४
जातीतच विवाह केलेला बरा. देवला तसंच वाटत होतं आजही. कारण देवनं करुणाशी मजबुरीनं विवाह केला होता. जी त्याच्या जातीतील नव्हती. जिला समाजानं आजही स्विकारलं नव्हतं. समाजाला आजही जातच आवडत होती. त्याचं कारण होतं जातीची बंधनं. जातीनं अख्ख्या समाजाला जातीच्याच बंधनात बांधून टाकलं होतं. जात ही जन्मापासूनच बांडगुळासारखी आयुष्याला चिकटून राहात असे. ती बदलत नसे वा कुणाचीही जात तेव्हापर्यंत बदललेली नव्हती. शिवाय मुलांचं शाळेत नाव दाखल करतांना जात टाकावी लागत असे. जात आधारीतच बरेच विवाह होत होते व सध्यातरी आंतरजातीय विवाहाला मान्यता नव्हती. असा आंतरजातीय विवाह कोणी केल्यास त्याला समाज वाळीत टाकत होता. तो समाज त्याला शेवटपर्यंत स्विकारत नव्हता. अन् त्यामुळंच देवच्या पत्नीचा स्विकार देवच्या बहिणींनी केलेला नव्हता.
देवला तीन बहिणी होत्या. तिन्ही बहिणी त्याच्या विरोधात होत्या. त्या जातच मानत होत्या व त्यानं जातीच्याच मुलींशी विवाह करावा असं त्यांना वाटत होतं. परंतु जातीच्या मुली टिकतील तेव्हा ना.
देव विचार करायचा की मंजू नावाची ती मुलगी. ती जातीचीच होती. ती टिकलीच नाही तर मग जातीच्या मुलीशी विवाह करुन काय उपयोग? असा विचार करुन त्यानं आंतरजातीय मुलगी जीवनसाथी म्हणून शोधली व त्यानं कोणालाच माहीत न होवू देता विवाह केला.
देवचा विवाह झाला होता. करुणा घरी आली होती. तशी करुणा घरी येताच ती बातमी वाऱ्यासारखी देवच्या बहिणीच्या घरी पोहोचली. तसा दुसराच दिवस उजळला व दुसऱ्या दिवशी देव नित्यनेमानं उठला व सकाळीच अंघोळ करुन तो आपल्या कर्तव्यपरायणासाठी आपल्या कर्तव्यावर गेला. तशी संधी साधून त्याच दिवशी त्याच्या बहिणी सकाळीच त्याच्या घरी पोहोचल्या. त्यातील एकीनं तिला बोलावलं. नाव गाव विचारलं व म्हटलं की तू देवसोबत विवाह का केला, तू निघून जा. आम्ही त्याच्याकडून पैसे घेवून तुझा विवाह तुझ्याच जातीतील व्यक्तीसोबत लावून देवू. परंतु तू जा. इथं राहू नकोस.
ते देवच्या बहिणींचं बोलणं. त्यावर ती स्तब्ध होती. काय बोलावं ते तिला सुचेना. तद्नंतर विचार करुन तिनं स्पष्ट उत्तर दिलं.
"कशी सोडणार. मी विवाह केलाय देवसोबत. मी त्याला कशी सोडणार?"
ते करुणेचं बाणेदार उत्तर. त्या उत्तराचा देवच्या बहिणींना भयंकर राग आला. ही अशी समजदारीपणानं देवला सोडून जात नाही. असं त्यांना वाटलं व त्यापैकी एक म्हणाली,
"खिच गं तिला. चांगलं कोळपूनच काढू."
तो देवच्या एका बहिणीच्या म्हणण्याचा अवकाश. दुसऱ्या दोघी बहिणी पुढे झाल्या. त्यांनी तिला धरलं व त्या तिघीही मिळून तिला मारु लागल्या. ज्यानं करुणेच्या देहाची अंगार होवू लागली होती.
करुणेला फार लागलं होतं. तशी पोलीस तक्रार होईल. या भीतीनं घाबरुन त्या पळून गेल्या होत्या. जाता जाता त्यांनी धमकी दिली होती की ती निघून न गेल्यास त्याचे परिणाम गंभीरच होतील. तसा थोड्याच वेळात देव घरी आला. त्यानं पाहिलं की त्याची नवनीत पत्नी करुणा रक्ताच्या थारोळ्यात पडलेली आहे. तसा तो घाबरला. काय झालं हे तो विचारु लागला. तशी करुणा म्हणाली,
"तुमच्याच बहिणी. सकाळी आल्या होत्या. त्यांनीच मारलं मला आणि म्हटलं की तू इथून निघून जा. आम्ही देवकडून पैसा घेवू व तुझा विवाह तुझ्याच जातीतील व्यक्तीसोबत लावून देवू. ज्यात मी नकार देताच त्यांनी मारहाण केली व धमकीही दिली की जर तू निघून गेली नाहीस तर त्याचे परिणाम गंभीर होतील."
देवनं ते सगळं ऐकलं. तसा देवनं विचार केला. त्याची तक्रार पोलीस स्टेशनला टाकली नाही तर माझ्या बहिणी मी नसतांना अशाच येवून करुणेला मारहाण करतील. त्यापेक्षा स्वतःच्या बहिणी का असेना, त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला टाकलेलीच बरी. तसा विचार करुन तो म्हणाला,
"चल पोलीस स्टेशनला. आपण त्यांची तक्रार करु."
ते देवचं बोलणं. तशी करुणा समजदार होती. ती त्याला समजवत म्हणाली,
"नको नको. हा राग आहे त्यांचा. तो राग काही दिवसानंतर मावळेलच. नात्याचेच बंध आहेत हे. त्यांनी मारलंही असलं थोडंसं तरी ते सहन करावंच लागेल. शेवटी बहिणीच आहेत त्या तुमच्या."
करुणेचं ते प्रेमळ बोलणं. तसा देव विचार करु लागला. एक मंजू होती की तिला माझी आई सहन होत नाही. ती तिला वृद्धाश्रमात टाकायला सांगत होती आणि ही एक आहे, जिला जबरन मारहाण होवूनही ही त्यांची तक्रार पोलीस स्टेशनला टाकायला तयार नाही तर ती त्यांना दोष न देता त्या बहिणी आहेत असंच सांगतेय. ही माणुसकीची गोष्ट आहे.
देव झालेल्या घटनेबद्दल विचार करु लागताच त्याने नवीनच केलेल्या पत्नीबाबत त्याचे मनात प्रेम निर्माण झालं होतं व त्याने त्याच वेळेस ठाम विचार केला होता की आता काहीही झालं तरी चालेल, आपण करुणेला सोडायचं नाही. तिच्या संकटात वेळोवेळी धावून जायचं.
तो दिवस त्याच्या मनात गाठ बांधून होता. त्यानंतर बरेच प्रसंग आले. परंतु देवनं तिला अंतर दिलं नाही. तिनंही त्याला अंतर दिलं नाही. आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत दोघंही एकत्र राहिले. ज्यात आनंद होता आणि तेवढाच जिव्हाळाही होता. त्यातच त्यानं आपल्या सासऱ्याचीही सेवा केली होती. त्यांनाही पोषलं होतं.
जातमान्य या विवाहप्रकारात काही लोकं असेही होते की जे आंतरजातीय विवाह करीत होते. ते जातविवाह करीत नव्हते. मात्र देव जातीतच विवाह करावा असे मानत असे. कारण त्यानं आंतरजातीय विवाह केला होता व त्यानं त्या विवाहानंतर बरंचसं भोगलंही होतं. लोकांनी तर त्याला वाळीतच टाकलं होतं. कोणी जातीतील व्यक्ती त्याला आपल्या घरी विवाहसमारंभात बोलावत नसे. त्याला आठवत होतं, ते पुरातन जीवन. ज्यात त्याला वाटत होतं की लोकांनी आंतरजातीय विवाह करु नये तर जातविवाहच करावा. त्याला काय माहीत होते की त्यालाही कधीकाळी आंतरजातीय विवाह करावा लागेल. तशी त्याला आंतरजातीय विवाहाची झळ पोहोचताच त्याला जातविवाह व आंतरजातीय विवाहाचा विचार येवू लागला होता.
सध्या आंतरजातीय विवाह लोकं राजरोषपणे करु लागले आहेत. त्याचं कारण आहे जातविवाहात येणारा अती खर्च, हुंडापद्धती व पाश्चात्यीकरण. ज्यातून जातविवाहातील प्रथा, परंपरा व त्यातून निर्माण होणारे संस्कार याला तिलांजली देण्याचे प्रयत्न होत आहेत. जातविवाह न होणे म्हणजेच समाजात कुसंस्काराचे वृद्धीकरण होणे होय. असे सर्वसामान्य लोकांना वाटत आहे. ते आपल्या भावनेने असल्या प्रकारांना रोखू पाहात आहेत. परंतु ते शक्य नाही. प्रेमविवाह लोकांना मान्य नाही. त्याचं कारण आहे ते मूल आणि त्याचा परीवार. ते मूल कसं आहे. त्याचा परीवार कसा आहे. हे माहीत नसतं. शिवाय तो परीवार कसा निघेल वा ते मूल कसं निघेल. याचाही थांगपत्ता नसतोच. परंतु जातविवाहात परीवारातील मूल कसं निघेल याची माहिती हमखास असतेच आणि तो वात्रटही निघाला तर त्याचेवर सामाजिक दबाब आणून त्याला सुधरविण्याची प्रक्रिया आहे. त्यामुळे जातविवाहाला जास्त पसंती निर्माण झाली आहे. हे जरी खरं असलं तरी आजही बऱ्याच ठिकाणी जातीचेही व नात्यातीलही विवाह टिकत नाहीत. त्यांच्यावरही घटस्फोटाची पाळी येते. शिवाय जातविवाहाला येणारा खर्च, हुंडापद्धती, बडेजावपणा, गर्विष्ठपणाही जातविवाहात जास्तच असतो. या सर्व कारणामुळे आज आंतरजातीय विवाहाचे प्रमाण वाढत चाललेले आहे. हे जात पाळणाऱ्या लोकांसाठी चिंताजनक आहे. कदाचीत यातून असं दिसून येत आहे की पुढं ज्या स्वार्थासाठी जात निर्माण झाली. ती जातच मुळात नष्ट होवून जाईल काय? परंतु असं वाटत जरी असलं तरी सध्या घाबरण्याची गरज नाही. जातीचेही विवाह होत आहेत. ज्यात परंपरा जोपासल्या जातात. ज्यातून संस्कार टिकवले जातात. जात जर नष्ट झाली तर हेच संस्कार लयास जातील असे जात बाळगणाऱ्या लोकांना वाटते आणि ते खरंही आहे. कारण आंतरजातीय विवाह करतांना जात विवाहात ज्या परंपरा व प्रथा पाळल्या जातात. त्या प्रथा आंतरजातीय विवाहात पाळल्या जात नाहीत. कालांतरानं जातीचे विवाह नष्ट झाले व आंतरजातीय विवाह होत गेले तर जात विवाहात पाळल्या जाणाऱ्या प्रथा, परंपरा आपल्याला दिसणार नाहीत. ज्यातून त्या प्रथा, परंपरा साहजीकच नष्ट होतील व संस्कारही आपोआपच तुटतील यात शंका नाही. महत्वपूर्ण बाब ही की जात नष्ट होवू नये. जातीवर आधारीत विवाहही नष्ट होवू नये. प्रथा, परंपराही तुटू नये. कारण तेच विवाह संस्कार टिकविण्याला पर्याय आहेत. ते जर विवाह नष्ट झाले तर साहजीकच परंपरा, प्रथा तुटल्यानं व संस्कार नेस्तनाबूत झाल्यानं विवाहाला कराराचे स्वरुप प्राप्त होईल. ज्यातून माणूसकी राहणार नाही. ती लयास जाईल. बलात्काराचे प्रमाण वाढतील आणि पुन्हा एकदा न्यायदेवता अंध होईल.
विवाह..... विवाहाचे अनेक प्रकार जरी असले तरी सध्याच्या काळात विवाहाचे मुख्यतः तीन प्रकार अस्तित्वात असलेले दिसतात. पहिला प्रकार जात विवाह, दुसरा प्रकार आंतरजातीय विवाह व तिसरा प्रकार आंतरधर्मीय विवाह. याशिवाय आंतरराष्ट्रीय, आंतरराज्यीय, आंतरभाषीय, गांधर्व इत्यादी अनेक प्रकार आहेत. वरीलपैकी लोकं जास्तीत जास्त जात विवाह करतात. कारण असा विवाह केल्यानंतर या विवाहात विवाह करणाऱ्या लोकांना आयुष्यभर सन्मान मिळत असतो. म्हणूनच अशा विवाहाला खर्च जरी जास्त येत असला तरी लोकं असा विवाह करीत असतात. या विवाहात प्रेमविवाहाला थारा नाही. असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही. कारण आजही जातीचेच विवाह होतात व जी मंडळी असा जातविवाह करीत नाहीत, त्यांना समाज दुषणे देतो. त्यांना समाज वाळीतही टाकत असतो.
अलिकडील काळात महागाई वाढली आहे व आजच्या काळात जातीचे विवाह परवडत नाहीत. कारण आजच्या काळात जातीत विवाह केल्यास साऱ्याच जुनाट असलेल्या प्रथा, परंपरा पाळाव्याच लागतात. जसे हळद लावणे, देवीला कोंबडा, बकरा बळी देणे, अईग म्हणून मातीचे भांडे घेणे, परडे घेणे, टोपल्या घेणे, बँड ठरवणे, गजरे घेणे, साड्या घेणे, आपल्यालाच नाही तर नवरदेवासह सर्व नातेवाईकांना कपडे घेणे, त्यातच जेवन व सभागृह करणे या साऱ्या गोष्टी. पंडीत करणे, त्याचेजवळ गुण जुळवणे, लग्नपत्रिका बनवणे व प्रत्यक्षात विवाहावेळी पंडीत ठेवणे. तोच पंडीत कथेतही असतोच. हा पंडीत विवाहाच्या सर्व विधीचा खर्च हा वीस ते पंचवीस हजार रुपयांपर्यंत घेतो. यात येणारा अवाढव्य खर्च, त्यातच रितीरिवाजानुसार हुंडा पद्धती. हुंडा पद्धती कायद्यानं बंद असली तरी काही समाजात अजुनही सुरुच आहे. वधूपक्षांकडून हुंडा मागण्याची पद्धत आहे. खर्च इथंच संपत नाही तर विवाहानंतर गोड जेवन, खारे जेवन, रस प्रक्रिया, शिवाय पहिली आषाढी, पहिली दिवाळी या साऱ्याच गोष्टी सुरु असतात. अन् यावरही खर्च थांबत नाही तर कुंटूबात जे काही विवाह सोहळे होतात. त्या सर्व विवाह सोहळ्यात उपस्थित राहावं लागतं. त्यांना आंदन व अहेर घ्यावाच लागतो. याव्यतिरिक्त विवाह झाल्यानंतर एकमेकांचे पाहुणे लागू होतात. ते सतत येत असतात. त्यांना पाहुणचार करावाच लागतो. म्हणजेच एकंदरीत सांगायचं झाल्यास कमाई कमी आणि खर्च जास्त अशी प्रक्रिया जातमान्य विवाहात होवून जाते. कधी व केव्हा एखादा पाहुणा टपकेल व त्याला पाहुणचार करावा लागेल याचा नेम नसतो. असे जातीच्याच विवाहात पाहायला मिळत असते आणि असा विवाह तुटलाच तर दुपटीनं आणखी पैसे मोजून द्यावे लागतात. जेव्हा विवाह झाल्यानंतर पती पत्नींचं पटत नाही, अन् न्यायालयात जेव्हा खटला जातो. तेव्हा वकील पक्ष व जाण्यायेण्याचा खर्च फारच असतो. शिवाय एक दिवसाचं काम जात असतं आणि वेळही जात असतो. तेव्हा विचार येतो की कदाचीत आपण विवाह केला नसता तर अगदी बरं झालं असतं. परंतु सदासर्वकाळ कोणी कुमार राहू इच्छीत नाही. तो विवाह करतोच. अशीच विवाहाची इच्छा ठेवणारे व्यक्ती विवाह झाल्यानंतर जर तो विवाह तुटत असेल तर विचार करतात की आपण प्रेमविवाह केला असता तर बरे झाले असते.
पुर्वीही विवाह करतांना मांगवाड्यात जावून मांगांकडून बँड ठरवले जात. कुंभारवाड्यात जावून कुंभाराकडून आवर्जून मातीचे भांडे विवाहात वापरले जात. भटजींकडून विवाह विधी काढला जायचा. चांभाराकडून चप्पल, जोडे बनवले जायचे. बुरडांकडून सुपं, परडे घेतली जात. भाट जेवनाचे आमंत्रण पोहोचवत असे. माली केसं कापून द्यायचा. वाढई पायाखालचे पाटं बनवून द्यायचा. माळ्यांकडून माळवा आणला जायचा. तेल तेली द्यायचा तर कुणबी अन्नधान्य पुरवायचा. तसेच शिंप्यांकडून कपडे शिवलेच जायचे. याचं कारण होतं, गावात प्रत्येकाला काम मिळणं व त्या कामातून त्या त्या जातींचा उदरनिर्वाह चालणं. हे जातविवाहातच घडत असे व आजही जातविवाहात हेच घडतांना दिसत आहे.
जातमान्य विवाहाच्या उलट आंतरजातीय विवाह आहे. या विवाह प्रकारात जास्त खर्च येत नाही. फक्त चार साक्षीदार हवे असतात व एक विवाह लावून देणारा भटजी हवा असतो. दुसरा साक्षीदार देवाची एखादी मुर्ती व दोन प्रत्यक्ष जीवंत देहाचे मानव साक्षीदार म्हणून हवे असतात. अलिकडील विवाह सोहळ्यातही चारच साक्षीदार हवे असतात. जे न्यायालयातून होतात. त्यात पहिला साक्षीदार म्हणजे न्यायाधीश, ज्याला आपण आपल्या भाषेत भटजी म्हणतो. दुसरा साक्षीदार म्हणजे न्यायदेवतेचा फोटो अर्थात न्यायदेवता व दोन प्रत्यक्ष साक्षीदार म्हणजेच जीवंत असलेले व्यक्ती. या पद्धतीत आणखी पुढे जावून एक, एक पावाचा पेढ्याचा डब्बा व दोन पुष्पहार हवे असतात. एकंदरीत सांगायचं झाल्यास असा आंतरजातीय विवाह करतांना पेढे व पुष्पहार पकडून जास्तीत जास्त पाचशे रुपये खर्च येतो. त्यापेक्षा जास्त नाही. शिवाय असा विवाह न्यायालयामार्फत झाल्यास दोघांना संसारोपयोगी अनुदानरुपात पैसेही मिळतात व काही संसारोपयोगी सामानही मिळत असते.
आंतरधर्मीय विवाहातही आंतरजातीय विवाहासारखीच परिस्थिती असते. या विवाहातही दोन साक्षीदार, देवाची मुर्ती व भटजी आणि तोच विवाह न्यायालयामार्फत होत असेल तर दोन साक्षीदार, न्यायदेवतेचा फोटो व प्रत्यक्ष न्यायाधीश लागतो. हीच स्थिती आंतरभाषीय, आंतरराष्ट्रीय व आंतराज्यीय विवाहात आहे. मात्र गांधर्वविवाहातील स्थिती थोडी वेगळी आहे. या विवाहात दोन साक्षीदार असायलाच हवेत असे बंधन नाही. हा विवाह स्री आणि पुरुष यांच्या सहमतीनं होतो व यात साक्षीदार म्हणून फक्त प्रत्यक्ष देवाची मुर्तीच लागते. दुसरा कोणताच व्यक्ती या विवाहात साक्षीदार म्हणून लागत नाही. काही ठिकाणी तुरळक प्रमाणात भटजी साक्षीदार म्हणून लागत असतो.
पुर्वी गांधर्व विवाह भरपूर व्हायचे. परंतु अलिकडील काळातील बदललेल्या विपरीत परिस्थितीमुळं व एकमेकांवरील विश्वास कमी झाल्यामुळं गांधर्व विवाह कमीच झालेले आहेत, अर्थात बंद झालेले आहेत. त्याजागी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहानं जागा घेतलेली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय, आंतरभाषीय व आंतरराज्यीय विवाह होत असले तरी त्याचा समावेश आंतरजातीय, जात विवाह, आंतरधर्मीय विवाहात होतो. त्यामुळंच अशा विवाह प्रकारांना विशेष असा वेगळा दर्जा नाही.
पुर्वी विवाह व्हायचे. जात विवाहच नाही तर आंतरजातीय विवाहही व्हायचे. दोन्ही विवाह लोकांना प्रियच असायचे व आवडायचेही. आंतरजातीय विवाहात मुलगी आपल्या स्वतःचा स्वयंवर ठेवायची. मग स्पर्धा लागायची. जो त्या स्पर्धेत जिंकेल, त्याच्या गळ्यात ती स्री वरमाला घालायची. मग तो कोणत्याही जातीतील का असेना. तोही विवाह लोकांना प्रिय असायचाच. त्यानंतर काळ बदलला. जातीला विशेष असं स्थान मिळालं व जात वर आली. त्यानंतर प्रथा, परंपरांना जास्त प्रमाणात स्थान मिळाले व जातीचेच विवाह पुढे आले. आंतरजातीय विवाह कालांतरानं मागे पडले. पैशाच्याही बाबतीत सांगायचं झाल्यास पुर्वी जो आंतरजातीय विवाह सोहळा साजरा केल्या जायचा. त्या विवाह सोहळ्यात जात विवाह सोहळ्यापेक्षा जास्त खर्च यायचा. कारण स्वयंवर जाहीर करणारी स्री स्पर्धाही जाहीर करायची. ज्यात देशोदेशीचे राजकुमार येत. त्यातच त्या सर्वांच्याच राहण्याची व खानपानाची व्यवस्था करावी लागायची. अशातच काही ठिकाणी प्रचंड युद्ध होत. त्यात शस्राचा वापर केल्या जायचा. तोही खर्च अमापच असायचा. कालांतरानं तो प्रकार मागे पडला.
पुर्वी जात विवाह व आंतरजातीय स्वयंवर विवाह यात अती प्रमाणात खर्च येत असे. तशीच सर्वांची मर्जी प्राप्त करावी लागत असे. म्हणूनच गांधर्व विवाह पुर्वीच्या काळात प्रचलीत झाले. ज्याला जास्त खर्च येत नसे. परंतु असे विवाह हे करार पद्धतीने चालत. करार संपला की पतीपत्नी एकमेकांपासून विभक्त होत असत. आता वर्तमान काळात त्याच गांधर्व विवाहाची जागा आंतरजातीय विवाहाने घेतलेली आहे.
आज जातविवाह होतात, प्रेमविवाह तेवढे होत नाहीत. कारण प्रेमविवाह हा समाजातील कोणत्याही वयोवृद्ध लोकांना अजिबात आवडत नाही. त्याचं कारण आहे, समाजानं त्या परिवाराला वाळीत टाकणं. समजा एखाद्या घरात प्रेमविवाह झाला असेल, तर आजुबाजूची मंडळी त्यांना नावबोटं ठेवतात. दुषणे देत असतात. वाळीतही टाकत असतात. त्यांच्याशी जास्त प्रमाणात व्यवहार करीत नाहीत. जरी त्यांचा स्वभाव चांगला असला तरी. एकमेकांशी चर्चा सुरु असेल तर त्यांचं नाव काढून अपशब्द सुरुच असतात. याचाच अर्थ असा की प्रेमविवाह लोकांना मान्य नाही. त्यातच प्रेमविवाहावर जातीचा पारंपारीक बडगा आहे. आज लोकांना वाटते की अशा विवाहातून संस्कार तुटतात. माणूसकी गहाण पडते. अन् हे खरंही आहे. कारण प्रेमविवाह करणारी बरीचशी मंडळी संस्कार पाळतीलच असे नाही. ते प्रथा, परंपरा पाळतीलच असे नाही. अन् ते आपल्या बाळावर जात अंतर्गत असलेले व शिकवले जाणारे संस्कार करतीलच असे नाही. परंतु हे जरी खरं असलं तरी आजही अशा बऱ्याच ठिकाणी जात विवाह होतात. प्रथा, परंपरा पाळल्या जातात व संस्कारही टिकवले जातात. यात शंका नाही.
जातविवाह व्हावेत असे लोकांना वाटते. जरी त्यात अवाढव्य खर्च लागत असला तरी. ते टिकावेत, यासाठीच लोकं जातविवाहात अवाढव्य पैसा खर्च करतात. कारण जातविवाहात आदर्श संस्काराचे प्रतिबिंब आहे असे लोकांना वाटते. मग त्यात हुंडाप्रकार असला, घटस्फोट व फारकत होत असली तरी प्रत्येक व्यक्ती जातविवाह टिकविण्याचा मार्ग अनुसरतो. कारण जात जर नसेल तर उद्या आपल्यातही माणुसकी नसेल व आपली गणती साहजीकच पशुंमध्ये होईल असे लोकांना वाटते. म्हणूनच ते जातविवाहात पैसा खर्च करतात. जातविवाहाचा खर्चही सहन करतात. परंतु जातविवाहच करतात. आंतरजातीय विवाह करीत नाही आणि आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना दंडीत करतात, वाळीत टाकतात. विशेष सांगायचं झाल्यास जातविवाहात खर्च जरी असला तरी लोकांचे म्हणजे याबाबत रास्त वाटते. कारण आंतरजातीय विवाह केल्यास त्याची शिक्षा आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना आयुष्यभर भोगावीच लागते. समाज त्यांना जवळ करीत नाही व त्याची अवस्था एखाद्या कळपातील भाकड गाईसारखी होते. जी भाकडगाय कोणाच्याच कामात येत नाही. शेवटी कसाई घेवून जातो व तिचा दोष नसतांना तिचा विनाकारण बळी घेतो. म्हणूनच आंतरजातीय विवाह कितीही चांगले असले तरी ते करु नयेत व त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या शोषू नये. संस्कार जर टिकवायचे असतील तर जातविवाहच केलेले बरे. यात शंका नाही. कारण जातविवाहातून जे बळ व आत्मशांती मनाला लाभते, ते बळ व आत्मशांती आंतरजातीय विवाह करण्यातून लाभत नाही. आंतरधर्मीय विवाहातून तर नाहीच नाही.
देवचा तो विचार. तसं त्याला वाटणं साहजीकच होतं. कारण त्यानं आंतरजातीय विवाह करुन भरपूर कळा भोगल्या होत्या. अजुनही समाजानं नव्हे तर त्याच्या जातीनं त्याला स्विकारलं नव्हतं. त्याला वाळीतच टाकल्यागत समाज वागणूक देत होता. ज्यासाठी त्याच्या बहिणी जबाबदार होत्या. त्यांना आधीपासूनच भाऊ आणि आई प्रिय नव्हतीच. त्यातच त्यानं दुसऱ्या विवाहाच्या वेळेस का असेना, त्यानं आंतरजातीय विवाह केल्यानं देवला बदनाम करण्याची नामी संधी त्यांना चालून आली होती त्यांना व त्या त्याला जातीत बदनाम करीत होत्या. जातीनं त्याला वाळीत टाकलं होतं व ते त्याला कोणत्याच कार्यक्रमात, विवाह समारंभात बोलवत नसे. ना त्याच्या घरी जात असे. असे हलाखीचे जीवन जगत होता तो. मंजूनं आपल्या एकंदरीत वर्तनानं त्याला समाजात व जातीत बदनाम करुन टाकलं होतं. ज्यात त्याचा कोणताच गुन्हा नव्हता. मात्र जरी समाजानं व जातीनं त्याला वाळीत टाकलं असलं तरी तो आजही खुश होता. त्याचं कारण होतं त्यानं केलेली त्याच्या आईची सेवा. तशीच त्यानं केलेली तिच्या वडिलांची सेवा. त्याच तत्वावर तो जगत होता व कशाचीही पर्वा करीत नव्हता. त्याला वाटत होतं की आपण सक्षम होताच एक दिवस तरी जात त्याचा स्विकार करेलच करेल. तसं त्याला वाटत होतं, मग विवाह कोणताही करा. परंतु मायबापाची सेवा घडावी.
सध्या आंतरजातीय विवाह होतात. ते काही दिवस टिकतात व काही दिवसानंतर त्या दोघांत वाद तयार होतात व त्याची परियंती घटस्फोटात होते. म्हणूनच लोकांचा आंतरजातीय विवाहाला विरोध असतो. शिवाय त्याला एक जोड दिली जाते. ती म्हणजे सेवेची. म्हटलं जातं की आंतरजातीय विवाह करणारी मंडळी ही वृद्ध, जन्म देणाऱ्या मायबापाची सेवा करीत नाहीत. तसं पाहिल्यास असे घटस्फोट जातीच्या विवाहातही होतात. अन् राहिली जन्मदात्याची सेवा. तर ती सेवाही जातीत विवाह करणारे करीत नाहीत. तेही आपल्या जन्मदात्या आईवडीलांना वृद्धाश्रमात टाकतात. अन् समाज विनाकारण आंतरजातीय विवाह करणाऱ्या लोकांना बदनाम करीत असतो.
सध्या आंतरजातीय विवाह होवू लागले आहेत व देशालाही तेच अपेक्षीत आहे. त्यासाठी कायदेही बनवले आहेत. त्याचं कारण येथे जातविवाहात चालत आलेल्या परंपरा नाहीत तर त्याला कारण आहे हुंडा पद्धती आणि जातीच्या विवाहात येणारा खर्च.
अलिकडील काळात लोकांच्या जातीवर आधारीत विवाहात अमाप खर्च येतो. ज्यासाठी कर्ज काढावे लागते. ते कर्ज सालोंसाल फेडत बसावे लागते. अशा खर्चात ना अनुदान मिळत ना काही. कर्जाचे हप्तेही वाढत असतात. शिवाय दिवसेंदिवस गरिबी येत असते. एकवेळ अशी येते की ज्यानं कर्ज काढले. त्या परिवाराला कर्जापायी आपली शेती, घरदार गमवावे लागतात. कधीकधी आत्महत्याही कराव्या लागतात. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी याच गोष्टीचा अभ्यास केला व सन १९५४ पासून आंतरजातीय विवाहाला मान्यता देवून कायद्यात तशा प्रकारची तरतूद केली व आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना बक्षीस म्हणून विशेष अनुदानाची तरतूदही केली. तेव्हापासून राजरोषपणे आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह होत आहेत. याचा अर्थ पुर्वी आंतरजातीय विवाह होत नव्हते काय? पुर्वीही आंतरजातीय विवाह होतच होते. नल दमयंती, जोधा अकबर, द्रौपदी पांडव, शांतनू सत्यवती अशी बरीच आंतरजातीय विवाहाची उदाहरणं आहेत की जी पुर्वीच्या काळात घडून आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीही आंतरजातीय विवाह केलेला आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाह केला. त्याचं कारण होतं जातीभेद आणि अस्पृश्यता निवारण करणं. कारण तो काळ असा होता की अस्पृश्यांना सामाजिक जीवन जगतांना कोणत्याच स्वरुपाचा वाव नव्हता. भेदभावपूर्ण वातावरण होतं व त्या वातावरणात अस्पृश्य समाज अगदी पिंजून जात होता. स्पृश्यांचे काही नियम होते व त्या नियमांचे अस्पृश्यांनी उल्लंघन केले तर त्यांना कडक शिक्षा केल्या जात असत. ज्यात अस्पृश्यांचे जीवही जात असत. अशावेळेस ही अस्पृश्यता मिटावी. म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आंतरजातीय विवाह केला व सविता माई आंबेडकरांच्या पत्नी बनल्या. त्यानंतरही आंतरजातीय विवाहाबाबत बरीच प्रकरणं घडली. त्या प्रकरणात कित्येक आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचे जीवही गेलेत. असं होवू नये म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना नाईलाजास्तव १९५४ मध्ये संविधानात आंतरजातीय विवाहाच्या कलमांचा समावेश करावा लागला. त्या कलमांचा समावेश करण्याचा लोकांना पुढे फायदाही मिळाला. कायद्यानुसार पोलीस संरक्षण मिळाल्यानं आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचे जीवही वाचले. वाळीत टाकणे बंद झाले व आंतरजातीय विवाह करणारे राजरोषपणे जीवन जगू लागले.
आज आंतरजातीय विवाह करणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. कायद्यानंही या विवाहाला मान्यता प्रदान केलेली आहे. परंतु हे जरी खरं असलं तरी आजही या विवाहाला कायद्यानुसार मान्यता आहे. राजमान्यताही आहे. परंतु जातीची मान्यता नाही. कारण जातीची बरीच मंडळी, आंतरजातीय विवाह करणाऱ्या जोडप्याला आयुष्यभर स्विकारत नाहीत. ते त्यांचा रागच करीत असतात आणि प्रसंगी आजही बऱ्याच ठिकाणी आंतरजातीय विवाह करणाऱ्यांची कत्तल केली जाते. हीच बाब लक्षात घेवून सरकारनं नुकताच या कायद्यात बदल करुन आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना सहा महिने पोलीस संरक्षण प्रदान केले आहे. आता आंतरजातीय विवाह करणाऱ्यांना कुटूंब व समाजाकडून काही त्रास उद्भवल्यास व त्यांनी तशी तक्रार केल्यास कारवाई निश्चीत होणार आहे.
सध्याच्या परिस्थितीत आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहाला संरक्षण मिळाले आहे. जात मिटवणे हा यात उद्देश असून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे हा यात एकमेव उद्देश आहे. शिवाय जातीअंतर्गत कालापकाल जे विवाह व्हायचे. ते विवाह रक्तसंबंधातून व्हायचे. ज्यातून आनुवांशिक रोग वाढीस लागायचे. ते आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाह केल्याने समूळ नष्ट होणार आहे. असं सरकारचं मत. परंतु हे मत येथील तमाम जात विवाह करणाऱ्या लोकांना मान्य नाही. ते आजही अशा विवाहाला नाकारतात. जात नष्ट होवू नये असं त्यांचं मत. त्याचं कारणही समाज देतो. जात जर नष्ट झालीच तर समाज नष्ट होईल व समाज जर नष्ट झालाच तर पुढं संस्कार. विवाहाला कराराचे स्वरुप प्राप्त होईल असं समाजाचं मत. त्यावर अधिक स्पष्टीकरण देत समाज म्हणतो की जातविवाह जर झाले नाहीत तर संस्कार दूर पळतील. कुसंस्कार वाढतील. त्याला पुरावा देतांना ते म्हणतात की जातीचे विवाह हे रक्तसंबंधावर आधारीत असून असे जेव्हा विवाह होतात. त्यावेळेस जातीअंतर्गत दबाव असल्यानं असे विवाह हे सहजासहजी तूटत नाहीत. त्याला बळकटी प्राप्त होते. शिवाय जातीच्या नियमानुसार वृद्ध माता पित्यांची सेवा ही कुटूंबातच होते. त्यांना वृद्धाश्रमात जावे लागत नाही. कारण रक्तसंबंध असतात. आंतरजातीय विवाहातून असे रक्तसंबंध नसल्याने वृद्ध मातापित्यांची सेवा घडत नाही. त्यामुळंच नाईलाजास्तव वृद्ध मातापित्यांना वृद्धाश्रमात जावे लागते व वृद्धाश्रमाची संख्या वाढते. तसं पाहिल्यास समाजाचंही म्हणणं बरोबरच आहे. कारण सध्या अलिकडील काळात वृद्धाश्रमाची संख्या वाढलेली आहे. ती आणखी वाढतच आहे आणि ती चिंतेची बाब ठरत आहे. आज वृद्ध मातापित्याची सेवा कुणीच करायला तयार नाहीत व ते सरळ वृद्धाश्रमात जात आहेत. स्वतः त्यांच्या पोटातून जन्म घेतलेली मुलं आपल्या जन्मदात्या मातापित्यांना राजरोजपणे वृद्धाश्रमात टाकत आहेत. त्यांना वृद्धाश्रमात टाकण्याचे प्रमाण हे सुशिक्षित लोकांमध्ये जास्तच आहे व आंतरजातीय विवाह करणाऱ्या परिवारात जास्तच आहे. विशेष सांगायचं झाल्यास विवाह कोणताही करावा. कोणी कोणताही विवाह करो. आपल्याला काय, आपण फक्त त्याचा संबंध भात खाण्याशीच ठेवावा. त्या विवाहाबाबत कुणातही संभ्रम असूच नये. जसा जातीचा विवाह महत्वाचा आहे. तसाच महत्वाचा आहे आंतरजातीय विवाह आणि तेवढाच महत्वाचा आहे आंतरधर्मीय विवाह. असंच सर्वांनी समजून घ्यावं. कोणालाही कोणत्याही स्वरुपाचा फरक पडू नये. फरक त्यांनाच पडेल, जो विवाह करीत असेल, त्यांना संसार करायचा असतो. हं, एवढं नक्कीच सांगावं की बाबा रे, विवाह आपल्या मनानुसार केला ना. आता टिकव. समाजाला दाखव की मी केलेला विवाह बरोबर आहे व मी योग्यच जोडीदाराशी विवाह केलेला आहे. हं, शेवटी असंच की आपण ज्याही कोणासोबत विवाह केलेला असेल, त्यांनी आपल्या मायबापाची सेवा करावी म्हणजे झालं. कारण त्यांनीच आपल्याला जन्म दिलाय. हेही खरं आहे.
तो तसाच काळ की त्या काळात लोकं जातीत विवाह करायचे. परंतु मायबापाची सेवा करायचे नाहीत. तसेच विवाह करतांनाही साध्या साध्या गोष्टीसाठी रुसायचे. साधं सूट, बूट व दागिण्यांसाठीही रुसायचे. देवला तेही वाटत होतं की लोकं जातीत विवाह करतात. परंतु दागिणे व सूट- बूटसाठी रुसतात. असं रुसणं फुगणं आंतरजातीय विवाहात नसतं. आंतरजातीय विवाहात रुसण्याला वाव नसतं. ही जातीतीलच सवय असून ती सवय लोकांनी मोडायला हवी असं देवला वाटत होतं. अन् वाटत होतं, आता सूट बूट वा दागीन्यासाठी रुसू नये. शिवाय वेळही पाळावी असं वाटत होतं.
विवाह सोहळे होतातच. ते शांततेनं पार पडतातच. परंतु आजकालच्या विवाहसोहळ्यात वेळ पाळली जात नाही. बाकी सगळेच सोपस्कार पार पाडले जातात. जसे कपडे घेणे. तसेच काही ठिकाणी याच कपड्यासाठी व दागीण्यांसाठी रुसवा असतो. वरपक्षांकडील लोकं अमूक अमूक सूटचे कपडे का नाही घेतले? माझ्यासाठी घड्याळ का नाही घेतली? मला गोप का नाही घेतला? एवढंच नाही तर मला चड्डी बनियान का नाही घेतला? याही किरकोळ गोष्टीसाठी रुसत असतात. परंतु असं रुसणं बरोबर नाही. कारण काळ बदलला आहे व या बदलत्या काळानुसार युद्ध होत नसल्यानं मुलांची संख्या वाढली आहे आणि स्री भ्रुण हत्या झाल्यानं मुलींची संख्या कमी झाली आहे. त्यामुळं स्रियांची हाजी हाजी करण्याची वेळ आली आहे व आजच्या मुलांनी अशी हाजी हाजी केली नाही व आपलाच हेका दाखवला तर त्यांचा जुळलेला विवाह तुटू शकेल. तसंच त्याला आयुष्यभर कुवारच राहावं लागेल आणि कुवारच मरावं लागेल. यात शंका नाही.
वेळेची बचत ही व्हायलाच हवी. निदान विवाहसोहळ्यात तरी वेळ पाळायलाच हवी. परंतु आजकालच्या भपकेबाजपणामुळं विवाहसोहळ्यात वेळेचं बंधनच दिसत नाही. विवाह एवढ्या उशिरा लागतो की ज्याची हद नाही. साडेनऊचा विवाह तर सायंकाळी चारला लागला होता. असे बरेच विवाह असतात की जे सकाळी नऊ वाजता असतात आणि ज्याला दुपारचे दोन वाजतात. ग्रामीण भागात तर हमखास दोन ते तीन वाजत असतात. त्याचं कारण असतं मनोरंजन. त्या नवरदेवाचा विवाह वारंवार होणार नाही ही बाब धरुन विवाहाला वेळ होत असतो. सर्वात जास्त वेळ कपड्यावरुन, मेकअपवरुन व नृत्याविष्कारावरुन होत असतो.
कपडे घेणे हा एक विवाहसोहळ्यातील प्रकार आहे. ज्यात विवाह ठरवितांनाच ही अट असते. म्हटलं जातं की नवरी वा नवरदेवाचे कपडे कोण घेणार. नवरीकडील घेणार की नवरदेवाकडील. हे आधीच तयार केलं जातं. साधारणत: नवरीचे कपडे नवरदेवाकडील मंडळी घेत असतात व नवरदेवाचे कपडे हे नवरीकडील मंडळी घेत असतात. एका विवाहसोहळ्यात नवरीकडील मंडळींनी नजरचुकीनं नवरदेवाची चड्डी व बनियान आणली नव्हती. गावात विवाहसोहळा होता. तसं ते अपेटी गाव होतं व गावात दुकानं नव्हती. मग काय, नवरदेव चड्डी बनियानससाठीच रुसला. चाहे वेळ कितीही होवो. मला चड्डी बनियान मिळाल्याशिवाय मी विवाहच करणार नाही. शेवटी वेळेवरच पंचवीस किलोमीटर अंतरावर असलेल्या शहरात जावून चड्डी बनियान घेवून आणावी लागली. त्यानंतरच नवरदेव विवाहाला तयार झाला. आता विचार हाच की विवाहाला वेळ किती झाला असेल.
साधारणतः विवाहाची लग्नपत्रिका बनवितांना विवाह मुहूर्त पाहण्यात येतो. काही ठिकाणी तो पाळण्यातही येतो. हिंदू धर्मात असा मुहूर्त पाहण्याला फार महत्त्व आहे. परंतु तो पाळण्याला विशेष असे महत्त्व दिसत नाही. मुहूर्त व तारीख हे भटजी काढून देतो. तो वधू वरांचे गुणही पाहून देतो. ते जुळवून देतो. जर गुण जुळले नाही तर विवाह होत नाही. कारण मान्यता आहे की गुण जर जुळले नाही आणि तरीही विवाह केला तर संसारात रमल्यावर कलह होत असतो व फारकत होत असते किंवा विधवा होण्याचा धोका असतो. असं लोकांचं मत. याच दृष्टिकोणातून विवाहासाठी गुण जुळवले जातात व आंतरजातीय वा आंतरधर्मीय विवाहाला महत्व दिले जात नाही. कारण आंतरजातीय विवाह हे वर वधूच्या स्वतःच्या आवडीनं होत असतात. त्यात धार्मिकतेला वा गुण जुळविण्याला महत्व दिले जात नाही. परंतु कितीही गुण जुळवले आणि गुण जुळवून विवाह केला. तरीही आयुष्यात जे व्हायचं तेच होते. गुण जुळलेल्या व्यक्तीचंही एकमेकांशी पटत नाही. तसेच त्यातूनच एकमेकात कलह निर्माण होवून घटस्फोट होत असतो वा कधीकाळी गुण जुळलेल्या घरातील महिलाही विधवा होत असतात.
विवाहसोहळ्यात वेळ ठरविण्याला महत्व आहे. वेळ ही भटजीकडून ठरवली जाते. परंतु साक्षात त्याच ठरविलेल्या वेळेनुसार विवाह लागतो का की ती वेळ निघून गेल्यावर विवाह लागतो? बऱ्याच ठिकाणी वेळ निघून गेल्यानंतरच विवाह लागतो. नवरदेव रस्त्यानं जरी निघाला तरी नाचणाऱ्यांचे प्रमाण एवढे असते की त्या मिरवणुकीत नाचत नाचत नवरदेव मंडपात पोहोचविण्यास बराच वेळ लागतो.
विवाह हे ठरलेल्या वेळेवर लागत नाहीत. विवाहाबाबत वेळ व हंगाम हा काही समाजाचा अविभाज्य भाग असल्याचं दिसतं. तसं पाहिल्यास सर्वच समाजात आता वेळेनुसार विवाह लागत नाही वेळ होतोच. परंतु वेळ करणाऱ्यात विशेष समाजाचा उल्लेख करायचा झाल्यास कुंभार समाजाचा उल्लेख करता येईल. ज्यांच्या समाजातील विवाह हे कधीच वेळेवर लागलेले दिसले नाहीत. तसेच मातंग समाजाचे विवाह कधीच हंगामात अर्थात उन्हाळ्याचे चार महिन्यात ठरलेले दिसले नाहीत. ते पावसाळ्यातच होतात. सर्वांचे विवाह संपल्यावर. त्याचं कारण आहे विवाह सोहळे. उन्हाळ्यात इतर समाजाचे विवाह सोहळे असतात. ज्यात बँड वाजविण्याला जास्त महत्व आहे. अशावेळेस मातंगांचे विवाहसोहळे असल्यास त्यांना आपल्या घरच्याच विवाहसोहळ्यात हजेरी लावावी लागते. अशावेळेस कमाईही जात असते व ते तीनचारच त्यांच्या कमाईचे महिने असतात. त्यामुळंच ते तीच बाब लक्षात घेवून आपले विवाहसोहळे सर्वांचे विवाह सोहळे आटोपल्यावर म्हणजेच पावसाळ्यात करीत असतात.
महत्वपूर्ण बाब आहे विवाह सोहळ्यातील वेळ. ही वेळ कोणीच पाळत नाही. वेळेवरच नवरदेवांचे सोंग सुरु होत असतात. मला बूट पाहिजे, मला सूट पाहिजे, मला गोप पाहिजे व मला घड्याळ पाहिजे, यासाठी रुसवे फुगवे सुरु होतात. ज्यातून मनधरणी करता करता विवाह लागण्याला वेळ होतो. अन् त्यातूनही जर ती मागणी पुर्ण केल्या गेली नाही, तर आयुष्यभर वधूपित्याला आणि वधूला ताणे पडत असतात. लोकं असे का वागतात ते कळत नाही. शिवाय हेही कळत नाही की ते मुहूर्ताची वेळ पाळत नाहीत, मग मुहूर्त का पाहतात. त्यातच गुणानुसार काहीच घडत नाही, असे असतांना गुण का पाहतात?
विवाह करतांना वरपिते जेवढे महत्वाचे असतात. तेवढेच महत्वाचे असतात वधूपितेही. परंतु विवाहसोहळ्यात वधूपित्यांची जास्त हेळसांड व उपेक्षा केली जाते. हे लज्जा चित्रपटात दाखवलंच आहे. तो कितीही वरपित्यांच्या मागण्या पुर्ण करेल तरीही वधूपित्यांना दोषच दिला जातो. विवाहसोहळ्यात आम्ही वराकडील. असे म्हणत गर्वाच्या पाऱ्यानं लोकं फुलून जात असतात. अन् तांडवच करीत असतात. तरीही सृष्टी निर्माण कर्त्यानं पुरुषांच्या हाती कोणतीच सत्ता दिलेली नाही. विद्या ग्रहण करण्याचा अधिकार आपल्याला जरी दिला असेल तरी त्याची सुत्र एका स्रीच्या हाती म्हणजेच शारदेच्या हाती दिली. व्यवहार करायला पैसा लागतो, त्याचेही सुत्र एका स्रीच्याच हाती म्हणजे लक्ष्मीच्या हाती दिले. अन्न आपण जरी प्राशन करीत असलो तरी त्याची सुत्रधार माता अन्नपुर्णा एक स्रीच आहे व मेहनत करण्यासाठी जी शक्ती लागते ना. ती शक्ती जर हवी असेल तर त्याचेही सुत्र एका स्रीच्याच हाती अर्थात देवी शक्तीजवळ आहेत. याचाच अर्थ पुरुषच नाही तर सर्व सृष्टीचेच अधिकार एका स्रीच्याच हाती आहेत. पुरुष मात्र शिवासारखा फक्त तांडवच करत असतो केव्हाही. मग तो विवाह सोहळा का असेना.
महत्वाचं सांगायचं झाल्यास आज काळ बदलला आहे व आजच्या विवाहसोहळ्यात कालसारखे पुरुषांना तेवढे महत्व राहिलेले नाही. कारण स्रियांची संख्या कमी झालेली आहे पुरुषांच्या मानाने. आता विवाहासाठी मुवी कमी व मुलंच जास्त आहेत. काळ बदलला आहे व युद्ध आजकाल होत नाहीत. युद्धात कालपरत्वे सैनिक मरण पावत असल्याने पुरुष कमी होते व स्रिया जास्त असल्याने त्यांचेशी विवाह कोण करेल असे वाटत होते. विवाह करतांना एकीकडून तुटलं तर दुसरी मुलगी सापडत होती व त्या स्री असलेल्या घराची बदनामी होत होती. आता तसे राहिलेले नाही. आता तो काळ संपला आहे व आता मुलीच कमी असल्यानं ज्या घरी मुलगी आहे, त्यांची हाजी हाजी करावी लागते. शिवाय आजची काही होतकरु मुलं प्रेम करुन मुलींशी आंतरजातीय विवाह करुन टाकतात. त्यातही जातविवाहासाठी जातीत मुलीच सापडत नाहीत. मग पुरुष नावाच्या दिखावा करणाऱ्यांची मर्जी कोण ऐकणार. आजची मंडळी अशा मर्जी ऐकत नाही व इथंच सारं संपतं. अन् त्यातही नवरदेव चड्डी बनियान, घड्याळ, सूट, बूट वा इतर गोष्टीसाठी रुसत असेल तर त्याची काही खैर नाही. म्हणूनच आज पुरुष नावाच्या एका प्राण्याने विवाह करतांना सूट, बूट वा कोणत्याही तत्सम गोष्टीसाठी रुसू नये. नाहीतर आयुष्यभरच कुवारे राहावं लागेल व कुवारच मरावं लागेल. यात शंका नाही.
ते देवचे विचार. लोकं विवाह करतांना रुसत होते. साधे सूट बूट व दागिण्यासाठी रुसत होते. कोणी घोड्यासाठी रुसत होते. शिवाय भपकेबाजपणा दाखवीत होते व असा भपकेबाजपणा दाखवत असतांना लाखो रुपयाची उधळपट्टी करुन टाकत होते. तो अल्बमही काढत होते, कितीतरी पैसे लावून. अन् विवाहानंतर त्यांचे विचार न पटल्यास कितीतरी रुपये लावून काढलेला अल्बम जाळून टाकत होते. शिवाय केलेला लाखो रुपयाचा खर्च व्यर्थ जात होता. त्यामुळं संसार टिकण्यासाठी कायदा बदलविण्याची गरज काय, असं देवला वाटत होतं.
ते घटस्फोट व ती घटस्फोटाची प्रकरणं..... सध्या न्यायालयातील प्रकरणात घटस्फोटाची संख्या वाढत चाललेली असून ही चिंतेची बाब ठरत आहे. घटस्फोट होण्याला बरीच कारणं आहेत. त्यातील पहिलं आणि मुख्य कारण म्हणजे पती पत्नींचं आपसात न पटणं.
पती पत्नींचं आपापसात न पटणं. हे घटस्फोटाचं मुख्य कारण आहे. त्यांचं आपापसात का पटत नाही. त्याचीही काही कारणं आहेत. पहिलं कारण आहे वरचढपणा. पत्नीला वाटत असते की पतीनं तिचंच ऐकावं. तिच्याशिवाय इतरांचं ऐकूच नये. तसंच पतीला वाटत असते की तिनं त्याचंच ऐकावं. तिनं त्याचेशिवाय कोणाचंच ऐकू नये. दुसरं कारण असतं, माहेरच्यांचा हस्तक्षेप. माहेरची माणसं ही जवळच राहतात व ते दहावेळेस आपल्या मुलींना बघावयास सतत मुलींकडे जात असतात. तिही थोड्या थोड्या गोष्टी आपल्या माहेरी सांगत असते. ज्यातून वाद उत्पन्न होत असतात. तिसरं कारण आहे, समजून न घेण्याची गोष्ट. आजचे लोकं काही गोष्टी समजूनच घेत नाहीत. तसेच ते एकमेकांनाही समजून घेत नाहीत. कोणत्याही गोष्टीवर विनाकारण वाद करीत असतात. चवथं कारण आहे बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असणं. लोकांची सोच. एकच एक वांग्याची भाजी खाऊ नये. कंटाळा येतो. जेवनात थोडी वेगळीच भाजी हवी. त्यासाठी बाहेरचे चक्कर. हे जेव्हा समजतं. तेव्हा वाद होतात. परंतु हे विवाह करण्यापुर्वीच समजायला हवं की नाही. विवाह करण्यापुर्वी जर आपल्या मनात कोणी प्रेमवीर असेल तर विवाहच का करावा? कोणी म्हणतात की मायबापानं केला ना माझा विवाह. मग मी काय करणार. म्हणणं एकच की त्यावेळेस तुमचा घोडा घास चरायला गेला होता की काय? अन् काही लोकं तर चक्कं विवाह झाल्यानंतर मुलंबाळं झाल्यानंतर आपला जोडीदार सोडून बाहेरच्या परव्यक्तीवर प्रेम करु लागतात. अन् हे माहीत झालं की मुलं गेली खड्ड्यात. घरात कलह निर्माण होतो. ज्याची परियंती फारकतीत होते.