Operation Sindoor - 9 in Marathi Women Focused by Ankush Shingade books and stories PDF | ऑपरेशन सिंदूर - भाग 9

Featured Books
Categories
Share

ऑपरेशन सिंदूर - भाग 9

          
         रुकसार आज म्हातारी झाली होती. परंतु तिला आठवत होत्या त्या ऑपरेशन सिंदूरच्या वेदना. ज्या वेदना कधीही न विसरणाऱ्या होत्या.     
          रात्र बरीच झाली होती. रुकसारला झोप येत नव्हती. तशी ती अंथरुणावर पहुडली होती व झोप येत नसल्यानं ती सारखी कड फिरवीत होती. तिनं झोप घेण्याचा बराच प्रयत्न केला. परंतु झोप येत नव्हती. तिच्या कानावर तो सारखा आवाज पडत होता. तो विमानाचा आवाज आणि तो क्षेपणास्त्राचा आवाज. त्या आवाजानं हादरलेला आसमंत तिच्यासमोर प्रत्यक्षात उभा होता. अशातच रुकसारला आठवला तो ऑपरेशन सिंदूरचा पराक्रम. जिनं एक मुस्लीम असूनही खरी भारतीय असण्याचा परिचय दिला होता. तिला आठवत होता तो मोहम्मद इम्तियाज. ऑपरेशन सिंदूरचा संघर्षविराम झाल्यानंतर पाकिस्ताननं जम्मूत केलेल्या गोळीबारातून बिचारा इम्तियाज मरण पावला होता. कारण रात्री त्याच्या घरावरच बॉंबगोळा पडला होता. ज्यातून त्याला मृत्यू आला होता. तसा तिला विचार आला. विचार आला की काय ही हैवानियत असलेली पाकिस्तानी प्रजाती. तिच्याजवळ माणूसकी नावाची गोष्टच नाही. जी भारतातील शहरावर थेट हल्ले करीत होती. हिंमत होती तर त्यांनी भारतीय लष्करी तळावरच हल्ले करायला हवे होते. परंतु नाही, कुंकू पुसायची सवय पडली आहे ना त्यांना. यापुर्वीही येथील बऱ्याच मुस्लीम बादशाहांनी कित्येक भारतीय स्रियांचे कुंकू पुसले. इस्लाम असं शिकवतो काय? इस्लाम असं कधीच शिकवीत नाही. तरीही असं कुंकू पुसण्याचं प्रकरण उद्भवतं. ही विचार करायला लावण्यालायक बाब आहे. मला तर आज वाटते की मी जेही काही केलं. ते अगदी योग्य केलं. हं, काही लोकांचा रोष नक्कीच होता माझ्यावर. परंतु मला जे योग्य वाटलं. ते अगदी उल्लेखनीय आहे.
          कुंकूसाठी बुद्ध नाही, युद्धच हवं होतं. असं म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण तो उपक्रमच तसा होता. म्हणतात की भारतीय स्वातंत्र्य हे शांती व अहिंसेच्या मार्गानं मिळालंय. परंतु ते चूक आहे. अन् कोणाला हे जरी सगळं बरोबर वाटत असलं तरी दहशतवाद थांबवणं हे काही शांतीचं काम नाही. ते क्रांतीचं काम आहे. तसं पाहिल्यास भारतीय स्वातंत्र्य देखील शांतीनं मिळालेलं नाही. ते मिळालंय क्रांतीच्याच मार्गानं. 
          स्वातंत्र्याबद्दल सांगायचं झाल्यास आपल्याला १९४२ चा काळ आठवावा लागेल. ज्यावेळेस चलेजावचं आंदोलन पुकारलं गेलं होतं. ज्यात महात्मा गांधींनी स्वतः म्हटलं होतं की येथील प्रत्येक व्यक्ती हा नेता आहे व नेता समजूनच त्यांनी कार्य करावं. कदाचीत आम्हाला म्हणजेच नेत्यांना इंग्रज पकडून तुरुंगातही टाकतील. तेव्हा इंग्रजांना हुसकावून लावण्यासाठी आपल्याला स्वतः नेते बनावं लागेल. 
          ते महात्मा गांधीचं बोलणं. ते हिंसेला बळ देणारं नसलं तरी त्यातून बोध घेवून लोकांनी टेलिफोनच्या तारा तोडल्या. पोलीस ठाणे जाळले. काही उठाव केले. त्यातच काही इंग्रज अधिकारी वर्गाची हत्या केली. हा हिंसाचारच होता की ज्या गोष्टीनं इंग्रज घायाळ झाले होते. त्यांना वाटत होतं की आता ही वेळ या देशात राहण्याची नाही तर या देशातील लोकांना त्यांचा देश परत देण्याची आहे. नाहीतर ही जनता आपल्याला सोडणार नाही. त्यातच दुसरं महायुद्ध झालं होतं व त्यातून इंग्लड हताशही झाला होता. कदाचीत दुसरं महायुद्ध झालं नसतं तर इंग्रज सक्षम राहिले असते व त्यांनी आपल्याला कधीच स्वातंत्र्य दिलं नसतं. 
          भारत शांतीनं नाही तर क्रांतीनंच स्वतंत्र झाला. याला आणखी एक कारण असं होतं, ते म्हणजे आझाद हिंद फौज. नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद फौज स्थापन केली होती व त्या माध्यमातूनही आपल्या देशाला इंग्रजांकडून स्वातंत्र्य मागून घेता आलं. 
          चलेजावचा उठाव, दुसरं महायुद्ध, आझाद हिंद फौज या तिन्ही गोष्टींचा परिणाम की आपल्याला स्वातंत्र्य मिळालंय. यात तिन्ही घटना क्रांतीकारीच होत्या. कोणी मानो अगर न मानो. फरक एवढाच की क्रांतीच्या मार्गाने जातांना निष्पाप जीव जातात. ज्यांचा दोष नसतो, त्यांचाही जीव जात असतो. परंतु कुणी साध्या बोलण्यानं ऐकत नसेल तर काय करावे? त्यासाठी क्रांतीच करणे बरे की नाही?
          आपल्याला माहितच आहे कलिंग युद्ध. त्यात जो रक्तपात झाला. त्यानंतर सम्राट अशोकांनी शस्र टाकली व ते बुद्धमय बनले. त्यानंतर त्यांनी धर्मप्रसाराचं काम केलं. ज्यात त्यांची मुलगी संघमित्रा व महेंद्र श्रीलंका, म्यानमार, थायंलंड, चीन, कंबोडिया, लाओस व कित्येक देशात पोहोचले. त्यांनी धर्मप्रसार केला. परंतु पुढं जेव्हा त्यांची सत्ता गेली. तेव्हा काय झालं. त्यावेळेस कित्येक बौद्ध भिख्खूंना कापून काढलं गेलं. जर त्यावेळेसच बौद्ध भिख्खू प्रसंगी युद्धाला मानणारे असते तर आज बौद्ध धम्म हा पहिल्याच क्रमांकावर असता. हे विसरता येत नाही. तसेच भारत स्वतंत्र झाल्यावर जी परिस्थिती उद्भवली. त्याही परिस्थितीचा आढावा घेतला असता असं आढळून येतं की ती परिस्थिती युद्धाशिवाय निवळणं शक्य नव्हतं. त्यातच युद्ध केलं गेलं. आपल्याला माहितच असेल की हैद्राबाद, जुनागढ व काश्मीरमधील काही भाग हा युद्धानंच मिळालेला आहे. तेथील प्रश्न हा युद्धानंच सोडवल्या गेला आहे. तेही सरदार वल्लभभाईच्या नेतृत्वात. आज जो पाकव्याप्त काश्मीर दिसतो ना. तोही आपण युद्धानं जिंकला होता. त्याचवेळेस शांततेनं तो सोडला नसता तर आज पाकव्याप्त काश्मीर आतंकवाद्याच्या लपायचा अड्डा झाला नसता, ना तिथे कुंकू प्रकरण घडलं असतं, ना आज ऑपरेशन सिंदूर झालं असतं. तसाच सन १९७१ मध्ये पाणीवाटपावरुन शांतेतेचा शिमला करार झाला नसता तर पाकला एवढी मस्तीच चढली नसती. आज पाकिस्ताननं आतंकवाद्यांच्या पडद्याआड लपून जी कुंकू पुसण्यासारखी भ्याड कृती केली ना. तिही पाकिस्तानला करता आली नसती.
          ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतानं आतंकवाद्यांची आतंकवादी स्थळं उध्वस्त केली. हा क्रांतीचा एक नमूनाच आहे. जर याही ठिकाणी आपण ती कृती शांततेच्या मार्गानंच पाहात बसलो असतो पूर्वीप्रमाणेच, तर तो दिवस दूर नव्हता की पाकिस्तान आपल्या देशावर हावी झाला असता. त्यानं विचार केला असता की हा काय भारत, आपलं काय वाकडे करु शकतो. आजपर्यंत आपण याच प्रश्नावर गप्प राहिलो. म्हणूनच पाकिस्तानची हिंमत वाढत गेली. ज्यातून कित्येक वेळेस आपल्या भारतीय सैन्याचे व नागरिकांचे कित्येक बळी गेले. म्हणूनच जरब जर बसवायची असेल तर युद्ध वा क्रांती हाच महत्वपुर्ण पर्याय आहे. जिथं शांतीनं काहीच निष्पन्न होत नाही. तिथं क्रांती हवीच असते ही सत्य बाब आहे. तेच आज आपण केलेले आहे ऑपरेशन सिंदूर करुन. 
          आपल्याला माहितच असेल आणि त्याला इतिहास साक्षीला आहे. आपण भारतीय सहिष्णू असून आपण सहसा हिंसा हातात घेत नाही. तशीच आपल्यात कुणालाही अगदी सहज माफ करण्याची शक्ती आहे आणि आपण माफही करतो. कारण आपल्या देशातील मातीच अशी आहे की त्या मातीत सहनशीलतेचं तत्व आहे. परंतु इतर देशातील लोकं आपल्याला सहजासहजी माफ करीत नाहीत. कारण त्यांची बनावटच तशा स्वरुपाची आहे. उदाहरण द्यायचं झाल्यास राजा दाहिरचं देवू. आपला देश ज्यावेळेस अखंड हिंदुस्थान होता, त्यावेळेस काश्मीरच्या भागात राजा दाहिर राज्य करीत होता. त्यावेळेस मोहम्मद बिन कासीम नावाच्या अरबी व्यक्तीनं राजा दाहिरवर बारा ते चौदा वेळेस आक्रमण केले. त्या प्रत्येक वेळेस राजा दाहिर युद्धात जिंकला. परंतु त्यांनी प्रत्येक वेळेस मोहम्मद बिन कासीमला माफ करुन सोडून दिलं. परंतु जेव्हा एका लढाईत राजा दाहिरचा पराभव झाला. तेव्हा तह झाला नाही वा मोहम्मद बिन कासीमनं एवढे वेळेस युद्धात जिंकूनही माफ करणाऱ्या आपल्या राजाला माफ केलं नाही. त्यांची हत्या केली. तेच घडलं पृथ्वीराज चव्हाणच्या काळात. पृथ्वीराज चव्हाण ज्यावेळेस दिल्लीच्या तख्तावर राजे म्हणून बसले. तेव्हा मोहम्मद घोरीनं भारतावर सतरा वेळेस स्वाऱ्या केल्या. परंतु आपल्या देशातील याच वीरपुत्रानं त्याला माफ केलं. परंतु जेव्हा एका लढाईत पृथ्वीराज चव्हाणचा पराभव झाला. तेव्हा जिंकूनही सतरा वेळेस माफ करणाऱ्या राजाला मोहम्मद घोरी आपल्या देशात घेवून गेला. त्यांना नजरकैदेत टाकलं. त्यानंतर त्यांचे डोळे फोडले. त्यांच्यावर अत्याचार केले व त्यांची हत्याही करुन टाकली.
           पहलगामची घटना काहीशी अशीच. याही घटनेत एक पाऊल मागं टाकून संघर्षविराम झाला. आपण भारतीय सहनशील स्वभावाचे असल्याने आपण आपल्या नेहमीच्याच सवयीप्रमाणे याही वेळेस पाकिस्तानला त्यांच्या कृतीवर उदार मनानं पांघरुण घालून माफही केलं. परंतु यदाकदाचित उद्या पाकिस्तानचे चांगले दिवस आले आणि त्यांनी केलेल्या लढाईत आपण यदाकदाचित हारलोच. तर पाकिस्तानही आपल्याला माफ करेल काय की राजा दाहिर व पृथ्वीराज चव्हाणची जी हत्या झाली. तशीच हत्या आपल्या संबंध भारतीयांची होवू शकेल. 
         रुकसार त्यावर विचार करीत होती. जरव्सं झालं यर. असं तिला वाटत होतं. तसा ऑपरेशन सिंदूर पुर्ण झाला होता. संघर्षविरामही झाला होताच.     
          ऑपरेशन सिंदूर पुर्ण झालेला होता. तसं पाहिल्यास अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. ज्यावर विरोधी पक्षाच्या वाईट प्रतिक्रिया उमटल्या होत्या. कोणी म्हणत होते की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत आपल्याला शहाणपणा शिकविणारे. सन १९७१ मध्ये अशाच मध्यस्थीनं शिमला करार झाला. ज्यातून आपलं नुकसान झालं. जर विद्यमान सरकारनं संघर्षविराम केला असता तर तो मान्यही केला असता आम्ही. कोणी म्हणत होत. काश्मीर मुद्दा हा बायबलसारखा हजारो वर्षे जुना नाही. तो २२ ऑक्टोबर १९४७ चा मुद्दा आहे. ७८ वर्षापुर्वी सुरु झालेला. तेव्हा पाकिस्ताननं जम्मू-काश्मीरवर हल्ला केला होता. त्यातच त्या घटनेवर अनेक प्रश्न उपस्थीत केले गेले होते. 
          ऑपरेशन सिंदूर पुर्णतः संपलेलं नव्हतं. त्यातून तीन पिल्लू जन्मास आले होते. पहिलं पिल्लू होतं पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्यायला हवं. त्याबद्दल भारताचं म्हणणं होतं की जर दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमध्ये लपून बसत असतील वा पाकव्याप्त काश्मीर त्यांना पाकिस्तान राहण्यासाठी देत असेल तर तो आमच्या ताब्यात का असू नये. कारण तो प्रदेश आमच्याकडून बेकायदेशीर पाकिस्ताननं ताब्यात घेतला आहे. तो आपण ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करावे नव्हे तर प्रयत्न करावेच लागतील. दुसरं पिल्लू होतं, सिंधू करार. ज्याला शिमला करार म्हटलं जात होतं. या करारानुसार सिंधू नदीचं पाणी पाकिस्तानला देतांना काही अटी टाकणे क्रमप्राप्त होते व तिसरं पिल्लू होतं, यापुढे जर कोणी आमच्या देशात आतंकवादी हमला करीत असेल तर ते युद्ध समजणे व त्यावर चोख प्रत्युत्तर देणे. 
          संघर्षविरामानंतरही शस्रसंधीचे उल्लंघन करुन मोहम्मद इम्तियाज नावाच्या सीमा सुरक्षा दलाचे उपनिरीक्षक असलेल्या व्यक्तीला हुतात्मा केल्यानं सरकारनं पाकिस्तानला इशारा दिला होता की त्यांनी जर संघर्षविराम संधी तोडली तर आम्ही त्याला युद्धाचा इशारा समजू व युद्धाला सुरुवात करु. 
          पाकिस्तानला ऑपरेशन सिंदूर माहित झालं होतं. पाकिस्तानात लपलेल्या आतंकवाद्यांना धडा शिकविण्यासाठी ऑपरेशन सिंदूर कृती केल्या गेली होती. 
          आज ऑपरेशन सिंदूर पुर्ण झालं होतं. वाद होता त्यातून जन्मास आलेल्या तीन पिल्लांचा. तसं पाहिल्यास छोट्या छोट्या चकमकी होतच होत्या. परंतु धर्म विचारुन कोणत्याही स्रिचे कुंकू मिटवले जात नव्हते. त्याला कारण होतं पाणी करार. आज पाकिस्ताननं ऑपरेशन सिंदूर पासून बोध घेतला होता की जर आम्ही भारताशी वाकडं घेतलंच तर उद्या आम्हाला मिळणारं पाणी बंद होईल. ज्यामुळं आम्ही जगू शकणार नाही. 
          आजही सारिका बोलत होती रुकसारशी. तशीच सपनाही बोलत होती रुकसारशी. गत दिनाच्या गोष्टी सांगत होती. त्या ऑपरेशन सिंदूरच्या आठवणी काढत असत कधीकधी. सपना आणि रुकसार भेटल्याच तर त्या दोघी गतकाळातील त्यांनी केलेल्या पराक्रमाच्या गोष्टी करत असत आणि सारिका जर भेटलीच तर ती आपल्या कुंकू पुसल्याची आठवण काढत असे. ज्यातून धर्माचे वावडे काढले जात.
          तो कुंकू पुसण्याबाबत हिंदू विचारुन व कलमा पठन करुन झालेला दहशतवादी हल्ला. तो हल्ला धर्माचा वाद म्हणून असेलही कदाचीत. परंतु त्या वादानं माणूसकीची हत्या केली होती. आतंकवादी हे कधीच कुणाच्या भावना जोपासत नाहीत. ते राक्षस आहेत हे सिद्ध झालं होतं. 
         तो दहशतवादी हल्ला व ते कुंकू पुसल्याचं प्रकरण घडल्यानंतर भारतानं जे ऑपरेशन सिंदूर केलं. त्या प्रकरणापासून भारतील हिंदू मुस्लीम एक झाले होते. ऑपरेशन सिंदूर म्हणजेच ते देशहितासाठी उचललेलं पाऊल होतं हेही सिद्ध झालं होतं. ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर जागतिक स्तरावर भारताचं नाव अजरामर झालं होतं. कारण जगाला भारतीय ताकद माहित झाली होती. जर ऑपरेशन सिंदूर घडलं नसतं तर भारत जगाच्या नकाशात एका कोपर्‍यातच राहिला असता. 
           सारिका ही काही जास्त दिवस जगली नाही. ती रुकसारच्या पुर्वीच मरण पावली. असाच तो काळा दिवस. आज तिच्या जीवनात उजळला होता. कदाचीत मृत्यू तिचीच वाट पाहात होता की काय? वा तिचा जुना पती, ज्यानं तिला काश्मीर फिरायला नेलं होतं, त्याचंच बोलावणं आलं होतं की काय, काळानं तिच्यावर झडप घातली आणि ती रुकसारच्या आठवणीच्या ओझल झाली. तिचा एका ट्रक अपघातात अपघात झाला होता. तिचा अपघात झाल्यावर तिला रुग्णालयात भरती केलं. तेव्हा डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केलं होतं. रुकसारला ती घटना जेव्हा माहित झाली. तेव्हा ती सारिकाच्या घराकडे मयतीनिमित्यानं जात होती. वाटेत तिला तिच्या गतकाळातील अनंत आठवणी येत होत्या. ज्या तिच्या आठवणी सतत रुकसारपुढं आ वासून उभ्या होत्या. 
         रुकसारला आठवत होती ती आठवण. एकदा तिच्याकडे तिची मैत्रीण सारिका आली होती. त्यातच त्यांच्यात ऑपरेशन सिंदूरबाबत चर्चा रंगल्या होत्या. त्यात सारिका म्हणाली होती,
         "रुकसार, तुम्ही अगदी सहजच ऑपरेशन सिंदूर घडवून आणलं आणि त्यात तुम्ही यशस्वीही झालात. त्याचं कारण काय?"
         सारिकानं विचारलेला प्रश्न. त्यावर उत्तर देत रुकसार म्हणाली,
          "ऑपरेशन सिंदूर करण्यासाठी भारतानं गतकाळात जे डोकं वापरलं. ते वाखाणण्याजोगच होतं. गतकाळात भारतानं फ्रांसकडून राफेल विमानं खरेदी केले होते. त्यावेळेस टिकाटिपण्णी झाली होती. भारतालाही हे माहित नव्हतं की आम्हाला या विमानांची गरज पडेल. तरीही ती विमानं खरेदी केली होती. जी विमानं लडाकू होती. त्याच विमानाचं नियंत्रण माझ्याकडे होतं. ती रात्र होती व मी राफेल विमानाचं नियंत्रण करीत होती. मला टार्गेट दिलं होतं की ती दहशतवादी स्थळं नष्ट करुन यायचं. असंच परतायचं नाही. अन् सहज परतायचं असेल तर स्वतःला गोळी मारुनच परतायचं. शेवटी आम्हीही सैनिक होतो. युद्धावर वीरमरण पत्करणारे. आम्हाला युद्ध लढतांना वीरमरण आलंच तर बरं वाटतं. तेच केलं मी. मी स्वतः दोन तीन दहशतवादी ठिकाणं नष्ट केली होती. शिवाय भारताला S400 हे सिस्टम रशियानं दिलं होतं. ते सिस्टम म्हणजे कुणीही जर वार केलाच तर वा ड्रोनहल्ले वा क्षेपणास्त्र डागली तर ती क्षेपणास्त्र जमिनीवर पोहोचू न देता अगदी वरच्या वर हवेतच निष्फळ करण्याचं साधन होतं. ज्यानं आम्हाला अगदी सहजच जिंकता आलं होतं."
         "रुकसार, ती ठिकाणं नष्ट करतांना तुला, तू मुस्लीम आहेस. असं वाटलं नाही काय?"
         "कधीच नाही. उलट मला अभिमानच वाटला. अभिमान वाटला की ही जबाबदारी देशानं मी मुस्लीम असूनही मला सोपवलेली आहे. त्यात मला आणखी उत्साह वाटला. उत्साह होता तो मी मुस्लीम असूनही मला ती जबाबदारी सोपविल्याचा. ज्यातून मला जोमाने कार्य करता आलं. त्यावेळेस मी मुस्लीम म्हणून नाही तर एक भारतीय म्हणून कार्य केलं होतं. आपणही या भारतात राहात असून भारत देश आपल्याला काहीही न मागता अन्न, वस्र आणि निवारा पुरवतो. त्यामुळंच त्याचे आपण ऋणकर्ते आहोत. हेच मला माझे काम करतांना मला दिसत होतं. दुसरं काहीच माझ्यासमोर उद्दिष्ट नव्हतं."
          "रुकसार, तू छान सांगीतलंय. तुझ्यासारखेच विचार प्रत्येक भारतीयांनी ठेवले तर या देशावर कधीच संकटं येणार नाही. अन् आलेच तर अगदी सहजासहजी निघून जातील."
          आज सारिका नव्हती. परंतु तिच्या आठवणी, तिचं बोलणं व तिच्याशी झालेले संवाद रुकसारच्या सोबत होते. सारिकाला तिचं कुंकू पुसलं जात असतांना मृत्यू आला नव्हता. परंतु तो मृत्यू आज आला होता. 
********************************************