शब्दच घडवितात महाभारत ------------------------------------------- "माणसाचं आयुष्य प्रचंड चढ-उतारांनी भरलेलं असतं.. आयुष्यातला कोणता दिवस तुम्हाला कोणत्या भूमिकेमध्ये नेऊन ठेवेल आपण सांगू शकत नाही.. जीवनाच्या रंगमंचावर रोजचे अभिनय वेगळे तसे आपल्या आजूबाजूच्या जगाचे रंगही त्यासोबत दिसू लागतात.. कठीण प्रसंगात आपली माणसं ओळखण्याची कला दडलेली असते पण कठीण प्रसंगी आपण आपला "विवेक" गमावून बसलेलो असतो.. स्त्री असो वा पुरुष बोलताना शब्द नेहमी जपून वापरावेत. नाहीतर किती मोठा अनर्थ घडू शकतो हे महाभारताच्या घडलेल्या या उदाहरणावरून लक्षात येईल.