Marathi Quote in Blog by मच्छिंद्र माळी

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

।। उपदेश ।। संकलन : मच्छिंद्र मा
ळी, औरंगाबाद .
समर्थ रामदास हे महाराष्ट्रातील थोर संत होऊन गेले. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे राजकीय व अध्यात्मिक गुरु होते. त्यांनी निर्माण केलेला " दासबोध " हा ग्रंथ म्हणजे तत्कालीन आचारसंहिताच होय. समर्थांचे जीवनातील अनेक महत्वाचे प्रसग , घटना मुळे त्यांचे चरित्र अभूतपूर्व आहे. असाच एक सुंदर प्रसंग खालीलप्रमाणे .
एकदा समर्थ रामदासस्वामी भिक्षा मागण्यासाठी एका घरासमोर उभे राहिले. त्यांनी दार वाजवून जय जय रघुवीर समर्थ । असा आवाज दिला. त्या वेळी घराचे दार उघडून एक स्त्री बाहेर आली. तिने महाराजांच्या झोळीत भिक्षा घातली आणि म्हणाली,

स्त्री : महाराज, काही उपदेश द्या.

समर्थ : आज नाही. उद्या देतो.

दुसर्‍या दिवशी समर्थांनी पुन्हा त्या घरासमोर उभे राहून आवाज दिला. त्या दिवशी त्या महिलेने बदाम आणि पिस्ता घालून खीर बनवली होती. ती स्त्री खीरीचा वाडगा घेऊन बाहेर आली. समर्थांनी कमंडलू पुढे केल्यावर खीर त्या कमंडलुत ओतण्याआधी तिला त्यात शेण आणि कचरा दिसला. त्यामुळे ती खीर घालण्यासाठी थांबली. ती समर्थांना म्हणाली,

स्त्री : महाराज, हा कमंडलू तर खराब आहे.

समर्थ : खराब तर आहे; पण तू त्यातच खीर घाल.

स्त्री : नाही महाराज. मग खीर खराब होईल. तुमचा कमंडलू द्या. तो मी धुऊन स्वच्छ करून देते.

समर्थ : म्हणजे हा कमंडलू स्वच्छ झाल्यावरच तू त्यात खीर घालणार ना ?

स्त्री : हो महाराज.

समर्थ : माझाही हाच उपदेश आहे. मनात जोपर्यंत चिंतेचा कचरा आणि वाईट संस्कारांचे शेण असेल, तोपर्यंत उपदेशामृताचा काही लाभ होणार नाही. जर उपदेशामृत मिळवायचे असेल, तर आधी मन शुद्ध करावे लागेल. वाईट संस्कारांचा त्याग करावा लागेल. तेव्हाच खर्‍या सुखाची आणि आनंदाची प्राप्ती होऊन तो अनुभवता येईल.

*!! जय जय रघुवीर समर्थ !!*

?

Marathi Blog by मच्छिंद्र माळी : 111300964
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now