कधी हरवली वाट तर...


कधी हरवली वाट तर
नजर फिरवावी कुठवर?
सावरायला तू येशीलच
भिस्त फक्त तुझ्यावर..

कधी हरवली वाट तर
नजर धुसर,किनारा दुस्तर
प्रेमांजन बनून यावी तू
पाऊल ओळखून मागावर..

कधी हरवली वाट तर
पाय चुकीचे ना पडावे
पडण्याआधी अंधारात
तव हातांनीच सावरावे..

कधी हरवली वाट तर
असूदे माघारीचा मार्ग खुला
कितीदा कुठेही हरवलो जरी
पावले शोधून काढतील तुला..

© संजय स.गुरव (सदासन)

Marathi Poem by Sanjay Gurav : 111156659
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now