Quotes by Dnyanraj Panchal in Bitesapp read free

Dnyanraj Panchal

Dnyanraj Panchal

@dnyaneshwarpanchal5699


तू वाळीत टाकलेल्या हरेक वस्तू ,
जळक्या , सडक्या , कुजक्या ,
ज्यांच्याशी संपलाय तुझा संभोगाचा करार .
अश्या सार्‍या वस्तूचा गाळ जमलाय
इथं पार तळाला .
जो दिवसेंदिवस वाढतोय , सडतोय .
.
.
काल इथून जाताना बघितलं मी तुला !
स्वच्छ कोर्‍या शहरात राहायला लागला तसा ,
तुला वास यायला लागलेला माझा .
त्या महागड्या परफ्युमचे शिडकावे मारलेला,
तुझा रुमाल .
तुझ्या वासनेचा वास घेणार्‍या नाकावर
झाकून जात होतास ना तू ?
.
.
येशील येशील थांब ।
तुझ्या संपलेल्या भोगाच्या सार्‍या वस्तू ,
सार्‍या सांभाळून ठेवतोय . घाबरु नकोस !
.
.
मरुदे माझ्यातील सार्‍या जिवंत भावना .
कोरडा झालो तर बेहत्तरच !
पाच पन्नास निष्पाप देह दिसतील ,
तडफडत मरुन पडलेली ,
त्यांचा मरणाचा #उग्र वास जाईल ना नाकात ...
तेव्हा ,
तेव्हा त्या परफ्युमचा वास थिटा पडेल आपोआपच
अन्
लवकरच सोडतील श्वासेही,
तुझ्या त्या उच्चभ्रू नाकाला .
त्यांना सारं सहन होतं . पण ?
पण हत्येच अोझं कोणाला पेलवत ?
.
.
एकाच्या सुटकेसाठी एकाचा बळी हवा !
तो तुझाच घेणार .
नको करु चिंता चितेची ..
तुझी माणसं ,
ती इथच आणून फेकतील तुला .
.
.
तेव्हा ,
तेव्हा जाळेल मी तुला ..
त्या सार्‍या गोष्टीला घेऊन ,
ज्यात असतील ,
तू वाळीत टाकलेल्या हरेक वस्तू ,
जळक्या , सडक्या , कुजक्या
ज्यांच्याशी संपलाय तुझा 'संभोगाचा' करार .. .
.
©मुक्तज्ञानी


#उग्र

Read More

गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांवरुन सार्‍या लोकांनी मिळून एकच सूर लावला की , माणूसकी संपली आहे . घडणार्‍या घटना अमानवीय असल्या तरिही ; संपुर्णपणे ह्या जगातून मानवता संपलीच आहे असा ग्रह करुन घेण्यात काही अर्थ नाही . प्रेमाची , विश्वासाची अपेक्षा जशी आपण केवळ जगाकडून करतो , तसचं माणुसकीची अपेक्षाही केवळ जगाकडून करत आलोत . जगात प्रेम आहे का ? असं कोणी विचारेल तेव्हा , आपण ठामपणे म्हणतो का कधी की , हो आहे ! किमान मी आहे तोपर्यंत तरी प्रेम माझ्या रुपाने शिल्लक आहे . असं म्हटलय आपण कधी ठामपणे ? .
.
मला अजूनही दिसतात अवतीभोवती अडचणीत असणार्‍या माणसांना मदत करणारी माणसं . मुक्या जिवांना जिवापाड जपणारी माणसं . पुरात , भुकंपात आणि महामारीत अडकलेल्यांना त्यातून बाहेर काढणारी माणसं . मदतीची हाक दिल्यानंतर त्याला लागलीच प्रतिसाद देणारी माणसं . आजही जातं ह्या घरात बनलेलं जेवन शेजारच्या घरात सहजपणे . आणि त्या घरातीलही येतं आपल्या घरात . प्रेमाची देवाणघेवाण आजही होते . तसं पाहीलं तर , जगाच्या पाठीवर झालेली महायुद्ध , त्यातील संहार , वा माणूस माणसावर करत आलेला अत्याच्यार ह्या सार्‍या गोष्टींविरुद्ध उभी राहणारीही माणसंच आहेत . अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारीही माणसंच आहेत . आहेत जगात अजूनही भुकेल्या लोकांची काळजी वाहणारी माणसं . आहेत अजूनही अनाथांना आधार देणारी माणसं . ज्यांच्या रुपाने मुर्तिमंत माणुसकी वावरत असते . फरक इतकाच की , आपल्याला दिसत नाहीत अशी माणसं ह्या जगाच्या झगमगाटीत !
.
.
माणुसकी जपणार्‍यांच होत नाही कौतुक आपल्याकडे हवं तितकं . ती प्रसिद्ध नसतात . प्रसिद्धी कौतुक येतं केवळ त्यांच्या वाट्याला जी दिखावा करतात माणुसकीचा . फोटो , व्हिडीयो व्हायरल होतात . तितक्यापुरतं कौतुक होतं आणि लोकं विसरुन जातात . माणुसकी जपणार्‍यांच तात्पुरतं कौतूक करुन आपण मोकळे होतोत . आपल्या नजरेतून त्याचं तोलमोल करुन आपण बसतोत आपल्याच घराच्या आत . पण ; देणार्‍याने देत जावे । घेणार्‍याने घेत जावे । घेता घेता घेणार्‍याने । देणार्‍याचे हात घ्यावे ॥ हे विसरुन जातोत . माणुसकी जपणार्‍यांपासून आपण त्यांची वृत्ती कधी घेत नाहीत . म्हणून वाटत राहतं आपल्याला की , संपलीये माणूसकी !
.
.
कोणी म्हणो वा ना म्हणो ; मी तरी म्हणेल की , माझ्या शेवटच्या श्वासांपर्यंत मी ठेवेल माझ्या आत माणुसकी जिवंत !दिव्याने अंधार झालाय म्हणून अोरडण्यात अर्थ नसतो . आपण जिवंत असताना माणूसकी संपली असं म्हणण्यात तरी कोणता अर्थ आहे ?
.
.
विश्वाकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा काही गोष्टी आपण जपायच्या असतात .
.
©मुक्तज्ञानी (insta/@panchal_dnyanraj)

Read More