला खालच्या न्यायालयात चालला. त्यानंतर तिथं बाबासाहेबांना विजय प्राप्त झाला व तो विजय इतर लोकांना पटला नसल्यानं तो खटला उच्च न्यायालयातही चालला. ज्यात विटाळ वाईटच असा निकाल आला होता. तरीही आज काही लोकं विटाळाच्या नियमांचा उदोउदो करुन त्या संबंधित विटाळाचा संबंध साथीच्या आजाराशी लावतात. त्या अस्पृश्य शोषत असलेल्या व स्रियांचे हक्कं नाकारणाऱ्या गोष्टी काही लोकं चांगल्या होत्या असे मानतात. म्हणतात की आजपर्यंत जो देश मनुस्मृतीच्या आधारावर चालला. चांगला चालला. ज्यानं राष्ट्र टिकवलं. त्यांचं म्हणणं असं की मनुस्मृती चांगली. मनुस्मृती, विटाळ, भेदभाव स्रियांचे अधिकार नाकारणे. या गोष्टी चांगल्या होत्या की वाईट. हे म्हणणं नाही. प्रत्येकांचं मत याबाबतीत वेगवेगळं असू शकते. कारण सर्वच व्यक्तींना सर्वच गोष्टी चांगल्या वाटतीलच असं नाही. एखाद्याला एखादी गोष्ट जास्त आवडते तर तीच गोष्ट दुसऱ्याला अजिबात आवडत नाही. तेच झालं मनुस्मृती म, विटाळ, भेदभाव व इतर गोष्टींबद्दलबद्दल. आज जेही लोकं त्या सर्व गोष्टीला चांगले म्हणत असतील. त्यांना त्या गोष्टी आवडत असेलच यात शंका नाही. त्याचं कारण म्हणजे त्यांना त्यातील जाचक नियमांची झळ पोहोचलेली नसेल. त्यामुळं त्यांनाच त्यातील नियमांबद्दल काही घेणं देणं नव्हतंच. परंतु ज्यांना त्यातील नियमांची झळ पोहोचली. त्यांना मनुस्मृती, विटाळ, भेदभाव, स्रियांचे अधिकार नाकारणे या गोष्टी तरी कशा आवडतील? समजा एखाद्याला कारल्याची भाजी आवडत नसेल तर तो व्यक्ती कारल्याच्या भाजीला कडूच म्हणेल व ज्या व्यक्तीला कारल्याची भाजी आवडत असेल, तो व्यक्ती आवडीनं कारल्याची भाजी कडू होवूनही खाईलच खाईल. तेच झालं बाबासाहेबांबद्दल. त्यांनी या सर्व गोष्टींचा अभ्यास केला. त्यांना त्यातील नियम अजिबात पटले नाहीत. म्हणूनच त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं आणि चवदार तळ्याचा सत्याग्रहही. ही बाब नाकारता येत नाही. तसाच तो खटला न्यायालयात गेला व न्यायालयानंही त्यातील नियम सामान्य लोकांच्या जीवन जगण्यासाठी वाईट आहेत याची पडताळणी करुन वा गृहीत धरुन जी मनुस्मृती जाळण्याची कृती वा इतर कृती चवदार तळ्याच्या आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर केल्या होत्या. त्या कृतींना योग्य ठरवत बाबासाहेबांच्या कृतींचं समर्थन केलं. त्यानंतर निकाल दिला की आजपासून अशा सर्वच कृत्यांवर कायमस्वरुपी बंदी लावण्यात येत आहे. त्यातूनच विटाळ, स्रियांचे अधिकार नाकारणे आणि भेदभावावर बंदी घालण्यात आली. विटाळ व भेदभावाची पाश्वभुमी. समाजाला बाबासाहेब जागृत करीत होते. सांगत होते की पिढीजात धंदे सोडा. ते अस्वच्छतेचे धंदे आहेत व त्यापासूनच भेदभाव, विटाळाचे किडे वळवळतात. वाढतात. विटाळ ही कीडच. शेवटी काही लोकांना वाटले, विटाळ नष्ट व्हावा. त्यांनी पिढीजात धंदे सोडले. ज्यातून सामाजिक परीवर्तन झालं व विटाळ मिटला व त्याचा परिणाम हा झाला की तद्नंतर समाजातील काही लोकांनी पिढीजात धंदे सोडले नाहीत. त्यांनाही समाजात सन्मानाचं स्थान मिळायला लागलं. आज विटाळ नाही. विटाळ कायमचा मिटला आहे असंही म्हणता येत नाही. तरीही समाजात काल ज्या घटकाला हीन समजलं जात होतं. त्या घटकाला आज समाजात मानाचं तसंच सन्मानाचं स्थान आहे. काल धंद्यावरुन नीच समजल्या अस्पृश्यांनाही आज उच्च जातीचे लोकं आपल्या बरोबरीनं जगण्याची परवानगी देतात. त्यांना हीन लेखत नाहीत. विटाळाच्या कालचक्रात काल मोठं घर बांधण्याची इच्छा ठेवणाऱ्यांना काल मोठं घर बांधता येत नव्हतं. आज तेही मोठं घर बांधू शकतात. एकमेकांच्या विवाह समारंभात भेदभाव न बाळगता सहभागी होत असतात. काल उच्च शिक्षण शिकता येत नव्हतं. आज उच्च शिक्षण शिकता येतं. काल एका अस्पृश्यानं तपश्चर्या केली म्हणून त्याच्या कानात शिसं ओतलं. आज तशी गोष्ट घडत नाही व तसा अन्याय झाल्यास आज न्यायालयात दाद मागण्याची तरतूद उपलब्ध आहे. कोणीच कोणाला हीन लेखू शकत नाही. अत्याचार करु शकत नाही. कारण आज कायद्याचं राज्य आहे व कायद्याचं उल्लंघन आज तरी करता येणे शक्य नाही. हेही शक्य झालं बाबासाहेबांमुळं. तरीही काही ठिकाणी विटाळ वळवळतोच. भेदभावही वळवळतोच. काही ठिकाणी स्रियांचे अधिकारही नाकारले जातातच. हे सगळं घडत असतं जातीमुळे. काही ठिकाणी आजही विशिष्ट जातीला हीन समजलं जातं. विटाळ मानला जातो. जात सहजासहजी सांगता येत नाही. ती जाणीवपूर्वक जाणूनबुजून लपवून आपली दुसरीच उच्चभ्रू जात सांगीतली जाते. याला काय म्हणता येईल. भेदभाव आणि विटाळच ना. आज बाबासाहेब आंबेडकर देवच आहेत की ज्यांनी समाज सुधरवला. समाजातील विटाळ थोडाफार बदलवला. लोकांना खुल्ल्या मनानं जगात प्रवास करता येत असतं. आपली जात लपवून का असेना, वावरता येत असतं. अन् तरीही यदाकदाचित जातीवर अन्याय झाल्यास न्यायालयात दादही मागता येत असतं. याचाच अर्थ असा की बाबासाहेबांनीच कायद्याचं राज्य आणलं. लोकांना सन्मानानं जगण्याचाही मार्ग उपलब्ध करुन दिला. विटाळ थोडासा का होईना, परंतु कायमचा संपला. हे जरी बरोबर असलं तरी आजही काही ठिकाणी भेदभाव आहेच. विटाळाच्या कालचक्रात आजही माणसं मारलीच जात आहेत. असं का होतं? तर त्याचं एकमेव कारण आहे जात. कारण जातीनंच भेदभाव निर्माण केला अन् जातीनंच विटाळदेखील. ती जात जेव्हा बंद होईल, तेव्हाच विटाळालाही पायबंद बसेल. त्यातल्यात्यात जातीप्रथा देखील नष्ट होईल यात शंका नाही. जर जात नष्ट होत नसेल तर, विटाळ, भेदभाव वा स्रियांचे अधिकार नाकारणे ह्या गोष्टी कधीच संपणार नाहीत. काल जरी मनुस्मृती जाळली असेल, तरी आज ती जाळून काहीच उपयोग नाही. काल चवदार तळ्याचं आंदोलन केलं गेलं व खटला लढल्या गेला असला तरी आज त्याचा काही उपयोग नाही. अन् कालच्या निकालानं विटाळ व भेदभाव थोडासा का होईना, संपला असला तरी आज त्याचा काहीच फायदा नाही. हे म्हणणे संयुक्तिक ठरते. डॉ. बाबासाहेब हे हिंदू होते. आरक्षण हे त्यांनी हिंदू धर्मात राहूनच लोकांना मिळवून दिलं. जेव्हा संविधान जगजाहीर झालं. ते कशासाठी तर हा सर्व उपेक्षित राहिलेला समाज सुधरावा. त्या समाजानंही आरक्षणाचा वापर करुन आपला सर्वप्रकारचा विकास करावा. परंतु तेवढी सोय करुनही जेव्हा त्यांनी पाहिलं की हा अस्पृश्य समाज जागच्या जाग्यावर आहे. त्यांच्यात एवढासाही बदल झालेला नाही. तेव्हा तसाच विचार करुन धर्म बदलवला तर कदाचीत आपला समाज सुधरु शकतो असं बाबासाहेबांना वाटलं व त्यांनी धर्म बदलवला. ते बौद्ध झाले. परंतु ते जरी बौद्ध झाले असले आणि आपल्या समाजालाही बौद्ध बनवलं असलं तरी समाज सुधरला नाही. त्यांनी आरक्षणाचा लाभ घेतला नाही. म्हणूनच आरक्षण वाढवावं लागलं. आज आरक्षण आहे. परंतु समाज सुधरला नाही. समाजातील काही लोकांनीच फक्त आरक्षणाचा लाभ घेतला. काहींनी लाभ घेतलाच नाही. म्हणूनच आरक्षण आजही सुरु आहे व त्यातूनच आज इतरही जातीचे वाद सुरु झाले आहेत. त्यामुळंच विशेष सांगायचं म्हणजे हे सर्व जात आहे, म्हणूनच सुरु आहे. जात जर नसती तर आरक्षण, भेदभाव, विटाळ नसताच, ना कोणावर कोणाचा अत्याचार झाला असता, ना कोणीच कोणाला उच व कोणीच कोणाला नीच समजले नसते. सर्व लोकं समान असते, समानतेनं जगले असते. म्हणूनच जात नष्ट करणे आहे व सर्व लोकांना समाजात समानतेने वागणे शिकवणे आहे यात शंका नाही. ******************************************** पोलीस...... पोलिसांवर कधीकधी शंकाच घेतली जाते. कारण त्यांचं वागणं. त्यांचं वागणं कधीकधी एवढं अजब असतं की त्यांच्यावर सहजच शंका निर्माण होत असते यात शंकाच नाही. मग एखादी महिला पोलिसांवर ताशेरे ओढत त्यांचं वागणं अजबच बाई असे म्हणायला कचरत नाही. म्हटलं जातं की अकस्मात अपराधाची स्थिती उत्पन्न होत असेल तर एकशे बारा क्रमांकावर फोन करावा. मुलांच्या बाबतीत काही समस्या असल्यास एक हजार अठ्ठ्यानव या क्रमांकावर फोन करुन लावावा. पोलीस येतात व अपराध टळतो. त्यातच पोलीस कन्ट्रोल रुमचाही क्रमांक लावावा. परंतु कधीकधी असा क्रमांक लावूनही उपयोग नसतो. जेव्हा तो कामात येत नाही. कधी पुरावा म्हणून तर कधी मदत म्हणून. तेव्हाच शंका उत्पन्न होते. पोलीस कन्ट्रोल रुमचे वा अकस्मात अपराध टाळायचे क्रमांक म्हणून एकशे बारा व एक हजार अठ्ठ्यानव हे क्रमांक प्रसिद्ध आहेत. पुर्वी शंभर क्रमांक होता. जो कधी लागतच नव्हता. आता एकशे बारा क्रमांक आहे. जो लागतो. परंतु तो क्रमांक लागल्यानंतर काय होतं. तो क्रमांक लागल्यानंतर पोलीस येतात. पण काहीच करीत नाहीत. उलट अपराध करणाऱ्या व्यक्तींनाच शह देत त्यांची बाजू कधीकधी उचलून धरतात. असं बरेचवेळा घडतं. ते मदतीला येणारे पोलीस शहानिशा करतात व सांगतात की आपण वाद मिटवावा आणि नसेल मिटत तर पोलीसस्टेशनला यावं व आपली तक्रार नोंदवावी. त्यानंतर दोन्ही बाजूकडील मंडळी मिळेल त्या साधनानं पोलीस स्टेशन गाठतात व आपली तक्रार नोंदवतात. यामध्ये महत्वपुर्ण बाब ही की संबंधीत जीही प्रकरणं उद्भवतात. त्या प्रकरणात एकशे बारावर फोन लावणारा व्यक्ती हा अन्यायशोषीत असतो. म्हणूनच तो एकशे बारावर फोन लावत असतो. त्यामुळंच पोलीस येतात व अपराध टळतो. हा एक पुरावाच असतो. अन्यायशोषीत व्यक्तींसाठी. त्यात अन्यायशोषीत व्यक्ती आणि अन्याय करणाऱ्या व्यक्तीला म्हणलं जातं की त्यानं पोलीस ठाण्यात यावं व तक्रार नोंदवावी. परंतु ज्यावेळेस अन्यायशोषीत व्यक्ती पोलीस स्टेशनला पोहोचतो. त्यावेळेस त्याची तक्रारच पोलीस स्टेशनला घेतली जात नाही. उत्तर विचारल्यावर चक्कं सांगीतलं जातं की तो उशिरा पोलीस स्टेशनला पोहोचला. तो येण्याच्या आधीच तक्रार नोंदवली गेली आहे. त्यानंतर तक्रार कोणं नोंदवली याची शहानिशा करण्यात येते. तेव्हा आढळून येतं की ती तक्रार ज्यानं अन्याय केला. त्याच व्यक्तीनं त्याचे आधी येवून तक्रार नोंदवली. त्यामुळंच ज्यानं एकशे बारा क्रमांकावर तक्रार नोंदवली. ती तक्रार घेतली जावू शकत नाही व त्या क्रमांकावर फोन लावण्याचाही उपयोग होत नाही. त्यानंतर असे का घडले याचा विचार येतो. विचार येतो व मनातल्या मनात नकाराचे चक्र सुरु होते व पोलिसांबद्दलची आत्मीयता नष्ट होवून मनात पोलिसांबद्दल असुयाही निर्माण होत असते. या प्रकरणात आणखी एक महत्वपूर्ण मुद्दा हा की संबंधीत व्यक्ती, ज्या व्यक्तीवर अन्याय झाला तो अन्यायशोषीत असून त्यानं जरी एकशे बारा क्रमांकावर फोन केला आणि पोलीस येवून त्यांनी जरी सांगीतलं की त्यानं पोलीस स्टेशनला येवून तक्रार नोंदवावी. तरीही साधनांच्या अपुरेपणामुळं तो अपराध करणाऱ्या व्यक्तीच्या मागून जर पोलीस ठाणे गाठत नसेल वा त्याची तक्रारच नोंदवली जात नसेल तर त्या एकशे बारा क्रमांकाचा वा एक हजार अठ्ठ्यानव क्रमांकाचा उपयोग काय? अशा घटना वा प्रसंग काही लोकांच्या जीवनात वारंवार घडत असतात. हे मला लहानपणापासून दिसलं. लहानपणातही गावात कुणावर कुणी अत्याचार केल्यास गावातील दोन्ही घटक तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनला जात. ज्यात अन्याय करणारा घटक आपल्यावर खटला दाखल होवू नये म्हणून आधीच पोहोचलेला असायचा. त्यातच त्याचा अवतार पाहण्यासारखा असायचा. ते स्वतः कपडे फाडलेल्या अवतारात असायचे. अंगावर ओरबाडलेल्या जखमा असायच्या. त्यानंतर दोन्ही पार्टीचं मेडीकल चेकअप व्हायचं व कळायचं की त्या जखमा त्यांनी स्वतः स्वतःच्याच अंगावर केलेल्या असत. फिंगरप्रिंट प्रणालीच्या तावडीतून ते सुटायचं नाही. लपायचंही नाही व अगदी ते सहज दिसायचं. कालचे पोलीस हे अतिशय इमानदारीनं फिंगरप्रिंट प्रणाली राबवायचे. ज्यात अन्याय कोणी कोणावर केला हे निदर्शनास यायचं. आजही अशीच फिंगर प्रिंट प्रणाली अस्तित्वात आहे. परंतु आज काळ बदलला आहे व लोकं फारच हुशारही झालेले आहेत. लोकं पोलिसांनाही मॅनेज करीत असावेत असे चित्र दिसत आहे. आज फिंगरप्रिंट प्रणाली ही आरोपीच्या मतानुसार काम करते की काय? याची शंका उत्पन्न होते. कारण एकशे बारा क्रमांकावर जरी फोन लावून अपराध टाळण्यासाठी पोलिसांना बोलवले तर पोलीस येतात हे निश्चीत. परंतु कधीकधी पोलीस येवून त्या परिस्थितीत केवळ ते तक्रारकर्त्यांनाच दाटतात. कारण असतं आरोपीचं वजन. आरोपी हा आरोपीच असतो. त्याला जात धर्म वा ओळख नसते. ही भावना गृहीत न धरता पोलीस प्रशासन संबंधीत गुन्हा नोंदवतांना आरोपीची ओळख, जात व धर्म पाहतात की जे पाहायला नको. त्यामुळंच काही लोकं म्हणतात की तशाच स्वरुपाचा आपल्यावर अत्याचार होत असतांना तोच क्रमांक लावून आपण आपल्यावर झालेल्या अत्याचाराचं निवारण करु शकत नसेल वा तो क्रमांक तक्रार करण्यासाठी ग्राह्य धरण्यात येत नसेल किंवा त्या क्रमांकावर फोन करण्याचा उपयोग होत नसेल तर तो क्रमांक कोणत्या फायद्याचा. तो क्रमांकच बंद केलेला बरा आणि आरोपीला मोकाटच सोडून दिलेले बरे की त्याला दुसरे तशाच स्वरुपाचे इतर बरेच गुन्हे करता येतील. असं आजही वाटतं. यामुळेच आजच्या काळात बरेचसे गुन्हे वाढत चाललेले आहेत. याबाबतीत एक घटना सांगतो. एक प्रकरण अमरावतीतील मेळघाटातील रेट्याखेड्या गावात घडली. हे गाव चिखलदऱ्यापासून ऐंशी किमीच्या अंतरावर आहे. त्या गावातील एका वृद्ध महिलेवर अलिकडील काळात जादूटोणा अस्तित्वात नसतांना तिच्यावर जादूटोणा केल्याचा आक्षेप घेवून तिची धिंड काढली. तिला आगीचे चटके दिले. तिला मुत्र पाजले व तिच्या तोंडाला काळे फासले. तसंच हे कृत्य खुद्द ज्या व्यक्तीनं गावातील अन्याय दूर करावा म्हणून त्याची नियुक्ती असते. अशा पोलीस पाटलानंच केलं. त्यातच त्या पोलीस पाटलाचाच रुतबा जवळच्या पोलीस स्टेशनला असल्यानं त्या महिलेवर अन्याय होवूनही पोलिसांनी सदर तक्रार दाबून ठेवली. पुढं कारवाई झाली. परंतु तेव्हापर्यंत ती तक्रार दबूनच राहिली ना. या प्रकरणात अन्याय ज्यावर झाला. त्या व्यक्तीची मुलं जिल्हाधिकाऱ्याकडे तक्रार घेवून गेले. तेव्हाच तक्रारीचं निवारण झालं व आरोपींना अटक झाली. जर असं झालं नसतं तर आरोपी जाळ्यात अडकले तरी असते काय? हा विचार करायला लावणारा प्रश्न आहे. आज बराचसा समुदाय सुशिक्षीत आहे म्हणून ठीक आहे. दाद तरी मागता येते. परंतु जर समाज सुशिक्षीत नसता तर चित्र काहीसे वेगळेच असते. आजही काही ठिकाणी असंच घडतं. विशेष सांगायचं झाल्यास आरोपी हा आरोपी असतो. त्याची जात, धर्म वा ओळखही आरोपीच असते. असे असतांना त्याला जात धर्म वा त्याची वेगळी अशी ओळख नसतेच. असे असतांनाही पोलीस ते प्रकरण जर आरोपीच्या जात, धर्म आणि विशेष अशा ओळखीनं हाताळत असतील तर जगातील कोणत्याच व्यक्तीला न्याय मिळणार नाही. अशाच धिंडी निघतील. कुणाला मुत्र पाजले जाईल तर कुणाचे गळेही कापले जातील. आज सगळीकडे असंच घडत आहे. वातावरण तंग आहे व आरोपी सर्रास सुटत आहेत. त्यांना अभय मिळत आहेत. महिलांवरही अत्याचार होत आहेत. ज्याचं काल याचं प्रमाण कमी होतं. आज जास्त आहे. आज बऱ्याच ठिकाणी गुन्हे घडू नये म्हणून पोलीस प्रशासनानं हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला. ज्यात एकशे बारा व एक हजार अठ्ठ्यानव क्रमांकाचा समावेश होतो. लोकं फोन लावतात. परंतु प्रत्यक्षदर्शी पोलीस स्टेशन गाठण्यावर तक्रार करण्याचं स्वरुप अवलंबून असतं. त्यातच आज तक्रार करणारी व्यक्ती जरी एकशे बारावर फोन करीत असेल तरी तीच तक्रार ग्राह्यं धरली जात नसल्यानं बऱ्याच लोकांचा पोलिसांवरील विश्वास उडत चाललेला आहे. ज्यातून गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होत आहे व गुन्हे वाढत असून गुन्हेगारही वाढत आहेत. यात शंका नाही. महत्वाचं सांगायचं झाल्यास अपराध टाळण्यासाठी वा पोलिसांची मदत मिळविण्यासाठी जर एकशे बारा क्रमांक आहे तर तोच क्रमांक तक्रार दाखल करण्यासाठीही पुरावा म्हणून वापरावा. शिवाय जो कोणी तक्रार दाखल करीत असेल तर त्याला तक्रार दाखल करतांना विचारावे की त्यानं तक्रार दाखल करण्यापुर्वी एकशे बारा क्रमांकावर फोन लावला होता काय? नसेल लावला तर त्याची तक्रार दाखलच करु नये. आधी एकशे बारावर फोन लावणाऱ्यांची तक्रार घ्यावी. जेणेकरून अन्याय कुणी कुणावर करणार नाही. गुन्हे कोणीही करणार नाही. गुन्ह्यांची संख्या कमी होईल. गुन्हेगारही कमी होतील. आरोपी मोकाट सुटणार नाही. अन् तसं होत नसेल तर एकशे बारा क्रमांक रद्द करावा. गुन्हे वाढतात व गुन्हेगार वाढतात. कारण त्यांना माहीत असतं की एकशे बारा क्रमांकावर फोन लावल्यानं काही उपयोग नाही. ते गुन्हे करतात जाणूनबुजून व ताबडतोब पोलीस स्टेशनला जावून तक्रार नोंदवतात. शिवाय उलटे चोर आपणच शेर होत समाजात मिरवतात. काही लोकं यातून पैसेही कमवतात. गुन्हे मागे घेत असतांना. चांगले व्यक्ती मात्र या भानगडीत पडत नाहीत. ते फक्त एकशे बारावर फोन करु शकतात. तक्रारीच्या भानगडीत पडत नाहीत. मग फसगत होते व चांगला व्यक्तीच पोलिसांच्या विनाकारण जाळ्यात अडकतो यात शंका नाही. तेव्हा एकशे बारा क्रमांक हाही एक तक्रारीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावा हेही तेवढंच खरं. जर असं घडत नसेल तर व्यक्तीच्या मनात शंका निर्माण होवून तो आजच्या पोलीसांचं वागणं अजबच बाई असे म्हणून घ्यायला विसरत नाहीत. दिक्षाच्या मुलांना जातीअंतर्गत होत असलेला त्रास. ती जिल्हाधिकारी असली तरी जाती आधारावर तिनं न्यायालयात दाखल केलेली तक्रार. एकदा ती शाळेत गेली व तिनं मुलांची जाती आधारावरील तक्रार तिला का येत आहे अशी साधी विचारणा त्या शाळेतील शिक्षकांना केली. परंतु शिक्षकांनी तिचा अपमान केला. ज्यात अपमानादाखल तिनं पोलिसांना एकशेबारा क्रमांकावर फोन लावला. त्यावेळेस तिनं ती जिल्हाधिकारी असल्याचं सांगीतलं नाही. तिनं आपलं पद आपल्या जातीअंतर्गत निर्माण केलेल्या लढ्यात बाजूला ठेवलं. दिक्षानं जातीआधारावर जात नष्ट व्हावी म्हणून जी जनहित याचिका न्यायालयात दाखल केली होती. ती याचिका ती खालच्या कोर्टात हारली होती व आता तीच याचिका तिनं डगमगून न जाता उच्च न्यायालयात दाखल केली होती. तिनं केलेली तक्रार. ना या काळात पोलीस प्रशासनही तिच्या बाजूनं बोलू शकत होतं, ना कनिष्ठ न्यायालयातील कोणी बोलत होतं. जनतेच्या उपयोगाच्या दृष्टीनं ती तक्रार होती. परंतु जनताही त्यावर बोलू शकत नव्हती. अशातच तिची ओळख झाली एका तरुणाशी. जो एक वर्तमानपत्र चालवत होता. त्याचं नाव गोपाल होतं. गोपालची झालेली दिक्षाची मुलाखत. त्याला दिक्षाचा लढा कळला होता. त्याला त्या लढ्याची उपयुक्तताही लक्षात आली होती. तो लढा रास्त होता. तसं त्यानं तिची प्रकरणं आपल्या वर्तमानपत्रात छापण्याचं ठरवलं. वाटलं की जर अशी प्रकरणं छापली गेली तर एक दिवस जनमत जागृत होईल व जात नष्ट होणार. तसं पाहिल्यास गतकाळात जेव्हा तिनं न्यायालयात तक्रार दाखल केली होती. तेव्हा बराच गाजावाजा झाला होता. त्यावेळेस सरकारनं वृत्तपत्राच्या संपादकांना धमकी दिली होती की त्यांनी जर त्या बातम्या वर्तमानपत्रात छापल्या तर त्यांच्या वर्तमानपत्राच्या मान्यता रद्द केल्या जातील. त्यानंतर बिचाऱ्यांनी त्या बातम्याच छापणं बंद केलं होतं. शिवाय गतकाळात जी जी वर्तमानपत्र तिच्या बातम्या छापत होती. त्या वर्तमानपत्राचा खपही कमी झाला होता. तिला जातीआधारावर खटला दाखल केल्यानं वेदनाच होत राहिल्या. तिच्या मनात सतत विचारत येत राहिले. पदोपदी तिचा अपमानच होत राहिला. परंतु तिनंही हार मानली नाही. ती लढत होती एखाद्या वाघिणीसारखी. कमरेला पदर खोचून. पतीनं जातीआधारावर जातीची तक्रार का टाकली अशी विचारणा करुन घेतात ती मागे घेशिल. तरच मी ठेवणार असा धाक दिला तरी ती घाबरली नाही. कारण तिला माहीत होतं की जात ही माणसांच्या माणूसकीला गुलाम करणारी आहे. आज आपण स्वतंत्र्य आहो व स्वातंत्र्यच अबाधित ठेवण्यासाठीच प्रजासत्ताक आहे. आपल्यालाही कधी ना कधी न्याय मिळेलच. *************************************** स्वातंत्र्य घेता का हो स्वातंत्र्य. असं जर कोणी आपल्याला दिसलं तर आपण म्हणू की संबंधीत व्यक्तीला वेड तर लागलं नाही ना. तसं पाहिल्यास आज हेच म्हणण्याची वेळ आली आहे. स्वातंत्र्य म्हणजे मुक्त जगणं. मनात येईल तसं जगणं. एवढा सोपा अर्थ आहे. आज हेच स्वातंत्र्य हिरावत चाललेले दिसत आहे. कारण आज माणसाच्या मनात चांगले विचार उरलेलेच नाही. सर्व कुविचार भरलेले आहेत. तरीही कालानुकाल काही थोर महात्म्ये जन्म घेतात व माणसाच्या मनातील कुविचारांचं शुद्धीकरण करतात. जसा रक्तात आलेला भेसळपणा दूर केला जातो. अर्थात कोलेस्टेरॉल वाढले असेल वा रक्त जाडसर झाले असेल तर ते काही फळं खावून वा जिनस कावून दूर केले जाते. इथं रक्त फळाच्या माध्यमातून शुद्ध होतं तर तिथं मन किर्तन, प्रवचन व सुविचाराने शुद्ध होतं. मनालाच शुद्ध करण्यासाठी स्वातंत्र्य असतं व स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीच प्रजासत्ताक असतं. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. याबाबत संत रोहिदास म्हणतात, 'मन चंगा तो कटौती मे गंगा' त्यानुसारच समर्थ रामदासांनी मनाचे महत्व लक्षात घेऊन म्हटले की मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. एवढे मनाचे महत्व आहे. मन जर चांगले असेल तर आपल्याला कोणताच आजार छळत नाही. सर्व प्रकारच्या व्याधींपासून आपण अलिप्त राहू शकतो. आज भारतीय प्रजासत्ताक. भारतात प्रजासत्ताक स्वरुपाचं राज्य सव्वीस जानेवारी एकोणविसशे पन्नास पासून अस्तित्वात आलं. त्यापुर्वी भारतात प्रजासत्ताक नव्हतं. प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांकडून लोकांसाठी चालविलेले राज्य. असे राज्य हे सगळे देशच चालवत होते. हे सगळं बरोबर होतं. मग भारतात अशी कोणती गरज पडली की भारताला लिखीत राज्यघटना तयार करावी लागली व ती राज्यघटना लिहून ती सव्वीस जानेवारी एकोणविसशे पन्नासला भारतीय जनतेला बहाल करावी लागली? हा एक विचार करण्यालायकच प्रश्न. तो कोणाच्याही मनात अगदी सहजच उद्भवेल. भारत प्रजासत्ताक होण्यापुर्वी तो आधीपासूनच अंधश्रद्धेच्या बुरख्यात जगत होता. शिवाय या भारतातील बरीचशी मंडळी ही मेंढरागत वागत होती. ती हुशार नव्हती व ती एका अतिशय हुशार माणसांच्या बोलण्यावर वा दिशा दाखविण्यावर विश्वास ठेवणारी होती. जी माणसं ढोंगी होती. बरीचशी मंडळी याच ढोंगी माणसांच्या प्रभावात लिप्त होती. ती देवादिकात व अंधश्रद्धेत रमत होती. त्यातच अंगात येणे याही गोष्टी वारंवार घडत. मांत्रीकांचे प्रस्थ माजले होते. हे मांत्रीक एखादा आजार आल्यास त्यावर अमूक भूत लागला वा एखादा व्यक्ती मरण पावल्यास अमूकानं मुठ मारली अर्थात करणी केली. अशा आशयात लोकं गुरफटले जात होते. हा मांत्रीक गुप्त धन मिळवून देतो असे सांगून परीसरातील जीवंत मुलांचा नरबळी देत असे व ते जाहीरही होवू देत नसे. मांत्रीक हा दगडाच्या देवांना पुढे करुन सामान्य माणसांना लुटत असे. एवढे लुटत असत की सामान्य माणसांचं जगणं अति अवघड होवून जाई. शिवाय केशवेपण, बालविवाह, विधवांच्या विवाहास बंदी या सर्व गोष्टी कायदे बनले तरी समाजात सुरुच होत्या. त्यातच लोकं समाजाला दोष देत होते. जे सामान्य जीवन जगायचे. अंधश्रद्धेवर विश्वास करणाऱ्या या समाजात त्यावेळच्या काळात संबंधक्रांतिकारांनी रणशिंग फुंकले. त्यांच्यात प्रयत्नाने भारत स्वतंत्र झाला. हे जरी खरं असलं तरी समाजाला नव्हे तर देशाला स्वातंत्र्य मिळाले होते. परंतु समाज सुधारला नव्हता. अशा समाजाला सुधारण्यासाठी वा त्यांना योग्य दिशा दाखविण्यासाठी भारतात काही नियमांची गरज होती. ज्या नियमानुसार देश चालेल. देशाला चालता येईल. तेच नियम म्हणजे घटना व ती राज्यासाठी लागू झाली होती. म्हणून ती राज्यघटना. भारतीय राज्यघटना सव्वीस जानेवारी एकोणविसशे पन्नासला लागू झाली. भारताला राज्यघटनेची गरज जेव्हा भासली. तेव्हा एक बैठक भरली. ती राज्यघटनेची आढावा बैठक होती. राज्यघटना ही लिखीत स्वरुपाची असावी की अलिखीत स्वरुपाची? त्यातच तीन देशाच्या राज्यघटना अभ्यासल्या गेल्या. इंग्लंड, अमेरिका, स्वित्झर्लंड. इंग्लंडमध्ये अलिखीत राज्यघटना होती. अमेरिकेत लिखीत पण परिदृढ राज्यघटना होती. स्वित्झर्लंडमध्ये परीवर्तनशील स्वरुपाची राज्यघटना होती. शिवाय राज्यघटना कोणती स्विकारावी यावर चर्चा झाली. अशा प्रकारचे वादविवाद त्या काळात निर्माण झाल्यानंतर मग ठरलं की आपण अलिखीत राज्यघटना ठेवावी. कारण ज्या देशानं आपल्यावर एवढे वर्ष राज्य केलं. त्या देशाची राज्यघटना ही अलिखीत स्वरुपाची होती. परंतु काही मंडळी म्हणत होती की राज्यघटना ही लिखीत स्वरुपाची असावी. इंग्लडचं जावू द्या. त्यानंतर कोण लिहिणार यावर विचारविमर्श झाला व पाच लोकांची समिती बनली. ज्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते, डॉ बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी आपल्या अथक परीश्रमातून राज्यघटना लिहिली. ज्या राज्यघटनेतून त्यांनी अंधश्रद्धा कायमच्या वगळल्या. विशेष म्हणजे त्यांनी राज्यघटनेत मांत्रीकतेचा समावेश केला नाही. तसंच राज्यघटनेत त्यांनी कोणत्याही धर्माला विशेष महत्व दिले नाही. कोणत्याही व्यक्तीला विशेष महत्व दिले नाही. सामान्य लोकांचा त्यात विचार केल्या गेला. त्यातच त्या राज्यघटनेतून स्री पुरुष भेदभावच नाही तर स्री पुरुष, स्पृश्य अस्पृश्य, गरीब श्रीमंत हाही भेदभाव मिटवला. आज राज्यघटनेतून अंधश्रद्धा दूर पळाल्या आहेत. भेदभावही तेवढेच दूर पळाले आहेत. माणसाचे माणूसपण जपले जात आहे. आजच्या या राज्यघटनेत ना मांत्रिकाला थारा आहे, ना मांत्रिकांच्या मांत्रीक विद्येला. ना आता कोणी गुप्तधनासाठी नरबळी म्हणून बालकांचा बळी देत. ना केशवेपण प्रथेचं पालन करुन स्रियांच्या पती निधनानंतर तिला विद्रूप करत. ना कोणी आपल्या कन्येचा बालविवाह करीत. आज विधवेलाही दुसरा विवाह करुन आपले जीवन जगण्याचा अधिकार आहे. एवढंच नाही तर आज कोणाचंही आपल्या पतीचं पटत नसल्यास फारकत घेता येते. आज कोणीच कोणाची नोकरी खावू शकत नाही. तसाच कोणीच कोणाचा हक्कंही हिरावून घेवू शकत नाही. एवढी स्वतंत्र्यता आहे. मात्र हे सगळं नियमांना धरुन घडतं. कारण भारत प्रजासत्ताक आहे. आज कुणीही कायद्यासमोर नव्हे तर भारतीय प्रजासत्ताकापेक्षा मोठा नाही. कुणीही स्वातंत्र्याचा उपभोग घेतांना कोणावरही अत्याचार करु शकत नाही. तसंच कुणीही स्वातंत्र्याचा आपल्या स्वार्थासाठी उपभोग घेवू शकत नाही. अन् समजा कुणी तसं करु म्हटल्यास भारतीय, प्रजासत्ताक त्यांच्या मुसक्या आवळते. याचाच अर्थ असा की स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठीच प्रजासत्ताक आहे. स्वैराचारी वागण्यासाठी वा स्वैराचारपणे स्वातंत्र्य उपभोगण्यासाठी भारतीय प्रजासत्ताक नाही. हे मात्र खरं. जात मिटली नव्हती. मात्र त्यानंतर चिंतातूर झालेली दिक्षा. काही लोकं वर्तमानपत्रात येत असलेल्या लेखांवर प्रतिक्रिया देत होते. म्हणत होते की थांबा, जात टिकविणे आहे. विवाहातही जातीचं अस्तित्व होतं. जातीवर आधारीत विवाह होत होते व ते यशस्वीही होत असत. आंतरजातीय विवाह झाल्यास वडील आपल्या मुलींना स्विकारत नसे. ते आपली मुलगी मरण पावली असे मानायचे. कारण त्यांना जातीनं विशेष असं महत्व दिलं होतं. जात विवाहात होती. कारण त्यामुळंच नवदांपत्यांच्या दांपत्य जीवनाला स्थैर्य आणि तेवढंच संरक्षण मिळत होतं. परंतु कालांतरानं जातीचा संदर्भ व स्वरुप बदललं व आंतरजातीय विवाहाला सुरुवात झाली. ते घटनेतील कलम ४९८ ब व १२५ अ यामुळं शक्य झालं. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.* जात...... अलिकडील काळात जातीवरुन भांडणं होतात. जात काढली तर न्यायालयात खटले दाखल होतात. जातीच्या आधारावर आजही उच्च नीच असा भेदभाव चालत असतो. कधीकधी अपमान होतो. कधीकधी पदोन्नत्याही नाकारल्या जातात. एकंदरीत सांगायचं झाल्यास अन्याय होत असतो. अशी ही जाती आधारावरील भेदभावाची दरी. ती भेदभावाची दरी दूर करता यावी म्हणून जात कोणी काढल्यास खटल्याची तरतूद आहे. म्हणतात की आमची कोणी जात काढली तर आम्ही माफ करणार नाही. एखाद्याची कनिष्ठ असणारी जात काढली तर जात काढली म्हणून जे खटले दाखल होतात. मग निकाल लागेपर्यंत खटले न्यायालयात सुरुच असतात. ज्यात चपला झिजत असतात. तरीही जातीचं आमच्यावर एवढं बंधन असतं की जात जर आम्ही आमच्या नावासमोर लावली नाही तर आम्हाला ते कसंतरी विचित्र वागण्यासारखं वाटतं. जात ही विवाह करतांनाही पाहिली जाते. त्यातच जाती आधारीत विवाह हे मुला मुलींच्या पसंतीनं होतीलच याचा काही नेम नसतो. शिवाय असा विवाह झाला आणि काही काळानंतर पती पत्नीचं पटेनासं झाल्यास जातीची काही माणसं दबाव टाकून त्या दोघांनाही समजवतात. कुटूंबाचा दोष नसतांना वाळीत टाकायची धमकी देत असतात. त्यामुळं नाईलाजानं अशा स्रीपुरुषांवर जातीचं बंधन आल्यानं वा दबाव वाढल्यानं चूप बसावं लागतं. त्यामुळंच काही लोकांचं बोलणं की कशाला हव्यात जाती आणि जातीवरुन ही भांडणं. जातच नसेल तर भांडणंही होणार नाहीत. जात अस्तित्वात आली कामावरुन. त्यातच त्या काळात स्वतःच्या रक्षणाचाही एक हेतू होताच. आता जात आमच्या अगदी नावाला चिकटलेली आहे. तसं पाहिल्यास जातीचं काही असं विशेष महत्व नाही. असं काही लोकांना वाटतं. असंही नाही की जात नसेल तर आम्ही मरणार अन् जात असेल तर जगणार. जात जरी नसेल तरी आम्ही जगू शकतो. तशी जात ही पुर्वीपासूनच चालत आलेली आहे. जेव्हा झाडावरील माकडाचा मानव बनला. त्या माणसाला लवकर ओळखता यावे व आपली कामं सुकर व्हावीत म्हणून जात बनविण्यात आली. जातीचे हेच सर्वात पुर्वीचे महत्व होते. जातीचे महत्व आणि स्वरुप पुर्वीच्या काळात ओळख म्हणून जरी असले तरी आज ते स्वरुप बदललं आहे व आज जाती आधारीत जातीवरच होत असलेला अन्याय पाहिल्यास जात नष्ट झालेली बरी असे वाटत आहे. जात ही माणसाला ओळखण्याच्या दृष्टीनं महत्वाची असली तरी जातीचं आणखी एक महत्व आहे. ते म्हणजे विवाह. विवाह हा पुर्वीपासून जातीत करण्याची परंपरा अस्तित्वात होती. त्याचं कारण होतं रक्तसंबंध व आपल्या मुलाबाळांचं पटवून घेणं. कारण ज्यावेळेस मुलं मुली तरुण होत. त्यावेळेस मुली ह्या परीपक्व नसायच्या. त्यांना स्वयंपाक करण्यापासून तर संसारातील सर्व गोष्टी शिकवाव्या लागायच्या. शिवाय शिकवावं लागायचं घरच्या धंद्यातील कसब. ज्या धंद्यातील काही गोष्टी ती आपल्या आईवडीलांकडून शिकून आलेली असायची. जसे चांभाराच्या घरच्या मुलीला चांभारकाम कसे करायचे. हे वेगळे शिकविण्याची गरज नसायची. तसंच मांगाच्या मुलींना झाडू कसे बनवावे लागते. हे शिकवावे लागायचे नाही. तेच इतर कामातही होते. काही गोष्टी या कामाशीही संबंधीत असायच्या. शिवाय आपल्याच जातीशी विवाह केल्यास जातीवरुन आक्रंदन होणार नाही याची दक्षता घेण्याची गरज नसायची. नवीन घरात येणारी मुलगी आपल्याच जातीतील मागीतली तर ती जातीवरुन आपल्या संसारात लवकर रमून जात असे आणि विवाह करतांना केवळ जातीतीलच नाही तर नात्यातीलही मुलगी मागण्याची प्रथा होती. त्याचं कारण होतं संस्कार व ओळखपारख. मुलगी वात्रट निघू नये. हा त्यापाठीमागील उद्देश होता. अन् वात्रट निघालीच तर तिला सरळ करण्याचं बाळकडूही जातीतूनच पाजलं जायचं. विवाह हा जातीतच व्हायचा व एखादी मुलगी वात्रट निघाली वा ती आपल्या सासू सासऱ्याचं ऐकण्याच्या पलीकडे असली तर आधी जातीत एक प्रकारची पंचायत भरायची. ज्यात जातीतील गणमान्य माणसं असायची. जी आपआपल्या अनुभवानं मार्गदर्शन करायची. ज्यातून नवविवाहीत जोडपं आपलं वर्तन सुधारायचे. एवढ्यावरच भागलं नाही तर गावपंचायत व्हायची. त्यातही खटले नेले जात व त्यातही जातीची माणसं असायची. काही नात्यातील जवळचे नातेवाईकही असायचे. ज्यातून सुधारणा होत असे आणि त्यानंतरही सुधारणा झाली नाही तर सरळ सरळ सोडचिठ्ठी व्हायची. ज्याला आज घटस्फोट म्हणतात. ज्यातून कोणालाच कोणत्याही स्वरुपाची क्षती पोहोचविल्या जात नसे. लवकरच आणि ताबडतोब निर्णय केला जात असे. शिवाय अशावरही भागले नाही तर त्या जातीच्या माणसाला वाळीत टाकण्याची शिक्षा होत असे. ही बातमी अख्या गावच्याच बिरादरीत नाही तर गावक्रोशीत पसरत असे. त्यानं फार मोठ्या स्वरुपाचा फरक पडत असे. त्यांच्या घरच्या इतर मुलांचे त्यानंतर विवाह होत नसत. ज्यातून कोणत्याही जातीतील कोणतीच स्री वा कोणताच पुरुष हा आपल्या संसारात भांडणं जरी झाले तरी ती भांडणं मिटवायचा. परंतु संसार टिकवीत असे. महत्वपुर्ण बाब ही की काल जात होती म्हणून संसारही टिकत होता व जातीआधारावरुन जास्त प्रमाणात घटस्फोट नव्हतेच. काल जात होती व कालच्या जातीनं घटस्फोट जास्त प्रमाणात घडू दिले नाही. संसार टिकवले. त्यातच एकदोन अशीही प्रकरणं असायची की ज्या प्रकरणात काही तरुण तरुणी पळून जावून दुसऱ्याच जातीशी विवाह करीत. ज्यात कालांतरानं पटत नसे व एकदा का मन त्या महिलेपासून विटलं की पुरुष दुसरी पत्नी करीत असे. ज्यातून पहिल्या पत्नीवर अनंत प्रकारचे अत्याचार होत असत. कधी उपाशी ठेवणे. कधी तिला आगीचे चटके देणे. कधी तिला घरातून हाकलून देणे. असे होवू नये म्हणून कालांतरानं जेव्हा संविधान बनलं. तेव्हा त्यात विशेष अशा कलमा टाकल्या. ज्यात कोणत्याही पुरुषानं विवाह केला तर त्यानं तिला सोडू नये. मग ती पत्नी म्हणून त्यानं कोणत्याही जातीतील स्रीचा स्विकार केला असेल. अन् तसं जर घडलंच तर तिला न्यायालयातर्फे तिला दाद मागता येईल. त्याच अनुषंगानं घटनेत दोन कलमं टाकली. पहिली म्हणजे ४९८ ब होती. त्यानुसार एखाद्या पुरुषानं पत्नी म्हणून एखाद्या स्रिचा स्विकार केल्यास आणि अचानक सोडल्यास त्याला विनाजमानतीनं आतमध्ये टाकणे. त्याचा अर्थ होता, त्यानं तिला सोडू नये. तशीच दुसरी कलम होती १२५ अ. समजा एखाद्या पुरुषानं एखाद्या स्रिला पत्नी म्हणून त्यागल्यास तिच्या खान्याचा खर्च म्हणून पोटगी देणे. ती पोटगी यासाठी होती की स्रियांच्या कमावण्याचा अधिकार त्यावेळच्या समेजव्यवस्थेनं नाकारला होता. जातीप्रथेनं व येथील अंधश्रद्धेनं स्रियांच्या शिक्षणावर बंदी आणली होती. शिवाय शिक्षण स्रियांसाठी जरी खुलं झालं असलं तरी येथील स्रिया शिकत नव्हत्या. या कलमा येथील समाजव्यवस्थेला लागू होत्या. कारण जो समाज जातीवर आधारीत विवाह करायचा. त्या समाजातील एखाद्या कन्येनं असा घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतल्यास तिला तिचा माहेरचा परीवार पोसायला सक्षम नसायचा. त्याचं कारण होतं, मुलांना जन्मास घालणं. रोगराई जास्त असल्यानं व त्या रोगराईच्या निदानासाठी लागणारी औषधे जास्त प्रमाणात उपलब्ध नसल्यानं परीवारात अनेक मुलांना बाप जन्माला घालत असे. अशावेळेस एखादी मुलगी जर घटस्फोटानं घरी येवून बसल्यास तिच्या घरच्या बाकीच्या भावंडांचा विवाह होत नसे. अशी स्री पतीनं सोडल्यावर चक्कं आत्महत्याच करीत असे वा पतीच्याच घरी एका कोपर्यात राहून पतीचा अत्याचार सहन करीत असे. असे होवू नये म्हणून पोटगीची रक्कम व विनाजमानतीची कलम होती. जातीवर आधारीत विवाह अस्तित्वात होता. जर एखादी मुलगी दुसर्याच जातीच्या मुलांसोबत पळून गेली तर त्या घरचा जबाबदार व्यक्ती हा आत्महत्याच करीत असे. ज्यात नाक कापलं गेलं असे मानण्याची पद्धत होती. ती आत्महत्या होती, इतर कोणत्याच मुलीनं इतर समाजातील मुलांसोबत पळून न जाणं. त्याचं कारण होतं, इतर जातीतील लोकं तिला सुखी ठेवणार नसल्याची भावना. ती जर सुखी राहणार नसेल तर आपल्याला दुःख होईल. ते माहीत होण्यापुर्वीच मरण पत्करलेलं बरं होईल. असे मानण्याची भावना. म्हणूनच आत्महत्या. आज काळ बदलला. आज मुली शिकल्या. स्वतः कमवायल्या लागल्या. त्यामुळं काल पतीच्या भरवशावर जगणाऱ्या मुली आज कमवत्या झाल्या. व्यतिरीक्त काल ज्या मुली सासूचा अत्याचार सहन करायच्या. आज त्याच मुली ज्या कमवत्या झाल्या, त्या सासूंवरच अत्याचार करायला लागल्या. शिवाय काल ज्या मुली वडीलांच्या मतानं जातीशीच विवाह करायच्या. आज त्याच मुली मायबापाला न विचारता कोणत्याही जातीशी विवाह करतात. तशीच आज जरी मुलगी इतर कोणत्याही जातीच्या मुलाशी पळून जरी गेली तरी आजच्या काळात कोणताच बाप मुलीनं नाक कापलं म्हणून आत्महत्या करीत नाही. कारण आज ना त्याला इतर तिच्यापेक्षा लहान असलेल्या मुलांच्या विवाहाची चिंता असते. ना त्याला समाजाची चिंता असते. कारण आज समाजही काही अंशी तशाच स्वरुपाचे पावले उचलत असतो. तशाच आजच्या काळात कोणत्याही परिवारात जास्त मुलं नसतात की विवाहाची चिंता पडेल. विशेष सांगायचं झाल्यास काल विवाह हा जातीशीच व्हायचा. कारण विचार असायचा की आपल्या जातीतील माणसांचं वागणं पाहून त्याला समजावता येईल की बाबा रे, तू असा वागू नकोस. ही कृती जातीतील माणसांकडूनच घडायची. त्यावर तो ऐकायचा. कारण वाळीत टाकण्याची भीती असायची. ज्यातून इतर मुलांच्या विवाहाच्या चिंतेनं चिंतातूर असलेला बाप विवाहाच्या चिंतेतून मुक्त असायचा. अन् जातीचा विवाह तुटलाच, तरही त्याला समस्या नसायची. ती लवकरच जातीतील इतर माणसाच्या घरी जायची. ज्याला पाट लावणे म्हणत किंवा विवाह तुटलाच तर ती माहेरी येत नसे. ती आपल्या वडीलाची बदनामी होवू नये म्हणून कधी आत्महत्या करीत असे वा स्वतंत्र्य जगत असे. शिवाय आपल्या मुलीचा विवाह करतांना बाप सांगत असे की बेटा, मरुन जाशील, परंतु परत माहेरी येवू नकोस. ती माहेरी येणं म्हणजे बदनामीचा सूर असतो असं समजण्याची प्रथा अस्तित्वात होती. मात्र तिनं इतर जातीतील माणसांशी विवाह केल्यास चिंता असायची की तिचं कसं होणार. तिही आपल्याच पोटातील जीव आहे. आज समाज बदलला. अंधश्रद्धा काही अंशी दूर पळाल्या. त्याचबरोबर मुली सुधारल्या. विचारानं प्रगल्भ झाल्या. हा सर्व बदल शिक्षणानं केला व शिक्षण हे वाघिणीचं दूध ठरलं. एकंदरीत सांगायचं झाल्यास परिस्थिती बदलली व त्याच मुली आज सासूवर अत्याचार करु लागल्या. पती असलेल्या पुरुषांवर अत्याचार करु लागल्या. शिवाय असे त्या स्वतः तर करुच लागल्या. व्यतिरीक्त ४९८ ब व १२५ अ या कलमांचाही गैरवापर करु लागल्या. आज जरी मुली सुधरल्या असल्या व विचारानं प्रगल्भ झाल्या असल्या तरी. कारण आज मुली सुधरल्या. मात्र कलमा अजूनही त्याच आहेत. त्या सुधरवल्या गेल्या नाहीत. शिवाय आज आणखी एक बदल झाला. जात सुधारली. जातीवर आधारीत विवाह सुधारले. आज बरीच मुलं वा परीवार आंतरजातीय विवाहही करु लागले आहेत. कारण कालच्या विवाहासारखा आज विवाह हा संस्कार राहिलेला नाही. त्यात बदल झालेला असून त्याला कराराचे स्वरुप प्राप्त झालेले आहेत. आजचे विवाह करार केल्यागत केव्हाही जुळतात आणि केव्हाही तुटतात. मात्र आज विवाहाचे खटले सुरु असतात. तारीखवर तारीख करत. ४९८ ब व १२५ अ चा वापर करीत. काही खटले याच कलमांच्या गैरवापरावरही सुरु असतात की जे संपता संपत नाहीत. महत्वाचं म्हणजे ४९८ ब व १२५ अ असल्यानं मुलींना विवाह करतांनाही घाबरण्याची गरज उरलेली नाही. जरी त्या मुलींचा विवाह झाल्यानंतर विवाह तुटला तरी. मग तो जातीच्या मुलांसोबत केलेला विवाह का असेना वा आंतरजातीय मुलांसोबत केलेला विवाह का असेना. दिक्षाचा पती हा तिला सोडून गेला होता. मात्र इतर लोकांसारखी दिक्षानं आपल्या पतीच्या वागण्यावरुन कुरकूर केली नाही. ना त्याची तक्रार पोलीस स्टेशनला टाकली. ती लढत होती फक्त आपल्या हक्कासाठी. ज्या जातीनं तिला त्रास दिला होता. जी जात तिला छळत होती. वाटत होतं की समाजात बदलाव व्हावा. जात विरहीत समाज तयार व्हावा. ******************************************** दिक्षानं जात नष्ट करण्यासाठी उचललेलं पाऊल. वर्तमानपत्रात त्या आशयाच्या बातम्या छापून येत होत्या आजही कधीकधी. त्यातच काही व्हिडीओही बनवून यु ट्यूबवर अपलोड केले जात होते. ज्यात तिच्या मनाच्या विरुद्धचे बोल वा शंका प्रदर्शित केल्या जात असत. त्यावर तिचं म्हणणं होतं की व्हिडीओ व फोटोचा वापर चांगुलपणासाठी करावा. वात्रटपणासाठी वा कोणाची टिंगल टवाळकी करण्यासाठी नाही. सध्या फॅशन आली आहे व्हिडीओ बनविण्याची. मग तो व्हिडीओ कोणत्याही पद्धतीनं बनलेला का असेना, लोकं व्हिडीओ टाकतच असतात. त्याचबरोबर फोटोही टाकत असतात. कधी वात्रट तर कधी फॅशन करुन. फॅशनेबल काळ असल्यानं अतिशय तोकडे कपडे घालून व्हिडीओ वा फोटो सोशल मिडीयावर टाकण्याची पद्धत अलिकडे रुढ झाली आहे. मात्र त्याला कोणी काहीही म्हणत नाहीत. लोकांना वाटते की त्याचा फायदाच होत असतो आणि लोकांचंही त्यादृष्टीनं बरोबरच आहे. कारण लोकं चांगल्या गोष्टी कधीच पाहणार नाहीत. वाईट गोष्टीकडं मात्र चटकन लक्ष जात असतं. कारण गत काही वर्षापूर्वीच पुनम पांडे वा ममता कुलकर्णी नावाच्या अभिनेत्रीनं असेच फोटो सोशल मिडीयावर पोष्ट केले होते. त्यांना चित्रपटात काम मिळालं. म्हणूनच लोकांचं असं वागणं. लोकांचं यात काय चुकतं. लोकांनाही वाटते की आपणही असेच प्रसिद्ध होवू. दिक्षाबाबतही तेच घडत होतं. प्रसिद्धी मिळविण्यासाठी वर्तमानपत्रात तिच्या मनाच्या विरुद्ध बातम्या प्रकाशित करीत असत. त्यावर तिचं मत होतं. पद, पैसा, प्रतिष्ठा व प्रसिद्धी. ह्या जेवढ्या काही प वर आधारीत गोष्टी आहेत. या नशिबाचाच एक भाग आहे. नशिबात असेल त्यालाच या गोष्टी मिळतात. इतरांना त्या गोष्टी अजिबात मिळत नाहीत. त्यामुळंच त्याचा बाऊ होवू नये. परंतु लोकांना कोण सांगेल. लोकं सर्व कामधंदे सोडून त्यापाठीमागेच लागले आहेत. शिवाय ह्या गोष्टीनं माणसांचीच अधोगतीही होत असते. कामात रस वाटत नाही. सगळी कामं खोळंबतात. मित्रमंडळ तुटतं. नातेसंबंधही तुटतात. शिवाय माणूस हा एकाकी बनतो. आजार बळावतो व व्यक्ती अशा निराशेच्या गर्तेत पोहोचतो की तेथून तो परत येवूही शकत नाही. ज्याला डिप्रेशन म्हणतात. हे लोकांना माहीत आहे. तरीही लोकं त्यामागे लागत असतात. आज असंच जग आहे व हे जग आम्हाला अशाच गोष्टीमागं फिरायला लावत असते. कारण स्पर्धाकाळ आहे. शेजारचा व्यक्ती असे करतो ना, मग आपणही तसेच करायला हवे. मग त्यासाठी कर्ज काढणं आणि ते कर्ज चुकवणं नाही झालं तर आत्महत्या. आज आत्महत्याही अगदी सोप्या झाल्यात. आत्महत्येचं प्रात्यक्षिक करुन दाखवतात लोकं. परंतु बाबा रे, त्यात तुमचाच मृत्यू होतो ना. हे मात्र कोणीही जाणत नाहीत. लोकं आत्महत्याही या सर्रास करीत असतात. व्हिडीओ व फोटोचं हे जग. लोकं या व्हिडीओ व फोटोच्या जगात चांगले फोटो वा व्हिडीओ कधीच बव्हंशी व्हायरल करणार नाही. याबाबतीत सांगतांना एका व्हिडीओबाबत सांगणे गरजेचे समजतो. एक व्हिडीओ असाच फेसबुकवर व्हायरल झाला. एक तीन वर्षाची मुलगी भांडे घासत होती. सुंदर होता तो व्हिडीओ. परंतु बोध काय, तुम्हाला पुढेही चांगले भांडे घासता यावेत यासाठी असेल का तो व्हिडीओ की स्रियांच्या नशिबात चूल आणि मूल असतं हे दर्शविणारा होता का तो व्हिडीओ. साहजिकच तेच दर्शवत असेल तो व्हिडीओ. त्यापेक्षा जर त्याच व्हिडीओच्या ठिकाणी त्याच तीन वर्षाच्या मुलीचा अभ्यास करतांना व्हिडीओ वा फोटो पोस्ट केला असता तर बराच संदेश वा बोध त्यातून देता आला असता. परंतु हे व्हिडीओ पोष्ट करणाऱ्यांना कोण सांगेल. फोटो वा व्हिडीओ आपल्याला बरंच काही सांगून जातात. तसं पाहिल्यास आजच्या काळात लोकांकडे वेळ जरी बराच असला तरी मोबाईलच्या संगतीनं त्यांच्याकडे अजिबात वेळच नाहक असे दिसायला लागले आहे. एवढे गर्क असतात लोकं मोबाईलच्या दुनियेत. मोबाईल म्हणजे त्यांना आत्माच वाटते स्वतःचा. मोबाईल जर,त्यांच्याकडून हिसकला की आक्रनतांडव होत असतं. मग माहीत नाही. लोकं काय काय डोक्यावर घेतात ते. लहान मुलंही मोबाईलमध्ये गर्कच असतात. त्यांचंही सांगायलाच नको. त्यांच्याही हातून थोडासा मोबाईल का घेतला की बस, त्यांना चूप करणं कठीण होवून बसतं. सोशल मिडीया ही मोठी कामाची वस्तू आहे. त्यातून राजनेते निवडूनही येत असतात. चांगलेच नाही तर गुन्हेगार राजनेतेही निवडून येत असतात. काही व्हिडीओ व फोटो हे बरंच काही सांगून जात असतात. एक फोटो असाच व्हाट्सअपवरुन व्हायरल झाला. एक आई आपल्या बाळाची आंघोळ करुन देत होती व लिहिलं होतं की जर बाळानं मोठे झाल्यावर या स्नानाचे ऋण फेडले तर त्याला कुंभमेळ्यात स्नान करण्याची काहीच गरज नाही. फोटो लहानसाच होता. परंतु त्यातून अर्थबोध किती होत होता. हे सांगायलाच नको. परंतु असे व्हिडीओ वा फोटो कुणीही लक्षात घेत नाहीत. त्याबद्दल कोणीही काही बोलत नाहीत वा प्रतिसाद देत नाहीत आणि वात्रट व्हिडीओ असले की बस. प्रतिक्रियेची सरबत्तीच होते. त्याचं कारण म्हणजे आजचा काळ. आज कलियुग आहे व या कलियुगात वाईट गोष्टींनाच जास्त प्राधान्य दिलं जात असतं. महत्वाचं म्हणजे आपल्याला जर व्हिडीओ बनवायचे कौशल्य प्राप्त झालेले आहे व ती प्रदत्त रुपात विधात्यानं दिलेली देणगी आहे. विचार करा की मोबाईलचा शोध जरी मानवानं लावला असला तरी तरी मानवाला विचार करण्याची शक्ती एका नैसर्गिक शक्तीनं दिलेली आहे. ती शक्ती निसर्गातीलच वस्तू प्राशन करुन वाढलेली आहे. म्हणूनच आपले विचार प्रगल्भ होवू शकले. जर आपण या निसर्गातील वस्तू प्राशन केल्या नसत्या तर आपली विचार करण्याची शक्ती वाढली नसती व आपण शोधही लावू शकलो नसतो. तेव्हा त्याच शक्तीच्या जोरावर आज आपण व्हिडीओ निर्मिती करु शकतो वा फोटोही काढू शकतो. तसं पाहिल्यास फोटो वा व्हिडीओ हे चांगले तसेच वाईटही काढू शकतो. तेव्हा आपल्याला मिळालेल्या त्याच अद्वैत शक्तीच्या जोरावर आपण वाईट वा वात्रट व्हिडीओ वा फोटो न काढता, चांगले फोटो वा व्हिडीओ काढावेत. जेणेकरुन त्या फोटोचा वापर जनकल्याणासाठी होईल. कधीकाळी सुचलंच तर लहान मुलांचा भांडे घासण्याचा व्हिडीओ पोष्ट न करता त्याच ठिकाणी एखादा अभ्यासाचा व्हिडीओ काढावा. जेणेकरुन त्या व्हिडीओच्या माध्यमातून लहान मुलांच्या मनात अभ्यासाची गोडी वाढेल. भांडे घासण्याची नाही हे तेवढंच खरं. म्हणूनच आपण निदान आपल्या मुलांना संस्कार लावण्यासाठी तरी तशा स्वरुपाचे व्हिडीओ वा फोटो काढू नये. ते सोशल मिडीयावर अपलोड करु नये. वात्रट व्हिडीओ वा फोटो त्याला दाखवू नये. म्हणजे झालं. दिक्षाला नेहमी वाटायचं की जात बदलवायचीय असेल तर ती बदलविण्यासाठी मानसिकता हवी. कारण ही जात नष्ट करण्यासाठी खटला लढून काही उपयोग नाही. कदाचीत मला जात नष्ट झाल्याचा निकाल मिळेलही खटला लढून. परंतु ह्या जातीचं बांडगुळ प्रत्येक व्यक्तीच्या मनातून जेव्हापर्यंत जात नाही. तेव्हापर्यंत ही जात नष्टच होणार नाही. जातीला अलिकडील काळात मोठे महत्व आले आहे. काही लोकं आपली जात टिकावी म्हणून प्रयत्न करु लागले आहेत. तसं पाहिल्यास जात कोणीही सोडलेली नाही. जरी आंतरजातीय विवाह होत असले तरी. विवाहाबद्दल सांगायचं झाल्यास विवाह हे आंतरजातीय होतात. आंतरधर्मीयही होतात. परंतु तसं जरी होत असलं तरी जात बदलत नाही. धर्मही बदलत नाही. हं, पुरुषसत्ताक कुटूंबपद्धती अस्तित्वात असल्यानं जात आणि धर्म हा प्रत्येक वारसाच्या जन्मामागे पुरुषांचा लागतो. त्यामुळं जात बदलता येत नाही. धर्माच्या बाबतीत सांगायचं झाल्यास धर्म हा तेवढा बदलतो. काही लोकांना त्याचा धर्म बरा वाटत नसेल तर तो आपला धर्म बदलवून नवीन धर्म स्विकारतो. जसा हिंदू असेल तर मुस्लिम वा ख्रिश्चन बनतो आणि मुस्लिम असेल तर तो हिंदू बनतो. हे त्यांचे हिंदू असेल तर इतर धर्माचे बनणे वा मुस्लिम असेल तर इतर धर्माचे बनणे. यावरुन जात बदलते असा त्याचा अर्थबोध होत नाही. गतकाळात बऱ्याच लोकांनी बाबासाहेबांनी बौद्ध धम्म घेतल्याबरोबर त्यांनीही बौद्ध धम्म स्विकारला. परंतु जात बदलवली नाही. जात तीच राहिली. बौद्ध धम्मात जातीला स्थान नसलं तरी. यावरुन धर्म बदलवता येतो व जात बदलवता येत नाही. हे सिद्ध होते. लोकांनी जातीबद्दल अनेक व्याख्या केलेल्या आहेत. म्हणतात की जात ही एखाद्या बांडगुळागत आहे. कोणी म्हणतात की जात ही ढेकणासारखी आहे. कोणी म्हणतात की जात असल्यास अत्याचार होत असतो. म्हणूनच जात ही नसावीच. तिचा काही उपयोग नाही. कारण कालपासून तर आजपर्यंतच्या काळात जातीवरुन अत्याचार झालेले आहेत. कधी अमानुष मारहाण तर कधी उच्च नीच भेदभाव. आजही अशा स्वरुपाचे अत्याचार होत आहेत की जे अत्याचार जातीअंतर्गत दूर करता येत नाही. जातीअंतर्गत होत असलेले अत्याचार पाहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहितांना घटनेत कलमं टाकली की जर जातीअंतर्गत अत्याचार झालाच तर पोलीस स्टेशनला तक्रार करावी. न्यायालयात दाद मागावी. परंतु हे जरी खरं असलं तरी आजच्या काळात रोजच जातीअंतर्गत अत्याचार होतच असतात आणि ते अत्याचार दूर करता येत नाही. याला जबाबदार आहे प्रशासन. प्रशासन व जातीअंतर्गत होत असलेला अत्याचार. याबद्दल थोडंसं सांगणं गरजेचं समजतो. आज भारताला डॉ. बाबासाहेबांच्या रुपानं संविधान नावाची महत्वपुर्ण देणगी मिळाली असली तरी देशात संविधानानुसार बरेच ठिकाणी लोकं वागतांना दिसत नाहीत. काही ठिकाणी चक्कं कायदा हातात घेतला जातो. आजही बऱ्याच ठिकाणी स्पृश्य अस्पृश्य भेदभाव आहेच. मग अस्पृश्य व्यक्ती एखाद्या शेतात जरी जात असेल तरी त्याला जावू देत नाहीत. शिवाय अस्पृश्यांनी मोठं घर बांधलेलंही काही काही ठिकाणी चालत नाहीत. काही ठिकाणी तर नोकरीमधील पदोन्ननतीही अस्पृश्यांना दिलेली चालत नाही. काही ठिकाणी अस्पृश्यांनी प्रगती केलेली चालत नाही. व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती असतातच. हा अत्याचारच असतो स्पृश्यांचा अस्पृश्यावर होत असलेला. जरी संविधान असलं तरी. अन् त्याची तक्रार जवळच्या पोलीस स्टेशनला केल्यास पोलीस प्रशासन अस्पृश्यांवरच दबाव टाकत असतात. त्यांची तक्रार घेत नाहीत आणि घेतलीच तर ती मार्गी लावली जात नाही अन् मार्गी लावलीच आणि ती न्यायालयात गेलीच तर न्यायालयातही टिकत नाही. न्यायालयातूनही अशा स्वरुपाचा स्पृश्यांचा अस्पृश्यांवर अत्याचार झाला असला तरी दाद मिळत नाही. सगळं गणित जुळवून आणलं जातं व अस्पृश्य न्यायालयातही खटले हारतात. कारण असतं अस्पृश्य व्यक्तीचं अज्ञान. न्यायालयीन लढाई लढण्यासाठी आवश्यक असणारा जवळचा पैसा. जो वकीलांना द्यावा लागतो. तसेच महत्वाचे असतात वकील. वकीलच न्यायालयात सत्याची बाजू असत्य करीत असतात व त्यात त्यांचा हातखंडा असतो. जातीअंतर्गत अत्याचार हे सतत न थांबणारं चक्र आहे. बाबासाहेब आंबेडकरांनीही जात बदलवता येत नसल्यानं व धर्म बदलवता येत असल्यानं धर्म बदलवला. ना रहेंगा बास आणि ना बजेंगी बासरी अंतर्गत. कारण धर्म बदलवण्याचं प्रावधान होतं गतकाळातील अनादी काळापासून चालत आलेलं. जात बदलविण्याचं प्रावधान नव्हतं. त्यानंतर धर्म बदलवताच जातीअंतर्गत होणारा त्यांच्यावरील अत्याचार थांबला. कारण धर्म बदलविल्यामुळे कोणताच पुर्वीचा धर्मवेडा त्यांच्या जातीवर अत्याचार करु शकला नाही. तसंच बाबासाहेबांनी संविधानातही जात बदलविण्याविषयी काहीच प्रावधान केलं नाही. त्यांनी संविधान लिहिलं व त्यात परीवर्तनाचे भरपूर नियम टाकले. परंतु जात बदलविण्याविषयी प्रावधान टाकले नाही वा एखादी कलम अशी बनवली नाही की जात बदलवता येईल. म्हणूनच आज जातीअंतर्गत अत्याचार होत आहेत व ते जरी होत असले तरी त्याला न्याय देखील कुठूनही मिळत नाही. आजही अस्पृश्य व्यक्ती देशाच्या कानाकोपऱ्यात जातांना वा प्रवास करतांना तो खुल्यामनानं जात सांगू शकत नाही. ती लपवतो व कोणी जात विचारल्यास खोटं बोलण्याची इच्छा नसतांनाही खोटं बोलून आपली दुसरीच जात सांगतो. काही ठिकाणी अधिवास करतांनाही जात लपवूनच अधिवास करतो. कारण आपल्याला माहीत असतं की आपली मुळ जात सांगितल्यास त्या ठिकाणचे लोकं आपल्याला जगू देणार नाहीत. आपली मुस्कटदाबी करतील. अन् खुल्यामनानं जात सांगतो म्हटल्यास त्याची तिथंच मुस्कटदाबी झाल्याशिवाय राहात नाही. हे वास्तविक चित्र आजही अनुभवायला येतं. तेव्हा विचार येतो की काश! बाबासाहेबांनी धर्म बदलविण्याऐवजी जात बदलविण्याचं प्रावधान घटनेत ठेवलं असतं वा निर्माण केलं असतं तर कदाचीत आपल्यावर अस्पृश्य असल्यानं अत्याचार होत असल्यास स्पृश्यांची जात लावली असती. म्हणजे अत्याचारच झाला नसता. नोकऱ्यांमध्येही पदोन्नत्या तशाच घेतल्या असत्या. देशाच्या कानाकोपऱ्यात जात बदलवूनच फिरलो असतो राजरोषपणे. परंतु आज जात बदलवता येत नसल्यानं सारेच बंधनं आहेत. जात ही कधीतरी बदलवता येईल का? पुढे तसा काळ तरी येईल का की जात ही बांडगुळागतच चिकटलेली राहील आयुष्यात. तर त्याचं उत्तर आहे. ती बदलवताच येणार नाही. कारण जर पडताळून पाहतांना त्याचा इतिहास पाहिला तर असं जाणवतं की जात नावाचा शब्द जेव्हापासून चिकटला. तेव्हापासून त्या शब्दानं आपल्याशी रिश्तेदारी केलीय. ती आजतागायत बदलवता आली नाही व बदलवताही येणार नाही. शिवाय अलिकडील काळात जात बदलविण्याची मानसिकता डोक्यात येवू नये म्हणून तसे प्रयत्नही केले जात आहेत. प्रत्यक्षात प्रयत्न होत आहेत. महत्वपुर्ण बाब ही की जातही बदलवता येवू शकते. जसा धर्म बदलवता येतो तसा. तसेच जात बदलवून आपल्या जातीवर होणार असलेले अत्याचारही दूर करता येवू शकतात. परंतु त्यासाठी आपली मानसिकता बदललेली हवी. ती आपली मानसिकता बदलणारी हवी. अन् विशेष सांगायचं झाल्यास देशात जेव्हा जाती बदलविण्याची प्रथा निर्माण होईल ना. तेव्हाच सामाजिक परीवर्तन होईल. त्यानंतर असे जेव्हा घडेल, तेव्हा कोणत्याच जातीचा माणूस कोणत्याच जातीवर अत्याचार करणार नाही, हेही तेवढंच खरं. परंतु याबद्दल नाण्याची एक बाजू पाहिल्यास हे होणार नाही. याची शक्यता जास्त दिसते. याला जबाबदार आहे प्रशासन आणि तेवढेच लोकंही. प्रशासनच जातीआधारीत आरक्षण देत असतं. लोकांना जातीअंतर्गत धंदे करायला टपऱ्या देत असतं. जातीचे धंदे करायला कर्ज देत असतं. शाळेतही विद्यार्थ्यांच्या नावासमोर जाती लिहायला लावतं. जातीची पडताळणी करुन मी त्याच जातीचा आहो हे सिद्ध करायला लावतं. अन् लोकंही मोठ्या दिमाखानं या सर्व गोष्टी करतात. स्वतःचा स्वार्थ पुर्ण होतो. म्हणून पिढीजात धंदे न सोडता तेच धंदे करतात. त्या धंद्यासाठी मिळणाऱ्या कर्जात सब्सिडी आहे म्हणून मी त्याच जातीचा आहे याचं प्रतिज्ञापत्र सादर करुन कर्ज उचलतात. धंद्यासाठी टपऱ्या उचलतांना जातीचं प्रमाणपत्र आवर्जून जोडतात. शिवाय आपल्या मुलांना जातीअंतर्गत आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून त्याच्या नावासमोर जात लावतात. शिवाय जातीची पडताळणी करुन सिद्धही करतात की मी अमूक जातीचा आहे. यावरुन कुठे जात बदलणार आहे. असा प्रश्न पडतो. परंतु हे जरी खरं असलं तरी दुसरी बाजू अशीही आहे की आज बरीचशी मंडळी अशीही आहेत, जी जात बदलवत जरी नसली तरी पिढीजात जातीच्या धंद्यात भरपूर फायदा होतो. म्हणून प्रशासनाकडून सब्सिडी रुपात मिळणारे कर्ज त्याच धंद्यावर उचलतात. ज्यातून जास्त पैसा मिळाल्यानं मजा मारता येते. काही दिवसापुर्वी विद्यार्थ्यांना जातीच्या आधारावर असलेल्या आरक्षणाचा लाभ व्हावा म्हणून आपल्या पाल्यांच्या नावासमोर आरक्षण ज्या जातीला असायचं, त्या जाती लिहायचे. जे जाती पडताळणीतून दिसून आलं. विशेष बाब ही की कोणत्याही परीवर्तनासाठी आंदोलन महत्वाचं असतं. जसं भारत स्वतंत्र्य होण्यापुर्वी आंदोलन झालं. तरंच ते परीवर्तन करता येतं. जातही बदलवता येवू शकते. परंतु त्यासाठी आंदोलन घडायला हवं. परंतु त्या आंदोलनाची कोणाला गरज आहे. त्यामुळं जात असो वा नसो, प्रत्येकाचं पोट भरतं ना. मग काय करायचं आहे आपल्याला असं म्हणत आज सगळेजण निगरगट्ट आहेत व आपआपली पोळी शेकत आहेत. त्याच्यावर अत्याचार होत आहे ना. आपल्यावर नाही ना. असा विचार करीत. परंतु आग शेजारी जर लागली असेल तर त्यानं आपलंही घर जळेल. यांचा विचार आज तरी होत नाही. म्हणूनच आज जातीअंतर्गत भेदभावाचा अत्याचार सुरु आहे. तो सुरुच राहणार. मग कितीही काळ लोटला जाणार तरी आणि आम्ही सर्वजण मुकाट्यानं जातीअंतर्गत होत असलेला अत्याचार सहन करीत निगरगट्ट राहू, हे तेवढंच खरं. अन् जेव्हा जागे होवू. तेव्हा जातीच्या बांडगुळानं आपलं आंदोलनाचंही रक्त सुकविलेलं असेल. यात शंका नाही. महत्वाचं म्हणजे आपल्यावर जातीअंतर्गत अत्याचार होवू नये म्हणून जातही बदलवता येवू शकेल, परंतु त्यासाठी आपली मानसिकता बदलवलेली हवी. ती जेव्हा बदलेल. तेव्हाच जात बदलवता येईल व एकदा का जात बदलवता आली की सहजच जातीअंतर्गत होत असलेले अत्याचार नक्कीच दूर करता येतील यात शंका नाही. ***************************************** दिक्षा आज बागेत फिरत होती. तिला आज बरच अस्वस्थ वाटत होतं. अशातच तिचं लक्ष एका गुलाबाच्या फुलाकडं गेलं. फुल आज मुरझावल्या अवस्थेत होतं. तसं त्या गुलाबाच्या फुलाला पाहताच तिचं मन अगदी भुतकाळात गेलं. जातीआधारीत दिक्षाच्या मनात विचार होता. काही प्रश्नही होते. तसाच आणखी एक प्रश्न दिक्षाच्या मनात होता. तो प्रश्न होता व्हॅलेंटाइन दिवसाचा. तिला व्हॅलेंटाइन दिवसाचा राग येत होता. कारण त्याच दिवशी तिला तिच्या मित्रानं ती दहावीत असतांना एक गुलाबाचं फुल दिलं होतं व त्याच दिवसापासून तिचं त्याचेवर प्रेम निर्माण झालं होतं. परंतु जेव्हा जात मधात आली. तेव्हा त्याच व्हॅलेंटाइन दिवसानं तिला मदत केली नाही. त्यामुळंच तिला आज वाटायला लागलं होतं की कदाचीत व्हॅलेंटाइन दिवसाला हद्दपार करावं लागेल. प्रेम...... अगदी दोनचार दिवसानंतर प्रेमाचा दिवस येणार होता. ज्याला व्हॅलेंटाइन दिवस म्हणत. तसं पाहिल्यास आठ तारखेपासूनच प्रेमाचा आठवडा साजरा करण्याची प्रक्रिया सुरु झाली होती. त्यातच हे दिवसं चॉकलेट डे, किक डे, किस डे, रोज डे, प्रपोज डे अशा साऱ्याच नावाने साजरे करण्याची प्रक्रिया विदेशात होती. आता ते लोण भारतात आले होते व पसरले होते. आता व्हॅलेंटाइन दिवसाचा हा सप्ताह अगदी दिवाळी दसऱ्यासारखाच भारतातही साजरा होतांना दिसत होता. अशातच दिक्षाला तिच्या मित्रानं व्हॅलेंटाइनच्या दिवशी एका टवटवीत असलेल्या गुलाबाचं फुल दिलं. तो दिवस तिला आठवणीत होता. जो तिला दिशाभूल करणारा ठरला. कारण त्यानंतर व्हॅलेंटाइन दिवस कधीच तिच्या आयुष्यात आला नाही. एवढा तिटकारा तिच्या मनात व्हॅलेंटाइन दिवसाबद्दल निर्माण झाला होता. व्हॅलेंटाइन दिवसाचा खरा अर्थ जरी वेगळा असेल तरी त्याचा मुळात भारतात तरी अर्थ प्रेम असाच घेतला जातो. शिवाय हा दिवस आला की लोकं अगदी वेडे होवून जातात व स्वतःचं आयुष्य, वय विसरुन प्रेमाच्या मागं धावत असतात. ते अगदी म्हातारे झाले असले तरी. त्यानंतर ते आपला हशा करुन घेतात. ते असे चाळे करतात की साहजिकच काही लोकं त्यांना पाहून त्याला म्हातारचाळ लागली की काय, असेच बोलत असतात. काही लोकं प्रेमाला नावबोटं ठेवतात. ते स्वतः तर चांगले वागत नाहीत. परंतु इतरांना सल्ला नक्कीच देत असतात. म्हणतात की अमूक असा वागतो. असा वागायला हवा. तमूक तसा वागतो. तसा वागायला नको. त्यामुळंच त्यांच्याबद्दल नक्कीच म्हणता येईल की शेंबूड माझ्या नाकाला व मी सांगतोय लोकांला. वागणे वा प्रेम करणे. प्रेमाची आवश्यकता ही म्हातारपणापर्यंत असते. अगदी मरतानाही प्रेम हवंच असते. प्रेम जर नसेल आयुष्यात तर व्यक्ती तीळ तीळ मरत असतो. प्रेम ही कधीही न संपणारी आंतरक्रिया आहे. परंतु प्रत्येक वयातील प्रेम हे वेगवेगळं असायला हवं आणि असूही शकते. मात्र काही लोकं आजही आपलं प्रेम करतांना आपलं वय लक्षात घेत नाहीत. ते आपले वागणे जणू आपण बालवयातील माणसांच्या वागण्यासारखे ठेवतात. साहजिकच त्यांना बालवेडे अशी उपमा मिळते. उदाहरण द्यायचं झाल्यास एका शाळेचं उदाहरण देतो. काल आम्ही जेव्हा शिकलो. त्यावेळेस अगदी दहावीला असतांनाही आमच्या वर्गातील मुलींना बहिणी मानायचे. त्यातच बहिणींचं जसं रक्षण करतो. तसंच तिचंही रक्षण करीत होतो. त्यानंतर शेजारच्या वर्गातील मुलांने त्यांना काही म्हटलं तर आम्ही त्याच्याशी भांडण करुन त्याला धडा शिकवत असू. त्याच अनुषंगानेच एका शाळेतील तो दहावीचा वर्ग. आज त्यांना दहावा वर्ग सोडून तीस बत्तीस वर्ष झाले होते. त्या कार्यक्रमात मी आवर्जून उपस्थिती लावली. तो दहावीचा वर्ग व ते विद्यार्थी गेट टू गेदर साजरा करणार होते. ज्याला तब्बल तीस वर्षाचा काळ लोटला होता. परंतु आज ते एकत्र आल्यानं त्यांचं बहिण भावाचं प्रेम उचंबळून आलं होतं. प्रतिक्रियेवर प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या. तसा तो दिवस प्रेमदिवस सुरु होण्याचाच दिवस होता. तरीही कुणामध्येच कोणत्याही स्वरुपाचं आजच्या तरुणपणातील वासनामय प्रेम आजही दिसलं नाही. हे पाहून मला गतकाळात जाता आलं आणि विचार करता आला की आम्ही दहावीत कसे वागत असू. आज मात्र तसं नाही. आज आम्ही दररोज शाळेत शिकतो. भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत. त्यानुसार एकाच वर्गात असलेली मुलं ही आपली साहजीकच भाऊबहिण असायला हवी. त्यांच्यात प्रेम निर्माण व्हायला हवं, ते भाऊ आणि बहिण म्हणून. मग व्हॅलेंटाइन दिवस येवो की आणखी कोणताही दिवस. आकर्षण निर्माणच होवूच नये. शारिरीक आकर्षण तर अजिबातच नाही. परंतु आजची मुलं एकाच वर्गातील असली तरी त्यांच्यात प्रेम हे एक भाऊ आणि बहिण म्हणून निर्माण होत नाही तर ते प्रेम निर्माण होतं एक प्रेमवीर म्हणून. वर्गातील मुलगी त्याला आवडायला लागते. तोही तिला आवडायला लागतो. मग इशाऱ्यावर इशारे सुरु होतात. त्यातच ते प्रेम एवढं वाढतं की त्यांना कळत नाही की मी किती मोठा आहे व मी किती लहान आहे. संसार पेलवू शकतो का? त्या वर्गातील मुलांना ते माहीत नसतं. एकदा संसारात पडल्यावर काय होणार याची कल्पना नसते. ती मुलगी त्या मुलाला एवढी आवडत असते की अगदी त्याला तिच्याशिवाय राहाणं अवघड असतं. अशा परिस्थितीत शारिरीक आकर्षणानं ते जवळ तर येतात. त्यांच्यात शारिरीक संबंध घडतात. ज्याचा परिणाम गर्भधारणेवर होतो. त्यातच गर्भधारण झाल्यानंतर काही दिवस जातात. अशी वेळ जात असते व त्यांच्यात शारिरीक आकर्षणाने जे घडतं, ते विदारक स्वरुपाचं असतं आणि त्याला खतपाणी घालतं व्हॅलेंटाइन डे नावाचा दिवस. हा दिवस त्यांच्यातील उत्तेजीत प्रेम आणखी वाढवत असतो. व्हॅलेंटाइन डे नावाचा दिवस. ज्यातून प्रेम नावाचा शब्द तयार होतो व त्या शब्दातून पुढे शारिरीक आकर्षण व गर्भधारणा. त्यानंतर त्याचं वय,नसतांना गर्भधारणा झालीच तर ती त्याचेकडे जाते. सांगते की माझ्या गर्भात तुझंच बाळ आहे. तू माझ्याशी विवाह कर. त्यावर तो नकार देतो. ज्यातून आत्महत्या घडतात. काही वेळेस तो तयार होतो विवाह करायला.परंतु जात आडवी येते. ती जात एवढी आडवी येते की ते पळून विवाह करतात. अन् पळून जावून जरी त्यांनी विवाह केला तरी जातीचे गुंड त्यांना शोधत असतात. आपली जात बदनाम होवू नये म्हणून. त्यानंतर ते जिथे कुठे सापडले, तर त्यावेळेस त्यांना समाप्त करण्याचं काम हेच आमचे जातगुंड करीत असतात किंवा निदान वाळीत तरी टाकत असतात. व्हॅलेंटाइन डे येणं व तो साजरा करणं या क्रियेला कोणी रोखू शकत नाही. कारण आज काळ बदलला आहे व या बदलत्या काळानुसार तरुणपणाही बदलला आहे. आजच्या मुलांना कालच्या वर्गातील प्रेमाचा संदर्भ आमच्याही काळात कसा होता आम्ही कसे एकमेकांना भाऊबहिण मानत होतो. हे काही सांगता येत नाही. शेवटी दोन चार संपर्कातील मुलं समजतात. बाकी सर्व सोडून देतात चांगल्या गोष्टी. ज्या प्रेमाच्या विकृतीपणावर फुंकर घालू शकतील. आज जात महत्वाची आहे व ही जात असे व्हॅलेंटाइन दिवसाचे प्रेम स्विकारु शकत नाही. आज जातीनंच बदलत्या काळानुसार सातत्यानं प्रयत्न चालवायला हवा. त्यातच प्रेमाबद्दलचं शिक्षण प्रत्येक जातीत द्यायला हवं की जी मुलं शाळा तर शिकतील. परंतु प्रेम करणार नाहीत. जरी व्हॅलेंटाइन दिवस दरवर्षी येत असला तरी. कारण असं केल्यानं कुठंतरी जातीतील संस्कार नष्ट होत असतात. काल त्या दहावीत असणारी सर्व मुलं मुली एकत्र आली व ठरवलं की आपण गेट टू गेदर घेवू. मग ठरलं, तो क्षण साजरा करायचा. गेट टू गेदर करायचं. गेट टू गेदर झालं व ज्या दिवशी गेट टू गेदर झालं. त्याच दिवशी माहीत पडलं की मुलांमध्ये दहावीचं प्रेम उचंबळून आलं होतं. ते गोमू संगतीनंच्या गाण्यात त्यावेळेस स्नेहसंमेलनातील नाटकात केलेलं त्यांचं नृत्य त्यांना आज आठवत होतं व ते सांगत होते की अमूक अमूक व्हॅलेंटाइन दिवसाच्या दिवशी आपल्या प्रेयसींना फुल देत नव्हतो. कारण आम्ही एकमेकांचे भाऊबहिण होतो नव्हे तर एकमेकांना भाऊबहिण मानत होतो. ते काल एकमेकांना भाऊबहिण मानत होते. म्हणूनच आज तब्बल बत्तीस वर्षानंतरही ते एकत्र आले व गेट टू गेदर साजरा करु शकले. कदाचीत त्यांनी ते दहावीत असतांना जर प्रेम केले असते प्रेमवीर असल्यागत तर कदाचीत ते आज एकत्र येवू शकले नसते व गेट टू गेदरही साजरा करु शकले नसते. हे तेवढंच खरं. महत्वपुर्ण बाब ही की आज व्हॅलेंटाइन दिवस साजरा करावा. परंतु तो साजरा करतांना प्रेम जरी असलं तरी वासनेची भावना त्यांच्यात नसावी. शारिरीक आकर्षण तर अजीबातच नसावे. जेणेकरुन बदलत्या काळात व्हॅलेंटाइन डेवर विश्वास निर्माण होईल. नाहीतर आज जो दिवस प्रेमदिवस म्हणून भारतात आला. पसरत आहे. त्याला हद्दपार करायलाही वेळ लागणार नाही. तो व्हॅलेंटाइन दिवस........ दिक्षाच्याही जीवनात तो दिवस आला होता. तसा तो गतकाळातील एक प्रसंग. तिला आठवत होता. ती आपल्या सवंगड्यांना सांगत होती. 'उद्या व्हॅलेंटाइन दिवस. संबंधीत सर्व जगातील प्रेमी हा दिवस साजरा करणार आहेत व ते एकमेकांना फुलही देणार आहेत. त्यातच एखाद्याचा प्रेमी जर हजर झाला नाही तर त्याचा रागही येणार आहे. तेव्हा तसा राग येवू न देता तो व्यक्ती वा तो प्रेमी का आला नाही हे समजून घ्यावे. कारण कधीकधी असंही घडू शकते की त्या व्यक्तीचा अपघात झालेला असतो. जो आपल्याला माहीत नसतो. कधीकधी आपला देश संस्कारीत असल्यामुळे त्या व्यक्तीला मायबापांनी येवू दिले नसेल किंवा कधीकधी त्या व्यक्तीला येण्याचे साधन मिळाले नसेल वा कधी संबंधीत व्यक्ती आजारी पडला असेल. आता आपण यावर म्हणाल की आता फोन आहे. फोनवर ती व्यक्ती का आली नाही ते तर ती व्यक्ती सांगू शकते ना. त्याचं कारण आहे की कधीकधी अशी बंधनं येतात, ज्याला वेळ म्हणता येईल. ते म्हणजे ती व्यक्ती फोनही करु शकत नाही. याबाबतीत जास्त न सांगीतलेलं बरं. ती बाब समजून घेण्यालायक बाब आहे.' आज दिक्षाला तो व्हॅलेंटाइन दिवस आवडत नव्हता. तसा आजच्याच दिवशी गोपाल तिच्याकडे आला. त्याच्या हातातही एक गुलाबाचं फुल होतं. तेही टवटवीत होतं. तसं त्यानं तिला फुल दिलं. तिनंही तिच्या मनात व्हॅलेंटाइन दिवसाबद्दल अतिशय राग असतांनाही घेतलं. असाच तो प्रसंग. तिला त्या प्रसंगाचा अतिशय राग आला होता. वाटत होतं की याला काय म्हणावं तेच कळेना. कारण एक लेखक अतिशय मेहनतीनं आपलं लेखन करतो. पुस्तक लिहितो. अन् जेव्हा तो पुस्तक काढून विक्रीला ठेवतो. तेव्हा पुढील किंतू परंतु स्वरुपाचे प्रश्न नेहमी ऐकायला मिळतात की ज्याची लेखकालाही कल्पना नसते. पुस्तकाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास लोकं दारु पाण्यावर लाखो खर्च करतात. परंतु पुस्तकावर तो खर्च करीत नाहीत. अशीच पुस्तक. ती एका लेखकानं विक्रीला काढली. त्यावर दुसऱ्या जिल्ह्यातून फोन आला. बोलणं होतं, "मला पुस्तक हवी आहे. तुम्ही पाठवावी." त्यावर त्या लेखकानं म्हटलं, "पाठवणार. मला पुस्तकाचा खर्च पाठवावा." तो लेखक बोलला व त्यानंतर त्यानं त्यावर सवलत मुल्य सांगितलं व हेही सांगितलं की पोष्टाचा खर्च त्यात समाविष्ट होईल. त्यावर त्यांचा प्रश्न. पोष्टाचा खर्च किती येणार. लेखकानं म्हटलं, साधारणतः चाळीस रुपये येणार. त्या लेखकाचं ते बोलणं. त्यावर त्याची छातीत धडधड वाढली असेल असं वाटायला लागलं. त्यावर तो म्हणाला, "एवढा खर्च पोष्टाचा येत नाही राव." याचाच अर्थ असा की लोकं पुस्तकाला नाकापेक्षा मोती जड समजतात. ज्यात काही अनमोल स्वरुपाचे विचार असतात. आजच्या काळात पुस्तक वाचन करा म्हटलं तर ते महाविद्यालयीन तरुणांना आवडत नाही. मात्र त्यांना बागेत, शाळेच्या खानावळीत एकमेकांशी प्रेमाच्या गोष्टी करणं आवडतं. एकवेळ चांगला मित्रानं पाठविलेला व्हिडीओ आवडत नाही. अन् वात्रट स्वरुपाचा मैत्रीणीनं पाठवलेला व्हिडीओ आवडतो. त्याचं कारण आहे प्रेम. अलिकडील काळात वाचन संस्कृती लयास जाते की काय, अशीच चिन्हं दिसत आहेत. लेखकांना वाचकवर्गच मिळत नाही अगदी निःशुल्क पुस्तक उपलब्ध करुन दिलं तरी. एकवेळ अशी येते की शुल्क लावलेली आणि तिही महागडी पुस्तकं प्रसंगी लोकं वाचतात. परंतु निःशुल्क स्वरुपात उपलब्ध करुन दिलेली पुस्तक वाचत नाही. ते मश्गुल असतात व्हिडीओ पाहण्यात. अगदी लहान लहान स्वरुपात व्हिडीओ पाहण्यात व्यस्त असतात. त्यांना पुस्तक एका ठिकाणी बसून वाचणं म्हणजे कंटाळवाणे वाटते. त्यामुळंच ते पुस्तक वाचत नाहीत. व्हिडीओ पाहतात. परंतु हे जरी खरं असलं तरी पुस्तकं हे अति तीव्र स्वरुपाचं ज्ञान देत असतात. तसे ज्ञान व्हिडीओही देतच असतात. परंतु पुस्तकातून मिळालेलं ज्ञान हे चिरकाल टिकतं. तसं ज्ञान व्हिडीओचं टिकत नाही. जरी ते प्रत्यक्षात दृश्य स्वरुपात दिलं जात असलं तरी. शिवाय पुस्तकं हे चिरकाल टिकतात व व्हिडीओ तसे चिरकाल टिकणारे नसतात. असं काही लोकांचं म्हणणं. विशेष सांगायचं झाल्यास व्हिडीओ बनविणे व पुस्तक लिहिणे या दोन्ही क्रिया सारख्याच. दोन्ही मध्ये कसब आहे. ज्याप्रमाणे पुस्तक लिहिणं कठीण आहे. त्याचप्रमाणे व्हिडीओ काढणेही अवघडच. फार प्रचंड ताकद लागते. सगळ्या स्वरुपाची जुळवाजुळव करावी लागते. अशातच कोणी जर आपल्याला वाईट म्हटलं किंवा आपली अवहेलना केली वा उपेक्षा केली तर कधीकधी त्या गोष्टीचा आपल्याला राग येतो. तो राग आपला आपल्यातच मावत नाही. मग उद्रेक होतो आपल्या मनातील विचारांचा. जे मनात चांगले विचार असतात. ते विचार कुविचारात बदलतात. मात्र राग कुणीही येवू देवू नये. दिक्षाला आज गोपालचा राग आला होता. तिचं फुल देणं तिला खपलं नव्हतं. तरीही तो राग आपल्या चेहर्यावर न दिसू देता तिनं तो रागाचा आवंढे गिळला. रागाबाबत काही गोष्टी सांगतो. कारण राग येणे ही आपली स्वाभाविक कृती आहे व प्रत्येकालाच राग येत असतो. तसेच रागातूनच भांडणंही उद्भवत असतात. मात्र यावर एक व्यक्ती मला म्हणाला होता की राग जर येत असेल तर आधी डोळे लावा व काही वेळ गप्प बसा. काही वेळानं डोळे उघडा. राग शांत होईल. दुसरी रागाच्या बाबतीत महत्वाची गोष्ट ही की जर पुढील व्यक्ती आपल्याला रागाच्या भरात काही बाही बोलत असेल तर त्या व्यक्तीचं संपुर्ण बोलणं आधी ऐकून घ्यायचं. मग बोलायचं. म्हणजे त्या व्यक्तीला वाटेल की संबंधीत व्यक्तीनं आपलं बोलणं ऐकून घेतलं. तो किती चांगला व्यक्ती आहे. अशानं पुढील व्यक्तीचा रागही मावळतो व सुकार्य घडतं. मात्र यात अपवाद असा आहे की काही लोकांचे राग कितीही काही केलं तरी मावळत नाही. अशांच्या गोष्टी ऐकलेल्या बऱ्या. महत्वपुर्ण बाब ही की आपली कृतीच कोणाला राग येईल अशी असू नये. जेणेकरुन त्यांना राग येईल. तो रागावलाही असेल कधीतरी. तरी त्या व्यक्तीला आपल्याला त्याचा राग आला आहे हे दाखविण्याची गरज नाही. तसं जर दाखवलं तर राग दिसून येईल व त्याचा परिणाम हा उद्रेकातच होईल ही शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा राग येवू न देता आपण सहकार्याची भावना ठेवावी हे तेवढंच खरं. ज्याप्रमाणे पुस्तक लिहिणाऱ्या लोकांना ती वाचन न करणाऱ्यांचा राग येतो. तसाच राग हा प्रेमीचा प्रेमिकेला वा प्रेमिकेला प्रेमिला येत असतो. ती न आल्यास वा त्या दोन्हींपैकी जो हजर,राहिला नाही तर असे करीत असतांना अतिशय राग येणारच. कारण त्यासाठी भरपूर तयारी केलेली असते. महत्वाचं म्हणजे उद्या व्हॅलेंटाइन दिवस. संबंधीत सर्व जगातील प्रेमी हा दिवस साजरा करणार आहेत व ते एकमेकांना फुलही देणार आहेत. त्यातच एखादा व्यक्ती जर हजर झाला नाही तर त्याचा रागही येणार आहे. तेव्हा तसा राग येवू न देता तो व्यक्ती वा तो प्रेमी का आला नाही हे समजून घ्यावे. कारण कधीकधी असंही घडू शकते की त्या व्यक्तीचा अपघात झालेला असतो. जो आपल्याला माहीत नसतो. कधीकधी आपला देश संस्कारीत असल्यामुळे त्या व्यक्तीला मायबापांनी येवू दिले नसेल किंवा कधीकधी त्या व्यक्तीला येण्याचे साधन मिळाले नसेल वा कधी संबंधीत व्यक्ती आजारी पडला असेल. आता आपण यावर म्हणाल की आता फोन आहे. फोनवर ती व्यक्ती का आली नाही ते तर ती व्यक्ती सांगू शकते ना. त्याचं कारण आहे की कधीकधी अशी बंधनं येतात, ज्याला वेळ म्हणता येईल. ते म्हणजे ती व्यक्ती फोनही करु शकत नाही. याबाबतीत जास्त न सांगीतलेलं बरं. ती बाब समजून घेण्यालायक बाब आहे व त्याबाबतीत राग येवू देवू नये म्हणजे झालं. कारण प्रेमदिवस आहे. त्यामुळंच प्रेम हे देखील तिळगुळासारखे वाटा म्हणजेच त्याचा तिळगुळासारखा गोडवा वाटेल व प्रेमदिवसाचंही सार्थक होईल यात शंका नाही. ******************************************* दिक्षा हुशार होती. ती जिल्हाधिकारी होती. परंतु खटल्यात तिचा पैसा अतोनात खर्च झाला होता. तसं तिनं जे जे प्रसंग पाहिले होते की त्यावरुन तिला वाटत होतं की श्रीमंतीच्या काळात हुशारीला किंमत नसते. श्रीमंतीच्या काळात हुशारीला किंमत नसते. कारण मुळातच गरीबांच्या घरी जे हुशार जन्मास येतात. त्यांना आपल्या परिस्थितीशीच झगडावे लागते. त्यांच्या गरजा गरीबीमुळं पुर्ण करता येत नाही. मग ती शिक्षण शिकण्याची गरज का असेना, अशातच त्यांचं शिक्षणही सुटलं व ते एखाद्या कामावर वेठबिगार म्हणून काम करीत असतात. त्यांच्या हुशारीचा त्यांना काहीच उपयोग होत नसतो. आज देश सुशिक्षीत आहे असं आपण म्हणतो आणि ते खरंच आहे. कारण देशात हुशार जर नसते तर देश आज विकसीत राष्ट्राच्या रांगेत उभा नसता. त्यामुळं देशात चाणाक्ष बुद्धीमत्तेची मंडळी नाहीत असे म्हणताच येत नाही.* आज जगात जसं खानपान व फॅशनला महत्व आहे. तसंच महत्व हुशारी व श्रीमंतीलाही आहे. परंतु सर्वांच्याच घरी विधाता दोन्ही गोष्टी देत नसतो. तसंच सर्वांनाच विधाता सुखी ठेवत नसतो. प्रत्येकाच्या घरी काही काही दुःख असतंच यात दुमत नाही. हुशारी व श्रीमंतीबद्दल सांगायचं झाल्यास प्रत्येकाच्या घरी हुशारी नसते. काही ठिकाणी हुशार असतात तर काही ठिकाणी पैसा असतो. तिथे पैसा वा मालमत्ता एवढी असते की ती मोजता येत नाही. परंतु तो पैसा कसा वापरावा याचं तारतम्य त्या घरात नसतं. तर काही ठिकाणी एवढी हुशारी असते. परंतु त्या हुशारीचा काहीच उपयोग नसतो. म्हणतात ना की चने जिथं असतात, तिथं दात नसतात व दात जिथं असतात तिथं चने नसतातच. आजचा आपला काळ असाच आहे. आजच्या काळात चने व दात असण्याला अर्थ नाही. कारण काही ठिकाणी लोकांनी भ्रष्टाचार करुन पैसा वाढवला आहे. म्हणूनच विधात्यानं त्या ठिकाणी हुशारी ठेवलेली नाही. बऱ्याचशा अशा कुटूंबात एक दोन जण वेडेच असलेले दिसतात. कारण विचारलं असता काहीजण ते व्यंग जन्मापासून असल्याचं सांगतात, तर काहीजण अकस्मात काळानंतर घडलेला प्रकार असल्याचं सांगतात. असं का होतं? त्याचं कारण आहे, पैसा कमविण्यासाठी केलेला भ्रष्टाचार. हुशारी ही सर्वच ठिकाणी नसते. याबाबतीतील एक उदाहरण आहे. एका शाळेत एक मुलगी फारच हुशार होती. कुटूंब सर्वसाधारणही नव्हतं. गरीबच होतं आणि अशातच त्या घरचा जबाबदार व्यक्ती मरण पावला. मग आबाळ झाली. मुलीला शिकवायचे कसे? प्रश्न पडला. ज्यात त्या महिलेनं पैशाअभावी तिची मुलगी हुशार असूनही तिला शिकवले नाही. या ठिकाणी तिच्या हुशारीचा कोणता उपयोग झाला? ही विचार करायला लावणारी बाबच आहे. याबाबतीतील दुसरं उदाहरण असंच आहे. एक गरीबच कुटूंब व त्याही कुटूंबातील ती एक हुशार मुलगी. मुलीला सर्वच यायचं. परंतु वडील दारु प्यायचे. ज्यातून तिच्या आईच्या मनावर परिणाम झाला व तिनं तिला शिकवलंच नाही. दारुड्या माणसाच्या घरची हुशारीची परिस्थितीच सांगू नये. त्या माणसाच्या घरीही हुशार मुलं असतात. परंतु दारुच्या व्यसनानं पुर्णच मुलांच्या हुशारीची राखरांगोळी होत असते. एक असाच दारुडा की त्या घरची त्याची पत्नी त्याला सोडून गेली व तिनं परिस्थितीअभावी तिला शिकवलेच नाही. दारुचं व्यसन असलेल्या घरी जरी हुशारीला किंमत नसते. तशीच किंमत नसते घटस्फोट घेणाऱ्या महिलेच्या घरच्या मुलांच्या हुशारीला. तिच्या घरची मुले हुशार असतात. परंतु तिच्या एकंदरीत वागण्यानं त्याही मुलांच्या अंगच्या हुशारीची राखरांगोळी होत असते. त्याही मुली ऐन वेळेवर मुलांची हुशारी न पाहता आपल्या पतीला सोडून जात असतात. हुशारीला कधीकधी उधळीही लागत असते. त्याला कारणीभूत असतो मृत्यू. अतिश्रीमंत कुटूंबात एखादा मुलगा हुशार असल्यास त्याच्या हुशारीला तेव्हा किंमत उरत नाही. जेव्हा त्याच्या कुटूंबातील त्याच्या आईचा किंवा वडीलांचा मृत्यू होत असतो. अशावेळेस जर एखादा घटक मृत्यू पावल्यास तो दुसरा विवाह करतो. मग दुसरा आलेला घरातील घटक हा अशा हुशार मुलांना शिकवेलच असं नाही. तो सरळ सरळ त्या मुलांना घरी बसवून त्यांना घरच्या कामाला लावत असतो. मग तो घटक श्रीमंत का असेना. तो घटक श्रीमंत जरी असला तरी त्या घरी हुशारीला काही किंमत नसते व हुशारीचा काही उपयोग नसतोच. श्रीमंतीचंही असंच आहे. श्रीमंत कुटूंबात एखादा जरी हुशार व्यक्ती असेल तर त्याच्या कलागुणांना व हुशारीला वाव नसतोच. सगळं काही पैशानंच विकत घेवू शकतो. असा विचार त्या कुटूंबात असतो. अन् तसं घडतंही. कारण सगळं पैशानंच घडून येत असतं. नोकरी, बंगले, गाड्या घोड्या जरी वापरण्याची रीत माहीत नसली तरी पैशाच्या भरवशावर वापरणं सुरु होत असतं अनेक ठिकाणी. अन् एखाद्या घरी जरी अतिहुशार असतील तरी पैसे नसल्यानं ते परिस्थितीशीच लढत असतात. त्यातच त्यांची बुद्धीमत्ता खर्च होत असते. जी बुद्धीमत्ता एखादा प्रयोग करतांना त्या प्रयोगात खर्च व्हायला हवी. परंतु तसे होत नसल्यानं ते मागे पडतात. त्याचबरोबर त्यांची बुद्धीमत्ताही मागे पडते आणि त्यांचा तो देशही. गरीबीत हुशारीला किंमत नसते. कारण त्यांना सतत परिस्थितीशी लढावं लागतं. ज्यात हुशारी खर्च होत असते. ज्या हुशारीची शक्ती मेंदूतून प्राप्त होत असते. ही नेहमी होणारी मेंदूतील झीज त्याच्या हुशारीला नेस्तनाबूत करीत असते. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. व्हॅलेंटाइन दिवस हा अलिकडील काळात वात्रटासारखे वागण्याचा दिवस होता. त्या दिवसाला आज प्रेमी प्रेमिका भेटत असत. गुलाबाचं एक फुल देत असत व भोळ्या भाबड्या प्रेयसींना फसवीत असत. त्यामुळंच तिला आज वाटायला लागलं होतं की असं व्हॅलेंटाइन दिवसाच्या निमित्यानं अभद्र गोष्टी वा कृती घडू नये. संस्कार रुजावेत. जे संस्कार शिक्षणातून रुजवले जावू शकतात. शिक्षणातूनही संस्कार रुजावेत. शिक्षणातून संस्कार रुजायला हवं. कॉपी करणं पापच. परंतु अलिकडील काळात शाळेतील विद्यार्थी हे कॉपी करीत असतात आणि त्यांनी कॉपी करु नये म्हणून कॉपीमुक्त अभियान राबविण्यात येत आहे. परंतु कितीही अशा प्रकारचे अभियान राबवले गेले तरी कॉपी ही कॉपीमुक्त होणार नाही. कारण जे संस्कार आलेले असतात. ते संस्कार हे अभ्यासक्रमातूनच आलेले असतात नव्हे तर ते राबविणाऱ्या घटकातूनही आलेले असतात. त्यातच त्यामध्ये त्या विद्यार्थ्यांचा परीसरही भर टाकत असतो. महत्वाचं म्हणजे असं होवू नये म्हणून अभ्यासक्रमच तयार करतांना तो संस्कारक्षम तयार करावा. तो राबविणारा घटकही संस्कारक्षम असावा आणि त्याचा परीसरही संस्कारक्षम बनावा. जेणेकरुन संस्कार त्या विद्यार्थ्यात रुजेल. ते कॉपी करणार नाहीत. व्यतिरीक्त देशही संस्कारक्षम बनेल हे तेवढंच खरं. अलिकडे शिक्षणाला फार महत्व आलेलं आहे. त्यानुसार शिक्षणाला वाघिणीचे दूध समजले जात असून शिक्षण सर्वांना मिळायला हवं. यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यासाठी ते शिकवीत असतांना वा देत असतांना शिक्षण काही शैक्षणिक धोरणं आखले जात आहेत व बदलत्या अभ्यासक्रमानुसार शिक्षकांना कामाला लादले जात असून विद्यार्थी स्वतः शिकावा व त्याचे सुप्त गुण बाहेर निघावे, त्याचा विकास व्हावा म्हणून तेच सुप्त गुण त्याच्या उदरनिर्वाहाचे साधन व्हावे वा ते सुप्त गुण वृद्धींगत होत जावून ते देशाच्या कामी यावे यासाठी पुरेपूर प्रयत्न केल्या जात आहे. शिक्षण सर्वांना मिळायलाच हवं. ते सर्वांना दर्जेदारच मिळायला हवं. यासाठीच शिक्षण धोरण हे बदलत्या काळानुसार वेळोवेळी आखलं जात असतं. हे सगळं बरोबर आहे. त्यासाठी शिक्षणाची रुपरेषा ठरवली जाते व त्यासाठी प्रशिक्षणं राबवली जातात. त्यासाठी खर्चही केला जातो. परंतु असं असतांनाही व भावी काळात घडणारी पिढी शिकवीत असतांना साहजीकच असं लक्षात येतं की जी पिढी शिकते. त्या पिढीत संस्कारच रुजलेले नाहीत. चारदोन जर सोडले तर त्यातील कुणीतरी गुंड निघतात. कुणीतरी मायबापाची सेवा करीत नाही. कुणीतरी चोऱ्या करतात. असं का होतं? याचाच अर्थ असा की मुलांना लहानपणापासून जे शाळेच्या माध्यमातून संस्कार आपण देतो. ते संस्कार मुळात आपले त्या विद्यार्थ्यांना गुन्हेगारीकडे नेणारे असतात. कारण सध्याच्या अभ्यासक्रमानुसार पाठ्यपुस्तकात संस्कार रुजविणाऱ्या गोष्टी असल्या तरी ते शिकविणारे व अभ्यासक्रम राबविणारे घटक हे स्वतः संस्कारीत नाहीत आणि अभ्यासक्रमही संस्कार देणारा नाही. उदाहरण द्यायचं झाल्यास इतिहासाचं देता येईल. इतिहासात अमूक व्यक्तीनं अमूक व्यक्तीला मारलं. अमूक युगातील व्यक्ती अमूक युगात शिकार करुन जगायचा. यात अशाच प्रकारच्या गोष्टी जर अभ्यासक्रमात राबवल्या जात असतील तर मुलांमध्ये संस्कार रुजणार कुठून? शिवाय आजच्या काळातील शाळेतील परिक्षा. शिक्षक स्वतःच मुलांना चांगला पेपर सोडवता यावा म्हणून मदत करतात. ज्यातून कॉपीची सवय लागणारच. पुढे त्याचा बिनधास्तपणा एवढा वाढतो की ती मुलं चोऱ्याही करु लागतात. आजची काही पाठ्यपुस्तके व अभ्यासक्रम हा जरी संस्कारावर काहीसा आधारीत असला तरी अलिकडील काळात मुलांवर संस्कार कसे करावेत. हा प्रश्न शिक्षकांसमोर आ वासून उभा आहे. कारण तो विद्यार्थी जसा करेल वा जसा वागेल. तसं त्याला वागू द्यायचं आहे. त्याला रागवायचे नाही. मारायचे तर अजीबात नाही. त्यामुळं पुर्वी जो धाक असायचा की ज्या धाकातून मुलं मायबापाची सेवा करायचे. ते आता दिसत नाही. आज जे घटक अभ्यासक्रम राबवतात. त्याच घटकांचं खाजगी आयुष्य पाहिलं तर त्यांचे मायबाप वृद्धाश्रमात दिसतात. कित्येक ठिकाणी पती पत्नीचे वाद असतात. कित्येक ठिकाणी अशा स्वरुपाचा उपक्रम राबविणारा घटक वादाच्या भोवऱ्यात अडकलेला असतो आणि कित्येक ठिकाणी त्या व्यक्तीचे हात हे भ्रष्टाचारात लिप्त असतात. अभ्यासक्रम तयार करणे वा ती प्रक्रिया घडून येणे ही काही साधी पद्धत नाही. ती एखाद्या गर्भात तयार होणाऱ्या बाळासारखी प्रक्रिया आहे. ज्याप्रमाणे एखादे बाळ गर्भात तयार होत असतांना त्या बाळावर आई कशी वागते. ती काय खाते पिते, त्या आईच्या सभोवताल कसे वातावरण आहे. या सर्व गोष्टीचा परिणाम होत असतो. तोच परिणाम अभ्यासक्रम तयार करतांनाही होतो. ज्याप्रमाणे एखाद्या परीक्षकाचे पेपर तपासत असतांना त्याच्या मनात कोणते विचार येतात. त्याचप्रमाणे गुण पेपरवरही उतरतात. त्यामुळंच जेव्हा अभ्यासक्रम तयार होतो. तेव्हा तो तयार होत असतांना वा जो कोणी तो अभ्यासक्रम तयार करण्याची प्रक्रिया करीत असतो. तेव्हा त्या व्यक्तीच्या मनात कोणती भावना असते. त्यानुसार अभ्यासक्रम तयार होवू शकतो. मग तो अभ्यासक्रम त्या व्यक्तीने रागात तयार केला तर तो राग अभ्यासक्रमात उतरणारच आणि तो जर आनंदात असेल तर तो आनंदही अभ्यासक्रमात उतरणारच. जेव्हा तो आनंदात असेल, तेव्हा तो ज्या कथेत आनंद व्यक्त केल्या गेला. ती कथा घेणार आणि जर तो व्यक्ती रागात असेल, तर राग व्यक्त केल्या गेलेल्या कथा घेणार. महत्वपुर्ण बाब ही की अलिकडील काळातील अभ्यासक्रम हा देखील अशाच स्वरुपाचा तयार व्हावा की ज्यातून संस्कार फुलतील. अन् ते राबविणारे घटकही संस्कारक्षम वा संस्कार फुलविणारेच असावेत. ते घटक प्रसन्न व सुविचार बाळगणारे असावेत. जसा अभ्यासक्रमात संस्कार असेल, तसाच तो शिकविणारा घटक हा देखील संस्कारक्षम. उदाहरणार्थ अभ्यासक्रमात खोटे बोलू नका हा संस्कार सांगितला असेल तर त्या राबविणाऱ्या घटकानेही खोटे बोलू नये नव्हे तर त्याने खोटे न बोलता वागावे. तरंच अभ्यासक्रमातून संस्कार फुलतील. ज्या संस्कारातून घडणारी भावी पीढी ही संस्कारक्षम घडेल व देशातील गुन्हेगारीही कमी होईल नव्हे तर देशातही संस्कारक्षमता वाढीस लागेल. जी देशाच्याच विकासाच्या कामात येईल यात शंका नाही. दिक्षानं जात नष्ट करण्यासाठी दाखल केलेला न्यायालयीन खटला. तो खटला आज उच्च न्यायालयात होता व तिथंही ती हारली होती. तिचा खटला न्यायालयात न्यायाधीश महोदयानं नाकारला होता व निकाल देतांना म्हटलं होतं की जात कधीच नष्ट होवू शकत नाही आणि ती नष्ट करण्यासाठी दाखल केलेली कृती ही अतिशय मुर्खपणाची कृती आहे. न्यायालयानं नाकारलेला खटला. त्यावर खजील झालेली दिक्षा. तिच्या मनात न्यायालयीन प्रकरणावर प्रश्नचिन्हं उभं राहिलं होतं. तिला वाटत होतं की अजुनही पक्षकाराला न्याय मिळत नाही. दिक्षा विचार करीत होती. न्यायालयात खटले दाखल होतात. ज्यात पुरावे सापडत नाहीत व आरोपी सुटतात. काही प्रकरणात पुरावे असतात. परंतु ते तपासले जात नाहीत. पक्षकार हा तारीखवर तारीख करीत न्यायाच्या प्रतिक्षेत आपल्या चपला झिजवीत असतो. प्रसंगी तो मरण पावतो. परंतु न्याय मिळत नाही. ही झाली सामान्य लोकांची व जातीची प्रकरणं. अनुसूचित जातीच्याही प्रकरणात असंच घडून येतं. याबाबतीत एक किस्सा आहे. एक प्रकरण न्यायालयात उभं होतं. ते अनुसूचित जातीवर झालेल्या अत्याचाराशी संबंधित होतं. घटना ही एक दिड महिन्यापुर्वी झाली होती. घावही सुकले होते. पीडीत व्यक्तीनं तक्रार टाकली होती. ज्याला तब्बल दिड महिना झाला होता. परंतु पीडीत व्यक्ती गरीब असल्यानं वा त्याच्या ओळख्या पाळख्या नसल्यानं तक्रारीची दखल घेतली गेली नाही. सगळं काही मॅनेज केलं गेलं. त्यानंतर पीडीत व्यक्तीनं गत एक दिड महिन्याच्या तक्रारीवरून दखल का घेतली नाही, म्हणून वरच्या स्तरावर तक्रार केली. त्यानंतर त्या दुसर्या तक्रारीची दखल घेतली गेली व प्रकरण नोंद झालं. त्यानंतर खटला न्यायालयात गेला. न्यायालयात विचारलं गेलं की ज्या तारखेला खटला दाखल करण्यात आला. त्या तारखेला घटना झाली होती का? सहजच नकारार्थी उत्तर निघालं की सदर तारखेला घटना झालीच नव्हती. त्यानंतर प्रकरणाचे पुरावे तपासले गेले. प्रकरणाच्या संबधाने तारखेवरचे पुरावे तपासण्यात आले व ठरवलं गेलं की सदर तारखेला प्रकरण घडलंच नाही व त्या संबंधानं शहानिशा केली असता पुरावेही सापडले नाहीत आणि पुरावे तरी कसे सापडणार? कारण घटना होण्याला दिड महिना झाला होता. घटना अशाच घडतात. संबंधीत तारखेला घडतात व नोंद होतात वेगळ्याच तारखांना. पुरावे घटनेच्या वेळेस मिळतात. ते घटना नोंद होण्याच्या तारखेपर्यंत मिटतात. मग कसा आरोपी जाळ्यात अडेल. त्याला निसटायला बराच वेळ मिळतो व तो सहजच निसटून जातो. अशाप्रकारे घटना घडत असल्याने व त्या घटना वेगळ्याच तारखांना नोंद होत असल्यानं न्याय हा अधुरा राहतो. त्यातच सगळेच आरोपी सुटतात. अनुसूचित जातीवरही असे बरेच अत्याचार होतात. परंतु खटले उभे राहात नाहीत. एखादा खटला उभा राहतो व तो न्यायालयात टिकत नाही. टिकला तरी यशस्वी होत नाही. त्याचं कारण तेच. अनुसूचित जात ही मुळात कालची महान जात. जी राजसत्तेवर असतांना इतर जातींना सन्मानानं वागवत होती. परंतु काळ बदलला व कित्येक काळानंतर या अनुसूचित जातीची सत्ता गेली. त्यानंतर पराभवानंतर व अधःपतनानंतर अनुसूचित जातीवर कालपर्यंत अत्याचार होत गेलेत. जेव्हापर्यंत भारत स्वतंत्र्य झाला नाही वा संविधान बनले नाही. जात..... जातीअंतर्गत भांडण. भांडणारा घटक हा उच्च जातीतील. माझी जात काढली म्हणून भांडण. नवीनच वादाचा मुद्दा. घटनेतील कलम ३(१) व ३(२) नुसार अनुसूचित जातीच्या व्यक्तीवर कोणी इतर उच्च जातीच्या व्यक्तीने अत्याचार केल्यास त्याचेवर ती कलम लावून दाद मिळवून दिली जात असे. ज्यात एखाद्याची जात काढल्यावर तो गुन्हा मानून त्यानं जर जात काढलीच तर तो दंडणीय अपराध मानून त्यावर दाद मागण्याचं प्रावधान संविधानात लिहिलं गेलं. ज्यात दोन तरी साक्षीदार उच्चवर्णीय असायला हवेत. असा मतितार्थ होता. संविधानातील त्या कलमेनुसार जर तो खटला फसलाच किंवा यशस्वी झाला नाही तर न्याय मिळविण्याच्या हेतूनं तो खटला दाखल करण्यात आला असे मानून सदभावना म्हणून त्या खटल्यात तो खटला यशस्वी जरी होत नसेल तर कारवाईचे संकेत नव्हते. त्याच अनुषंगाने दाखल केलेल्या त्या खटल्यात कलम बावीस नुसार शिक्षा नव्हती. तसं पाहिल्यास शिक्षाही व्हायलाच नको. त्याचं कारण आहे की जो अनसुचीत जातीचा व्यक्ती असतो, ज्याचेवर अत्याचार होतो. तो व्यक्ती सरासरी अत्याचार सहन करीत असतो. परंतु तो त्याचेवर अत्याचार जरी झाला तरी त्यासाठी खटला टाकू शकत नाही. एखादाच व्यक्ती असा असतो की तोच हिंमत करतो. हे आजतागायत चालत आलेलं सत्य आहे. अनुसूचित जातीनं टाकलेले बरेचसे खटले फसतात. त्याचं कारण आहे त्यांचं दारिद्र्य. त्यांना खटले लढायला वकील बरोबर न मिळणं. कित्येक अनुसूचित जातीचे खटले सरकारी वकील चालवत असतात. जे खटले व्यवस्थीत लढवत नाहीत. ज्यातून पराभवाचा सामना करावा लागतो अनुसूचित जातीच्या लोकांना. म्हणूनच ही कलम क्रमांक बावीसची तरतूद होती. आता त्यालाही छेद दिलेला आहे. सहानुभूती शब्दच राहिलेला नाही. आता एकदा का अनुसूचित जातीचा व्यक्ती खटला हारलाच तर त्याचेवर ज्याप्रमाणे एखाद्या असहाय्य सापावर असंख्य कावळे अचानक एकाचवेळेस हमले करतात. तसाच हमला उच्चवर्णीय व्यक्ती करतो चारही बाजूंनी. त्यातच त्या उच्चवर्णीय व्यक्तीला संपुर्ण उच्चवर्णीय यंत्रणा धडा शिकविण्यासाठी मदत करीत असते. ज्यातून अनुसूचित जातीचे लचके तोडले जातात. यात महत्वपुर्ण बाब ही की जोपर्यंत तक्रारी घडलेल्या तारखेवर दाखल होणार नाहीत व त्याच दिवशी घडलेल्या प्रकरणाची शहानिशा करुन जेव्हापर्यंत पुरावे नष्ट होण्यापुर्वी पुरावे गोळा केले जाणार नाहीत. तेव्हापर्यंत आरोपी सापडणार नाहीत. आरोपींना शिक्षा होणार नाही. मग इतर जातीतील खटले असोत वा अनुसूचित जातीतील खटले असोत. आज असे बरेच खटले आहेत की जे दाखल होण्यापुर्वीच संपतात. पक्षकाराला गुन्हा नोंदविण्यापुर्वीच आरोपी त्याला धमक्या देतो की ज्या धमक्यांना घाबरून पक्षकार आपल्यावर अन्याय अत्याचार झाला तरी तक्रार दाखलच करीत नाही. घाबरतो. कारण आजच्या पक्षकाराला माहीत झालं आहे की आपण संबंधीत प्रकरणाची तक्रार केली तरी आपल्याला न्याय मिळणार नाही व आपला प्रसंगी पराभव होईलच. अशी बरीच प्रकरणं घडत आहेत. ज्यात आरोपी मोकाट सुटत आहे व पक्षकारच शिक्षा भोगत न्यायालयाचे चक्कर कापत आहे. तारीखवर तारीख करत. मात्र त्यांना अजुनही न्याय मिळत नाही हे तेवढंच खरं. हे असं का घडतं? दिक्षाच्या मनात आलेला विचार. खुद्द न्यायाधीश या प्रकरणावर रास्त बाजूनं विचार करीत नाहीत. कारण कालच्यापेक्षा आजच्या अभ्यासक्रमात विशेष म्हणजे चांगल्या गोष्टीच शिकवल्या जात नाहीत. आज शिक्षणात औपचारिक व अनौपचारिक अशा दोन्ही स्वरुपाचे शिक्षण आलेले आहे. शिवाय आज शिक्षणाची व्याख्याच बदलली आहे. अलिकडच्या शिक्षणात विद्यार्थ्यांना शिकवावेच लागत नाही तर तो स्वतः शिकतो यावर भर दिला जात आहे. त्यानुसार आज शिक्षणाचा साचेबद्ध प्रकार बंद झाला असून मुक्त शिक्षणाचा आकृतीबंध शासनाने स्विकारलेला आहे. असं सरकार म्हणतं. त्यानुसारच विद्यार्थ्यांना वर्गात शिकवले जात आहे. त्यासाठी कृतीवर जास्त भर दिला जात असून त्यासाठी शिक्षकांची कृती जेवढी महत्वाची आहे. विद्यार्थ्यांची कृतीही तेवढी महत्वाची आहे व त्याच कृतीला वाढविण्यावर जास्त भर दिला जात आहे. अन् हे करीत असतांना विद्यार्थ्यांच्या औपचारिक शिक्षण घेण्याचे वयही बदललेले आहे. शिक्षण...... कालमितीला शिक्षणाचा इतिहास पाहिल्यास जेव्हा कानाला हात पुरायचा. तेव्हा त्याचं नाव शाळेत दाखल केलं जात असे. ते तसं वय ठरविण्याचं कारण होतं, त्या मुलांचं आत्मनिर्भर होणं. ते मुल वयाच्या सातव्या वर्षीच आत्मनिर्भर व्हायचं. आपली कामे आपण स्वतःच करायचं ब्रीद, ते मुल शाळेत येण्यापुर्वीच शिकून येत होतं. ते ब्रीद त्याला शिकवावंच लागत नव्हतं. जसे प्रातःक्रिया करणे. आज प्रातःविधीपासून तर सर्व प्रकारच्या क्रिया शाळेत शिकविल्या जाणार. कारण नर्सरीपासून म्हणजे मुलाच्या वयाच्या तीन वर्षापासून मुलांना शिक्षण प्रवाहात आणायचे आहे. काही दिवसानं तोही स्तर बदलणार व मुलांच्या जन्मापासूनच त्याला शाळेत ठेवावं लागणार. ही शंका नाकारता येत नाही. तो काळ व ते वय. जरी आज त्या शिकण्याला घोकंपट्टीचं वय समजत असले तरी खरं शिक्षण तेच वाटायचं. ज्या शिक्षणातून पुढे प्रत्येक विद्यार्थी अगदी अल्पवयातच आत्मनिर्भर बनायचा. विद्यार्थी आत्मनिर्भर असायचा. त्याचं कारण असायचं त्याचं वय. ते वय वाढलेलं असायचं व त्या वाढलेल्या वयात त्या विद्यार्थ्यांचा मेंदू हा अधिक विकसीत झालेला असायचा. त्यातील काही विद्यार्थी घोकंपट्टी करीत शिकायचे. काही विद्यार्थी शिकत नव्हते. कारण त्या विद्यार्थ्यांच्या शिकण्यात वातावरण वा परीसर कारणीभूत असायचा. वडीलांचं सतत आईला मारणं तसंच वडीलांचंही दारुचं व्यसन हे त्याला कारणीभूत असायचं. शिवाय त्या शिक्षणाला महत्वपुर्ण अडथळा होता, तो म्हणजे विद्यार्थ्यांच्या घरी असलेले त्याचे भाऊबहिण. ते जरा जास्तच असायचे. आज हा भाग कालबाह्य झाला व प्रत्येक बालक आज शिकू लागला आहे. कारण आज शिक्षण शिकण्याचं व शिकविण्याचं महत्व वाढलेलं आहे. शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झाल्यास कालची मुले महामारीत डॉक्टर औषधाला सापडत नाहीत व महामारीत लेकरं विना औषधानं मरण पावतात, म्हणून जन्मास घालावी लागायची. त्यानंतर त्याचे आईवडील मुलांना शाळेत तर टाकत असतच. परंतु मुलं शिकलीच पाहिजे ही काही त्यांची अपेक्षा नसायची व मुलांनाही मी शिकलोच पाहिजे असंही वाटायचं नाही. ज्यातून मुलं जरी स्वतः कोणाचीही मदत न घेता आत्मनिर्भर बनत असली तरी त्याला त्या काळात विशेष महत्व नव्हतं. आज तीच मुलं आहेत की जी मुलं आपल्या मुलांना शिकवितात. हे केवळ आज वाढल्या असलेल्या शिक्षणाच्या महत्वामुळे. आज काळ हळूहळू बदलला व मुल जन्मास कात्री लागली. त्याचं कारण म्हणजे औषधे व तंत्रज्ञानाचा शोध. तसेच महागाई. या तीन भात्यातील तलवारीनं जुन्या काळातील आत्मनिर्भर करणाऱ्या शिक्षणाची हत्या केली. अन् त्या जागी नवीन शिक्षण आणलं. त्यासाठी फार मोठी जाहीरात केली गेली. जाहीरात होती, जुनं शिक्षण बेकार होतं, आजचं नवीन शिक्षण चांगलं आहे. विशेष म्हणजे नवीन शिक्षणाबद्दल सांगता येईल की आज मायबापांना दोनच मुलं असतात. त्यातच महागाईची झळ जास्त प्रमाणात सतावू नये म्हणून लोकांनी दोनच लेकरं ठेवली. तसंच अलिकडील काळातील जाहीरातीनुसार जे शिक्षण शिकत असतांना तो विद्यार्थी आत्मनिर्भर होत नसेल तर ते शिक्षण कोणत्या कामाचं? असं म्हणण्याची वेळ येवू नये म्हणून अलिकडील शिक्षण व्यवस्थेची जाहीरात मोठी व त्यामागे काहीतरी मोठी गंभीर बाब, ती म्हणजे जुन्या काळातील राबवलेल्या अभ्यासक्रम यंत्रणा लपविण्याचं षडयंत्र घडत असल्याचं चित्र दिसतं. अलिकडच्या काळातील शिक्षण सांगतं की विद्यार्थी हा केवळ शाळेतच शिकत नाही. तर तो परीसरात शिकतो. त्यासाठी त्याला शिकविण्याची गरज नाही. त्याला फक्त मार्ग दाखविण्याची गरज आहे. हे सगळं करीत असतांना त्याच्या कौशल्यावर व कृतीशिलतेवर आज भरपूर दिला आहे. वय कमी केलं आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी अलिकडील शिक्षणाला हे माहीत आहे की पुर्वीच्या शिक्षणानं विद्यार्थ्यांना आत्मनिर्भर केलं. ती मुलं शाळेत शिकत जरी नसली तरी ती आपोआपच आत्मनिर्भर बनायची. उदा. थॉमस अल्वा एडीसनसारखे बरेचसे शास्त्रज्ञ की जे शाळेतच गेले नाहीत. तरीही त्यांनी मोठमोठे शोध लावलेत. काल शाळेत जाण्याचे वय जास्त होते व आज ते कमी झालेले आहे. अर्थात आकृतीबंधानुसार पुर्वप्राथमिक वर्ग शाळेला जोडलेला आहे व एक नवीन स्वरुपाचा आकृतीबंध तयार केल्या गेला आहे. शिवाय या नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलगा हा वातावरणातून अनौपचारिक शिक्षण शिकायला हवा. जे पुर्वी अभिप्रेत होतं व तीच क्रिया आज आपोआपच घडत असे. आज ती घडावी असा आकृतीबंध तयार केला आहे. तसंच आज ज्या शिक्षणावर भर दिलं जातं. तो स्तर आहे, ५+३+३+४. याचाच अर्थ असा की वय वर्ष सात वर्षापर्यंत पहिला पाचचा स्तर. ज्यात बालवाटिका स्तर अर्थात नर्सरी, त्यानंतर केजी वन व केजी टू. या इय्यतेचा समावेश केल्या गेला आहे. याचाच अर्थ असा की मुलगा शिको की न शिको. औपचारिक शिक्षणातून त्याला पुर्वीसारखं स्वतः आत्मनिर्भर बनू द्यायचे नाही तर त्याला आपण आत्मनिर्भर व्यक्ती बनवायचे आहे. त्यासाठी त्यांच्यावर त्यांना समजायच्या आतच क्रिया प्रतिक्रिया करायच्या आहेत. याचाच अर्थ असा की विद्यार्थ्याला मातीची उपमा दिली तर त्या मातीला आपल्याला जसा आकार द्यायचा असेल, तो देण्यात येईल. यात महत्वपुर्ण भाग असा की एकीकडे सरकार म्हणतं की विद्यार्थ्यात काही सुप्त गुण असतात. ते गुण आपण विचारात घेवून त्या गुणांनुसार शिकवायचे. त्या गुणांना वाढीस लावायचे. ज्या गुणांचा वापर करुन मुलांना आत्मनिर्भर बनवायचे व नवनिर्मीती करायला लावायची. तर दुसरीकडं सरकार अशा मुलांचे वय वर्ष लक्षात न घेता त्याच्या अगदी तीन वर्षाच्या काळापासून शिकवायचे. जेणेकरुन तो मुलगा म्हणजे ओली माती व तो नर्सरीचा वर्ग म्हणजे एखादे भांडे आकार देणारं. यात उदाहरण द्यायचं झाल्यास दारु तीच आहे, पिणारेही तेच आहेत. फरक इतकाच आहे की त्याचे भांडे वेगवेगळे आहे. सरकार हे सांगत नाही की आमच्याही देशात आम्हाला कॉन्व्हेटचं शिक्षण आणायचं आहे. परंतु सरकार हे सरळ सरळ सांगत नाही. विशेष सांगायचं झाल्यास सरकारनं नक्कीच कॉन्व्हेंटचं शिक्षण आणावं. त्याला मनाई नाही. ज्याचा पॅटर्न याआधीच कॉन्व्हेंटच्या शाळेच्या स्वरुपात राबविण्यात आला. ज्या शाळेत आतापर्यंत केवळ श्रीमंतांची मुलं शिकत होती. आता शाळा या मराठी माध्यमाच्या राहणार आहेत स्तर आणि अभ्यासक्रम हा कॉन्व्हेंट स्वरुपाचा राहणार आहे. परंतु स्तर व अभ्यासक्रम हा जरी कॉन्व्हेंट स्वरुपाचा असला तरी कालच्या शिक्षणालाही वा अभ्यासक्रम आणि स्तरालाही नावबोटं ठेवता येणार नाही. कालचाही अभ्यासक्रम त्यातच स्तर आणि तेवढंच शिक्षणही तेवढंच महत्वाचं होतं. यात शंका नाही. समजा कालचं शिक्षण जर आत्मनिर्भरतेला बळ देणारं नसतं तर कदाचीत आज जो अभ्यासक्रम तयार केल्या गेला. तोही कदाचीत करता आला नसता हे तेवढंच खरं.****************************************** जातीआधारावर निर्माण झालेला तो खटला. आज दिक्षानं न्यायालयात दाखल केलेला तो खटला. ती उच्च न्यायालयात जरी अपयशी ठरली असली तरी तिनं हिंमत हारली नव्हती. तिनं तो खटला पुन्हा एका नव्या जिद्दीनं सर्वोच्च न्यायालयात दाखल केला. ज्यात त्या खटल्यातील तथ्यांश एका खंडपीठात तपासण्यात आलेत. त्या खटल्यातील बारकावेही लक्षात घेण्यात आलेत. त्याचे फायदे तोटे अभ्यासण्यात आलेत. ज्यातून फायद्याचा विचार केल्यास फायद्यापेक्षा तोटेच जास्त होते. जातीनं कित्येक उपवर मुलामुलींचे जीव गेले होते. जातीनंच अंधश्रद्धा पसरवल्या होत्या व जातीनंच कित्येकांवर अत्याचारही केले होते. हाच भाग लक्षात घेवून सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. ते म्हणालं, "जात ही तसं पाहिल्यास नष्टच व्हायलाच हवी. कारण जातीचे फायद्यापेक्षा नुकसानच जास्त आहे. परंतु ती सरासर नष्ट केली जावू शकत नाही. कारण ती नष्ट व्हायला बराच वेळ लागू शकेल. त्यासाठी जनमत तयार होणं गरजेचं आहे. ते जेव्हापर्यंत निर्माण होत नाही. तेव्हापर्यंत जात ही नष्टही केली जावू शकत नाही. मात्र न्यायालय अशिलाला एक संधी नव्हे तर निर्णय देत आहे की जर तिला तिची जात तिच्या मुलांसमोर शाळेत दाखल करतांना टाकायची नसेल तर तिची ती कृती समर्थनीय राहिल. त्यासाठी तिला बंधन नको आणि भविष्यातही जर एखाद्याला तिच्यासारखी कृती करायची असेल वा आपल्या मुलांना शिकवितांना त्यांच्या नावासमोर जात लावायची नसेल तर त्यालाही तशा स्वरुपाचं बंधन नको. याची मुभा या निकालाच्या पाश्र्वभूमीवर देत आहे. हाच न्यायालयाचा अंतिम निर्णय आहे व यानंतर कोणाला आपल्या नावासमोर जात लिहायची नसल्यास हाच पुरावा ग्राह्य धरण्यात यावा. हाच न्यायालयाचा या प्रकरणात अंतिम निर्णय आहे." न्यायालयानं दिक्षाला तिच्या प्रकरणात दिलेला निर्णय तिला योग्य वाटला होता. तिला अतिशय आनंद झाला होता. त्यानंतर तिनं त्याच निकालाचा आधार घेवून आपली मुलं, त्यांच्या नावासमोर जात न लावता शिकवली. आज ती विदेशात स्थावर झाली होती. ज्या देशात जातीव्यवस्था नव्हती तर वर्गव्यवस्था होती. आता कुणालाही कोणीही आपल्या नावासमोर जात लावण्याबद्दल मनाई करु शकत नव्हते. शाळेतही आपल्या मुलांचे नाव दाखल करतांना जात लावण्याबद्दल शिक्षकही जबरदस्ती करु शकत नव्हते. एकंदरीत सांगायचं झाल्यास जात विरहीत समाज तयार होवू लागला होता. आता लोकं आपल्याच जातीची कामं न करता कोणत्याही जातीची कामं स्वखुशीनं करु लागले होते. ज्यातून त्यांना आनंद प्राप्त होत होता. कामं करतांनाही जात महत्वाची नव्हती तर काम हेच ब्रीद होतं व काम महत्वाचं होतं. न्यायालयातील प्रकरण निवळताच न्यायालयीन लढाई जिंकलेल्या दिक्षाला भेटायला तिचा पती आला असता त्यानं तिचं अभिनंदन केलं व आपण आपला संसार नव्यानं सुरु करण्याबाबत तिला विनंती केली. परंतु तिनं ती विनंती धुडकावून लावली व तिनं गोपालशीच विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर ती गोपालशी विवाहबद्ध झाली होती. दिक्षाला गोपालची व्हॅलेंटाइन दिवसाला गुलाबाचं फुल देण्याची कृती पटली नाही. परंतु त्यानं केलेली सोबत तिला पटली होती. त्यातच निकाल लागल्यानंतर तिनं त्याचेशीच विवाह केला होता व ती त्याचेसमवेत सुखी राहू लागली होती. आज तिची मुलं विदेशात स्थायिक झाली होती. ज्या देशात आपल्या नावासमोर जात लावण्याची पद्धत नव्हती. तिही अतिशय सुखी होती व आपल्या आईनं केलेल्या कष्टाबद्दल कृतज्ञताही व्यक्त करीत होती. आज दिक्षा व गोपाल म्हातारे झाले होते. त्यांच्या डोळ्यानं बरोबर दिसत नव्हतं, ना कानानं बरोबर ऐकायला येत होतं. परंतु ते आजही लोकांचे चाहते बनले होते नव्हे तर मार्गदर्शक बनले होते. त्यांनी जणू आपल्या कृतीनं लोकांचे डोळे उघडले होते. ***********************************समाप्त ************