विवाह टिकवावाच? हे जीवन आहे व जीवन जगत असतांना लोकं विवाह करतात. विवाह हा केवळ आपले लाड पुरविण्यासाठी नसतोच. विवाह असतो, आनंदी जीवन जगण्यासाठी. ज्यात सुख दुःख येत असतात. तसं पाहिल्यास सुख दुःख हे पाचवीलाच पुजलेले असतात माणसाच्या. दुःख हे माणसाच्या जीवनात पावलोपावली येय असतात. त्याला घाबरुन जावं नये म्हणूनच विवाह असतो व आपण तो करतो. त्याचं महत्वपूर्ण कारण असतं, ते म्हणजे आपले आईवडील. आपले आईवडील आपल्या आयुष्यात शेवटपर्यंत जीवंत राहात नाहीत. म्हणूनच आपले आईवडील आपला विवाह करुन देत असतात. आपलं सदोदीत सुख पाहणाऱ्या आपल्या आईवडीलांना नित्य वाटत असते की आम्ही जरी मरण पावलो तरी आमची मुलं थडीवर पडू नयेत. त्यांना शेवटपर्यंततचं म्हणजेच मरणापर्यंतचं जीवन जगता यावं व ते जीवन आनंदानंच जगता यावं. म्हणूनच ते आपला विवाह करतात. शिवाय आपल्याच आनंदमय जगण्यासाठी त्यांची धडपड असते आणि तसं घडतंही. जोडीदार जर चांगला मिळालाच तर आयुष्याचं सोनं होतं. तसं पाहिल्यास नेहमी आढळून येतं की म्हणतांना जोडीदारापैकी ती पत्नी असेल तर पत्नी म्हणते की काहीही असो, मला पती चांगला मिळाला, तर पती म्हणतो की काहीही असो, मला पत्नी चांगली मिळाली. आज मात्र काळ बदलला आहे. बदलत्या काळानुसार विवाहाला जे महत्व होतं, तेच आहे. मात्र पत्नी पत्नीचं नातं कालच्यासारखं नाही. ते मात्र बदललं आहे. आज बदलत्या काळानुसार विवाहाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत व त्या अपेक्षात अपेक्षीत प्रमाणात वाढ झाली आहे. ज्या अपेक्षा पुर्ण न झाल्यास अपेक्षाभंग होतो. त्याला जबाबदार आहे पाश्चात्यीकरण. आजच्या विवाहाचे स्वरुप बदलले असून त्याला एक कराराचं स्वरूप प्राप्त झालेले आहे. त्यानुसार आज लोकं विवाह तर करतात. जो आपल्या आईवडीलांच्या मतानुसार व मनानुसार असतो. परंतु विवाहानंतरचं जीवन हे आपल्या आईवडीलांच्या मनानुसार व मतानुसार नसते. ज्यात भरपूर फरक असते व त्यात स्वतःला समाविष्ट करतांना अडचणी येत असतात. कारण आपण विवाह तर करतोच. परंतु त्या विवाहाला आपण विवाह मानत नाही. त्याला करार मानतो. इथंच आपण चुकतो. मग सुरु होतो एक प्रकारचा संघर्ष. पत्नी पत्नींचे वाद वादातून पती पत्नींचं न पटणं. ज्यातून निर्माण होतो घटस्फोट. जो घटस्फोट आपल्या इच्छा आकांक्षा यावर पाणी फेरतं. आपलं जीवन उध्वस्त करतं. आपल्या आनंददायी जीवनात रस राहात नाही. संशयी भावना निर्माण होते. विवाह बाह्य संबंध निर्माण होतात. आपलं विवाह झाल्यानंतर जर पटत नसेल तर आपल्याला काही अनौरस घटक फुस लावत असतात. जे आपला विवाह तुटल्यावर आपल्याला मदत करीत नाहीत. ज्याच्यात स्वार्थ कुटकूट भरलेला असतो. ते आपल्या मजबुरीचा फायदाच घेवू इच्छितात नव्हे तर घेतात. ते आपल्याशी विवाहबाह्य संबंध निर्माण करतात. ते आपल्या शरीराचा फायदा घेतात. आपली वासना पुर्ण करीत असतात. जेव्हापर्यंत स्रियात त्यांची तरुणाई असते. तेव्हापर्यंत हे विवाह बाह्य संबंध चालतात. पुरुषांजवळ जेव्हापर्यंत पैसा असतो, तेव्हापर्यंत विवाह बाह्य संबंध चालतात. काही पुरुष असेही असतात की जे पैसा कमविण्यासाठी अशा स्रियांशी विवाहाचं नाटक करतात. त्यानंतर दिसून येतं त्याचं पडद्याआड लपलेलं रुप. ते विकून टाकतात अशा स्रियांना. तू अपने पती की नही हुई, तो मेरी क्या होगी, असंच त्याचं मत असतं. ज्यातून ती विचारही करीत नाही. अशा ठिकाणी जावून फसते. त्यानंतर तिला पश्चाताप होतो की काश! मी माझ्या जीवनात अशी चूक करायला नको होती. चूक....... हो ती चूकच असते. कारण घर जर म्हटलं तर भांडणं आलीच. मतभेद आलेच. त्यानंतर वाद प्रतिवाद आलाच. नवीन घरची मुलगी जेव्हा सासरी नांदायला येते. तेव्हा तिच्या अपेक्षा जास्त असतातच. ज्या अपेक्षांवर पाणी फेरलं जात आहे असं तिला वाटतं. तिला वाटत असतं की माझ्या सासरकडील मंडळी माझ्या मुठ्ठीत राहावी. माझाच वचक निर्माण व्हावा. असं घडतंही कधीकधी. परंतु कधी तसं घडत नाही, त्यात मर्यादा येतात. जेव्हा मर्यादा येतात. काही नवरदेव मंडळी ही आपल्या घरात येणाऱ्या व स्वतःचा वरदहस्त निर्माण करणाऱ्या नवरीचं मुळात ऐकतच नाहीत. तेव्हा मात्र प्रत्यक्षात समस्या निर्माण होतात. अशा समस्या येतात की त्या समस्यातून मार्ग निघत नाही व नंतर होतात घटस्फोट. असा घटस्फोट झालाच की आपली चिंता मिटते असे नाही. त्यातूनच निर्माण होतो खरा संघर्ष. तो संघर्ष जो वायफळ असतो. दोष आपलाच असतो आणि आपण तो दोष दुसऱ्याच्याच माथी मारत असतो. विवाह झाल्यानंतर आपले स्वतःचे विचार राहात नाही. ते विचार नष्ट होतात. त्यानंतर कोणत्याही विषयावर सल्लामसलत करायची झाल्यास एकतर्फी निर्णय घेतला जात नाही. त्यावर दोघांचं मत घ्यावं लागते. अशावेळेस एखाद्या विषयावर एकमत करायचं झाल्यास जोडीदारांमध्ये संभ्रम असल्यास एकमत होत नाही. ज्यातून वाद निर्माण होण्यास तात्कालिक कारण निर्माण होतं. मग निर्माण होते कुरकूर. कलह करतांना आपल्याला भानच नसतं की कलह झाल्यानंतर आपलं जोडीदारासोबत पटणार नाही. ज्यातून जोडीदारांमध्ये असुया निर्माण होईल. घटस्फोटापर्यंत ठीक असतं. घटस्फोट झाल्यानंतर स्री वर्ग किंवा पुरुषवर्गात जो असहाय्य असेल, त्याला मदत म्हणून आयुष्य जगण्यासाठी न्यायालयातील प्रक्रियेनं खावटी नावाचं एक प्रावधान निर्माण केलं आहे. त्यानंतर खावटी मंजूर झाल्यानंतरही आपण समाधानी राहात नाही. जोडीदारापासून वेगळंच राहावं वाटत नाही. शेवटी विवाह करतो. अन् जो विवाह करतो. तो विवाह करतांना आपण त्यात परिस्थितीशी जुळवून घेतो. तसं पाहिल्यास खावटी हा आदर्श व आनंदी जीवन जगण्याचं साधन नाही. असे असतांनाही आपण खावटी मागतो. कारण असतं जोडीदारानं आपल्याला सोडणं. परंतु जोडीदार आपल्याला का सोडतो? याचा विचार आपण कधीच करीत नाही. जर आपण आपल्या वागणुकीनं आपल्या जोडीदाराला थोडंसं समजून घेतलं तर..... होय, आपल्या जोडीदाराला आपण थोडंसं समजून घेतलं तर..... तर अशा भानगडीच उठत नाहीत व आपल्याला जोडीदारापासून फारकतही घ्यावी लागत नाही. फारकतीची अनेक कारणं असतात. आपले असणारे विवाहबाह्य संबंध. जे लैंगीकतेच्या माध्यमातून निर्माण होत असतात. आपला जोडीदार हा शारिरीक व लैंगीकदृष्ट्या सक्षम नसतोच की जो आपल्या पुर्ण इच्छा पुर्ण करु शकेल. मग विवाहबाह्य संबंध निर्माण करावेच लागतात. दुसरं कारण असतं आपला वरचढपणा, आपल्या प्रत्येकालाच वाटते की आपलाच वरदहस्त निर्माण व्हावा. त्यातून समस्या उद्भवतात. तिसरं कारण असतं अति प्रमाणात व्यसनाधिनता. आपण एकमेकांना समजूनच घेत नाही व दारु किंवा नशेच्या आहारी जातो. चवथं कारण असतं, आपली मारहाण करणं. आपण भांडणातून सतत मारहाण करीत असतो. तसंच पाचवं कारण असतं, आपल्या परिवाराचा आपल्या सर्वच गोष्टीत होत असलेला हस्तक्षेप. अशा पाच प्रकारच्या सुत्रानं आपली भांडणं होतात. त्याचवेळेस कोणी आपल्याला समुपदेशन करण्याची गरज असते आणि ते समुपदेशन ऐकण्याची शक्ती आपल्यातही असावी. तरच फारकत होत नाही. परंतु आपण त्याबाबत विचारच करीत नाही व कोणाचंही ऐकून न घेता उतावळीसारखे आपण निर्णय घेतो व इथंच फसतो. अलिकडील काळात विवाहाला एका कराराचे स्वरुप आलेले आहे. जे कधीही होतात व कधीही तूटत असतात. ज्यातून त्यांना अपत्य असलं की त्यांचं नुकसानच होत असतं. पुर्वी असं नव्हतं. विवाह हा एक संस्कार होता व त्याला संस्कारासारखंच जपलं जायचं. तो संस्कार होता, आपल्या पुर्वजांनी बनविलेला. आपण मरण पावल्यानंतर आपल्या मुलाला चांगलं आनंददायी जीवन जगता यावं म्हणून आपले पुर्वज बालपणातच वधू शोधत असत. तिला बालवयातच आपल्या घरी आणत असत. तिच्यावर संस्कार करीत असत व वारंवार सांगत असत की तिनं भविष्यात कितीही संकट आलंच तर घाबरु नये. पतीला साथ द्यावी. अन् पुरुषालाही सांगणं असायचं की त्यानं तिला सोडू नये. त्यानंही तिला साथ द्यावी. अशाच संस्कारात वाढणारे ते जोडीदार. समजा युद्धात पती मरण पावताच वा त्यांना इतर बाबीतून मरण येताच प्रेम करणारी त्याची जोडीदार स्वखुशीनं आपल्या पतीसोबत सती जात असे. तशी सती जाण्याची इतरही काही कारणं होती. त्यातील हेही एक कारण होतं. ह्या अशाच दोघांना बालपणापासून शिकविलेल्या गोष्टी. ज्यातून त्यांच्यात प्रेम त्या काळातही निर्माण होत असे. जे प्रेम सती जायला प्रेरणा देत असे. घटस्फोटाचे प्रमाण कमी होते. घटस्फोट होत नव्हते असे नाही. त्या काळातही घटस्फोट होतच होते. परंतु ते घटस्फोट किरकोळच स्वरुपाचे असायचे. जास्त नसायचेच आणि तीव्रही नसायचेच. तसंच जर एखाद्यावेळेस एखादे प्रकरण फारकतीवर येत असेल वा एखाद्या घरात कोणी जोडीदाराला त्रास देत असेल तर संयुक्त कुटूंब असल्यामुळे त्यांना समजविण्याची कृती घडत असे. कारण बालविवाहच जास्त प्रमाणात व्हायचे. ज्यात आपली स्नुषा कशी घडावी? आपल्या मुलासोबत तिनं कसं वागावं? याचं बाळकडू तिला बालपणापासूनच सासरची मंडळी पाजत असत. ज्यातून ती वृद्धावस्थेतही आपल्या सासरकडील सर्व मंडळींची सेवा करायची. त्यांना जपायची. अन् आईवडीलही म्हातारे झालेच तर ते स्वखुशीनं संन्यास स्विकारायचे. आपल्या मुलांच्या संसारात दखलंदाजी वा हस्तक्षेप करायचे नाहीत. ते वानप्रस्थाश्रम स्विकारायचे व दूर अशा अरण्यात जावून मृत्यूला जवळ करायचे. ते ओझं बनून आपल्या मुलांजवळ राहायचे नाहीत. आज तसं नाही आणि आजची परिस्थितीही तशी नाही. आज कोणतेच आईवडील स्वखुशीनं वानप्रस्थाश्रम स्विकारत नाहीत. तर त्यांना जबरदस्तीनं वानप्रस्थाश्रमात पाठवलं जातं. आज बालविवाह होत नाहीत व शिकलेल्या मुली या आपल्या घरातील म्हाताऱ्या मंडळींची सेवा करीत नाहीत. ते स्पष्ट नकार देतात. त्याचं कारण आहे, त्यांच्यावर घरात होणारे संस्कार. आजच्या मुलीला बालविवाह होत नसल्यानं तिला सासू म्हणजे काय? सुनेची जबाबदारी कोणती? हे कळत नाही. तिला सासूशी कसं वागावं? पतीशी कसं वागावं? हे शिकविणारी त्या काळातील बालविवाह पद्धतीत लवकरच मिळणारी सासू, आज मिळत नसल्यानं आजच्या मुलींच्या जीवनात सासू सासरे आणि सासरकडील मंडळींबद्दल आत्मीयता नसते. माझ्या मुलाचा संसार चांगला चालावा. तो शेवटास जावा. यासाठी त्या काळातील बालविवाहाच्या माध्यमातून मिळणारी सासू आपल्या सुनेला सर्व शिकवायची. त्यातच ती तिला त्रास जरी देत असली तरी त्याचा तेवढा राग वाटत नव्हताच मुलींना. संस्काराचाच तो भाग होता. परंतु त्यात बालपण हिरावलं जायचं. आज बालपण हिरावलं जात नाही. परंतु सासूपणाचा संसार तूटत जातोय. त्याचाच परिणाम म्हणून आज विवाहाला कराराचे स्वरुप प्राप्त झाले आहे, विवाह तूटत आहेत. मग जरी कोणी ते टिकविण्याचा प्रयत्न केला तरी. विशेष सांगायचं म्हणजे माणसानं विवाह करावा. तो सोचून समजून करावा. जेणेकरुन तो टिकवता येईल. जर विवाह टिकवायचाच नसेल, तर कोणीही विवाह करु नये व आपल्या आईवडिलांच्या कष्टानं कमविलेल्या पैशाची धुळधानी करु नये म्हणजे झाले. शिवाय त्यातून आपण स्वतःही त्रास भोगू नये हेही तेवढंच खरं. अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०