No connection to terrorists. in Marathi Detective stories by Ankush Shingade books and stories PDF | आतंकवाद्यांना नातं नसतंच

Featured Books
Categories
Share

आतंकवाद्यांना नातं नसतंच

आतंकवाद्यांना नातं असतं?

          महिला ही शांत असतेच. ती अशांत नसतेच. परंतु जर तिला कोणी डिवचलंच तर ती रुद्र रुप घेत असते. तिची महाकाली बनत असते. कधी तिच्यात दुर्गेचं रुप दिसते. तर कधी ती सीता बनून अख्खा रावणराज समाप्त करुन टाकते तर कधी द्रोपदी बनून अख्खं महाभारत घडवून आणते. अर्थात शंभर प्रकारची शक्ती असलेलं कौरवाचं साम्राज्य नष्ट करुन टाकते. पहलगामची घटना अशीच. तब्बल सव्वीस महिलांचं म कुंकू पुसण्याचं प्रकरण. ज्यातून महिलांची शक्ती दिसली. पहलगाममध्ये कुंकवावरुन जो वाद निर्माण झाला. त्याच वादात सोफिया व व्योमिकासारख्या महिलांनी आतंकवाद्यांनाच नाही तर अख्ख्या पाकिस्तानला धडा शिकवला. 
         कुंकू...... कुंकवामध्ये एवढी शक्ती असते की त्या भरवशावर एखादी महिला कुणालाही नेस्तनाबूत करु शकते. तसं पाहिल्यास महिला ही शांतच असते. तिला कुंकवानंच शांत केलेलं असतं. अन् कुंकवाला धक्का लागलाच तर ती बिथरते. अन् ती जेव्हा बिथरते. तेव्हा ती काय करु शकते. हे दाखवून दिलं सोफिया आणि व्योमिकाच्या टीमनं. त्यांनी ऑपरेशन सिंदूर करुन कुंकू महान असतं नव्हे तर महिला ही कमजोर नसते हेच दाखवून दिलं. 
          सोफिया व व्योमिकाच्या जोडीनं कुंकवाचं महत्व सांगीतलं नव्हे तर आपण फ्वतः कृती करुन दाखवून दिलं. परंतु हे जरी खरं असलं आणि वास्तविक घडलं असलं तरी येथील पुरुषसत्ताक समाज स्री पराक्रमाला महत्व देत नाही. हे दिसलं मध्यप्रदेश मधील मंत्री विजय शाहच्या वक्तव्यावरुन. त्यांनी आपली जीभ घसरवत म्हटलं की पहलगाम हल्ल्यात आमच्या बहिणीचे सिंदूर पुसून टाकणाऱ्या दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी आम्ही त्यांच्या बहिणीला पाठवून बदला घेतला. 
         ते विजय शाह नावाच्या मंत्र्याचं बोलणं. विजय शाह एक पुरुषी चेहरा. त्याआधीच सोफियानं खुलासा केला होता की मी मुस्लीम जरी असलो तरी मी आतंकवाद्यांविरुद्ध लढलो. कारण ते आतंकवादी आहेत व आतंकवाद्यांना कधीच जात व धर्म नसतोच. नातंही नसतंच. अन् जी सोफिया कुरेशी नावाची विरांगणा लढली. ती कशी काय आतंकवाद्यांची बहिण होवू शकते. याचा विचार मंत्र्यानं करायला हवा होता. त्यावर सारवासारव करत मंत्री महोदय अस्सल माफी मागायला तयार नाहीत. ते पुढे म्हणतात की जर माझ्या विधानामुळे वा वक्तव्यामुळे कोणी दुखावले असेल तर दहावेळा मी माफी मागायला तयार आहे. मी कर्नल सोफिया कुरेशीचा माझ्या बहिणीपेक्षा जास्त आदर करतो. याचाच अर्थ असा की मंत्री महोदय मी विधान मागे घेतो असं म्हणत नाहीत. तर ते माझ्या विधानामुळे कोणी दुखावले असेल तर माफी मागतो असं म्हणतात. 
         कर्नल कुरेशीबाबत केलेलं मंत्री महोदय विजय शाहचं विधान म्हणजे एक प्रकारचा कर्नल सोफियाचा अपमान करणारं विधान नाही तर तमाम पहलगाममध्ये कुंकू पुसलं जाणाऱ्या महिलांचा अपमान आहे. त्यातच हा संबंध मानवजातीतील महिलांचा अपमान आहे. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. त्याचं कारण म्हणजे कर्नल सोफियाचा पराक्रम. बिचारीनं आपल्या जीवावर उदार होवून ऑपरेशन सिंदूर केलं नव्हे तर त्या ऑपरेशन सिंदूर दरम्यान तिचा जीवही गेला असता. त्याचं येथील संबंध पुरुषजातीला काही घेणंदेणं नाही. असंच एकंदरीत मंत्री महोदय विजय शाहच्या वक्तव्यावरून दिसून येतं. असो. तो स्वतःच्या प्रसिद्धीसाठी एका फंडा असू शकतो. त्याची दखल महिला आयोगानं घेतली आहे. महिला आयोग जे काही करेल, ते करेलच. महत्वपुर्ण बाब आहे आपली मानसिकता. आपण स्रियांना डिवचतो. त्यांना कमजोर समजतो. त्यांच्याबाबत अनैतिक वक्तव्य करतो. त्यांचा पदोपदी अपमान करतो. कधी त्यांना जोहार साठी बाध्य करतो तर कधी त्यांच्या हक्कांना बाधा पोहोचवतो. त्यांनी केलेल्या पराक्रमांनाही आपण तुच्छ लेखतो. आपण हेच करीत नाही तर आपण त्यांना कमजोर समजून कोणती जबाबदारी द्यायची टाळाटाळ करतो. 
        कर्नल सोफियानं जी भुमिका ऑपरेशन सिंदूर माध्यमातून केली. ती वाखाणण्याजोगीच आहे व तमाम महिला जातींचा तिनं आपल्या कर्तृत्वानं उत्साहही वाढवला आहे. शिवाय हेही दाखवून दिलं आहे की जगातील कोणतीच महिला ही कमजोर नाही व तिला कोणीही कमजोर समजू नये. 
         कर्नल सोफिया एक मुस्लीम. परंतु तिनं स्वतःला मुस्लीम न समजता एक खरी भारतीय समजून ऑपरेशन सिंदूरमध्ये कार्य केलं. ज्यातून ऑपरेशन सिंदूर तर झालंच. त्याव्यतिरिक्त ऑपरेशन पाकिस्तानही झालं. याचाच अर्थ असा की ऑपरेशन सिंदूर नंतर ज्या पाकिस्ताननं भारताला कमजोर समजून जे युद्धासारखं आव्हान दिलं. त्यातून पाकिस्तानला शह दिल्यानंतर जी भारताची ताकद पाकिस्तानलाच नव्हे तर जगाला दिसली, त्यावरुन भारतही एक बलशाली व बलाढ्य राष्ट्र आहे, हे सिद्ध झालं. कदाचीत ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालं नसतं तर पाकिस्तानसमोर भारताचा हशा झाला असता. तसेच जागतिक स्तरावरही भारताला नाक दाखवायची शरम वाटली असती. आज भारताची मान जगासमोर ताठ आहे. आता शरम वाटत नाही. ते सगळं घडलं भारतातील महिला शक्तीमुळं. ज्यांनी ऑपरेशन सिंदूर साकारलाय. म्हणूनच महिला शक्ती ही महान आहे. तिला कोणीही कमजोर समजू नये. 
          दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आतंकवाद्याची बहिण म्हणणं. तर हा मुद्दा वादाचाच होवू शकतो. कारण गुन्हेगार हा गुन्हेगार असतोच. त्याला जात, धर्म व नाते नसतातच. अन् यात कर्नल सोफियानं स्वतःला आतंकवाद्यांची बहिण समजलं असतं तर कदाचीत तिनं पाकिस्तानच्या घरात शिरुन ऑपरेशन सिंदूर केलं नसतं. 
           महत्वाचं म्हणजे महिलांनाही नाते असतातच. नसतात असे नाही. परंतु त्या नात्यांचा त्रास होत असेल तर ते नाते काही कामाचे नसतात. अशावेळेस महिला या नाते संपवतात. जर त्यांचा सख्खा भाऊ जरी आतंकवादी बनत असेल तर त्या त्यांना भाऊ समजत नाही. हे आपल्याला महाभारतातून दिसते. महाभारतात द्रोपदी ही स्नुषा व भावजं असूनही तिचा भर दरबारात अपमान करण्यात आला. त्यानंतर तिनं नातं संपवलं व आपल्या अपमानाचा तिनं बदला घेतला.    
         आतंकवाद्यांनाही नाते नसतात. ते गुन्हेगार असतातच. शिवाय त्यांनी कोणाचं कुंकू पुसूच नये. कुंकवात एवढी शक्ती असते की तेच कुंकू राजाला रंक बनवू शकते. यात शंका नाही. भारतात तरी हिंदूंमध्ये कुंकवाला जास्त महत्व आहे. भारतातील हिंदू स्रिया कुंकवाला विशेष महत्व देत असून आपण गतकाळात पाहिलेच आहे की गतकाळात हिंदू स्रिया विधवा झाल्यास प्रसंगी जोहार करीत असत. परंतु कोणत्याही प्रकारचा व्याभिचार सहन करायच्या नाहीत. हिंदू स्रिया प्रसंगी सती जात. परंतु दुसऱ्याशी विवाह करणे टाळत असत. त्यातच काही कुंकूधारी स्रिया आपल्या सतीत्वाच्या आधारावर राक्षसांनाही स्वतःच्या अंगाला स्पर्श करु देत नव्हत्या. हे आम्हाला आमचे ग्रंथ सांगतात. उदाहरण द्यायचं झाल्यास माता सीतेचं देता येईल. माता सीतेच्या अंगाला रावणही कुंकवाच्या आधारावर स्पर्श करु शकत नव्हता. म्हणूनच कुंकू हे हिंदू स्रियांसाठी महत्वपुर्ण वस्तू आहे.
         विशेष सांगायचं झाल्यास आतंकवाद्यांना नातं नसतं. परंतु विजय शाहनं म्हणण्यानुसार तसं वक्तव्य करुन आतंकवाद्यांनाही नातं असतं असं सिद्ध होतं. कदाचीत हा प्रकार हिंदू मुस्लीम एकता तोडण्याचा तर प्रकार नाही ना. तसं सिद्ध करुन विजय शाह काय करु इच्छितात. ते कळत नाही. कदाचीत कळलं असतं तर बरं झालं असतं.

         अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०