विवाह नावाची माझी ही एकशे सहावी पुस्तक. वाचकांसमोर प्रदर्शित करतांना मला अतिशय आनंद होत आहे. ही पुस्तक नाही तर एक जीवनातील सार आहे. प्रत्येक चरित्राला लागू होईल असाच विषय यात आहे. परंतु त्या साराला काल्पनिक जोड दिली आहे. या पुस्तकाचं कथानक थोडक्यात मांडणं मी गरजेचं समजतो. लोकं विवाह करतात. ज्यात उद्देश असतो मुलं जन्मास घालणं व आयुष्यात शेवटपर्यंत सोबत राहाणं. परंतु अलिकडील काळात करारानुसार विवाह होतात. शेवटपर्यंत सर्वजण सोबत राहात नाहीत व विवाह तुटतो. हे जीवन आहे व जीवन जगत असतांना लोकं विवाह करतात. विवाह हा केवळ आपले लाड पुरविण्यासाठी नसतोच. विवाह असतो, आनंदी जीवन जगण्यासाठी.

1

विवाह - भाग 1

१विवाह पुस्तकाच्या निमित्याने विवाह नावाची माझी ही एकशे सहावी पुस्तक. वाचकांसमोर प्रदर्शित करतांना मला अतिशय होत आहे. ही पुस्तक नाही तर एक जीवनातील सार आहे. प्रत्येक चरित्राला लागू होईल असाच विषय यात आहे. परंतु त्या साराला काल्पनिक जोड दिली आहे. या पुस्तकाचं कथानक थोडक्यात मांडणं मी गरजेचं समजतो. लोकं विवाह करतात. ज्यात उद्देश असतो मुलं जन्मास घालणं व आयुष्यात शेवटपर्यंत सोबत राहाणं. परंतु अलिकडील काळात करारानुसार विवाह होतात. शेवटपर्यंत सर्वजण सोबत राहात नाहीत व विवाह तुटतो. हे जीवन आहे व जीवन जगत असतांना लोकं विवाह करतात. विवाह हा ...Read More

2

विवाह - भाग 2

२ विवाह (कादंबरी) अंकुश शिंगाडे काय चुकलं त्या दोघांचं ते कळत नव्हतं. त्यांच्याच नशिबाला ते भोग का आलेत. तेही कळत नव्हतं. नियतीनं त्यांच्याच जीवनात ते दुःख का आणलं तेही कळत नव्हतं. देवचं काहीच चुकलं नव्हतं. तो तिला काहीही बोलला नव्हता. तरीही त्याची पत्नी त्याला सोडून गेली होती. कारण काय होतं कळत नव्हतं. देवचं तिच्यावर निरतिशय प्रेम होतं. विवाहानंतर ते एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. ते आनंदातच होते. आनंदातच बागेत जाणे, गप्पागोष्टी करणे, भेल, आईस्क्रीम खाणे. इत्यादी गोष्टी ते नित्यनेमानं करीत होते. ...Read More

3

विवाह - भाग 4

४ जातीतच विवाह केलेला बरा. देवला तसंच वाटत होतं कारण देवनं करुणाशी मजबुरीनं विवाह केला होता. जी त्याच्या जातीतील नव्हती. जिला समाजानं आजही स्विकारलं नव्हतं. समाजाला आजही जातच आवडत होती. त्याचं कारण होतं जातीची बंधनं. जातीनं अख्ख्या समाजाला जातीच्याच बंधनात बांधून टाकलं होतं. जात ही जन्मापासूनच बांडगुळासारखी आयुष्याला चिकटून राहात असे. ती बदलत नसे वा कुणाचीही जात तेव्हापर्यंत बदललेली नव्हती. शिवाय मुलांचं शाळेत नाव दाखल करतांना जात टाकावी लागत असे. जात आधारीतच बरेच विवाह होत होते व सध्यातरी आंतरजातीय विवाहाला मान्यता नव्हती. असा आंतरजातीय विवाह कोणी केल्यास त्याला समाज ...Read More

4

विवाह - भाग 5

५ देव थांबता थांबता बरेच दिवस थांबला. त्याला आपल्या आईचा सतावत होता. ती जास्त म्हातारी होत चालली होती. त्यातच त्यानं गांधर्व विवाह केला व जिच्यासोबत विवाह केला. तिला आश्वासन दिलं होतं की तो मंजूच्या प्रकरणापासून मुक्त झाला की तिच्याशी विवाह करेल. ती मंजू....... मंजू देवला हुंगत नव्हती. तशी ती भावही देत नव्हती. त्याला मात्र मंजूची आठवण यायची व तो तिला भेटायला जायचा. परंतु ती सतत अपमानीत करीत होती त्याला. तसा काळ पालटला. त्यानं गांधर्व विवाह का होईना केला. तद्नंतर त्यानं मंजूकडे जाणंच सोडलं. त्यानं करुणाशी ...Read More

5

विवाह - भाग 3

३ देवनं अट मान्य करुन विवाह ठरवला. तसं अटीनुसार त्यानं किरायाचा घेतला. त्यानंतर त्यानं आपला विवाह केला व अटीनुसार त्यानं विवाहानंतर आपली वरात किरायाच्या कमऱ्यातच वळवली. स्वतःच्या हातचं बनवलेलं घर. त्या घरावर पाणी फेरलं. तसे दोन तीन दिवस झाले. विवाहाला दोन तीन दिवस झाले होते. देव विचारच करीत होता. किराया कसा द्यायचा? पोट कसं पालवायचं? आपलं वेतन तुटपुंजं? आपण विवाह तर केला, परंतु पुढं काय? शेवटी विचार करता करता त्याला मार्ग सापडला. आपण पोलीस स्टेशनला तक्रार करायची. तक्रार करायची की आपलं पासबुक हारवलंय व ती तक्रार आपण ...Read More

6

विवाह - भाग 6

६ तो ऋतू परीवर्तन आणणारा होता. तसा आज पडला होता. गार वारेही सुटले होते. त्यातच तिला आठवला देव. ज्याला तिनं महाभयंकर त्रास दिला होता. आज तो तिच्या सकाळी स्वप्नातही येवून गेला होता. ती दुःखातच होती. कारण तिचे पती. आज तिनं विवाह केले होते. तसे तिचे चार पाच विवाह झाले होते व हा चवथ्या क्रमाकांचा पती मुस्लीम होता. तिचं आतापर्यंत कोणाशीच पटलं नव्हतं. ज्यातून तिला सर्वांनीच सोडलं होता व आता नाईलाजास्तव तिला वेगळ्या धर्माच्या व्यक्तीचा पती म्हणून स्विकार करावा लागला होता. ...Read More