"आई, या पपईच्या बिया कशा फेकून देत असतेस? यांच्यापासून तर पुन्हा झाड होऊ शकतं ना?" — आठ वर्षांचा अर्णव प्रश्नार्थक डोळ्यांनी माझ्याकडे पाहात होता. हातात त्याच्या फळांच्या वाटीत काही पपईचे ताज्या बिया होत्या, आणि चेहऱ्यावर एक निरागस कुतूहल. लहानसा अर्णवनिसर्गा वरती खूप प्रेम करतो. निसर्गाची काळजी कशी करायची. प्रश्न त्याच्या मनात नेहमीच राहायचं.. आणि त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांची आजी नेहमी त्याला द्यायची. फोन कदाचित त्याचे निसर्ग वरती खूप प्रेम होतं.मी क्षणभर थबकले. रोजच्या सवयीने पपईचे साले आणि बिया थेट कचऱ्याच्या पिशवीत टाकणारी मी, त्या छोट्या मुलाच्या तोंडून आलेल्या त्या प्रश्नाने थोडीशी मनात कुबुजली."हो रे राजा, झाडं होऊ शकतात त्यांच्यापासून..." मी