Marathi Quote in Blog by Komal Mankar

Blog quotes are very popular on BitesApp with millions of authors writing small inspirational quotes in Marathi daily and inspiring the readers, you can start writing today and fulfill your life of becoming the quotes writer or poem writer.

जिथे भावनांचे दमन तिथेच भावनांचा उद्रेक 

जगण्याच्या वर्तुळात प्रेम हे प्रत्येक सजीवाला बहाल केलेली अनमोल देणगी ....

प्रेम म्हणजे जीवनाचं मर्म ! त्या वाटेवर मनुष्यानं निरंतर चालतं जावं असं सुखद कर्म ....

जेव्हा एखादा मनुष्य आपल्या अतृप्त इच्छेसाठी एखाद्यावर प्राण घातक हल्ला करतो , तेव्हा त्याच्या माणुसकीवर संदेह निर्माण होतो .

आपण त्याला क्रूर जनावर किंवा नरभक्षक म्हणून मोकळे होतो . तेव्हा , त्याला जबाबदार तो एकटा नसतोच तर संस्कृतीची थोरवी गाणारे , त्यांना बंधनात अडकविणारा हा समाज ही असतो .

प्रेमापासून आपल्या अपत्यांना दूर ठेवणारे आईबाबा . त्यांना वाटतं आपला मुलगा किंवा मुलगी प्रेमात पडले म्हणजे तोंड काळे करून येणार की काय ?

आणि तस चुकून माकून झालंच तर समाजात ह्यांचं नाक कटणार ..

मूलं वयात आल्यावर मुलांना मुलीपासून किंवा मुलींना मुलापासून आईबाबा दूर ठेवतातच . शरीर वाढायला लागलं की जबाबदारीने आई मुलीला सांगते आता तू स्कर्ट नको घालू शिवलेस नको घालू बरं ! पाय झाकेल मांड्या गुडघे दिसणार नाही असे पूर्ण कपडे परिधान करायचे .

त्यांना मुलगा आणि मुलगी ह्या दोन नात्यात मैत्रीची मोकळीक नसतेच . याचं वयात मुलांच्या मानसिकतेवर तारुण्याच्या उबंरठाबाहेर न पडण्याचं दडपणही असतेच कुठेतरी ...

आजही अशी परिस्थिती आहे मुलं मुली दहावी पर्यंत एकमेकांनपासून लांबच असतात ; म्हणून बहुतेकांना कॉलेज लाईफच आकर्षण असते . मुली मुलांच्या जीवनात मैत्रिणी म्हणून असल्या की त्याच्या मनात त्यांच्याबद्दल मैत्रीची भावना असते .. मनात आदरभाव वाढतो . एकमेकांच्या संम्पर्कात असल्याने वस्तूची देवाण घेवाण वर्गात न समजल्या जाणाऱ्या विषयावर चर्चा होते इथेच आकर्षण हळूहळू नाहीस होते .

पुरोगामी म्हणविणाऱ्या भारत देशात पुढारलेपणा अजूनही जागच्या जागी थिंगळ घालून आहे . नवीन पिढीला योग्य संस्कार देण्याची संधी हि गमावलेली आहे ह्याच वाईट वाटतं ... योग्य संस्कार योग्य माहिती जाणून घेणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे .

मूल वयात आल्यावर त्याची कृती भावना मन समजून घेणे , प्रत्येक वडिलांनी मुलगा वयात आल्यावर मुलाला लैगिक शिक्षणाबद्दल तर मुलींना आईने योग्य ती माहिती देणे गरजेचे आहे . पण आपल्या संस्कृतीत असं काही घरातल्यानी उघड उघड चर्चा म्हणजे डोक्यावर ताण , कपाळावर शंभर आठ्या येतील . आमच्या काळी हे असं काही नव्हतं , असं सांगितल्या जातं . कारण आधीच्या काळात मुलींचे लग्न बारा पंधरा वर्षातच करून देण्यात कुटुंब आनंद मानायचे ; पण सुरवातीच्या काळात हिंदी चित्रपटातील चुंबनदृश्य बघून कुणाचं कॅरेक्टर बिघडलं असेल असं नाही . लैंगिक शिक्षणाचा रोख स्त्रीपुरुष सबंध कसा ठेवतात . याची मनोरंजक माहिती नसून तो कसा सुरक्षित असावा , त्यातून निर्माण होणारी वैक्तिक , भावनिक , सामाजिक बांधिलकी ह्यावर भर देणारा असावा .असं वाटतं ...

त्यासाठी कुठल्याही बालकातला बदल पालक अथवा शिक्षक ह्यांनी नजरे आड करून चालणार नाही . पालकांनी आपल्या बालकासमवेत वेळोवेळी संवाद साधत राहवं . जेणेकरून त्यांच्या मनात आपल्या पालकांबद्दल विश्वास निर्माण होईल ; पण मुलांच्या मनातले संकोच , त्यांच्या दबलेल्या भावना उघडकीस येतील . जर अशी घटना त्यांच्या सोबत कधी घडलीच , तर ते मोकळेपणाने पालकाना सांगतील . त्यातूनच बालकांच्या मनावर होणारे अनिष्ट परिणाम टाळता येतील .



एका नाजूक विषयाला हाताळताना त्याबद्दल टिकास्त्र्ही असणारच ; पण माझ्या लेखणा मागचा उदेश सुसंस्कृत तरुणाच्या सफल आयुष्याशी हितगुज साधणाराच हा संवाद असतो .... तुमचा अभिप्राय ही नक्की कळवा !!

- कोमल प्रकाश मानकर 

Marathi Blog by Komal Mankar : 111053904
New bites

The best sellers write on Matrubharti, do you?

Start Writing Now