नियोजन; शिक्षकांनी करायलाच हवं? नियोजन....... नियोजनाला शालेय दृष्टीकोनातून अतिशय महत्व आहे. कारण शालेय स्तरावर नियोजन नसेल तर शालेय उद्दिष्ट पुर्ण करायला मर्यादा येत असतात. शालेय नियोजन केल्यानं शैक्षक तर सक्षम बनतातच. विद्यार्थी सुद्धा सक्षम बनू शकतात. नियोजन...... कोणतेही काम करायचे झाल्यास नियोजनाला फार महत्त्व आहे. उदाहरणार्थ एखादा विवाह प्रसंग. विवाहप्रसंगात नियोजन करतांना आपण मुलगी बघण्यापासून तर तो विवाह कसा पार पाडायचा? याचं नियोजन आधीच करीत असतो. पैसा लागत असेल तर त्याचेही नियोजन करीत असतो. विवाहसोहळ्यात कोणत्या पाहुण्यांना बोलवायचे व कोणत्या पाहुण्यांना नाही? हेही आपण निश्चित करीत असतो. त्यातच कोणत्या पाहुण्यांना अहेर