(टीप :ही कथा वाचण्यापूर्वी कृपया “नारीशक्ती” या पुस्तकाचा पहिला भाग वाचा. कारण या कथेतल्या अनेक घटना, पात्रं आणि त्यांच्या भावनिक प्रवासाचा धागा त्या भागाशी जोडलेला आहे. पहिला भाग वाचल्यास ही कथा अधिक समजून घेता येईल आणि तिचा आस्वाद अधिक छान घेता येईल.)आरती आता तिच्या जिल्ह्यात एक सुपरहिरोप्रमाणे ओळखली जाऊ लागली होती. तिच्या ‘नारी शक्ती’ मिशनने अनेक महिलांना प्रेरणा दिली होती. पण यशासोबतच नव्या समस्या आणि आव्हानंही समोर येऊ लागली होती. गावात आणि आजूबाजूच्या परिसरात तिच्या कामामुळे काही शक्तिशाली लोक नाराज झाले होते. राकेश, संजय आणि विक्रम यांना फाशीची शिक्षा झाली होती, पण त्यांच्या मागे असलेली गुन्हेगारी टोळी अजूनही सक्रिय होती.