You should definitely go for a walk. But...... in Marathi Philosophy by Ankush Shingade books and stories PDF | फिरायला अवश्य जावे. पण......

Featured Books
Categories
Share

फिरायला अवश्य जावे. पण......

फिरायला अवश्य जा. पण.......   

       आपण फिरायला जातो. कारण आपल्याला फिरणे आवडते. निसर्ग पाहाणं आवडतं. किल्ले व प्रेक्षणीय स्थळं पाहाणं आवडतं. जंगल, वनसंपदा व प्राणी पाहाणं आवडतं. विचित्र वस्तू वस्तू, व्यक्ती पाहाणं आवडतं. धार्मिक स्थळं पाहाणं आवडतं. धरणं, जलाशयं, नदी नाले, समुद्र पाहाणं आवडतं. त्यात अंघोळ करणं आवडतं. त्यासाठीच आपण फिरायला जात असतो.  

        फिरणे अतिशय सुंदर कृती. कुणी सहलीसाठी फिरायला जात असतात. तर कुणी घरी कंटाळवाणं वाटते म्हणून फिरायला जात असतात. कुणी कामानिमित्त फिरायला जात असतात. कुणी मनोरंजन म्हणून फिरायला जात असतात तर कुणी कोणत्या कारणानं. फक्त त्यांच्यासाठी फिरणं महत्वाचं असतं.         फिरायला जाण्याचा बेत. तो बेत जर घरात माहिती पडला तर भरपूरच आनंद आणि उत्साह संचारतो आपल्या परिवारात. अगदी ताजेतवाने झाल्यासारखे वाटत असते. एवढं फिरण्याला महत्व आहे. 

        फिरणे हे कुठे व्हायला हवे? असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. फिरायचं असेल तर एखाद्या भकास टेकडीवर आपण जात नाही. ना मोकळ्या मैदानात आफण फिरायला जात. मग आपण फिरायला कुठे जातो? फिरायला जातो आपण एखाद्या तलावाच्या काठावर. एखाद्या शेतात. एखादी नदी पाहायला. जंगल पाहायला. मंदिरं पाहायला. त्यातल्यात्यात आपण फिरायला जातो किल्ले व वस्तुसंग्रहालय पाहायला आणि प्राणीसंग्रहालय पाहायला. आता फिरायला जातो कुत्रीम निर्माण झालेले रिसॉर्ट पाहायला. ज्यात मनोरंजनासोबतच जेवनही असतं.

        अलिकडे अशी बरीच ठिकाणे निर्माण झाली आहेत की त्या ठिकाणी मनोरंजनच मनोरंजन असते. अशा ठिकाणी बैलगाडीतून फिरायला मिळते. जे शहरातील मुलांनी पाहिलेलं नसतं व बैलगाडीतून बसून प्रवास करणे त्यांना अतिशय मनोरंजनाचं वाटतं. कधी उंट वा हत्तीवर बसून स्वारी करायला मिळत असते तर कधी घोड्यावरील स्वारी करायला मिळते. या रिसॉर्टमध्ये जादूचे खेळ असतात. काचेवर उभ्या राहणाऱ्या व माठ घेवून नृत्य करणाऱ्या स्रिया असतात. याच स्रिया थयथय काचाच्या तुकड्यावरही नाचत असतात. तशीच रिसॉर्टमध्ये दोरीवर खेळणारी व कलाकृती दाखविणारी मुलं असतात. त्या मुली सर्कशीत जसं दाखवलं जातं. तशाच करतबी या दोरीवरही दाखवतात. त्यातल्यात्यात आपल्याला पाहायला मिळणाऱ्या कळसुत्री बाहुल्या. त्याही आपल्याला रिसॉर्टमध्ये पाहावयास मिळतात. अलिकडील काळात फिरायला रिसॉर्टमध्ये गेल्यावर रिसॉर्टमध्ये त्याःची फ्वतःची बससुविधा असते. ते जंगल फिरायला नेत असतात. त्यातच त्या बसमधून फिरायला गेल्यानंतर आपल्याला वन्यप्राण्यांचेही दर्शन होत असते. तसंच अलिकडील रिसॉर्टमध्ये पोहोण्याच्याही सुविधा आहेत. त्यातच नावेतूनही फिरवत असतात. हे सगळं फिरुन झालं की मग जेवन तेही स्वादिष्ट व रंगारंगाचं मिळत असते.

          रिसॉर्टचं शुल्क भरपूरच असते की जे शुल्क सामान्य लोकांना परवडत नाही. परंतु असं शुल्क जरी परवडत नसलं तरी ते शुल्क तिथं जे काही पाहायला मिळतं, जे काही खायला मिळतं. अन् जे काही तिथं मनोरंजन होतं. त्यापेक्षा जास्त मोठं नसतं.  

        फिरण्यातून हवामान बदल होतो. नवा उत्साह मनात निर्माण होतो. कार्य करण्याचा जोम निर्माण होतो. एवढंच नाही तर फिरण्यातून मन प्रफुल्लित होत असतं. तशीच वर्षभर मनावर आलेली मरगळ फिरण्यातून दूर होत असते. परंतु हे जरी खरं असलं तरी कधी कधी फिरण्याला गालबोट लागत असतं. जेव्हा अपघात होत असतो. असे बरेचसे अपघात झालेले आहेत. जसे दोन वर्षापुर्वी नागपूरात झालेला अपघात. एक विद्यार्थ्यांची बस सहलीनिमित्य विद्यार्थ्यांना फिरायला नेत होती. दुसरी घटना अशीच घडली होती. पंढरपूर यात्रेनिमीत्य भाविकांना फिरायला नेणाऱ्या एका बसचा पंढरपूरवरुन परत येत असतांना अपघात झाला होता. असे कितीतरी अपघात आहेत की जे लोकांच्या फिरायला जाण्यावर बंदी आणतात. परंतु तरीही फिरायला जाणं आवडतं. कधी कोणी फिरायला गेल्यानंतर जलाशयात पोहतांना डुंबून मरण पावतं तर कधी वन्यप्राण्यांच्या कचाट्यात सापडून मरण पावतं. कधी धार्मिक स्थळावर आतंकवादी हल्ले झाल्यानं मरण पावतं तर कधी धार्मिक स्थळावर पुरसदृश्य स्थिती निर्माण झाल्यावर मरण पावतं. नुकतीच घडलेली पहलगामची घटना. याही घटनेत भावीक फिरायलाच गेले होते. ज्यातून कुंकू पुसलं गेलं. ज्यासाठी ऑपरेशन सिंदूर करावं लागलं.

         फिरणे..... फिरणे ही जरी कृती चांगली वाटत असली तरी त्या फिरण्यातून आपल्यावर संकटं येत असतात. अशी संकटं येत असतात की त्यातून आपण सावरु शकत नाही. कधी आपलेच प्रियजण मरण पावत असतात तर कधी आपला आधार जगातून निघून जात असतो. तरीही लोकं कालापकाल ते सर्व विसरुन पुन्हा नव्यानं फिरायला जात असतात.          महत्वाचं सांगायचं झाल्यास फिरणे ही एक चांगली बाब आहे व फिरायलाच जायलाच हवं. कारण त्यातून आपल्या मनात नवा जोश व उत्साह निर्माण होत असतो. हे जरी खरं असलं तरी फिरण्यातून जे संकट निर्माण होत असतं. त्यामुळं अख्खा परीवार नेस्तनाबूत होत असतो. परीवारातील आनंदही नेस्तनाबूत होत असतो. म्हणूनच फिरायला अवश्य जावं. परंतु स्वतःच स्वतःची काळजी घ्यावी. जेणेकरुन आपल्यावर दुर्भाग्य कोसळणार नाही. आपत्तीही कोसळणार नाही आणि कोसळलीच तर त्यातून सावरण्याची ताकद स्वतःच स्वतःमध्ये निर्माण करावी. ज्यातून तुम्ही स्वतःला सावरु शकाल व त्यानंतर नवीन दिशा ठरवू शकाल एवढंच सांगणं आहे.        

   अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०