Quotes by Hari Alhat in Bitesapp read free

Hari Alhat

Hari Alhat

@harialhat.712238


https://youtu.be/B3tly2c55zA?si=njSLKor47An3pMlk

ठाणे जिल्हा: पत्रकारांच्या विविध मागण्यांचे ‘व्हाईस ऑफ मिडियाच्या वतीने जिल्हाधिकारी आणि जिल्हा माहिती अधिकाऱ्यांना निवेदन

पत्रकारांना दहा वर्षे पूर्ण झाली आहेत, अशा पत्रकारांना अधिस्वीकृती कार्ड देण्यात यावे

प्रतिनिधी हर्षद पठाडे

निवेदिका आशा रणखांबे

एडिटर हरी आल्हाट

बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा
जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729

Read More

https://youtube.com/@janhitnewsmaharashtra

जनहित न्युज महाराष्ट्र चैनेलला सबस्क्राईब जरूर करा
संपादक हरी आल्हाट 9960504729

https://youtu.be/i2BYjsxIK9Y

रोटरी क्लब ऑफ पल्लावा की औरसे अंध और दिव्यांग व्यक्तीयो को अन्नदान और व्हील चेअर की मदत

जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729

Read More

समजून घे

समजत नाही का तुला
तुझ्या फोनची वाट पाहते
फोन आल्या शिवाय तुझा
जेवन न करता राहते

दिवसातुन एकदातरी बोलावं
असं वाटत नाही का तुला?
आवाज ऐकुन आनंद होतो
तसा होत नाही का तुला?

स्वप्न तुझीच बघत असते
तुझ्यासाठीच जगत असते
तुला नाही का तसे वाटत?
माझ्यासाठी जीव आटत?

कधी होणार एक आपण?
तारीख वार सांगशील का?
सात जन्म नाही पण
एक जन्म माझा होशील का?

कधी कळणार भावना तुला?
की कळूनही दाखवत नाही
माहित आहे मला प्राणसख्या
तुला माझे मन राखवत नाही

नको जीव घेउस माझा
आता नाही सहन होत
ये भेटण्यास लवकर
आता नाही सहन होत

समजून घे रे मला
नको त्रास देऊ असा
ये धावत लवकर
जसा आहेस तसा

Read More

चांगला स्वभाव हीच माणसाने कमावलेली स्वतःची सर्वात मोठी संपत्ती असते . कोणाचा सरळ स्वभाव ही त्याची कमजोरी समजू नका तर ते त्याचे संस्कार असतात .ज्याच्या जवळ शक्ती बरोबर सहनशक्ती सुद्धा असते अशा व्यक्तीच्या शक्तीचा कधीही मुकाबला होऊ शकत नाही .
चांगला माणूस कधीही मतलबी नसतो , तो फक्त अशा लोकांपासून दूर रहात असतो ज्यांना त्याची कदर नसते . अशा चांगल्या , माणसाची निंदा तेच लोक करत असतात जे त्याची बरोबरी करू शकत नसतात .
आयुष्यात निरंतर चांगले बनून रहा . कोणी तुमचा सन्मान करेल तर कोणी तुमचा अपमान करेल परंतु तो परमपिता परमेश्वर तुमचा सन्मान अवश्य करेल . कारण ज्या लोकांजवळ साधी राहाणी , उच्च विचारसरणी , धैर्य आणि दया हे गुण असतात ते लोक खूप भाग्यशाली असतात आणि परमेश्वराला प्रिय असतात .
चांगलं व्यक्तीमत्व घेऊन जन्माला येणं ही आईवडीलां कडून आपल्याला मिळालेली एक सुंदर भेट असते . मात्र एक चांगलं व्यक्तीमत्व म्हणून जगणं ही आपली स्वतःची ओळख असते . फक्त माणूस होणं पुरेसं नसतं . माणसात माणूसकी असणं हे देखील आवश्यक असतं .
व्यक्तीची किंमत तेव्हाच असते जेव्हा त्याची आवश्यकता असते . नाहीतर गरजे शिवाय हिरे देखील तिजोरीत ठेवून दिले जातात . म्हणून कधीही हा अभिमान नको की मला कोणाची गरज नाही . आणि हा देखील अभिमान नको की माझी गरज सर्वांना आहे .
लक्षात ठेवा अहंकार कधीच सत्य स्वीकारीत नाही . सत्य फक्त अहंकार नसलेली व्यक्तीच स्वीकारू शकते . अहंकारात बुडालेल्या व्यक्तीला न स्वतःची चूक दिसते ना दुसऱ्याने सांगितलेले चांगले विचार
जन्माला येणं आणि मरून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सार्थ होणं असं नाही तर जन्माला येणं आणि इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करून जाणं म्हणजे जीवनाचा प्रवास सार्थक होणं होय . हवेत काय पक्षीही उडतो आणि माशीही उडते पण उडून कोण कुठे बसतं यावरच त्याची लायकी ठरते .
तुम्हाला जी व्यक्ती बनायची आहे त्यासाठी जर तुम्ही मेहनत घेत नसाल तर तुम्ही अशी व्यक्ती बनाल जी बनायची तुमची इच्छा नाहीये . फक्त काबाडकष्ट करणारा प्रत्येक माणूस यशस्वी होईलच असे नाही परंतु कष्टा बरोबर कामाचे योग्य नियोजन करणारा माणूस नक्की यशस्वी होतो .
एक गोष्ट लक्षात ठेवा आयुष्यात कधीही नवीन सुरूवात करायला घाबरू नका . त्यासाठी मुहूर्त नाही तर जिद्द महत्त्वाची असते . दुसऱ्याचे निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःचे आत्मपरिक्षण केलेले कधीही चांगले....

हरि आल्हाट...

Read More

! जनहितार्थ जारी !
.......... मुले आणि त्यांचे संगोपन......

( संतती लायक असेल तर कमवून ठेवण्याची काहीच गरज नाही,
कारण ते स्वतः कमविल्या शिवाय रहाणार नाहीत )

( आणि संतती नालायक असेल, तर अजिबात कमवून ठेवण्याची गरज नाही. कारण आपल्या समोरच त्या संपत्तीला काडी लागल्याशिवाय रहाणार नाहीत )

( जबाबदारी जेवढ्या लहान वयात अंगावर पडते, तेवढे कर्तृत्व महान होते. म्हणून आपल्या मुलांना जबाबदारी घ्यायला शिकवा आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे करा )

आजकालच्या मुलांना झाडावर चढून फळे काढता येत नाहीत, साधे घरातील माळ्यावर ठेवलेली वस्तुसुद्धा काढायला घाबरतात. उंच जागी चढतांना आईच्याकडून धीर मिळत नाही. तर "पडशील", "घसरशील", "तुला जमणार नाही", "उतर, कुणालातरी बोलावून करूया", असे शब्द ऐकायला मिळतात.*
या मुलांच्या आया आणि बाप, मुले मोठी झाली तरी मुलांच्या शाळेची बॅग शाळेला जाणाऱ्या रिक्षा किंवा व्हॅनमध्ये पोहोचवून देतात, हे पाहिल्यावर मुलांची किव येते )

( आज सत्तरी ओलांडलेल्या आई वडिलांनी मुलांना संघर्ष शिकवला, परंतू तीच मुले आपल्या मुलांना तसा संघर्ष का शिकवत नाहीत, याचे नवल वाटते ? )

( पाश्चिमात्य देशात मुले आपली सायकल (पंक्चर इ.) स्वतः दुरूस्त करतात, त्यांच्याकडे त्याचे किट असते. यात सर्व हत्यारे असतात, ज्याचा वापर मुले अगदी सहजतेने करतात )

( नवीन पिढीतील मुलांना स्वावलंबी करणे, हेच खरे पालकत्व आहे. त्यांना शर्टाचे किंवा ड्रेसचे बटन लावणे, इस्त्री करणे, आपापले कपडे धुणे, सकाळी उठल्यावर स्वतःची चादर घडी करून योग्य ठिकाणी ठेवणे, पुस्तकांना कव्हर लावणे, बूट पॉलिश करणे, सर्व चप्पल-बूट जोड नीट एक रेषेत ठेवणे, वेळप्रसंगी भांडी धुणे, कचरा साफ करणे हे आलेच पाहिजे ? )

लाड खाण्यापिण्याचे करा, कामात लाड वर्ज्य आहे.
स्वयंपाक खोलीत त्यांना मदतीला आवर्जून बोलवा, आठवड्यातून एकदा आई वडिलांच्यासाठी चहा बनवायला सांगा. दोन कप चहासाठी किती चहा, साखर व दुध लागते याचा अंदाज स्वतः केल्याशिवाय त्यांना कधीच येणार नाही ? हे करताना बऱ्याच वेळेस चटका ही लागतो, लागू दे! ही जखम दोन दिवसांची असते, पण आयुष्यभराची शिकवण देऊन जाते. या व अश्या कामातून मुलांना जबाबदारी घेण्याची सवय होते, तसेच ही कामे खालच्या दर्जाची नसतात हे ही समजते )

आजकाल एक वाक्य नेहेमी ऐकण्यात येते, "मला जे कष्ट करावे लागले ते माझ्या मुलांना करायला लागू नयेत

( विचार करा आपण कोणत्या मार्गाने जात आहोत ? )

Read More

मराठमोळ्या संदीपचा कॅनडामध्ये डंका*

*राख'* *चित्रपटासाठी पटकावला आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार*
( मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर )
आजवर बऱ्याच कलाकारांनी आपल्या अनोख्या अभिनयशैलीच्या बळावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. अशांपैकीच एक असणाऱ्या अभिनेता संदीप पाठकनंही अगदी पदार्पणापासून रसिकांसोबतच समीक्षकांचंही लक्ष वेधून घेत विविधांगी भूमिका साकरण्याचं काम केलं आहे. कोणतीही व्यक्तिरेखा लीलया साकारण्याचं कौशल्य अंगी असणाऱ्या संदीपनं नुकताच आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या सिनेमहोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कारावर आपलं नाव कोरत मराठी सिनेसृष्टीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला आहे.

चित्रपट, मालिका आणि नाटकांच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन करण्यात अग्रस्थानी असणाऱ्या संदीपनं कॅनडामधील टोरंटो येथे झालेल्या जागतिक किर्तीच्या 'काऊच फिल्म फेस्टिव्हल स्प्रिंग २०२२' (Couch Film Festival Spring 2022 )मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार पटकावला आहे. 'राख' या मराठी चित्रपटात संदीपनं साकारलेल्या व्यक्तिरेखेसाठी हा पुरस्कार मिळाला आहे. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याच्या शर्यतीत संदीपसोबत नेदरलँडचा डिर्क मोहर आणि अमेरिकेचा डोनॅटो डि'लुका हे दोन तगडे अभिनेते होते. या दोघांवर मात करत संदीपनं हा पुरस्कार आपल्या नावे करण्यात यश मिळवलं. राजेश चव्हाण यांनी या सायलेंट मुव्हीचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटात संवादाविना संदीपनं साकारलेल्या भूमिकेचं खूप कौतुक करण्यात आलं. 'वऱ्हाड निघालंय लंडनला' च्या माध्यमातून विविध देशांमधील नाट्यरसिकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या संदीपला मिळालेला हा पुरस्कार सर्वार्थानं त्यानं आजवर केलेल्या मेहनतीचं फळ आहे. एकीकडे विनोदी व्यक्तिरेखांच्या माध्यमातून रसिकांना पोट धरून हसवताना संदीपनं दुसरीकडे धीरगंभीर भूमिका साकारत आपल्यातील संवेदनशील अभिनेत्याचंही दर्शन घडवलं आहे. दोन भिन्न टोकांच्या व्यक्तिरेखांचा अचूक ताळमेळ साधण्याचं काम नेहमीच संदीपनं केलं आहे.

आंतरराष्ट्रीय ख्यातीचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यानंतर आपल्या भावना व्यक्त करताना संदीप म्हणाला की, हा पुरस्कार जरी मला मिळाला असला तरी तो माझा एकट्याचा मुळीच नाही. 'राख' च्या संपूर्ण टिमनं घेतलेल्या मेहनतीचं हे फळ आहे. ‘'राख'’मधील माझं कॅरेक्टर आजवर साकारलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळं असल्यानं यासाठी पुरस्कार मिळाल्याचा आनंद खूप वेगळा आहे. या चित्रपटासाठी घेतलेल्या मेहनतीला मिळालेली ही जणू पोचपावतीच असल्याचंही संदीप म्हणाला. संदीपनं 'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'रंगा पतंगा', 'ईडक', 'एक हजाराची नोट' आदी ५० हून अधिक चित्रपटांच्या जोडीला विविध नाटकांचे अडीच हजारांहून अधिक प्रयोग आणि पंचवीसपेक्षाही जास्त टीव्ही शोजच्या माध्यमातून रसिकांचं मनोरंजन केलं आहे. लवकरच संदीपचे आणखी काही चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, त्यात त्याची वेगवेगळी रुपं पहायला मिळणार आहेत. अशी माहिती मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर यांनी दिली

Read More

झोपाळा
भाग २

दिवसभर सर्वकाही सामान्य होते, पण संध्याकाळी, 'घर भाड्याने देणे आहे' असा बोर्ड घराबाहेर लटकलेला पाहून नवीनने गोंधळलेल्या आवाजात बाबांना विचारले, "पप्पा, घर मोठे आहे हे मान्य, पण हे काय"?

"पुढच्या महिन्यात माझ्या स्टाफमधले मिस्टर गुप्ते सेवानिवृत्त होत आहेत, ते या घरात राहतील", त्यांनी शांतपणे उत्तर दिले.

"पण कुठे?"

"तुमच्या भागात", अशोकजींनी साध्या आवाजात उत्तर दिले.

"आणि आम्ही?"

"तुम्ही तुमच्या पायावर उभे राहू शकाल इतके सक्षम तर मी तुम्हाला बनवलेच आहे. दोन तीन महिन्यांत तुम्ही दुसरा फ्लॅट पाहा किंवा कंपनीच्या फ्लॅटमध्ये राहण्यासाठी जा, जिथे तुम्ही तुमच्या वयाच्या लोकांबरोबर राहू शकाल!

आम्ही दोघेही आमच्या वयाच्या लोकांमध्ये राहू. तुमच्या आईचं संपूर्ण आयुष्य तुम्हा सर्वांची काळजी घेण्यात गेले. आता तुमच्याकडून शहाणपणाचे धडे शिकणे एवढंच बाकी होतं."

"बाबा, मला असे म्हणायचे नव्हते," नवीन हात जोडत म्हणाला.

"नाही बेटा, तुझ्या पिढीने आम्हालाही व्यावहारिक होण्याचा धडा दिला आहे. जर आम्ही दोघे तुम्हा दोघांना एकत्र पाहून आनंदीत होऊ शकतो तर मग तुम्हाला आमच्यापासून त्रास का होतो? हे घर तुझ्या आईने बांधले आहे, हे झाड, ही फुले तुमच्यासाठी भोगलेल्या अनंत कष्टांचे साक्षीदार आहेत, म्हणून मी कोणालाही तिचा हक्काचा कोपरा हिसकावण्याचा अधिकार देणार नाही."

"बाबा, तुम्ही गंभीर झालात", नवीनचा आवाज आता हळवा झाला होता.

"नाही बेटा ... तुझ्या आईने आजवर खूप त्याग करून, खूप दुःख सहन करून मला पाठिंबा दिला. आज तिच्या कृपेने माझ्या डोक्यावर कोणतेही कर्ज नाही. म्हणूनच फक्त हा कोपराच नाही, संपूर्ण घर तिचे ऋणी आहे. तुमच्यापेक्षा तिचा या घरावर अधिक हक्क आहे.

आमची मुलं असल्याचा फायदा जरूर घ्या. पण जर देव मंदिरात जोडीने शोभून दिसतात तर आईवडील का दिसू नये ?

Read More

झोपाळा
भाग १
सून फोनवर आईशी बोलत होती, “आई मी काय सांगू, आजकाल शिळ्या कढीला पण उत आलाय! सासरेबुवा निवृत्त झाल्यापासून, दोघेही गार्डनमध्ये एखाद्या फिल्मी जोडप्यासारखे दिवसभर झोपाळ्यावर बसलेले असतात. आपल्या पिकल्या केसांकडे बघून तरी वागायचं त्यांनी! अजूनही स्वतःला पंचवीशीतलेच समजतात.

तेवढ्यात उदास मनाने सासूबाई स्वयंपाकघरात शिरल्या. त्यांनी हे सर्व ऐकले होते, पण त्याकडे दुर्लक्ष करून त्यांनी शांतपणे चहा बनवला आणि सुनेलाही तिच्या खोलीत जाऊन दिला. नवऱ्यासाठी चहा घेऊन जाताना सुनेने पाहिलं अन पुन्हा तोंड वेडंवाकडं केलं. पण त्यांनी तिच्याकडे दुर्लक्षच केलं.

पती निवृत्त झाल्यापासून हा आता त्यांचा रोजचाच दिनक्रम झाला होता. त्यांच्या इच्छेनुसार ती रोज चांगले चांगले कपडे घालून गार्डनमध्येच आपला बराचसा वेळ घालवायची. आयुष्यभर त्यांनी फक्त मुलासाठीच खस्ता खाल्ल्या होत्या. त्यामुळे आयुष्याच्या संध्याकाळी, ते दोघेही एकत्र वेळ घालवायचे.

अन्नपूर्णा भवन… दोन मजली बंगलेवजा घर अशोक आणि प्रभा यांचे आजीवन स्वप्न होते. घराच्या समोर असलेल्या बागेत प्रभाबाईंनी बेल, जास्वंदी, चाफा, मोगरा अशी कितीतरी फुलझाडे लावली होती. एका छोट्या टाकीत छानशी कमळेही फुलली होती. हिवाळ्यात त्या तेथे भाज्यांचीही लागवड करत. स्वयंपाकघरासाठी लागणारी ताजी कोथिंबीर, पुदिना, मेथी तिथलीच असायची!

पण इतकी वर्षे कामाच्या गडबडीत अशोकजींना त्या जागेचा कधीच आनंद घेता आला नाही. पण आता मात्र त्यांचा सगळा मोकळा वेळ तिथेच जात असे. खरं तर त्या जागेत एक छानसं टुमदार घर दोघांसाठी बनवायचं म्हणून ती अतिरिक्त जागा त्यांनी घेतली होती. पण आता ते शक्य नव्हतं. प्रभाबाईंना तिथे एक झोपाळा हवा होता तो त्यांनी आणला. आता त्यांचा बराचसा वेळ त्या झोपाळ्यावर गप्पा मारण्यातच जायचा.

आता पती-पत्नी दोघांनाही आरामाचे क्षण जगायचे होते. त्यांच्या घरात सर्व आवश्यक सोयीसुविधाही होत्या, तरीही सूनेला त्यांचं हे दिवसभर झोपाळ्यावर बसणं खटकायचं. अगोदर दिवसभर तिच्यासोबत असलेल्या सासूबाई आता त्यांच्या पतीला थोडा अधिक वेळ देऊ लागल्या होत्या.

त्यांना टोमणे मारायची एकही संधी ती सोडत नसे. एकदा त्यांना त्या जागेतून हटवण्यासाठी तिने एक युक्ती केली.

"आपण मोठी कार का खरेदी करत नाही ... नवीन"

"कल्पना चांगली आहे, पण ठेवायची कुठे? आपल्याकडे फक्त एकच गॅरेज आहे." नवीन थोड्या चिंतेच्या स्वरात म्हणाला.

"जागा का नाही, ती बाग आहे ना! जिथे आजकाल दोन लव्हबर्ड्स बसतात!"

"तू जरा जास्तच बोलतेस!" म्हणत नविनने तिला फटकारले खरे, पण त्यानेही याबाबटुत बाबांशी बोलायचे ठरवले होते.

दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तो वडिलांकडे गेला आणि म्हणाला, "बाबा! मला आणि सोनमला मोठी कार घ्यायची आहे."

"पण बेटा, मोठी गाडी आधीच घरात आहे, मग तू ती ठेवणार कुठे?"

"या बागेतच नवं गॅरेज बांधायचा विचार करतोय मी!. सोनम काही बघणार नाही आणि आई तरी अजून किती दिवस काळजी घेईल? त्यापेक्षा ही झाडे तोडणे चांगले होईल."

प्रभाबाईंच्या छातीत ते ऐकून धस्स झालं! रागावर नियंत्रण ठेवत बाबा म्हणाले, "मला तुझ्या आईशी बोलावं लागेल, मला थोडा वेळ दे."

"काय पप्पा ... आईला काय विचारायचे .. या जागेचा काय उपयोग?", नवीन जरा चिडूनच म्हणाला. "तुम्ही दोघेही दिवसभर कुठलाही विचार न करता, चार लोकांचा विचार न करता इथे बसता. आता सोनम सुद्धा घरात आहे, लहान मुलंही आहेत. पण तुम्ही मात्र दोघेही दिवसभर झोपाळ्यावर डुलता."

आतून सोनमची बडबड चालूच होती.

नवीन आणि सोनमने त्या संध्याकाळी बाहेरून जेवण मागवले. पण ते जेवण काही केल्या या दोघांच्याही घशाखाली उतरले नाही. इच्छाच नव्हती कसली. दोघेही रात्रभर जागेचं होते!
( पुढील भागात)

Read More