The Download Link has been successfully sent to your Mobile Number. Please Download the App.
Continue log in with
By clicking Log In, you agree to Matrubharti "Terms of Use" and "Privacy Policy"
Verification
Download App
Get a link to download app
"मनशास्त्राचं खेळगडं!" मानसशास्त्र म्हणजे काय? हे त्या माणसाला विचारा ज्याने प्रेमात चकवले गेलेल्या मित्राला "ती तुझ्या मनातली projection होती, ती खरंच तुझ्यावर प्रेम करत नव्हती" असं सांगितलं आणि त्यानं ऐकून डोकं आपटलं! आपल्या आजीच्या भाषेत सांगायचं झालं तर – "मनाचं भलं करून घेण्याचं हे एक सायन्स आहे, पण त्याला समजायला मन लागतं!" --- सुरुवात करूया 'इगो'पासून. इगो हा तुमच्या आत असतो आणि तो तुमचं आत्मभान टिकवतो. पण हा इगो कधी-कधी एवढा वाढतो की वाटतं – "आपणच सर्वश्रेष्ठ, बाकीचे सगळे लोक थेरडे!" याला म्हणतात Freud काकांनी सांगितलेलं "Id, Ego आणि Superego". ह्यात Id म्हणजे आतलं लहान बाळ – हवंय म्हणजे हवंय. Superego म्हणजे तुमचं घरचं आजोबा मंडळ – नीती, नियम, कायदे आणि जबाबदाऱ्या! आणि मधे Ego – बिचारा मेडीएटर. तो म्हणतो, "आता शांत बसा, दोघंही! मला लोकांमध्ये जावं लागतो." --- 'Defense Mechanisms' म्हणजे मानसिक जुगाड. तुमचा प्रेझेंटेशन वाईट गेलं? – "बॉसच मूर्ख आहे!" कोणीतरी तुमचं अपमान केलं? – "त्याचं बालपण बिघडलेलं दिसतं." ह्यातली काही लोकप्रिय मानसिक कवचं म्हणजे: Denial – "ती मला अजून आवडते." (ती ४ मुलांची आई झालेली असते.) Projection – "तो माझा रागावलेला चेहरा का कॉपी करतो?" Displacement – बॉसने ओरडलं म्हणून बायकोवर चिडणं! Regression – काही माणसं वयाच्या ४५ व्या वर्षीही हट्टाने चिऊताईसारखी वागतात! --- थोडं 'मल्टीपरसॅनॅलिटी'बद्दल. आपल्या प्रत्येकात कमीत कमी ५ माणसं असतात – १. घरातली शांत व्यक्ती २. ऑफिसातला नमताराम ३. ट्राफिकमध्ये शिव्या देणारा योध्दा ४. सोशल मीडियावरचा तत्त्वज्ञ ५. आणि अंघोळ करताना गाणं म्हणणारा सुप्रसिद्ध गायक! यालाच मानसशास्त्रात "Contextual personality" म्हणतात, पण आपल्या गावात याला "याच्या तर पाच तोंडं आहेत!" असं म्हटलं जातं. --- मनशास्त्र शिकवणारी माणसं ही विचित्र असतात. एकदा आमच्या क्लासमध्ये प्रोफेसर म्हणाले – "Feel your inner child." मग वर्गात सगळे २०-२५ वर्षांचे तरुण डोळे मिटून अंगठा चोखायला लागले! --- आणि शेवटी – मनाचं गमक. मन हे चिवट लाडू आहे. त्याला दडपलं तर फुटतं, खूप फुलवलं तर वितळतं. पण विनोदी चष्म्यातून त्याकडे पाहिलं, की त्याचं ओझं कमी होतं. "माणूस हसतो तेव्हा मन हलकं होतं, आणि हलकं मन हेच खरं मनशास्त्र!" --- लेखकाची सूचना: हा लेख वाचताना जर तुम्ही हसला नसाल, तर कदाचित तुमचं superego जरा जास्त अॅक्टिव्ह आहे. कृपया आइसक्रीम खा आणि मनशांती लाभवा
प्रेम अपयशातही शुद्ध राहतं, वेदनेतही सौम्य गंध सुटतो. ज्याचं उत्तर न मिळालं, तेच खरं असतं, कारण ते मागणीच करत नाही. मनात ठेवलेलं प्रेम कधीही राग धरत नाही, ते फक्त आठवणींमध्ये हळूच वाहतं. प्रेम करणं म्हणजे हक्क नव्हे, सेवा असते, प्रेम टिकवणं म्हणजे प्रतिशोध नव्हे, क्षमा असते. कोणीतरी दूर गेलं तरी प्रेम संपत नाही, कारण खरं प्रेम कधीही संपत नाही.
आकाशाकडे पाहणारा एकटाच माणूस सायंकाळची वेळ. बागेत पक्ष्यांचा किरकिराट थोडा ओसरलेला. मुलांच्या आरोळ्या मागे सरकलेल्या, आणि सूर्याची किरणं हळूहळू जमिनीवरून पाय मागं घेत होती. झाडांच्या सावल्या लांबट होत होत्या, जणू त्या सुद्धा विसाव्याच्या शोधात होत्या. त्या बेंचवर तो एकटा बसलेला होता. साधा शर्ट, थोडा काळवंडलेला चेहरा, आणि डोळे — जे काही बोलत नव्हते, पण खूप काही सांगत होते. ते डोळे आकाशाकडे रोखलेले होते. जणू काही त्याला आकाशात काहीतरी शोधायचं होतं — हरवलेलं प्रेम, न सापडलेलं उत्तर, की एखादं अपूर्ण स्वप्न? कोणी म्हणालं असतं, “काय झालं रे?”, तर तो फक्त मंद स्मिताने मान हलवला असता. कारण काही गोष्टी सांगून होत नाहीत. त्या फक्त जगाव्या लागतात, हृदयात जपाव्या लागतात, आणि अशाच संध्याकाळी आकाशाकडे पाहत विसरून जाव्या लागतात. झाडावरचा एक पान हवेवर थरथरत त्याच्या शेजारी पडला. त्याने ते उचललं, बघितलं... आणि हळूच खाली ठेवून दिलं. जणू तेही त्याच्यासारखंच – थोडंसं तुटलेलं, थोडंसं शांत, आणि कुणीतरी विसरलेलं. अशा संध्याकाळीं मनं शांत नाही होत. त्या फक्त थांबतात. थोडा वेळ, थोड्या श्वासांसाठी. आणि मग पुन्हा चालू लागतात – न बोलता, न कुणाला सांगता – आकाशाकडे पाहत. – एक उदास संध्याकाळ. एक मूक संवाद. एक आकाशाकडे पाहणारं मन.
मी वाऱ्याला विचारलं, "तू इतका मुक्त का आहेस?" तो हसला, आणि म्हणाला – "कारण मला कुठल्याही दिशा बांधून ठेवत नाहीत. प्रेमही असंच असावं, निस्सीम." - Fazal Esaf
नातं म्हणजे दोन मनांमधली एक शांत जागा — जिथं शब्द कमी आणि समज जास्त असतो." - Fazal Esaf
"मनं जुळण्यासाठी वय लागत नाही, काळ लागतो... आणि काळाची कसोटी सहन करणारी नातीच खरी असतात." - Fazal Esaf
खरं नातं तेच, जे दुःखाच्या क्षणी मिठी मारतं आणि सांगतं – 'आपण दोघं आहोत, पुरे आहे!'" - Fazal Esaf
कोरोनाने खरंच दाखवून दिलं… कोण आपल्यावर किती प्रेम करतंय ते. कित्येक मुलं आपल्या आईबाबांच्या, कुटुंबियांच्या प्रेतेकडे फिरकलीसुद्धा नाहीत… कित्येक बायका नवऱ्यांपासून दूर पळाल्या… आणि नवरे त्या प्रेमाच्या नावाने गळा काढणाऱ्या बायकांपासून चार हात लांब राहिले…Vice -Versa तेच लोक जे रोज "आय लव्ह यू", "सोनू", "मोनू" करत होते, तेच या महामारीच्या सावलीत केवळ स्वतःचा जीव वाचवण्यात व्यग्र होते… म्हणतात ना… प्रेम जर खोटं असेल, तर एक दिवस उघड होतंच. आणि जर खरं असेल, तर ते 'टायटॅनिक'सारखं असतं — जहाज बुडत असलं तरी, तो म्हणतो… "मी तुझ्यासोबत आहे." हेच खरं प्रेम… जे वेळेच्या वादळात उभं राहतं. बाकी सगळं — केवळ शब्दांचा गाजावाजा!
"ती गेली का माझ्यापासून दूर..." ती गेली का माझ्यापासून दूर, मगही प्रत्येक क्षणात तिची साथ का आहे? जसं जुन्या पुस्तकातला एखादा सुगंध, की आठवणीत लपलेली एखादी रात्र का आहे? तिचा आवाज ऐकू येत नाही, ना तिचा चेहरा कुठे दिसतो, पण प्रत्येक शांततेत तीच भावना का आहे, जी तिच्या बोलण्यातूनच उमटायची? वेळेच्या या वाटेवर काही क्षण थांबूनच राहतात वारंवार... आणि काही चेहरे, काही नात्यांच्या सावल्या संपूर्ण आयुष्यभर सोबत चालतात माझ्याबरोबर. मग तो दुरावा म्हणणं कितपत खरं आहे, जेव्हा प्रत्येक क्षणात ती जवळ वाटते? ती गेली तरी कुठे गेली, सांगा, मीच स्वतःपासून उदास वाटतो, असं का भासतं? – फजल अबूबक्कर एसाफ
Copyright © 2025, Matrubharti Technologies Pvt. Ltd. All Rights Reserved.
Please enable javascript on your browser