त्याचे प्रेम ..
त्याला जेव्हापासून ती भेटलेली असते ..
त्याचे मन जणू कापसासारखे ‘तरल”झालेलं असते !!
“तीचे बोलणे “..तीचे हसणे “..
त्याची नुसती “उलघाल “होत असते
मनातले हे “वादळ “तीला कसे सांगावे
हे मात्र त्याला उमगत नसते .!
स्थळ ..काळ ..वयाचे बंधन असते जरी .
त्याला मात्र वाटत असते ती त्याच्या स्वप्नातली “परी “.
तशी ती ही असते रुप गुणाची “खाण”.
त्याला मात्र असते फक्त तिच्या “अस्तित्वाचे “भान ..
“आताच का हे “प्रेम “व्हावे .
हे त्याचे त्याला ही कळत नसते ..
तिचा “सहवास “अप्राप्य आहे
हे कळते ..पण वळत नसते ..
आता पुढे काय होईल ...काय मनात देवाच्या
त्याला मात्र तिची ..साथ द्यायचीय “अंतापर्यंत जगाच्या ...!!!
...................................वृषाली **