आपल्या भारत देशात पाहुण्यांना विशेष महत्व आहे. पाहुण्यांना आपल्या भारत देशात अतिथी देवो भवं म्हणत देवांचा दर्जा दिला जातो. त्यांच्या सर्व गोष्टी ऐकल्या जातात. त्यांच्यासाठी विशेष असा पाहुणचारही केला जातो. कारण आपल्याला ते जर आले तर अतिशय आनंद होत असतो. त्याचं कारण आहे, हे जीवन. म्हणूनच पाहुण्यांची आपण इज्जत करतो. हे जीवन तसं पाहिल्यास बरंच कंटाळवाणं आहे. या कंटाळवाण्या जीवनात पाहुण्यांना विशेष स्थान आहे. कारण पाहूणे हे आपल्या कंटाळवाण्या जीवनात रंग भरत असतात.
Full Novel
राजकारण - भाग 1
राजकारण कादंबरी अंकुश शिंगाडे आपल्या भारत देशात पाहुण्यांना महत्व आहे. पाहुण्यांना आपल्या भारत देशात अतिथी देवो भवं म्हणत देवांचा दर्जा दिला जातो. त्यांच्या सर्व गोष्टी ऐकल्या जातात. त्यांच्यासाठी विशेष असा पाहुणचारही केला जातो. कारण आपल्याला ते जर आले तर अतिशय आनंद होत असतो. त्याचं कारण आहे, हे जीवन. म्हणूनच पाहुण्यांची आपण इज्जत करतो. हे जीवन तसं पाहिल्यास बरंच कंटाळवाणं आहे. या कंटाळवाण्या जीवनात पाहुण्यांना विशेष स्थान आहे. कारण पाहूणे हे आपल्या कंटाळवाण्या जीवनात रंग भरत असतात. पाहूणे....... अलिकडील काळात भारतात पाहूण्यांना मोठा सन्मान ...Read More
राजकारण - भाग 2
राजकारण कादंबरी भाग दोन वसीमला आठवत होता निवडणुकीपुर्वीचा काळ. सत्तेत अनेई साऱ्या पार्ट्या होत्या व त्या येवून निवडणूक लढवीत होत्या. त्यामुळंच त्यांचे दोन गट बनले होते. पहिला गट होता महाविकास आघाडी व दुसरा पक्ष होता मित्रपक्ष. मित्रपक्षात तीन प्रमुख पक्ष व इतर,लहानमोठे पक्ष होते. तर महाविकास आघाडीतही तीच स्थिती होती. नुकताच एक बदलाव झाला होता. महाविकास आघाडीतील दोन पार्ट्या होत्या, त्यांना न्यायालयानं दोन नवीन चिन्हं दिलं होतं. तर त्यांच्याच पक्षाचं असलेलं जुनं चिन्हं हे मित्रपक्षाच्या पार्टीला दिलं होतं. त्यामुळंच संभ्रम होणार होता. तसाच फरकही पडणार होता. हे वसीमला माहीत होतं. परंतु वसीम ती गोष्ट कोणाला सांगून ...Read More