चंद्रहास चक्रपाणी च्या पुस्तकातील शेवटचे प्रकरण.........11.पळून जातांना चक्रपाणीला त्याच्या मूळ वेषातच बाहेर जावे लागणार होते, त्याच्याच गाडीने.पण त्याला बाहेर जायचे स्वातंत्र्य देण्यात आल्यामुळे पहारेकरी अडवणार नव्हते.तसंच घडलं. दुबईच्या विमान तळाच्या दिशेने चंद्रहास चक्रपाणीने गाडी पिटाळली........ गाडीच्या वेगाने मनातले विचार पळत होते.खऱ्या प्रजापतीला भेटायची संधी त्याला मिळालीच नाही.त्याला त्याच्या दुष्ट आईने, प्रशिला ने खरंच खोलीत जखडून ठेवला होता आणि चंद्रहास ला भासवल होतं की त्या खोलीत मालविका असते म्हणून. प्रजापती हृदय विकाराचा झटका येऊन मेल्याचं समीप ला योगायोगानेच ,क्रॉस फोन कनेक्शन मुळे समजलं. पण तो दोन वर्षापासून खरंच आजारी असल्याचा दाखला मालविका ने चंद्रहास ला दिला होता म्हणून त्या वरून प्रशिलाचा खोटेपणा