मायबापांनीच सुधारण्याची गरज?
*आपण फेसबुक, इंन्टॉग्राम, यु ट्यूब पाहतो. व्हाट्सअप पाहतो. त्यात एक व्हिडिओ आपण पाहिलाच असेल. एक बँकेतील कर्मचारी आपली पंचर झालेली गाडी घेवून पंचर सुधरवायला पंचर दुकानात येतो. तेव्हा पंचरवाला त्याला कुठे काम करीत आहे हे विचारतो. त्यावेळेस त्यानं टायरमधील ट्युब उघडलेला असतो. तो कर्मचारी जेव्हा बँकेचं नाव घेतो. तेव्हा तसं नाव घेताच पंचरवाला घड्याळात बघतो. त्यानंतर तो जेवायला बसतो. त्यावर पंचरवाल्याला कर्मचारी विचारतो की त्याला फारच घाई आहे. कार्यालयात वेळ होतो आहे. त्यावर उत्तर देत पंचरवाला म्हणतो की त्याचा आता लंचटाईम झालेला आहे व तो पंचर लंचटाईम संपल्यानंतर सुधारेल. हा व्हिडीओ व हा संवाद. नेहमी आपण बघितलेला. यात वागणूक प्रदर्शित झालेली. या व्हिडीओतून बँकेतील कर्मचारी वा कार्यालयातील कर्मचारी आपल्याशी कसे वागतात? यावर भाष्य करीत असलेलं दिसून येत असतं. आपल्या जीवनातही तेच घडत आहे. आपण सन्मार्गानं पैसा कमवला आणि विचार व व्यवहार जर चांगले ठेवले तर आपलं भाग्य उजळतं. त्यातच आपलं म्हातारपण चांगलं जातं. आपल्या मुलाबाळांनाही कोणी टोमणे मारत नाहीत. त्यांच्यावर संकटही येत नाहीत. शिवाय आपण याउलट वागलो तर संकटं आपल्या आणि आपल्या मुलाबाळांच्या पाचवीला पुजलेले असतात. त्यांना त्यांच्या जीवनात शेवटच्या श्वासापर्यंत टोमणेही मारत असतात. एकंदरीत सांगायचं झाल्यास त्यांचं जगणं कठीण करुन टाकतात. म्हणूनच मायबापांनी सुधरावं. कारण ते सुधारले तर त्याचा फायदा त्यांच्या मुलाबाळांनाच होतो. त्यांना लोकं चांगले म्हणत असतात. म्हणतात की ज्यांचे मायबाप चांगले. त्यांची मुलंही चांगली. ते जलमर व्याभिचारी असतील तर मुलं कितीही चांगली वागली तरी लोकं त्यांना दुषणे लावत असतात.*
नुकताच पितृदिन पार पडला. समस्त मुलांनी आपल्या पित्यांना शुभेच्छा दिल्या. काहींनी पितृदिन मोठ्या थाटामाटात साजरा केला. काहींही स्तुतीसुमनेही उधळलीत. कारण त्यांना आपल्या पित्यावर गर्व असेल.
ते मायबाप. त्या मायबापावर आपल्याला गर्व असायलाच पाहिजे. अन् का नसणार. कारण ते जन्म देतात. लहानाचं मोठं करतात. शिक्षण शिकवतात व आपल्याला मोठ्या हुद्द्यावर पाठवतात. विवाह सुद्धा करुन देतात काही मायबाप आणि नोकरीलाही लावून देतात काही काही मायबाप.
आपले आईवडील आपली सेवाच करतात. उन्हातून सावलीत नेतात. त्यांना कळतं की बाळ हे माझं आहे. ते माझं बाळ म्हणून आपल्या बाळाची ते काळजी घेतातच. बदल्यात काही मुलं त्यांचं म्हातारपण येताच त्यांची सेवा करीत नाहीत. त्यांना वृद्धाश्रमात पाठवीत असतात. हे अपवादात्मक घडतं. बरीचशी मुलं ही आपल्या आईवडीलांची सेवाच करीत असतात.
आईवडीलांचा आपल्याला अभिमान असतो. एवढा अभिमान असतो की आपण आपल्या आईवडीलांबद्दल वाईट ऐकूच शकत नाही. आपला क्रोधाग्नी भडकतो. आपल्याला तसं बोललेलं अजिबात चालत नाही. अन् चालणार तरी कसं? आपल्याला माहितच असतं आपल्या आईवडीलांनी आपल्यासाठी कितीतरी उपसलेले कष्ट. त्यामुळंच कोणीच कोणाचा ब्र देखील आपल्या आईवडीलांविरुद्ध ऐकू शकत नाहीत.
आपल्याला आपल्या आईवडीलांचा अभिमान आहे. असायलाच हवा. त्यासाठी आपल्या आईवडीलांनी कसं राहायला हवं. यावर आईवडीलांनीच विचार करायला हवा. आईवडील चांगले असले तर त्या बाळाला आपल्या आईवडीलांची माहिती देतांना गर्वच वाटत असतो. शिवाय अशांच्या आईवडीलांविरुद्ध कोणी ब्र देखील काढू शकत नाहीत. परंतु ज्यांचे आईवडील चांगले नसतात. त्यांच्या आईवडीलांविरुद्ध त्यांच्या मुलांना वेळोवेळी ताणे ऐकावे लागतात. विशेष म्हणजे आपण जर आपल्या मुलांवर प्रेम करीत असेल तर आपण आपल्या मुलांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त करतो. त्यांचं भविष्य उज्ज्वल बनविण्याचा प्रयत्न करतो. ज्यात त्यांना आपल्या पश्चात कोणी बोलू नये असं प्रत्येक आईवडिलांना वाटत असतं. ते जर चांगले आईवडील असतील तर. अन् ते जर चांगले आईवडील नसतील तर त्यांना मुलांशी व मुलांच्या आयुष्याशी काही घेणंदेणं नसतं. इथं तर काही आईवडील असे आहेत की मुलं असतांनाही व पत्नी असतांनाही व ती पत्नी सुस्वभावी असतांनाही बेहेर शारिरीक संबंध ठेवतात. हे अनैतिक संबंध असतात. कधीकधी अशा संबंधातून विवाह करुन दुसरी पत्नी घरात आणतात. ज्यांची वाईट फळं आईवडिलांना नाही तर बाळांना चाखायला मिळतात. याच प्रकरणापासून कधीकधी खुनही घडून येतात व त्यांचाही परिणाम मुलांच्या भविष्यावर होतो.
पोट..... माणसाचं पोट हे सर्वात महत्वपुर्ण इंद्रीय आहे. पोट असं इंद्रीय आहे की ते पोट भरण्यासाठी व्यक्ती काहीही करीत असतो. ज्यात काही लोकं चोऱ्याही करीत असतात. कोणी लुटमारही करतात. कोणी सुपारी घेवून खुनही करतातच. त्यांनाही मुलं असतातच. तेव्हा व्यक्ती असा चोरी, लुटालूट करुन आपल्या परिवाराला पोसत असेल, अशावेळेस त्याची चोरी, लुटमार उघडकीस आली आणि तो तुरुंगात गेला तर त्या व्यक्तीची बदनामी होते. त्यानंतर त्या व्यक्तीबाबत लोकं टोमणे त्यांच्या मुलांनाच मारत असतात. ज्यात मुलांचा गुन्हा नसतोच. तसाच कोणी दारु पित असेल, तर त्याच्या मुलांना त्यांच्या दारुवरुन टोमणे असतात आणि कोणी व्याभिचार करीत असेल तर त्यांच्या व्याभिचारावरुन त्यांच्या मुलांना टोमणे असतात. याउलट ज्याचे मायबाप चांगले असतात. त्यांच्याबद्दल काही म्हणायचा प्रश्नच उद्भवत नाही.
व्याभिचार..... काही काही मायबाप हे व्याभिचारीही असतात. त्यांना व्याभिचार करतांना आपल्या लेकरांशी काही घेणंदेणं नसतं. समाज आपल्याला काय म्हणेल? याचीही पर्वा नसते. ते अनैतिक संबंध चालवतात. कधी लपूनछपून तर कधी उजागिरीनं दुसरी पत्नी करतात. त्यातच अशाही काही घटना घडतात की त्यातून हत्याही घडत असतात. एक अशीच घटना. वर्तमानपत्रात छापून आलेली. अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची हत्या केली. याचाच अर्थ असा की आज व्याभिचारीपणाही वाढलेला असून त्यानं कळसच गाठलेला आहे. ही वर्तमानपत्रात छापून आलेली एकच घटना नाही. अशा प्रकारच्या बऱ्याच घटना आहेत की ज्यातून त्यांनी जन्मास घातलेल्या लेकरांना दुषणंच ऐकावी लागतात. अशी मुलं पितृ मातृदिन कसे साजरे करतील? ते आपल्या आईवडीलांच्या मृत्यूनंतरही त्यांना वाईटच लेखत असतात. जरी त्यांनी जन्माला घातलं असेल, लहानाचं मोठं केलं असेल, उन्हातून सावलीत नेलं असेल. काहीकाही मुलं अशीही असतात की ज्यांचं शिक्षण पालनपोषण बेईमानीच्या पैशातून झालेलं असतं. काही लोकं बेईमानी करुन एवढं धन गोळा करतात. त्यानंतर त्या धनातून ते आपल्या मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवतात. ती मुलं नोकरीवरही लागतात. विदेशात नोकरी करु लागतात. कालांतरानं आईवडील म्हातारे होतात. परंतु ती मुलं आपल्या आईवडीलांकडं ढुंकूनही पाहात नाहीत. शिवाय अशी मुलं आपल्या आईवडिलांना चक्कं वृद्धाश्रमात टाकत असतात. तशीच ती त्यांच्या मृत्यूनंतर मैयतीतही येत नाहीत. कारण ते धन बेईमानीचं असतं.
महत्वपूर्ण बाब ही की बेईमानी करुन असं धन का कमवावं की त्या धनातून आपल्या मुलांनी माणूसकी सोडून तशा स्वरुपानं वागावं. आपलं वर्तन असं ठेवू नये की ज्यातून आपल्या मुलांना टोमणे ऐकावे लागावेत. विशेष सांगायचं म्हणजे आपण आईवडील आहोत ना व आपल्याला आपली मुलं चांगल्या स्वभावाची हवी आहेत ना. तर चांगलं कर्म करावं. याचा फायदा आपल्याला नक्कीच होईल. कदाचीत आपल्या चांगल्या वागण्यानं आपल्याजवळ पैसा कमी असणार. कदाचीत आपल्या चांगल्या वागण्यानं मुलं जास्त शिकणारही नाहीत. परंतु संस्कार व माणुसकी त्यांच्यात कुटकूट भरलेली असेल. कोणीही त्यांना टोमणे मारणारच नाहीत. उलट इज्जत करतील. म्हणतील की अमुक अमुक मुलांचे आईवडील फारच छान होते. ते त्यांना सर्वतोपरी मदतही करतील. त्यांच्याच आईवडीलांकडे पाहून. असे जर घडले तर स्वाभिमानानं आपल्या मुलांना त्यांच्या आईवडीलांबद्दल गर्व वाटेल. जर आपण चांगले वागलो तर...... नाही तर पळसाला पानं तीनच असल्यागत आपली व आपल्या मुलांची स्थिती होईल. लोकं आपल्याच वाईट कामाचं खापर आपल्या मुलांवर फोडतील आणि मुलं त्यांच्या आयुष्यभर जन्म घेवूनही आपल्याच मायबापांना कोसत राहतील यात शंका नाही.
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०