६ तो ऋतू परीवर्तन आणणारा होता. तसा आज पाऊस पडला होता. गार वारेही सुटले होते. त्यातच तिला आठवला देव. ज्याला तिनं महाभयंकर त्रास दिला होता. आज तो तिच्या सकाळी स्वप्नातही येवून गेला होता. ती दुःखातच होती. कारण तिचे पती. आज तिनं विवाह केले होते. तसे तिचे चार पाच विवाह झाले होते व हा चवथ्या क्रमाकांचा पती मुस्लीम होता. तिचं आतापर्यंत कोणाशीच पटलं नव्हतं. ज्यातून तिला सर्वांनीच सोडलं होता व आता नाईलाजास्तव तिला वेगळ्या धर्माच्या व्यक्तीचा पती म्हणून स्विकार करावा लागला होता.