नुकतीच अरुणाचल सहल पार पडली तेव्हा सेला पास पहायला गेलो तिथेच रायफलमॅन जसवंत सिंगचे स्मारक आहे "अनाम वीरा जिथे जाहलातुझा जीवनाअंत स्तंभ तिथे ना कुणी पाहिलापेटली ना वात" असे म्हणले तर वावगे ठरणार नाही त्यांच्या विषयीचा इतिहास स्थानिक लोक आणि गाईड यांच्याकडून असा समजला नुरानंगच्या लढाईदरम्यान रायफलमॅन जसवंतसिंग ईशान्य सीमावर्ती एजन्सी (आता अरुणाचल प्रदेश) मध्ये चौथ्या गढवाल रायफल्सच्या चौथ्या बटालियनमध्ये कार्यरत होते.१९६२ च्या भारत-चीन युद्धात चिनी सैन्याची प्रचंड संख्या व आपले कमी संख्याबळ यामुळे रायफलमॅन जसवंत सिंग रावत यांना पोस्ट रिकामी करण्याचे आदेश मिळूनही रायफलमॅन रावत यांनी पोस्ट सोडली नाहीमी इथेच लढणार आणि शत्रूला पुढे येऊ देणार नाही अशी त्यांनी भूमिका घेतली त्यांच्या या भूमिकेने त्यांच्या बरोबर