नुकतीच अरुणाचल सहल पार पडली तेव्हा सेला पास पहायला गेलो तिथेच रायफलमॅन जसवंत सिंगचे स्मारक आहे "अनाम वीरा जिथे जाहलातुझा जीवनाअंत स्तंभ तिथे ना कुणी पाहिलापेटली ना वात" 😢असे म्हणले तर वावगे ठरणार नाही त्यांच्या विषयीचा इतिहास स्थानिक लोक आणि गाईड यांच्याकडून असा समजला नुरानंगच्या लढाईदरम्यान रायफलमॅन जसवंतसिंग ईशान्य सीमावर्ती एजन्सी (आता अरुणाचल प्रदेश) मध्ये चौथ्या गढवाल रायफल्सच्या चौथ्या बटालियनमध्ये कार्यरत होते.१९६२ च्या भारत-चीन युद्धात चिनी सैन्याची प्रचंड संख्या व आपले कमी संख्याबळ यामुळे रायफलमॅन जसवंत सिंग रावत यांना पोस्ट रिकामी करण्याचे आदेश मिळूनही रायफलमॅन रावत यांनी पोस्ट सोडली नाहीमी इथेच लढणार आणि शत्रूला पुढे येऊ देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली त्यांच्या या भूमिकेने त्यांच्या बरोबर असलेल्या इतर सैनिकांना सुद्धा बळ आले अन कमी दारूगोळा व कमी सैनिक बळ असताना सुद्धा ते सर्व लढायला तयार झाले या घनघोर लढाईत सर्वच सैनिक मारले गेले आणि फक्त जसवंतसिंग यांनी एकट्याने 300 चिनी सैनिकांचा सामना केला. नुरानांगच्या लढाईत ते एकटे जवान होते जे इतक्या मोठ्या बटालियनशी लढले.या लढाई संदर्भात अनेक लोककथा अस्तित्वात आहेत सेलापास हे अरुणाचल प्रदेशातील एक स्थळ जिथे रायफलमॅन जसवंत सिंग यांनी चिनी आक्रमक शक्तिशाली सैन्याविरुद्ध लढा दिला.चीन-भारत युद्धादरम्यान जेव्हा जसवंत सिंग रावत हे चिनी सैन्याविरुद्ध एकटेच लढत होते, तेव्हा तेथील मोनपा जमातीतील सेला आणि तिची बहीण नूराने त्यांना दारूगोळा आणि अन्न पुरवून मदत केली. जसवंत यांनी 72 तास चिनी सैन्याविरुद्ध लढा दिला आणि 300 हून अधिक विरोधी सैनिकांना एकट्याने ठार केले.जसवंत सिंग यांनी पोस्टच्या आत वेगवेगळ्या ठिकाणी शस्त्रे ठेवून शक्तिशाली सैन्याचा भ्रम निर्माण केला.त्यांच्या या लष्करी रणनीतीमुळे भारतीय सैनिकांची संख्या जास्त असल्याचा भ्रम चिनी सैन्याला झाला. जसवंत सिंगने आधीच 300 सैनिक मारले होते त्यामुळे चिनी सैनिकांच्या दृष्टीने ते एक धोका बनत होते जसवंतला अन्न रेशन पुरवणारा एक स्थानिक देशद्रोही होता ज्याने जसवंत सिंगच्या ठावठिकाणाविषयी माहिती लीक केली होती.सेला पास येथेजसवंत सिंग एकटेच लढत असल्याची खबर चिनी सैन्याला समजल्यावर जसवंत सिंह रावत यांना चिनी सैनिकांनी पकडून त्यांचा शिरच्छेद केला. सेलाने टेकडीवरून उडी मारून आत्महत्या केली. आणि नूराला चिनी सैन्याने मारले. या ऐतिहासिक लढे दिलेल्या साध्या आदिवासी मुलीच्या स्मरणार्थ 'नूरा फॉल्स' नावाचा धबधबाही आहे.इतिहासात अनेक शूर स्त्रियावर कथा आणि चरित्रे लिहिली गेली आहेत. पण कित्येक अनामिक धाडसी स्त्रिया ज्यांच्याबद्दल कधीच काही लिहिले गेले नाही. याचे कारण त्यांच्या बद्दल काही माहिती अस्तित्वात नाही अशा कथांपैकी एक कथा सेला आणि तिची बहिण नूरा या दोन मुलींची आहे. . रायफलमॅन जसवंत यांच्या हौतात्म्याबद्दल वेगवेगळ्या कथा आहेत. काही दंतकथांनुसार त्याला चिनी सैन्याने जिवंत पकडले आणि फासावर लटकवले. सेला आणि नूरा या दोन बहिणीही शत्रूंनी केलेल्या प्रचंड छळामुळे मरण पावल्या. इतर विविध कथांनुसार, सेला शत्रू सैनिकांशी लढताना ग्रेनेडच्या स्फोटात मरण पावली. नूराने पकडले जाऊ नये म्हणून कड्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याचीही दंत कथा आहे. रायफलमॅन जसवंत सिंगच्या मृत्यूनंतर सेलाचे नेमके काय झाले हे कोणालाही माहिती नाही. नूरालाही शत्रूंनी सोडले नाही. जसवंतसिंग रावत यांना आक्रमणकर्त्यांविरुद्धच्या एकाकी लढाईत मदत करताना तिचा निनावी मृत्यू झाला. जसवंत सिंगला त्याच्या एकहाती लढाईत मदत करताना, सेलाच्या मनात त्या शूर सैनिकाबद्दल जी आपुलकीची भावना निर्माण झाली याच निःस्वार्थ भावनेने 1962 च्या भारत-चीन युद्धात जसवंत सोबत लढण्यासाठी आणि मरण्यासाठी सेलाला प्रेरणा मिळाली होती ७२ अवर्स हा जसवंत सिंग रावत यांच्या जीवनावर आधारित एक नवीन युद्ध चित्रपट आहेजसवंत सिंग रावत यांच्या जीवनावर आणि चिनी सैन्याविरुद्धच्या त्यांच्या लढ्यावर आधारित हा चित्रपट अंगावर रोमाच उभे करणारा हा चित्रपट आहे या युद्ध चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जसवंतसोबत झालेल्या सेला येथील लढाईची एक छोटीशी झलक दाखवण्यात आली आहे. राष्ट्राने आपल्या वीराला महावीर चक्राने सन्मानित केले आणि त्यांच्या स्मरणार्थ जसवंतगड युद्ध स्मारक बांधले. तसेच, स्थानिकांच्या आग्रहानुसार सेला पासचे नाव मोनपा मुलगी सेला आणि नुरानंग फॉल्सचे नाव सेलाची बहीण नुरा यावरून ठेवले असे म्हणतात रायफलमॅन जसवंत सिंग रावत यांची कहाणी जोपर्यंत जिवंत आहे, तोपर्यंत सेला आणि नुरा यांची सुद्धा कथा अमर राहील.🙏