माणूसकी

  • 612
  • 264

डोंगराच्या कुशीत वसलेलं चारशे उंबऱ्यांचं आनंदवाडी हे छोटसं गाव. गावाला वळसा खळखळ वाहणारी नदी. डोंगर आणि गावाच्या मध्ये असलेली सुपीक जमीन. आणि त्या गावातील कष्टकरी आणि माणुसकीने वागणारी प्रेमळ माणसं. त्यामुळे आनंदवाडी गावाची पंचक्रोशीत एक वेगळीच ओळख होती. त्या गावात सर्व जाती, धर्माची लोकं गुण्या गोविंदाने नांदत होती. गावातील कोणत्याही जातीतील माणसाच्या घरी शुभकार्य असेल तर जात न पाहता सर्व गाव त्या कुटुंबाच्या मदतीला धावायचा. कार्यक्रमा निमित्त जेवणासाठी सर्व गावकऱ्यांना चूलबंद आवतनं (जेवणासाठी निमंत्रण) असायचं. गावातील कोणीतीही व्यक्ती मयत झाली तर सर्व गाव त्या कुटुंबाच्या दुखात सहभागी व्हायचं. त्याच चांगल्या गावामध्ये आजच्या नव्या पिढीतील दोन जिवलग मित्र राहत होते. सचिन